श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
क्षणार्धात संपला, सुंदर स्वप्नांचा डाव
श्री आशिष बिवलकर ☆
☆
निष्पाप निरागस,
जीव तीन कोवळे |
झडप काळाची,
पाणावलेत डोळे |
*
सुंदर फुलण्याआधीच,
काळाने कळ्या तोडल्या |
क्रूर निष्ठुर नियतीने,
अग्नीकुंडात जाळल्या |
*
निरागस नजर,
निरागस त्यातले भाव |
क्षणार्धात संपला,
सुंदर स्वप्नांचा डाव |
*
मृत्यू म्हणजे काय,
समजण्यापलीकडचे वय |
गाठले मृत्यूने त्यांना,
कशाचीही नाही केली गय |
*
हसतं खेळतं कुटुंब,
क्षणात झालं उध्वस्त |
अग्नीच्या ज्वाळांनी,
क्षणात केलं फस्त |
*
सांग ना गं नियती,
इतकी निष्ठुर का वागली |
गोऱ्या गोबऱ्या गालांवरची,
लाली कशी ना तुज उमगली |
*
वज्राहून कठोर हृदये,
ती देखील पिळवटलीत |
पाहून मृत्यूचे थैमान,
करोडो मनं हळहळलीत |
*
शेवटचा गोड हा सेल्फी,
लावून गेला जीवाला खंत |
वैरी जरी असला कोणी,
नसावा त्याचा असा अंत |
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
दि. 14 जून 2025
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




