? मनमंजुषेतून ?

☆ हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆ 

 

लग्न पूर्ण ठरेपर्यंत 

स्पर्शाचा गंधही नव्हता.. 

नुकत्याच ठरलेल्या लग्नाला 

स्पर्श मंद मंद स्पर्शत होता .. 

 

जातायेता वाऱ्याने उडलेला पदर

गुदगुल्या करायचा .. 

चहाच्या कपाची देवाणघेवाण

हळूच बोट धरायचा . 

 

रस्त्याने चालताना समोरून येणारी गाडी 

खांदा धरायला भाग पाडायची 

ती रुतलेली बोटं 

काळजापर्यंत भिडायची .. 

 

हॉटेलमध्ये समोरासमोर बसल्यावर

नजरेला नजर स्पर्श करायची .. 

टेबलाखाली लपलेली पावलंही 

अडसर दूर करुन पावलाला बिलगायची .. 

 

मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध

केसांनाही स्पर्शुन जायचा .. 

मानेवर ओघळलेल्या फुलाला नव्हे मानेला 

हात लावण्याचा मोह व्हायचा .. 

 

वाऱ्याने उडलेलं पान 

हळूच गालावर पडायचं .. 

पान सुकलेलं असलं तरी 

त्या दोघांच प्रेम हिरवगार  व्हायचं .. 

 

तरल कोमल अशा भावनांनाच 

स्पर्शाचं भान होत .. 

कळतनकळत एकरूप होण्याचं 

अनावर स्वप्न होतं .. 

 

हळूहळू जोपासलेल्या या नात्याला 

एकमेकांच्या संमतीची साथ होती .. 

नाती आयुष्य संपेपर्यंत टिकवण्याची 

ती अलिखित नियमावली होती .. 

 

हे सगळे पुन्हा आठवले 

आजकालचे स्पर्श पाहून .. 

नजाकत त्यातली संपली .. 

याने दाटून आले काहूर .. 

 

झटपट आयुष्यामधे 

नात्यात फक्त झटापट उरली .. 

प्रत्येक कृतीला भावनांची जोड हवी  

हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली .. 

 

||  हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली..||

 

अनामिक……

प्रस्तुति –  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments