श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? कवितेचा उत्सव ?

☆ निरोप☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

नऊ मास उदरी वाहूनी

सांभाळले मजला मातेने

उपकार अनंत असती मजवर

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

*

अनंत जन्म असतील घेतले

किती माता अन पुत्र किती

गणना त्यांची कशी करू मी

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

*

गुरुजनांनी शिक्षण दिधले

मायपित्याने ‘शहाणे’ केले

अनपेक्षित अलौकिक मज लाभले

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

*

सगेसोयरे आप्तस्वकीय

अकृत्रिम स्नेहे करती माया

जनव्यवहार शिकविला मजला

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

*

निरोप तुझा कसा मी घेऊ

जिथून आलो तेथेच जाणे

हेच ज्ञान मजला लाभावे सत्वर

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments