सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “एकदा वाचून पहाच!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एकदा वाचून पहाच!!

 

जपानमध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ राहणाऱ्या एका भारतीयाने एक गोष्ट पाहिली..

त्याचे जपानी मित्र अतिशय नम्र, सभ्य आणि मदत करणारे होते,

पण त्यातील एकानेही त्याला कधी घरी बोलावले नाही…

ना चहासाठी, ना साध्याभेटीसाठी.

 

तो भारतीय थोडा आश्चर्यचकित झाला आणि दुखावला गेला.

एके दिवशी त्याने आपल्या एका जपानी मित्राला विचारले,

“तुम्ही इतके चांगले, प्रेमळ आहात… तरीही मला का कधीच घरी बोलावत नाही? ”

 

त्या जपानी मित्राने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं –

“आम्हाला भारतीय इतिहास शिकवला जातो… पण प्रेरणा म्हणून नाही, 

तर सजगता म्हणून. ”

 

तो भारतीय थक्क झाला..

“सजगता? भारतीय इतिहास सावधानतेसाठी शिकवला जातो? का?”

 

जपानी मित्र म्हणाला,

“सांग बरं, इंग्रज जेव्हा भारतात राज्य करत होते, तेव्हा किती इंग्रज असतील?”

भारतीय म्हणाला, “कदाचित… दहा हजार?”

 

जपानीने गंभीर चेहऱ्याने मान हलवली, आणि विचारलं — “आणि त्या वेळी भारतात किती भारतीय होते? ”

“सुमारे ३० कोटी, ” भारतीय म्हणाला.

 

जपानी शांतपणे म्हणाला —

“मग सांगा, अत्याचार कोणी केला? भारतीयांवर चाबकाचे फटके कोणी मारले? गोळ्या कोणी झाडल्या? ”

 

तो पुढे म्हणाला —

“जेव्हा जनरल डायरने जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश दिला, ट्रिगर कोणी दाबला? इंग्रज सैनिकांनी? —

— नाही… ते भारतीय सैनिकच होते. ”

 

“कोणत्याही भारतीयाने जनरल डायरकडे बंदूक का उगारली नाही? एकाने पण का नाही? ”

— — “तुम्ही ज्याला गुलामी म्हणता, ती शरीराची नव्हती… ती आत्म्याची होती. ”

 

भारतीय गप्प उभा राहिला, डोळ्यात पाणी.

 

जपानी मित्र पुढे म्हणाला —

“मध्य आशियातून आलेले मुगल किती होते? काही हजार? आणि तरी त्यांनी शतकानुशतके राज्य केलं…

.. ते बलाच्या जोरावर नव्हे, तर तुमच्याच लोकांच्या नम्रतेवर, त्यांच्या विश्वासघातावर. ”

— — “तुमच्याच लोकांनी धर्म बदलला, तुमच्याच लोकांनी आपल्या बहिणींचं, मुलींचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं.

— — तुमच्याच लोकांनी तुमचे नायक इंग्रजांच्या हाती दिले.

— — चंद्रशेखर आझाद कुठे लपले आहेत हे इंग्रजांना कोणी सांगितलं?

— — भगतसिंहांना फाशी देणं इतकं सोपं होते का? पण तुमच्याच लोकांनी पाठ फिरवली”

 

… “तुम्हाला बाहेरून शत्रूंची गरजच नाही. तुमचे स्वतःचे लोकच सत्तेसाठी, पदासाठी, थोड्याशा फायद्यासाठी तुम्हाला वारंवार धोका देतात.

म्हणूनच आम्ही भारतीयांपासून थोडं अंतर ठेवतो. ”

 

… “जेव्हा इंग्रज हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आले, तेव्हा एकाही स्थानिकाने त्यांच्या सैन्यात प्रवेश केला नाही.

पण भारतात? — तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती झालात, त्यांची सेवा केली, त्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्याच लोकांना मारलं. ”

 

… “आणि आजही तुम्ही बदलले नाही…

थोडीशी मोफत वीज,

एक बाटली दारू,

एक चादर दिली की

तुमचा मत, तुमचा आत्मा,

सगळं विकत घेता येतं. ”

 

… “तुमची निष्ठा देशाशी नाही, तर तुमच्या पोटाशी आहे. ”

… “तुम्ही घोषणा देता, आंदोलन करता, पण जेव्हा देशाला तुमच्या त्यागाची गरज असते, तेव्हा तुम्ही कुठे असता?

तुमची पहिली निष्ठा अजूनही तुमचे घर, कुटुंब आणि पैशाशी आहे — देश आणि धर्म नंतर. ”

 

इतकं बोलून तो जपानी शांतपणे निघून गेला,

आणि तो भारतीय तिथेच उभा राहिला —

डोळ्यांत लाज, मनात वेदना ठेऊन…

 

– – – _पुढच्या भारतीयाला पाठवा… कदाचित बदल घडेल

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments