☆ “खाण्याचे शास्त्र…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
☆
खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.
रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात.
उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही, तोपर्यंत ‘घ्या’ म्हणायला माझं काय जातं म्हणा!
तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे.
पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखानं नांदणार नाहीत.
जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो, तसा जिलबी आणि… छे!
जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.
खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं
जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात.
रागांप्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत.
सकाळी यमन बेचव वाटतो.
सकाळी थालीपीठही बेचव वाटतं.
मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मध्ये बसतं.
सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा.
बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं.
सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहोत, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत.
अधिकचं हे असं आहे.
लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात.
हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं.
शहाळ्याचं पाणी हापिसात बसून
पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत.
मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे.
आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे.
खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेत्ते होते.
उपासाचं खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. ‘उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. ‘
लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. ‘हरहर महादेव’ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे.
माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई.
सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा.
सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे.
होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा.
दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते.
संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर ‘गोड गोड बोला’ म्हणतील लोक.
कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दूध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं.
गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या?
आपण IIT-IIM च्या डिग्रीला “इंटेलिजन्स” म्हणतो, पण जी बाई रोज सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत किचन नावाची कंपनी CEO सारखी चालवते, तिच्या IQ चं सर्टिफिकेट कोण देणार?
तू सांगितलेले 8 विषय + माझ्याकडून 2 एक्स्ट्रा:
विषय: किचनमध्ये काय होते? बाहेरच्या जगात काय म्हणतात?
गणित: “4 लोकांसाठी 2 वाटी डाळ, पण सासूबाई आल्या तर 2. 5” Resource Planning, Demand Forecasting
भौतिकशास्त्र: तेलाचा “तडतड” आवाज ऐकून तापमान कळणं Thermodynamics + Acoustics
रसायनशास्त्र : दही लावताना ‘ऊब’ बरोबर लागली का? Bio-chemistry + Fermentation Tech
मॅनेजमेंट: गॅसवर डाळ, कुकरमध्ये भात, तव्यावर पोळी, मनात उद्याचा स्वयंपाक Parallel Processing + Time Management
बोनस 1: Nutrition: ताप आल्यावर पेज, पावसाळ्यात गरम सूप, परीक्षेला दूध-बदाम Dietician + Preventive Healthcare
बोनस 2: Diplomacy: सासूला कमी तिखट, नवऱ्याला जास्त तिखट – एकाच भाजीत 2 चव Stakeholder Management
3 गोष्टी ज्या कुठल्याही MBA मध्ये शिकवत नाहीत:
“उरलं-सुरलं” ची कला: रात्रीची पोळी → सकाळचा कुस्करा. भात उरला → दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात. Waste = 0%. हे आहे Circular Economyचा बेस्ट नमुना.
“मूड डिटेक्टर”: घरात कोणी उपाशी झोपलं तर तिला झोप लागत नाही. ती कॅलरी मोजत नाही, चेहऱ्यावरचं समाधान मोजते.
“अदृश्य ओव्हरटाइम”: ऑफिसमध्ये 9-5 नंतर OT चे पैसे मिळतात. किचनमध्ये रात्री 11 ला मुलाला भूक लागली तर बिनपगारी एक्स्ट्रा शिफ्ट. तरी तक्रार नाही.
म्हणूनच रावणाच्या सोन्याच्या लंकेपेक्षा आईच्या हातच्या वरण-भाताची किंमत जास्त.
तू आधी पाठवलेल्या “Silent Kitchen” मेसेजचा पुढचा भाग हा आहे. अमेरिका किचन विसरली, म्हणजे तिने “डिग्रीशिवायच्या CEO”ला रिटायर केलं. परिणाम: कुटुंब तुटलं.
जपान आजही जगात सर्वात जास्त जगतो कारण तिथे “ओफुकुरो नो अजी” = आईच्या हातची चव ही सांस्कृतिक संपत्ती मानली जाते.
आज काय करायचं? 3 मिनिटांचं “थँक यू किचन” प्रोटोकॉल:
☆ स्फटिक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
☆
दिव्यसहस्रनामाचा जन्म आणि जगातला पहिला ‘Tape Recorder’ : स्फटिक
कुरुक्षेत्रावर कोणी notes घेतले नाहीत, मग विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत कसे पोहोचले?
आपल्याला माहीत असलेली गोष्ट :
भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर. युधिष्ठिर समोर. श्रीकृष्ण साक्षीला. वेदव्यास उपस्थित. भीष्मांनी विष्णूची एक हजार नावे सांगितली.
आपण सगळे हे जाणतो.
पण एक प्रश्न कधी मनात आला का?
त्या भयाण रणांगणावर, बाणांच्या शय्येजवळ बसून कोणी notes घेतल्या होत्या का? कागद होता? लेखणी होती? कोणी लिहित होते का?
नाही.
आणि इथेच सुरू होते, ती गोष्ट ~ जी तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल.
भीष्मांनी सांगितले ~ पण कोणी लिहिले नाही!
भीष्म पितामह जेव्हा विष्णूची सहस्त्र नावे सांगत होते, तेव्हा तिथे असलेले सगळे म्हणजे युधिष्ठिर, पाचही पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्मांचे सांगणे संपले आणि सगळ्यांनी डोळे उघडले.
पहिला आवाज आला युधिष्ठिराचा–
“थांबा… पितामहांनी एक हजार नावे सांगितली. आपण सगळे ऐकत होतो. पण कोणी लिहून ठेवले का? क्रम गेला! सहस्त्रनाम हरवले!”
सगळे एकमेकांकडे पाहू लागले.
मग सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिले..
“तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल!”
श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले “मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो. माझ्याकडेही उत्तर नाही. ”
सगळे हतबल झाले. इतके मोठे ज्ञान आणि ते हरवणार?
मग श्रीकृष्णाने सांगितला एक अद्भूत उपाय!
श्रीकृष्ण म्हणाले : एकच मार्ग आहे. सहदेव.
सगळे चकित झाले. सहदेव? पाचव्या पांडवाला हे कसे शक्य होईल?
श्रीकृष्ण म्हणाले “सहदेव हा आपल्यात एकमेव असा आहे, जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे, की शांत वातावरणात उच्चारलेले शब्द तो आपल्यात साठवून ठेवतो. भीष्मांनी जेव्हा ती नावे सांगितली, तेव्हा सहदेवाच्या स्फटिकाने ते सगळे टिपून ठेवले आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले, तर तो स्फटिकातून ते ध्वनी परत मिळवू शकतो आणि वेदव्यास ते लिहून घेतील. “
जगातील पहिला ‘Tape Recorder’
स्फटिक!
सहदेव आणि वेदव्यास त्याच जागी बसले, जिथे भीष्म पितामहांनी सहस्त्रनाम सांगितले होते.
सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एकेक नाव लिहून घेऊ लागले.
असे वेदव्यासांनी विष्णू सहस्त्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले.
हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, “जगातील सर्वात पहिला Tape Recorder म्हणजे हा ‘स्फटिक’ ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्त्रनाम जपून ठेवले. “
हे ऐकून सगळे स्तब्ध झाले.
आणखी एक गोष्ट, जी कमी माहीत आहे.
महाभारतात दोन महान उपदेश आहेत : एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता आणि दुसरा युधिष्ठिराला भीष्मांनी दिलेले विष्णू सहस्त्रनाम आणि हे दोन्ही वेदव्यासांनी लिहून ठेवले. विशेष म्हणजे, विष्णू सहस्त्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोता होते!
विचार करा… ज्याची नावे सांगितली जात होती, तो स्वतः ऐकत होता!
हे किती जुने आहे?
महाभारत युद्ध साधारण इसवीसनपूर्व ३०६७ मध्ये झाले, असे मानले जाते ~ म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत येऊन आता जवळपास ५१०० वर्षे झाली आहेत.
५१०० वर्षांपूर्वी रणांगणावर सांगितलेले, एका स्फटिकात साठलेले; वेदव्यासांनी लिहून ठेवलेले आणि आज आपण घरी बसून म्हणतो. हा धागा तुटला नाही, कारण श्रद्धा तुटली नाही.
आजचा विचार :
पुढच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम जेव्हा म्हणाल, तेव्हा एक क्षण थांबा!
कुरुक्षेत्राच्या त्या भयाण रणांगणावर, बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले, वेदव्यासांनी जे लिहिल; ते ५१०० वर्षांनंतर तुमच्या ओठांवर आहे.
हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, ही दिव्य स्पंदनं आहेत!
॥ॐ नमो भगवते वासुदेवाय॥
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
’हसणं’ ही ईश्वराने फक्त माणसाला दिलेली एक अद्भुत देणगी आहे. पण आजच्या धावपळीच्या जगात आपण हे साधं, सोपं सुख कुठेतरी हरवून बसलोय की काय, असं वाटतं. ज्या दिवशी आपण मनमोकळं हसलो नाही, तो दिवस खरोखरच ‘वेस्ट’ आहे.. !
आयुष्यात संकटं कोणाला नाहीत? प्रत्येकाच्या पाठीवर दुःखाची एक छोटी-मोठी गोणी असतेच. पण जो माणूस या संकटांकडे बघून एक ‘तिरकस’ का होईना, पण हसू देऊ शकतो, त्याच्यातला अर्धा ताण तिथेच विरघळतो.
लहानपणीच्या त्या “हसी तो फसी” या डायलॉगमध्ये आपण अडकून पडलो होतो, पण मोठेपणी कळतं की हसू हे कोणाला ‘फसवण्यासाठी’ नाही, तर स्वतःला ‘सावरण्यासाठी’ असतं. लाफ्टर थेरपीमध्ये कृत्रिमरीत्या हसणारे लोक जेव्हा आपण पाहतो, तेव्हा जाणीव होते की, ‘आतलं हसू’ आज किती महाग झालंय. समोरच्याचा अपमान करण्यासाठी आलेलं हसू हे विष असतं, तर कुणाचं दुःख हलकं करण्यासाठी दिलेलं हसू हे अमृत असतं. स्वतःवर हसायला ज्याला जमतं, त्याला जग जिंकणं सोपं जातं. जगातील सर्वात पुण्यवान माणूस तोच, जो स्वतःच्या डोळ्यात पाणी असताना समोरच्याला हसवण्याची ताकद ठेवतो.
तुमचा हसरा चेहरा हा केवळ तुमचा दागिना नाही, तर तो तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी एक आशेचा किरण असतो. म्हणूनच, अट्टाहासाने का होईना, पण हसायला शिका. आरशात बघून स्वतःला एक स्माईल द्या, जुन्या आठवणी काढून मित्रांसोबत खिदळा आणि हो… एखादा विनोद समजला नाही, तरी दुसऱ्याचं हसू बघून हसा! त्यातही एक वेगळीच मजा आहे.
हसण्याचं हे ‘बजेट’ कधीच कमी होऊ देऊ नका!
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मैत्रिणींचं माहेरपण… – लेखिका : अर्चना अनंत ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆
☆
शरयू मोबाईल हातात घेऊन शांतपणे बसली होती. सकाळपासून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एकामागून एक स्टेटस दिसत होते.
”अधिक मासाचं वाण मिळालं…”
“माहेरहून ओटी आली…”
“भावाने खास बोलावलं…”
कुठे लेकींचे फोटो, कुठे माहेरच्या अंगणात काढलेले क्षण, तर कुठे आईच्या हातचा स्वयंपाक.
स्टेटस पाहताना शरयूच्या ओठांवर हलकंसं हसू आलं, पण मनात कुठेतरी एक हुरहूर दाटून आली.
”आपलं असं कौतुक कधी झालंच नाही…” ती स्वतःशीच पुटपुटली.
खिडकीतून बाहेर नजर गेली. समोरच्या झाडावर पक्षी किलबिल करत होते. घरात सगळं सुरळीत होतं. संसार, मुलं, जबाबदाऱ्या… काहीच कमी नव्हतं.
तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात माहेर नावाचा एक नाजूक धागा अजूनही जिवंत होता.
तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं — माधवी.
”हॅलो, काय करतेस गं?” माधवीने विचारलं.
”काही नाही गं. हे अधिक मासाचे स्टेटस बघत होते.”
माधवी हलकंसं हसली, “माझंही तेच चाललंय. आई-बाबा होते तोपर्यंत थोडंफार तरी अधिक मासाचं कौतुक व्हायचं. आता तर माहेरच संपलं म्हण ना!”
क्षणभर दोघीही शांत झाल्या.
”अगं, आपण आता पन्नाशी पार केलीये. कुठे अशा अपेक्षा ठेवायच्या आता?” शरयू म्हणाली.
”अपेक्षा नाही गं…” माधवीचा आवाज किंचित भरून आला, “पण कधीतरी वाटतं ना… कुणीतरी हक्काने म्हणावं, ‘ये गं माहेरी.’ भाऊ आहे, वहिनी आहेत. त्यांचा संसार, त्यांची मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या… तेही त्यांच्या जागी चुकीचे नाहीत. पण मनातली माहेराची ओढ कधी संपत नाही गं!”
शरयूच्या मनातलं जणू माधवीच बोलत होती. फोन ठेवला, पण दोघींच्या मनातले विचार थांबत नव्हते.
शरयूने लगेच त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला — “सांगा बरं, तुमचं माहेरपण अजून टिकून आहे का?”
काहीच क्षणांत उत्तरांचा पाऊस सुरू झाला…
”माझा तर भाऊच नाही…”
“आई गेल्यापासून माहेरी जाण्याचं कारणच उरलं नाही…”
“भाऊ आहे, पण आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही गं…”
“माहेर आहे, पण तिथे आता माहेरपण नाही…”
एकामागून एक मेसेज वाचताना शरयूच्या लक्षात आलं की, ग्रुपमधली एकही मैत्रीण अशी नव्हती, जिला अजूनही जुन्यासारखं हक्काचं माहेर लाभलं होतं.
त्या रात्री शरयूने माधवीला पुन्हा फोन केला.
”ऐक, एक कल्पना आहे.”
”काय?”
”आपणच आपल्या मैत्रिणींचं माहेरपण जपायचं!”
क्षणभर पलीकडून शांतता पसरली. “म्हणजे? काय म्हणायचंय तुला?” माधवीने विचारलं.
”अधिक मासानिमित्त सगळ्या मैत्रिणींना घरी बोलवू. पण अगदी सरप्राइज! कुणालाच काही सांगायचं नाही. प्रत्येकीची ओटी भरायची, छोटंसं गिफ्ट द्यायचं आणि एक दिवस त्यांना पुन्हा माहेरची लाडकी लेक असल्याचा अनुभव द्यायचा.”
माधवी काही क्षण गप्प राहिली. मग तिचा भरून आलेला आवाज ऐकू आला, “शरयू… ही फक्त कल्पना नाही गं… ही तर एक सुंदर भावना आहे!”
पुढचे काही दिवस दोघींची अक्षरशः धावपळ सुरू झाली. स्वयंपाकाचा बेत त्यांनी स्वतः ठरवला. आंब्याचा रस, मऊसुत पुरणपोळी आणि सगळ्यांचे आवडीचे पदार्थ… सोबतीला ओटीचं सामान, भेटवस्तू, सजावट… सगळं काही दोघींनी मिळून केलं.
पण तयारी करताना त्यांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्नही येत होते.
”उगीच तर नाही ना करत आपण हे सगळं?”
“लोकांना आवडेल का?”
“कोणी याला नाटक तर म्हणणार नाही ना?”
“या वयात अशा गोष्टींनी कोण भावूक होतं?”
पण प्रत्येक वेळी त्यांच्या मनातून एकच उत्तर यायचं — “जर यामुळे कुणाच्या चेहऱ्यावर घटकेचा आनंद मिळणार असेल, तर हे जरूर करायचं!”
ठरलेल्या दिवशी घर फुलांनी सजलं होतं. दारात सुंदर रांगोळी काढली होती. स्वयंपाकघरातून रसाचा आणि पुरणपोळीचा सुगंध दरवळत होता.
एकामागून एक मैत्रिणी येऊ लागल्या. सगळ्यांना वाटलं होतं की, हा नेहमीसारखाच एखादा गेट-टुगेदर असेल. गप्पा, जेवण आणि जुन्या आठवणी. हशा, टाळ्या, कॉलेजचे दिवस, लग्नानंतरचे किस्से… घर आनंदाने आणि किलबिलाटाने भरून गेलं होतं.
आणि मग अचानक शरयूने घोषणा केली, “आजचा कार्यक्रम इथेच संपत नाहीये…”
त्यानंतर एकेक मैत्रीण पाटावर बसू लागली. तिची प्रेमाने ओटी भरली जाऊ लागली, हातात सुंदर भेटवस्तू दिली गेली. आणि शरयू-माधवी दोघीही प्रत्येकीला एकच वाक्य सांगत होत्या — “आज तू आमच्या माहेरची लेक आहेस!”
ते वाक्य ऐकताच अनेकांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांना ‘लेक’ म्हणून जपलं होतं. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांच्या मनातल्या त्या रिकाम्या कोपऱ्यावर मायेचा हात ठेवला होता.
पण अजून एक भावूक क्षण बाकी होता…
ग्रुपमधली एक मैत्रीण, जिला सगळ्या जणी हक्काने “झाशीची राणी” म्हणायच्या. स्वभावाने अत्यंत कणखर, निर्भीड, कधीच न रडणारी आणि वेळ प्रसंगी सगळ्यांना आधार देणारी.
तिची ओटी भरून झाल्यावर ती काही क्षण शांत उभी राहिली. अचानक ती शरयूच्या जवळ आली आणि पुढच्याच क्षणी तिच्या गळ्यात पडून रडू लागली… अगदी एखाद्या लहान मुलीसारखी! तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली, “अगं शरयू… माझ्यासाठीही कुणी असं काही करू शकतं, असं मला कधी वाटलंच नव्हतं गं!” ती थोडी थांबली आणि पुढे म्हणाली, “आई-वडील जिवंत होते, तेव्हाही माझं असं कौतुक कधी झालं नाही… आज पहिल्यांदाच वाटतंय, मी सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे!”
क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. कोणाच्याही डोळ्यांतलं पाणी लपून राहिलं नाही.
शरयू आणि माधवी एकमेकींकडे पाहत होत्या. त्यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते. कारण त्या एका वाक्याने त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती.
”आपण उगीच तर नाही ना केलं?”, “लोक काय म्हणतील?”, “कुणाला आवडेल का?” — या सगळ्या शंकांना त्या एका भावनिक क्षणाने पूर्णविराम दिला होता.
त्यांना जाणवलं की, आपण काहीच चुकीचं केलं नाही. आपण फक्त काही रिकाम्या झालेल्या मनांना मायेचा ओलावा दिला, काही हरवलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आणि काही स्त्रियांना पुन्हा एकदा “लेक” असल्याची जाणीव करून दिली.
त्या दिवशी गिफ्टची किंमत महत्त्वाची नव्हती, की ओटीत काय होतं याला अर्थ नव्हता. महत्त्व होतं ते फक्त त्या शुद्ध भावनेला, त्या मायेला आणि त्या आपलेपणाला!
कारण स्त्री कितीही मोठी झाली, कितीही कणखर झाली, तिने कितीही जबाबदाऱ्या पेलल्या… तरी तिच्या मनात एक छोटीशी मुलगी कायम जिवंत असते, जिला कधीतरी हक्काने माहेरी जायचं असतं.
आणि त्या दिवशी शरयू आणि माधवीने त्या सगळ्या मुलींना पुन्हा एकदा त्यांचं हक्काचं माहेर मिळवून दिलं होतं.
खरंच… माहेर हे फक्त एक विटांचं घर नसतं, माहेर ही एक निखळ भावना असते. आणि त्या दिवशी त्या सगळ्या मैत्रिणींना त्यांचं हरवलेलं माहेर पुन्हा सापडलं होतं… मैत्रीच्या रूपाने!
@ अर्चना अनंत
माझं मनोगत…
ही कथा काल्पनिक नाही. यातला भावनिक अनुभव आम्ही मैत्रिणींनी प्रत्यक्ष जगला आहे. अधिक मासानिमित्त आम्ही सगळ्या मैत्रिणींना एकत्र बोलावलं, त्यांची ओटी भरली, त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुन्हा एकदा “लेक” असल्याची जाणीव करून देण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि मन भरून आलं होतं.
पण या निमित्ताने माझ्या स्वतःच्या मनातही काही विचार आले.
आम्ही चार बहिणी. वडील आमच्या लहानपणीच गेले. आर्थिक परिस्थिती जेमतेम . त्यामुळे वाण, औक्षण, भेटवस्तू किंवा अशा प्रकारचं विशेष कौतुक आमच्या वाट्याला फारसं आलं नाही. पण त्याबद्दल मला कधीच वाईट वाटलं नाही. कारण माझ्या आईने आम्हाला जे भरभरून प्रेम दिलं, ज्या ताकदीने उभं केलं आणि प्रत्येक अडीअडचणीत जी साथ दिली, त्याची किंमत कोणत्याही भेटवस्तूपेक्षा खूप मोठी होती.
आज आई नाही. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कुणीही भरून काढू शकत नाही. कितीही मोठं गिफ्ट मिळालं, कितीही प्रेमाने औक्षण झालं, तरी आईच्या मायेची सर त्याला येऊ शकत नाही.
मला वाटतं, अशा भेटीगाठी, असे उपक्रम आणि अशा प्रेमाच्या क्षणांमुळे मनाला आधार मिळतो, जुन्या जखमांवर मायेची फुंकर बसते. पण खरं माहेर आपण आपल्या आठवणींत जपून ठेवलेलं असतं. आई-वडिलांचं प्रेम, त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण हेच आयुष्यभर आपली खरी संपत्ती असते.
आपली माणसं आपल्यापासून दूर जातात, पण त्यांचं प्रेम कधीच दूर जात नाही. ते आपल्या प्रत्येक आठवणीत, प्रत्येक यशात आणि प्रत्येक संघर्षात आपल्यासोबत असतं. म्हणूनच मला वाटतं, माहेर फक्त एका घरात नसतं; ते आपल्या मनात, आपल्या स्मृतीत आणि आपल्या जपलेल्या प्रेमात कायम जिवंत असतं.
☆
लेखिका: अर्चना अनंत
प्रस्तुती: सुचिता पंडित
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈