सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘तुम भी चलो… हम भी चले…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

तुम भी चलो, हम भी चले ••• 

आज वर्ष झालं. तो एक धाडसी निर्णयच होता. थोडा वेगळा समजायला, पचायलाही. खर तर तारेवरची कसरतच होती सर्वांची. ते एक जगावेगळ आव्हानच होत. अगदी शिवधनुष्य पेलण्याएवढे कठीण.

खरच या निर्णयात निर्णय घेणारे आणि त्या निर्णयाला संमती देणारे, कोणा कोणाचे कौतुक करावे कळतच नाही. सर्वांचेच कौतुक.

यात एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे सर्वांनी एकमेकांचा विचार केला, मुख्य म्हणजे मुलांचा विचार केला. शेवटी आई वडीलच ते. जेथे मुलांचा प्रश्न येतो तेथे सहज तडजोड करण जमत त्यांना. अनेक न पटणारे विचार सहज पटतात. आपला कम्फर्ट झोन सोडून या वयातही * adjust * करायला तयार होणे, म्हणजे कौतुकच आहे. नाही का?

आज देशमुखांकडे *celebration* आहे. अजय अनिता अनय खास अमेरिकेहून आले आहेत.

अनय खूप खुश आहे. दोन आजी, आजोबा सर्व एकत्र भेटले, म्हणून आनंदात आहे. दिवसभर दोन्ही आजींबरोबर *पाच तीन दोन* पत्त्यांचा खेळ सुरू आहे.

अजय अनिता बाबांबरोबर बसून घरात काही चेंन्जेस करण्यात बिझी आहेत.

उद्या सर्वांना अष्ट विनायक दर्शनाला जायचे आहे. त्याआधी काही काम उरकरायची आहेत.

हीच ती तारीख १ जानेवारी २०२३ 

माझ्या चांगली लक्षात आहे.

ताईचा फोन आला होता, आणि तिने अजय अनिताच्या प्रस्तावाबाबत सांगितले होते.

ताईने जे सांगितले होते, ते असे••• ती म्हणाली••••

आज सकाळी सकाळी अजयचा फोन आला.

फोन घेता घेता आत्ता अमेरिकेत किती वाजले असतील? हा हिशेब नेहमी प्रमाणेच मनातल्या मनात झाला.

अजय म्हणाला, ••••

आई!! बाबा आहेत ना. मग फोन स्पीकर वर टाक. तसेही आम्ही नेहमीच फोन स्पीकर वर टाकतोच. कारण मुलाचा, सूनेचा आणि त्याहून महत्वाचा म्हणजे नातवाचा आवाज ऐकायचा असतो. अर्धवट मराठी, इंग्रजी एक्सेंट मधील मराठी ऐकायचे असते. हा एनर्जी डोज मिळाला की आमचा दिवस मजेत जातो.

बरे असो,

मी म्हटलं, ••• काय रे काही विशेष? सर्व ठीक आहे ना.

अनिता म्हणाली, ••• 

आई बाबा!! सर्व ठीक आहे. एका महत्वाच्या विषयावर तुमच्या बरोबर बोलायचे आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आम्ही विचार करतोय. आज विषय काढायचाच, अस ठरवलंय.

आता ही मुलं काय बोलणार आहेत?

आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघीतल.

बाबा म्हणाले, ••••

अग!! बोल बेटा. बिनधास्त सांगा / विचारा.

काय बोलायचे आहे?

अनिता म्हणाली, ••••

बाबा! माझ्या आईचा प्रश्न आहे हो. आता वर्ष झालं माझ्या बाबांना जाऊन, पण आई अजूनही सावरलेली नाही. अबोल स्वभावामुळे मैत्रीणी नाही. एकटेपणा जाणवतोय तिला. सारख काही तरी सुरूच असत. बरं! येथे यायला तयार नाही. आम्ही सारखं तेथे येऊ शकत नाही.

आम्हाला तुमच्या दोघांची, आईची काळजी असते. आमच्या समोर आमचा वर्तमान, भविष्य आणि तुम्ही सर्व, अशा तीन प्रकारच्या गोष्टी नेहमीच महत्वाच्या असतात. आमची जबाबदारीच आहे ती.

आज आम्ही पैसा भरपूर कमवतोय, पण तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. याचा खेद आहे.

अजय ही खूपदा अस्वस्थ होतो. पण आता या middle of the phase मध्ये काय धरावं?? आणि काय सोडावं?? कळत नाहिये.

खूप दिवसांपासून आमच्या मनात एक विचार येतोय, की तेथे म्हणजे भारतात एक मोठे घर घ्यावे. तेथे तुम्ही दोघे आणि माझी आई, तुम्ही सर्व एकत्र राहाल, तर आमची काळजी कमी होईल.

आम्ही तशी एक सोसायटी शोधली आहे, जेथे ज्येष्ठांच्या वयाप्रमाणे, गरजेप्रमाणे सर्व सोई उपलब्ध आहेत. Residential doctor आहे. इतर चांगल्या दवाखान्यां बरोबर त्यांचं टाय अप ही आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. ज्येष्ठांच्या अनेक activities पण तेथे आहेत.

तुम्ही दोघे *आनंदवन * ही सोसायटी बघून याल का??

आज आम्ही तुमच्या बरोबर हा विषय बोलतोय, उद्या परवा आई बरोबर बोलू. तुमच्या सर्वांचे मत महत्वाचे आहे. तुम्हाला आणि आईला पटलं तर तसं करता येईल. तुम्ही दोघांनी विचार करावा.

ताई भाऊजी विचारात मग्न झाले. ते मधून मधून अनिताच्या आईला भेटायला जातात. त्या एकट्याच असतात, म्हणून त्यांची काळजी सर्वांनाच असते. एकदा ताई अनिताला म्हणाली ही होती, •••

अग!! आम्ही सारखं जाऊ शकत नाही. तेंव्हा एखादा फ्लॅट येथेच आमच्या सोसायटीत तुझ्या आईसाठी घेतला तर बरे होईल.

आता एकदम एकत्र रहायचा प्रस्ताव??

आता किती तरी वर्षांपासून आम्ही दोघेच आहोत. खरं सांगू का?

कोणाकडे दोन दिवस राहणे किंवा कोणी दोन दिवस घरी रहायला आले, तरी सर्व रूटीन गडबड होत. केंव्हा एकदा आपल्या घरी जातो असं वाटतं.

आणि येथे तर नातं आहे. तेही नाजूक. दूर राहून विचार पूस करणं वेगळं पण एकत्र राहण. जमेल का? चोवीस तास एकत्र राहण सोपं नक्कीच नाही. कोणाबरोबर ही नाही. या वयात प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत सेट झालेली असते. ती बदलणे जमेल का?

हा प्रश्न मंगलाताईंनाही पडेलच. नाही का?

भाऊजी म्हणाले, •••

मुलांच्या दृष्टीने त्यांनी सुचवलेला निर्णय तसा बरोबर आहे. आता आपली काळजी त्यांना आहेच.

अग!! तू आजूबाजूला बघतेस ना, परिस्थिती कशी बिकट आहे ते?

आपली मुलं आपल्याला विचारतायेत. हे कमी आहे का? विचार करूया.

खरंय, ••••

*घरात जिवंत माणसाबरोबर नीट बोलायला मुलांना वेळ नसतो. आणि मेलेल्या माणसाला हलवून हलवून विचारतात तू बोलत का नाहीस म्हणून?? मेल्यानंतर दान धर्म पण भरपूर करतात. **

समाजातील हे एक कटू सत्य तर आहेच.

बरे असो,

बघूया मंगला ताई काय म्हणतात ते??

पूढच्याच आठवड्यात सर्वांची एकत्र video conference झाली. आपापसात चर्चा झाली. एकत्र राहण्याचे प्लस माइनस पोइंट डिस्कस झाले.

मुलांच्या दृष्टीने, त्यांच्या सोईसाठी, ताई भाऊजी, मंगलाताई सर्वांनी होकार दिला.

लगेचच येथे चार बेडरूम चां मोठा फ्लॅट घेतला. सर्व सोयी केल्या, स्वयंपाकाला मावशी, इतर कामांना मावशी, एका ड्रायव्हरची सोय झाली. सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. सर्व सुख सोयींनी सज्ज घर अजय अनिताने ताईच्या हातात दिले.

काही झालं तरी अनिताच्या आईकडे लक्ष देणे गरजेचे आहेच.

म्हणतात ना, •••

**Communicating is one thing but your tone and your way while communicating is everything. ** 

हे सर्व व्यवस्थित पार पडल‌, कारण अजय अनिताने योग्य पद्धतीने हा प्रश्न हाताळला. योग्य शब्दात सद्य परिस्थिती, प्रश्न व त्या प्रश्नाचे समाधान सांगीतले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांच्या दृष्टीने हा निर्णय कसा बरोबर आहे, हे समजावून सांगितले.

तसंही म्हणतात ना, •••

Every one goes through bad days/difficult phase in life. Don’t give up. Pause, Rest, Rethink, Reset and Restart. Always choose the best option and move on.

It is your decision not condition which shape your life.

तसेही आपण सर्व नेहमीच तडजोड करत असतोच. घरी, बाहेर, नोकरीत सर्व ठिकाणी. त्याशिवाय आपण समाजात आनंदाने जगूच शकत नाही. आयुष्याचे गणित सोडवताना आपण असे बरेच निर्णय घेतो, ज्याचे side effects आपल्याला नंतर फेस करावेच लागतात.

आज उच्च शिक्षित अजय आपल्या बुद्धी, शिक्षणाच्या जोरावर अमेरिकेत नोकरी करातोय. जेंव्हा अजय अमेरिकेत गेला, तेंव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला होता ताईला. एका मध्यम वर्गीय कुटुंबासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तर त्याच आनंदाचा side effect ताई भाउजींना आज दिसतोय.

माझ्या म्हातारपणी माझी मुलं माझ्या जवळच असावी, हा विचार आपल्या स्वार्थासाठी कोणतेही आईवडील कधी करतील का‌??

भारतात नोकरी करणारी मुलं तरी नेहमीच आईवडिलांच्या सेवेला हजर असतात का? कसं शक्य आहे ते?

अशी अपेक्षा करणे बरोबर आहे का?

तेंव्हा आज अजय अनिताने आपल्या आईवडिलाना जो alternate option दिला तो सर्वांनी सहर्ष स्वीकार केला.

खूपदा *वेळ/ काळ / वय * आपली परीक्षा घेत असत.

आता पूढे काय? या प्रश्नाने आपल्यापैकी अनेकांचे आयुष्य, अनेक ज्येष्ठांचे जीवन चिंताग्रस्त करून ठेवले आहे.

मग हा निर्णय बरोबरच आहे.

अस म्हणता येईल का? निर्णय धाडसी आहे. पण सर्वांच्या प्रश्नाचे समाधान होत असेल तर काय हरकत आहे?

भाऊजी म्हणजे एक Balanced व्यक्तिमत्व सद्य परिस्थितीला ओळखून, दुसऱ्यांना समजून, समजावून योग्य निर्णय घेणार.

आज त्याच धाडसी निर्णयाचे *success Celebration* आहे.

*आत्मविश्वास *तडजोड * माझ्या बरोबर तुम्ही पण आनंदी रहाव. * 

*तुम भी चलो हम भी चले. चलती रहे जिंदगी।**

 हा विचार कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. समाधान शोधू शकतो.

This Positive approach/ attitude and confidence can solve any problem.

शेवटी असंच म्हणावस वाटत, •••

**ए वक्त तू कितना भी परेशान करले हमें, पर याद रख••• किसी मोड़ पे तुझे भी बदल देंगे हम। **

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments