कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

?  विविधा ?

☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

(जन्म:१२ ऑक्टोबर १९२२ – मृत्यू : ६ जून २००२)

आपल्या ओघवत्या भाषेचं श्रेय त्या आचार्य अत्रेंना देतात. ‘ शब्दांचा सोस असला तरी बोलण्यातील ओघ आपल्या लेखनात पाहिजे’; हे अत्रे यांचं वाक्य त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्रचूर भाषाशैली बदलली. जीवन अनुभव घेताना कोणताही प्रसंग, एखादे दृश्य, ऐखादं चित्रं, एखादं मनात कोरलं गेलेलं वाक्य, निसर्गाची विविध रूपं कविता सुचायला कारणीभूत झाले आहेत.

शांता शेळके यांची ‘ पैठणी ‘ ही कविता…. मनात खोलवर रुजलेली पण अजुनही मायेची उब व आधार देणारी ही कविता, ‘प्रत्येक स्त्री चा थोडा वेगळा असला तरी असाच एखादा अनुभव तिच्या मनात नक्कीच असणार———

‘पैठणी’—फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली आजीची एक ‘पैठणी’ जपून ठेवली आहे.कवयित्री लिहिते —–

कधीतरी ही पैठणी

मी धरते ऊरी कवळून

मऊ रेशमी स्पर्शामध्ये

आजी भेटते मला जवळून

त्यांची शोध ही कविता—— आजही स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारी कविता आहे. हा स्वतः च्या अस्तित्वाचा शोध पूर्वीही होता आणि आजही तसाच आहे. शोध या कवितेतील या ओळी पहा….

‘माहीत नव्हते मला माझे बळ,

माझी दुर्बलता   सतत मला वेढून बसलेली

माझी  भिरुता’

आणि पुढे त्या लिहितात—-

आत आतल्या आत मी.   

आहे उलगडत

 क्षणोक्षणी विस्तार पावत.

 पोहचते आहे जाऊन—

 अंतरंगाच्या कानाकोपऱ्यात.

 मी चकीत होत आहे.

 स्तिमित होत आहे.

दुखावत आहे आणि सुखावतही’

‘असा बेभान हा वारा’, ‘ किनारे मनाचे’, ‘अनोळख’ हे त्यांचे काव्यसंग्रह —अनेक सूक्ष्म, तरल,  वेगवेगळ्या भावना, संवेदना यातून जाणवतात.

चित्रपटातील गाणी जशी लोकप्रिय तशी चित्रपटातील ‘लावणी’ ही.

मराठा तितुका मेळवावा हा  ‘चित्रपट’; या चित्रपटातील लावणी. ‘ आनंदघन’ ह्या नावाने लताबाईंचं संगीत आहे.

‘ *रेशमाच्या रेघांनी

लाल काळया धाग्यांनी

कर्नाटकी कशिदा मी  काढीला        

हात नका लावू माझ्या साडीला’*

‘सोनियाची पाऊले’ पवनाकाठचा धोंडी’, ‘     ‘मंगळसूत्र’ हे लावण्यामुळे गाजलेले चित्रपट.

तसेच  चित्रपटातील त्यांची द्वंद्वगीतेही तितकीच लोकप्रिय झाली.

प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी बाबर यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे काम केले. साहित्यातील विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

आळंदी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला.

निसर्गीची त्यांना विलक्षण ओढ होती.त्यांचे मन तासनतास तेथे रमे, हे धूळपाटी या त्यांच्या आत्मचरित्रात लक्षात येते.

म्हणून त्या म्हणतात_———

असेन मी नसेन मी

तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या

उद्या हसेल गीत हे’

कवयित्री शांता शेळके यांची काही प्रसिद्ध पुस्तके——

१. ‘चिमुकल्यासाठी गाणी —अकुबाई बकुबाई ‘हा  बालकविता संग्रह         

२.’ जन्म जान्हवी’

३. ‘तोच

काही अनुवादित पुस्तके—–

 ६. काॅनरॅड रिझ्टर यांचे अनुवादित पुस्तक —-  ‘गवती समुद्र’

७. लुईसा हे अल्काॅट ( मूळ इंग्रजी लेखिका)

    यांच्या लिटल वुमन पुस्तकाचा अनुवाद — ‘चौघीजणी’

८. द हेलन केलर ह्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद —  ‘आंधळी’

९.  मूळ लेखक वेद मेहता यांच्या पुस्तकाचा अनुवाद — ‘आंधळ्याचे डोळे’   

१०. कविता संग्रह —

      १. ‘असा बेभान वारा’

      २. ‘किनारे मनाचे’

      ३. ‘अनोळख’

११. ‘धूळपाटी’ हे आत्मचरित्र    

 

©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments