सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ नात्यातील  वीण… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

नात्यातली वीण  ” “नाते”दोनच अक्षरी शब्द.मनामनांना जोडणारा. स्नेह, प्रेम, आपुलकी,  जवळीक दर्शविणारा. जन्मल्याबरोबर आई-वडिलांबरोबर रक्ताच्या नात्याचे बंध निर्माण होतात. त्यानंतर मूल जसजसे मोठे होत जाते तसतसा त्याचा/तिचा भाऊ, बहिण, आजी आजोबा,  काका-काकू, मावशी, आत्या इ. अनेक नात्यांशी परिचय होऊ लागतो. आईच्या स्पर्शातून मायाच पाझरते. म्हणूनच आपण मोठे झालो तरी ठेच लागली किंवा काही दुखले-खुपले तरी “आई ग” असेमहणतो. राव रंक सर्वांसाठी हे नातेसमान असते. पिता कठोर असतो तर दोघेही अपत्याच्या भल्यासाठी झटतात. आई वडिलांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन आपण वाटचाल करतो.

बंधुप्रेमाचे उदाहरण घ्यायचे झाले तर राजसिंहासनावर श्रीरामांच्या पादुका स्थापून स्वतः पर्णकुटीत राहणारा भरत आठवतो. राखीचा एक धागा  बहिणीने बांधला कि भाऊराया  तिच्या प्रेमात बद्ध होतो. तिचा रक्षणकर्ता होतो, पाठीराखा बनतो.रक्ताचे नाते नसले तरीही काही वेळा हे नाते मनाने स्वीकारलेले असते. महाभारतात श्रीकृष्ण दौपदीशी असाच जोडलेला दिसतो. इतका कि वस्त्रहरणाच्या बाक्या प्रसंगी त्याने  तिचे नव्हे तर समस्त स्त्रीजातीचे लज्जारक्षण केले असे म्हणावे वाटते.

 समाजात वावरताना जेंव्हा परस्परांची. वेव्हलेंग्थ दोघांना आक्रुष्ट करते तेव्हा प्रियकर प्रेयसीचे नाते निर्माण होते.हे आगळेच. संमती ने किंवा संमतीशिवाय ही ते दोघे पती पत्नीत रुपांतरित होतात. नि वीण घट्ट बनते.

.. परंतु काही वेळा रक्ताच्या नात्याच्या पलिकडचे असे एक जिवाभावाचे नाते आपण पाहतो, अनुभवतो. ते नाते म्हणजे मैत्रीचै. म्हणूनच” पसायदानात” ज्ञानेश्वर माउली म्हणतात भूतां परस्परे जडो। मैत्र जीवाचे।

इथं भूत म्हणजे फक्त कुटुंबिय नाहीत तर परिसरातील किंबहुना अखिल विश्वातील पशु; पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्याशी सुद्धा आपण मैत्र साधले पाहिजे. “वसुधैव कुटुंबकम्” म्हणजे हे विश्वचि माझे घर अशी भावना असली तरच आपण नातेसंबंध टिकवु शकतो. शुद्ध हवा, शुद्ध पाणी देणारा नि अन्न ,वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करणारा निसर्ग हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे. संत तुकाराम म्हणतात “व्रुक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे.”

सर्वात शेवटी यम्हणावे वाटते कि मानवतेचे अर्थाने माणुसकीचे नाते सर्वश्रेष्ठ आहे. गुरू-शिष्य, रुग्ण-डॉक्टर हे मानवतेच्या नात्याने जोडले आहेत.

इथं विश्वासाची गरज असते. म्हणूनच असे हे परस्परांना जोडणारे नाते संबंध स्नेहबंध ठरतात नि म्हणावे वाटते

मनामनांचे प्रेम जपते ते नाते।

परस्परांचा स्नेह वर्धिते ते नाते।।

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. 9552448461

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments