श्री सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “एक उघडं कटू सत्य…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
“IITs भारत घडवत नाहीत, USA घडवत आहेत – हे उघडं सत्य”
IIT मधील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून झटत असतात, पण भारतासाठी नाही. आपल्या कराच्या पैशावर ते अमेरिका/युरोपची साम्राज्ये मजबूत करत आहेत.
१९४७ पूर्वी आपण East India Company ची सेवा केली. आज आपण West Coast Company समोर नतमस्तक आहोत.
.
हे कुणी सांगत नाही, पण सत्य आहे—
सरकार एका IIT विद्यार्थ्यावर ४ वर्षांच्या B.Tech कार्यक्रमा दरम्यान ₹.१०–१५ लाख खर्च करते.
२०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी IIT चा एकूण बजेट आहे ₹.९,६६० कोटी.
त्यातील फक्त थोडाच भाग विद्यार्थी भरतात. अनेकांना शिष्यवृत्तीमुळे अजिबात फी द्यावी लागत नाही. उरलेला पैसा कोण भरतो? तुम्ही/आम्ही.
.
मग सुरुवात होते विश्वासघाताची—
३०–३६% IIT पदवीधर परदेशात स्थलांतर करतात.
JEE मधील पहिल्या १०० विद्यार्थ्यांपैकी ६२% शेवटी US किंवा युरोपमध्ये स्थायिक होतात.
जे भारतात राहतात त्यातील ७०% परदेशी MNC मध्ये काम करतात: Google, Amazon, Microsoft, McKinsey इ.
पण, DRDO, ISRO किंवा BARC मध्ये काम करणारे फक्त २–३%.
.
राष्ट्रनिर्मिती? कुणाला पर्वा नाही.
.
IIT चे स्वप्न आज “जागतिक मजूर निर्यात” बनलं आहे.
आणि दर प्रजासत्ताक दिनी आपण IIT ला भारताचा मुकुटमणी म्हणून मिरवतो.
पण कुणी विचारत नाही—
हेच का अब्दुल कलाम, होमी भाभा, विक्रम साराभाई यांचे स्वप्न होते?
.
ही संस्था atomic research साठी, ग्रामीण वीजपुरवठ्यासाठी, भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी उभारल्या गेल्या होत्या.
आज त्या कॅलिफोर्नियातील शेयर होल्डर्सचे नफे वाचवतात.
एक आकडा ऐका—
अमेरिकेतला एक software engineer वर्षाला ₹.१.५ कोटी कमावतो.
ISRO मधला एक entry level शास्त्रज्ञ वर्षाला ₹.१२ लाख कमावतो.
हे brain drain नाही.
हे राज्य प्रायोजित cognitive asset laundering आहे.
आपण खर्च करून त्यांना घडवतो. पाश्चात्य देश ते “मन” विकत घेतात.
आणि आपल्याला मिळतं काय?
सुंदर पिचाईसोबत एक सेल्फी.
किंवा एखाद्या भारतीय CEO वर LinkedIn वर टाळ्या.
जर हे तेजस्वी मेंदू HAL, BHEL, Bharat Electronics चालवायला गेले असते तर?
आपण हा प्रश्न विचारत नाही.
कारण आतून आतून आपण अजूनही गुलाम आहोत—फक्त आता जास्त पगार मिळतो.
.
१९४७ पूर्वी आपण कापूस आणि हिरे निर्यात करत होतो.
आता आपण बुद्धिमत्ता निर्यात करतो.
आणि त्याचा उत्सव साजरा करतो.
.
का?
कारण आपण व्यक्तिगत यशाला राष्ट्रीय अभिमान समजतो.
.
मग धोरण कुठं आहे?
सरकारी पैशावर शिकणाऱ्यांसाठी ५ वर्षांची national service bond का नाही?
विदेशी MNC ना आपल्या राष्ट्रीय संस्थांतून भरती करायला परवानगी का?
जर त्यांनी भारताच्या मूलभूत क्षेत्रांत गुंतवणूक केली नाही तर?
का कुणी हे म्हणत नाही—बस्स!
.
एक National Brain Retention Plan तयार करा.
IIT नंतर भारताची सेवा करणं हा सन्मान बनवा, शिक्षा नाही.
.
हे Viksit Bharat नाही.
हे Outsourced Bharat आहे.
.
तुम्ही कर भरता.
तुम्ही त्यांची स्वप्नं घडवता.
ते दुसऱ्या देशाला घडवतात.
आणि जन्मभूमी टाळ्या वाजवत उभी राहते.
.
कुणी लिहलंय माहिती नाही, पण १००% बरोबर लिहलंय.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





