डॉ. सोनिया कस्तुरे
चित्रकाव्य
– “आसवं…” –
☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
गिळालेली आसवं कुठे जातात?
काही न राहून पापण्यावर तरंगतात.
काही दीप होऊन तेवत राहतात.
*
काही पुस्तकांची पान होतात तर
काही आपल्याकडून पुसली जातात..
*
काही नामशेष होतात,
जगणं कवटाळण्यासाठी
*
एकाचे दुःखाश्रू
दुसऱ्याचे आनंदाश्रू होतात तेव्हा
अश्रू ही ओक्साबोक्शी रडतात.
संपत चाललेल्या मानवतेने कोरडे होतात.
*
अश्रू खूप प्रेमळ असतात.
त्यांना किंमत दिली नाही की
ती अस्तित्वहीन होऊन
कायमचे नाहीसे होतात.
*
मग माणसंच माणसाला
निष्ठूर म्हणतात.
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





