सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “काटेकरांची मुलं…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
बारा वाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव
घड्याळ त्याचे नाव//
काटेकरांचे वेडे तीन भाऊ होते गावभर फिरणारे
मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ
तोच मोठा होता चपळ पळ पळ सतत पळायचा
बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा
मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा
पण फिरून नाही हं दमायचे
रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा
बारा घरांचा त्यांना लागला होता लळा
यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ
आणि शिस्त म्हणजे शिस्त
पाळायलाच पाहिजे ना
साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त
सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा
रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा
आई-बाबांना यांचाच धाक
लोकलचतर चालते यांच्यावरच चाक
यांचा दर्जा कायम वरचा
भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही स्क्रीनवर
ग्रहावरही यांचीच हुकूमत
सूर्य ही उठतो वेळेवर
दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात
ग्रह तारे बिनदिक्कत
जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित
अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित
पण ठाऊक आहे का काय यांची गंमत
यांचे बाबा मागे बसूनपाहतअसतात जम्मत
बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा
धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप
तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप
मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं
एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं
आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप
काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




