संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वेगळी वाट” ☆ संध्या बेडेकर ☆

माझी ताई खूप हुशार. शिक्षण म्हंटल तर खूप नाही. पण स्मार्ट व नेहमी उत्साही, काही तरी वेगळे करणार. नेहमीच वेगळा विचार करणारी बदलत्या जगाबरोबर चालणारी “जून ते सर्वच सोनं ” असा समज व नवीन “आधुनिक सर्वच चांगलं किंवा खराब” या दोन्ही चा बरोबर विचार करून नवीन विचार मनात रुजवणे, तिला सहज जमत. एकतर विचार सरणी उत्तम, स्पष्ट, कुठेही ‘ confusion ‘नसते. तिच्या विचारात काल्पनिक भितीला कुठे जागाच नसते. जमलं तर उत्तम. नाही तर काही तरी केल्याचे समाधान. यश मिळेल, नाही तर अनुभव तर नक्कीच मिळेल ना. हा अनुभव कुठे तरी कामी येईल. असा विचार करणारी.

थोडी बिनधास्त, लोकांचा जास्त विचार न करणारी. त्यामुळे तिच्या कामात येणारे अडथळे कमी असतात. लोकांना भेटणे. त्यांचे विचार जाणून घेणे. व त्यावर विचार करणे जमते तिला. तिच्या प्रत्त्येक गोष्टी चे logic असते तिच्याजवळ. ते सांगताना भरपूर आत्मविश्वास सुंदर, योग्य शब्दात मांडणी, व आवाजात माधुर्य असतं. त्यामुळे तिचे विचार सहज पटतात. आपल्या मैत्रिणींमधे ती सर्वांची आवडती आहे. तिच्या गृप मधे विचारांना चालना देणे, दिशा देण्याचे काम ती छान करते. तिच्या घरी कामाला येणाऱ्या बायका खूप खूष असतात.  काकू!! तुमच्याशी बोलून छान वाटत. अस म्हणतात. थोडक्यात तिचे विचार पटतात.

“अहो!! असं करून बघा तर, नक्की जमेल तुम्हाला. व आवडेलही. “हे तिचं ब्रीद वाक्य.

तिचे म्हणणे, आपलं व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले विचार, आपले बोलणे. तुमच्या बोलण्यात तुमचे विचार झळकतात. चेहऱ्यावर कपड्यांवर थोड्या वेळाकरिता लोक भाळतात. तुमचे कौतुक करतात. यापेक्षा चांगले सशक्त विचारांचा प्रभाव जास्त वेळ राहतो.

“Branded कपडे नसलेत तरी चालेल, Branded विचार असावेत असं ती नेहमी म्हणते. ”

विचार वेगळे असावे. नवीन असावे. थोडे चौकटीच्या बाहेर चे असावे. सर्वांना प्रोत्साहित करणारे असावे. व मुख्य म्हणजे सहज अंमलात आणता येतील असे असावे. ती ‘ वेगळी वाट ‘ नेहमी शोधावी.

कोणतीही वेगळी वाट धरायला वेगळा विचार मनात आला पाहिजे. विचार पटणारा असावा. जीवनात, आपल्या कार्य पध्दतीत सहज ‘ adjust ‘ होणारा असावा. जास्त बदलाव न करता एखादे काम करायला मन सहज तयार असते. वर्षानुवर्षे एकाच विचार पद्धतीने आपण काम करतो. अगदी रोजच्या स्वयंपाकात ही बदल करायला सुध्दा खूप जण तयार नसतात. काय माहिती आवडेल का‌? असा विचार करून ते पूढे पाऊल टाकायला धजत नाही. आणि वेगळ्या वाटेने जायची इच्छा मनात येण्याआधी सर्व दरवाजे बंद करतात.

वेगळ्या वाटेवर थोडं चालून तर बघावं. हा विचार मनात येणे म्हणजेच जून्या बंधनातून स्वतः ला मुक्त करणे आले.  वर्षानुवर्षे असलेल्या सवयीला मुरड घालावी लागेल.  तेंव्हाच नवीन काही तरी घडेल. आपल्या क्षमतेनुसार, असे प्रयोग करायला काय हरकत आहे. नवीन उर्जेचा संचार होईल. स्वतः बद्दल अभिमान वाटेल. एक चांगली गोष्ट दुसरी चांगली गोष्ट करायला प्रेरित करेल. कमी त कमी काही तरी केल्याचे समाधान मिळेल.

एकदा ताईने सांगितले. म्हणाली  मला आठवत, आम्ही थाइलॅंडला जायचे ठरविले. तेथे पॅरा ग्लायडिंग हे टूर मधे करविणार होते. जेंव्हा पासून टूरचे ‘ booking ‘ झाले होते, मी रोज म्हणायचे, मी अजिबात करणार नाही. मला नाही जमणार. पण त्यावेळेस एका सत्तर वर्षांच्या बाईंनी अगदी सहज केले. व तिला बघून मी पण केले. आणि खूप आनंद झाला. काही तरी नवीन ‘ adventure ‘केल्या मुळे आत्मविश्वास वाढला. व मागच्या दोन महिन्यांत वाटणाऱ्या काल्पनिक भिती ने मी माझा वेळ, फक्त माझाच नाही, घरच्या सर्वांचाच वेळ किती खराब केला. त्याचे वाईट वाटले. तेंव्हा पासून ठरविले कुठे ही नाही म्हणायचे नाही.

सांगायचा उद्देश हा की, उगीच घाबरणे हा स्वभाव असतो. पण स्वतःला समजाविणे हे काम केल्यास, वेगळ्या वाटेने जाणे नक्की जमेल‌.

म्हणतात ना “Age is just a number. ”

काही तरी वेगळं कोणत्याही वयात करता येत. फक्त मी काय आहे?? आणि मी काय करू शकते??? या दोन्ही मधील ‘gap’. भरता आला पाहिजे.

“आता काय झालं सर्व. , देवाने जसे आयुष्य दिले तसे जगावे. , आता या वयात काय राहील आहे? हातापायांत त्राण राहिले नाही. त्यामुळे रोजचा दिवस जसा उगवेल तसा काढायचा. “हे असे विचार म्हणजे सर्व दरवाजे बंद करणे. नवीन विचारांना डोक्यात शिरूच द्यायचे नाही. अपयशाच्या भिती ने तडजोडीचे आयुष्य जगण्यात काय मजा??”

शांत बसून दिवस घालविणे, म्हणजे जून्या घटना त्याही आपल्या बरोबर जे चूक झाले, वाईट झाले, ते उगाळत बसायचे. कारण असेच विचार मनात लगेच येतात. आपणच आपल्या विचारांना ती संधी देतो. व स्वतः ला दुःखी, असहाय समजत जातो.  .

वयामानाप्रमाणे हे सर्व होणारच आहे. पण बुध्दी जागृत आहे ना. अनुभव पाठीशी आहे. रिकामा वेळही आहे. प्रत्त्येक गोष्ट करायला धावायची गरजही नाही. तेंव्हा मी या सद्य परिस्थितीत काय करू शकते??? हा विचार मनात आला, तर दहा गोष्टी सहज सूचतात. त्यातील एक निवडून करणे. म्हणजेच वेगळी वाट शोधणे होय.

कुठे तरी वाचलेलं एक वाक्य मला खूप आवडतं

“The greatest lesson I have learned in life is that I still have lot to learn. ”

जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत राबराब राबणे, म्हणजे आयुष्य जगणे नव्हे. स्वतः च्या समाधानासाठी, आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे होय.

वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत. नवीन वेगळे रस्ते शोधले पाहिजेत.

म्हणतात ना,

“आयुष्य म्हणजे मानलं तर मौज.

नाही तर आहेतच समस्या रोज. “

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments