सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “‘लेकरू’  होण्याचा प्रयत्न” ☆ सुश्री शीला पतकी 

‘लेकरू’  होण्याचा प्रयत्न – – 

“लेकरू झाल्याशिवाय माऊलीची माया मिळत नाही” – – 

– – एका कीर्तनात ऐकलेले हे वाक्य..! आता लेकरू व्हायचे म्हणजे काय? आपण लेकरू व्हायला तयारच नसतो. लहान लेकरू कसं निष्पाप असतं निस्वार्थी असतं कुणाबद्दल त्याच्या मनात द्वेष नसतो *मी* ही भावनाच नसते म्हणजे अहंकार नसतो मस्ती करतील पण मस्ती नसते मोह नसतो लोभ नाही. गरजेपुरता आपलं सगळं आटपलं की ते लेकरू शांत! आपल्या मुळात गरजाच संपत नाहीत…. अहंकार संपत नाही… उलट हे सगळे विकार वाढत जातात. माझं कोण काय करते बघू! अजून मला ओळखलं नाहीये तू.!! मी काय करतोय तुला ठाऊक नाहीये…!!! हे सगळं मी निर्माण केलेले आहे… माझ्यामुळे तू आहेस हे लक्षात ठेव…. मी नसतो तर तुमचं काय झालं असतं रे….?

अरे बापरे.. अशा अनेक वाक्याने लेकरूपणापासून आपण फार दूर जातो. मग ती माऊली भेटावी कशी? हे सगळं जेव्हा आपण सोडू आणि अहंकारविरहीत काया वाचा मनाने परमेश्वराला शरण जाऊ तेव्हा तो आपल्याला उचलून मांडीवर घेणारच. आशीर्वाद देणारच. त्याच आपल्यावर अगणित प्रेम असणारच…. कारण आपण लेकरू झालो की तो माऊली होतो. मग त्याला माऊली करण्यासाठी आपण लेकरू होणे गरजेचे नाही का? ..

बरं चला तर मग या वर्षात हे सगळे विकार सोडून देऊ आणि लेकरू होण्याचा प्रयत्न करू जेणेकरून परमेश्वराचा वरदहस्त आपल्यावर राहील त्याचं अफाट प्रेम मिळेल!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments