सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “गाठ नात्याविना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
नात्याविना नात्यात गुंतण्याची ही गाठ तु का बांधितो
कधी धागे रेशमी कधी दोरखंड सांधतो
*
कधी धागे कच्चे…. गाठ विरते
कधी तुटते कधी अर्ध्यावरही सुटते
*
रेशमी गाठी सुखाने नांदती… दोरखंडे मारती आवळून पाठी
विरल्या धाग्यांची गाठ कधी न बसते
धागा तुटलेला… गाठ मात्र सलते
*
विरलेले फसवे धागे मोहाचे असेच विरून जातात
आठवणी तयांच्या धूसर होतात करकचणाऱ्या गाठीतून
.. सुटका नसते कधीही
.. रक्तबंबाळ होण्याशिवाय पर्याय नसतो
*
गुदमरणारा श्वास दैवाचा फास तुटता तुटत नाही
तुटलेल्या गाठीचा सल हाती
.. तो जखम कुरवाळतो
.. रोज अश्रू ढाळतो
.. आतल्या आत रडतो
*
– – आणि जगाला सांगतो
” हसते रहो यार हसना मना नही……! “
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




