मंजुषा सुनीत मुळे
☆ क्षण सृजनाचा ☆
☆ काय फरक पडतो?? … मूळ हिन्दी कविता : हेमन्त बावनकर ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆
अमेरिका – इस्राईल – इराण यांच्यामध्ये सुरु झालेल्या आणि जगभर खळबळ आणि अशांतता माजविणाऱ्या तीव्र संघर्षाचे खेदजनक आणि वेदनादायक पडसाद जगभर वेगवेगळ्या प्रकारे उमटले .. उमटत आहेत.. उमटत राहणार आहेत. या युद्धातला सर्वात जास्त उद्विग्न करणारा हाहा:कार म्हणजे दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नराधमांकडून केली गेलेली अत्यंत हीन कारवाई ….. दक्षिण इराणमधल्या ‘मिनाब’ मध्ये मुलींच्या प्राथमिक शाळेवर केला गेलेला मिसाईल हल्ला. या हल्ल्यात शंभराहूनही जास्त व्यक्ती मारल्या गेल्या …. ज्यात बहुतांश व्यक्ती म्हणजे या शाळेतल्या लहान लहान मुली होत्या .. ‘ व्यक्ती’ म्हणून अजून पुरेशा उमललेल्याही नाहीत अशा मुग्ध कळ्या ..
…. ज्यांची मने दगडाचीच आहेत त्या निर्घृणांना या घटनेमुळे दु:खच काय .. साधा खेदही वाटला नसेल. पण अतिशय संवेदनशील मन असणारे हिंदी कवी श्री. हेमंत बावनकर यांच्या मनात या प्रसंगामुळे माजलेली खळबळ आणि उद्विग्नता मात्र शब्दरूप घेऊन व्यक्त झाली आणि ‘क्या फर्क पड़ता है?’ या अगदी चपखल शीर्षकाची त्यांची मुक्तछंदातली कविता कागदावर उतरली. त्यांनी अनुभवलेला सृजनाचा हा अतिशय हळवा क्षण या कवितेतून थेट हृदयाला भिडला आणि या काव्याचा स्वैर अनुवाद केल्यावाचून रहावलेच नाही …..
☆ काय फरक पडतो ? ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆
अजिबात आवाज नको हं ..
शांतता .. एकदम शांतता ..
इथे गाढ झोपल्यात लहान लहान मुली .. शंभराहून जास्त ..
हो खरंच .. शंभराहून जास्त
शिकायला चाललेल्या ..
चालल्या तर होत्या .. पण परत येऊ शकल्याच नाहीत ..
झोपवून टाकलं गेलं त्यांना .. त्या लहान लहान कबरींमध्ये ..
एका भयानक दफनभूमीमध्ये ..
– – पण .. पण यामुळे जगातल्या बाकीच्या तशाच लहान लहान मुलींना ..
त्यांच्या नातेवाईकांना .. आणि .. आणि ..
माणूस म्हणण्याच्या लायकीच्याच नसलेल्या माणसांना ..
काय फरक पडतो ???
..
त्या निष्पाप लहान मुलींना तर हेही माहिती नव्हतं की ..
देश म्हणजे नक्की काय असतं ?
देशाची सीमा काय असते ? ..
धर्म .. पंथ म्हणजे तरी काय ?
वंश म्हणजे नेमकं काय असतं ? .. यातलं काही काही माहिती नव्हतं ..
मित्र देश आणि शत्रू देश म्हणजे नेमके कोण ?
.. आणि ते कसं ठरवतात
.. हे कुठे ठाऊक होतं ?
.. .. त्यांना तर एवढंच समजत होतं की ..
सूर्य एकच असतो ..
चंद्रही एकच असतो ..
आणि ही जमीन सगळ्यांचीच असते.
त्यांचं सगळं विश्व घरापासून सुरू होतं आणि शाळेपर्यंत संपतं सुद्धा..
खायचं-प्यायचं, अभ्यास करायचा आणि आई-वडलांच्या कुशीत स्वतःला विसरून जायचं .. बस् .. ..
– – पण ज्याने कुणी त्यांच्या शाळेला लक्ष्य करून मिसाईल टाकलं ..
.. .. त्यांना या निरागस वास्तवामुळे काय फरक पडतो ???
आपल्याला तर आता सवयच झालीये ..
टि.व्ही. वर लढाया बघायची ..
व्हिडिओ गेम्स बघतो तितक्याच सहजपणे बघायची …
विनाशाच्या या खेळात आता आम्हाला दिसतच नाहीत ..
.. .. पार विध्वंस होत असलेल्या शाळा आणि रुग्णालयं ..
.. शहरं .. तिथल्या दिमाखदार इमारती ..
.. विध्वंस झालेल्या शहरांखाली दडलेली
.. गुदमरणारी शांत- स्वस्थ आयुष्यं …
.. उध्वस्त झालेल्या सुंदर बागा .. .. आता ..
.. आता लहान मुलं , स्त्री-पुरुष ,वृद्ध माणसं
.. सगळेच कसं का जगेनात नाहीतर मरेनात …
.. .. कुणाला काय फरक पडतो ???
शिकण्यासारखं तर खूप काही होतं आपल्याला …
पण काय शिकलो आपण …
– – शासक निरंकुश सत्ताधारी झाले त्यापासून ?
– – नागासाकीत अणुबॉम्बचा विस्फोट केला गेला त्यापासून ?
– – छळछावण्यांकडून ? गॅस चेम्बर्सकडून ? थेट मृत्यूच्या जबड्यात टाकणाऱ्या त्या विनाशक गॅसकडून ?
– – आतंकवादाच्या भयानक सावटाकडून ..
– – जहाल विषारी असणाऱ्या धर्मान्धतेकडून ..
– – सततची युद्ध आणि प्रचंड नरसंहाराकडून … ???
.. .. .. आणि आता हताश झालेल्या त्या शांती आणि सुरक्षिततेच्या भावनेचीच जरी हिंसा झाली
.. शान्तिदूत जन्माला येण्याची शक्यताच जरी मावळली .. तरी ..
.. तरी कुणाला काय फरक पडतो ???
.. ..
.. भविष्यातही शांतता – सुरक्षितता कदाचित अशीच गाढ झोपलेली असेल .. मृतवत् ..
.. बहुसंख्य जनता उदासीन तरी असेल नाहीतर चक्क बेपर्वा ..
.. आणि शासक .. .. भरकटलेले.. बुद्धिभ्रष्ट ..
– – खरं तर हीच अगदी योग्य वेळ आहे
– – शायर हबीब जालिब यांच्या त्या शब्दांची आठवण करून देण्याची.. ..
.. तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था
उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था..
– – पण .. .. पण त्यांना त्याचा अर्थ समजावून देणं अशक्य आहे .. कारण ..
.. कारण त्यांना कशानेच कुठे काय फरक पडतोय ???
.. .. ..
तरीही – –
तरीही आशेची ज्योत अजून विझली नाहीये ..
“ वसुधैव कुटुंबकम् “
.. “ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे “
.. .. असं अथर्ववेदात उगीच म्हटलेलं नाहीये ..
.. म्हणूनच माझ्या शब्दांना अडवणारी कोणतीच सीमा नाही ..
कुणीही जगभरात कुठेही गेलं तरी .. .. .. ..
.. …. माणुसकीचा संदेश घेऊन जाऊ देत ….
.. …. शांततेचा संदेश घेऊन जाऊ देत ….
.. .. .. .. आता मात्र असं म्हणू नका की
.. त्याने काय फरक पडणार आहे ???
“ शांती आणि माणुसकी “ या भावना नेमकेपणाने पोहोचण्याने फरक तर पडणारच ….
.. .. .. नक्कीच खूप मोठा फरक पडणार .. .. ..
मूळ हिंदी कविता : “ क्या फर्क पडता है ? ‘
कवी : * श्री. हेमंत बावनकर, पुणे *
स्वैर अनुवाद : मंजुषा मुळे
—–
श्री. बावनकर यांची मूळ हिंदी कविता :
हेमन्त बावनकर
☆ क्या फर्क पड़ता है? ☆
श्श्श्श…श्श्श
शान्त… शान्त
यहाँ सोती हैं
सौ से ज्यादा छोटी छोटी लड़कियाँ
जो पढ़ने के लिए निकली थीं.
पढ़ने तो गईं…
लेकिन, वापिस लौट न सकीं
और
सुला दी गई
उन छोटी छोटी कब्रों में
एक भयावह कब्रगाह में…
इससे,
दुनिया की बाकी छोटी छोटी लड़कियों को
उनके रिश्तेदारों को
और
इंसान न कहलाने लायक इंसानों को…
क्या फर्क पड़ता है?
वे मासूम लड़कियाँ
तो जानती भी नहीं थी कि…
देश क्या होता है?
सरहद क्या होती है?
मजहब क्या होता है?
नस्ल क्या होती है?
दोस्त देश क्या होता है?
और
दुश्मन देश क्या होता है?
वे तो समझती थी कि
सूरज एक होता है
चाँद एक होता है
और
यह जमीं सभी की होती है.
उनकी सारी दुनिया तो
घर से शुरू होकर
स्कूल तक ख़त्म हो जाती थी.
खा पीकर, पढ़ लिख कर
माँ-बाप की आगोश में खो जाती थी.
फिर,
जिस किसी ने निशाना बनाकर
उनके स्कूल पर मिसाइल दागी थी, उसे
क्या फर्क पड़ता है?
हम आदी हो चुके हैं
लड़ाइयों को टी वी पर देखने के
विडियो गेम्स की मानिंद…
तबाही के इस खेल में
अब हमें दिखाई नहीं देते
खँडहर बनते स्कूल और अस्पताल
शहर और इमारतें
शहरों-खंडहरों में दब रही
ऐशो आराम पुरसुकून आलीशान जिंदगी.
तबाह होते
खूबसूरत बाग़ बगीचे.
अब… बच्चे, मर्द-औरतें और बुजुर्ग
कैसे भी जियें या मरें,
क्या फर्क पड़ता है?
हमें सीखने के लिए तो बहुत कुछ था
फिर क्या सीखा हमने ?
हुक्मरानों के तानाशाह होने से…
नागासाकी के परमाणु विस्फोट से…
यातना शिविरों से…
गैस चेम्बरों से…
गैस त्रासदी से…
आतंक के साए से…
धर्मान्धता के जहर से…
कोविड की महामारी से…
लड़ाइयों और नरसंहारों से…
अब, अमन के नाउम्मीद उन्मादियों को
क्या फर्क पड़ता है?
मुस्तक़बिल का अमन-याफ़्ता
शायद कहीं सो रहा है…
ज्यादातर अवाम बे-रुख़ हो गई है
और हुक्मरान पगला गए हैं…
उन्हें बकौल शायर हबीब जालिब
याद दिलाना लाजमी है कि-
तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था
उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था
समझाना नामुमकिन है, उनको
क्या फर्क पड़ता है?
उम्मीद की लौ
बुझी नहीं है…
अथर्ववेद में ऐसे ही नहीं कहा गया है.
“वसुधैव कुटुम्बकम”
“पूरी दुनिया एक परिवार है”
इसलिए
मेरे अल्फाज
सरहदों के बगैर अल्फाज हैं
जो जहाँ कहीं तक पहुंचे
इंसानियत का पैग़ाम लेकर पहुंचे
अमन का पैग़ाम लेकर पहुंचे
अब ये मत कहना कि- इससे
क्या फर्क पड़ता है?
फर्क तो पड़ता है,
अमन और इंसानियत के पैगाम से…
फर्क तो पड़ता है…
फर्क तो जरुर पड़ता है !
कवी : * हेमन्त बावनकर, पुणे*
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





