संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “मनात आलं तर करून टाकावं..“ ☆ संध्या बेडेकर ☆
आमची नागपुरची ट्रीप ठरली. माझ्या दिरांकडे सोळा सोमवार चे उद्यापन चा मोठा कार्यक्रम होता. एवढ कठिण व्रत मी तर काही करू शकत नाही. कमीत कमी असा कार्यक्रम अटेंड करावा. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आपल्या जावेचे कौतुक, अभिनंदन म्हणून आम्ही जायचे ठरवल.
खरंतर आमचे सर्व नातेवाईक या कार्यक्रमात भेटणार होतेच. तरी मनात आलं आपल्यापेक्षा जेष्ठ मंडळीला यावेळेस त्यांच्या घरी जाऊन भेटावे.. जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांचे आयुष्यातील किस्से ऐकावे. आपल्याच घराण्या बद्दल अनेक गोष्टी कळतील. मुख्य म्हणजे थोडा आनंद घ्यावा आणि द्यावाही. अनुभवाच्या शाळेत थोड शिकून याव.
आता आम्हीच senior citizen category त आलो आहोत, त्यामुळे काही बंधन वाढत्या वयामुळे तर काही सध्या च्या इकडच्या तिकडच्या बातम्या ऐकून मनात घर करून बसली आहेत. थोडी हिम्मत ही कमी झाली आहे. आणि नागपूरचे आमचे जेष्ठ तर Super Senior category तच आहेत. काही तर नव्वदी पार century च्या जवळपास.
यावेळेस भेटून याव, अस आमच बोलण झाल.
सहजच मी माझी मैत्रीण रमाला आमचा नागपुर प्रोग्राम सांगितला.
रमा म्हणाली
अरे व्वा ! छान. मनात आलंय न तर नक्की जाऊन या. अग! नंतर पश्चाताप व्हायला नको.
आज आमचे हे reservation करायच म्हणून सकाळी आठ वाजताच लॅपटाॅप घेऊन बसले. मला म्हणाले करू ना नक्की reservation ? काढू ना तिकिट ?
अग! नाहीतर केंसल करण्यात उगीचच पैसे वाया जातात.
सहज माझ्या मनात आल,
हा एप्रिल महिना, नागपुर ची गर्मी. आज तर गर्मीचा कहरच होता. आपण ठरवतो तर आहे, पण झेपणार आहे का आपल्याला ? तिथे जाऊन आजारी पडलो तर. तशी पुण्याची गर्मी पण काही कमी नाही पण इथे आपण घरातच असतो ना. सध्याकाळी छान थंड होत. जमेल का आपल्याला ?
मी म्हंटल अहो ! थांबा जरा. आज राहू द्या. उद्या बघू.
यांची चिडचिड बडबड मला ऐकू येत होती. पण काय करू ? एक मन म्हणत होत हो तर लगेच दुसर मन अनेक कारण सांगून नागपूरला या सीझन मध्ये जाण कस चूक आहे, हे पटवून देत होत. दोघांच्या वादविवादात माझा गोंधळ उडाला होता.
मला निर्णय घेणे जमत नव्हत.
संध्याकाळी रमाकडे चैत्र गौरीचे हळदीकुंकू म्हणून तिच्या घरी गेले, तर तिने सहज विचारले काय ग ! झाले का reservation?
मी म्हंटल नाही ग. अग! नागपूरची गर्मी बघून हिम्मत होत नाहिये.
हळंदी कुंकवाला आलेल्या बायकांनी तर हा विषय उचलूनच धरला. पुन्हा तसेच
हो आणि नाही चे दोन पक्ष तयार झाले.
रमा म्हणाली,
अग! लोक राहतात ना तिथे. अग! AC taxi मिळते तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता, तिथे रात्री राहण शक्यअसल्यास रहा तिथे.
रमा आमच्याच बिल्डिंग मध्ये येवढ्यातच रहायला आलेली. Morning walk ला भेट होत गेली आणि आम्ही मैत्रीणी झालो.
रमा म्हणाली अग ! मी माझा अनुभव सांगते.
मी नागपूरला आणि माझा भाऊ वर्धा येथे. म्हणजे जवळच रहात होता.
रवी मला सारख म्हणायचा,
ताई ! ये ना. माझ नवीन घर, दवाखाना बघायला ये.
खरतर कोणत्याही शनिवार-रविवार मी सहज जाऊ शकले असते. पण या शनीवारी हे काम। तर पूढच्या रवीवारी ते काम, अस होत गेल, आणि माझ जाण झाल नाही.
अशाच एका शुक्रवारी फोन वाजला.
रमेश म्हणाले ” आला तुझ्या भावाचा फोन. अग ! या शनिवार-रविवारी जाऊन ये. अग! काम काय होत राहतील.
आता फोनवरच तस सांग त्याला.
मी फोन घेतला आणि बोलणारच, तेवढ्यात वहीनीने रडत रडतच रवी गेल्याची बीतमी सांगितली.
म्हणाली, ताई तुमची खूप वाट बघत होते हो हे.
या वाक्याने तर मी पार कोलमडून पडले..
मला माझीच लाज वाटू लागली.
जी कारण सांगून मी एवढ्या जवळ असून गेले नाही, त्यातील एक तरी कारण वाजवी होत का ? खूप महत्वाच होत का ? ते काम नंतरही करता आल असत ना.
मी का नाही गेले? आजही राहून राहून हा विचार मला बधीर करतो.
म्हणतात ना,
Dead people receive more flowers than. Living ones, because
Regret is stronger than gratitude
आजपर्यंत मी स्वतःला माफ करू शकले नाही.
कितीही काम असू दे. अग! कितीही ऊन असू दे मी केलेली चूक कोणीच करू नये. नंतर फक्त पश्चाताप होतो.
रमा बरोबरच बोलत होती. खूपदा वेळेवर निर्णय चूकतात आणि नंतर वाईट वाटत. गोष्ट काही खूप मोठी असते अस नाही. कधी कधी तर एखाद्या घरची आनंदाची बातमी असते तर कधी दुःखद असते. ऐकल्यानंतर मनात फोन करायचा विचार येतो. पण कधी कधी तर उगीच काहीही विशेष कारण नसताना राहून जातो. आणि मग आता तर ती गोष्ट जूनी झाली, या विचाराने राहून जातो.
याचा सरळ साधा उपाय म्हणजे
मनात आल की लगेच करून टाकाव.
हाच आहे.
आज घरी आल्यावर विचारांची दिशाच बदलली. गर्मी असली तरी आपल्याला कशी आपली काळजी घेऊन नागपूर ट्रीप manage, , करता येईल या प्रश्नाची दहा उत्तर मिळाली.
सोचने से सूझता है, और ढुंढनेसे मिलता है।
हेच बरोबर आहे. फक्त रमा सारखी मैत्रीण हवी जी विचारांची दिशा बदलू शकेल..
आम्ही नागपूर ट्रीप करून आलो. विशेष असा त्रास काही झाला नाही. आनंद, समाधान मात्र खूप मिळाल. आपल्याच घराण्यातल्या अनेक गोष्टी, सणवार पद्धती, पूर्वजांच्या अनेक गोष्टी कळल्या. मनापासून दिलेले भरपूर आशिर्वाद मिळाले.
लक्षात आल, अडचणी मनात असतात. अति विचार करून आपण त्यात भर घालतो.
म्हणतात ना
Whether it”s a machine, house or relationship
Maintenance is always easier, cheaper than repairing.
You need not have to regret later.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





