अलका ओमप्रकाश माळी
विविधा
☆ – लोक काय म्हणतील..? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆
कुछ तो लोग कहेंगे.. लोगों का काम है कहेना.. छोडो बेकार की बातों मे… बीत न जाये (रैना)… हे गाणं आजच्या विषयाला अगदी समर्पक आहे ना.. मनुष्य प्राणी समाजप्रिय आहे आणि ह्या समाजाचा मुख्य घटक म्हणजे लोक.. त्यामुळे आपल्या आयुष्यातील कित्येक निर्णय आपण लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून घेत असतो.. पण हे कितपत योग्य आहे..? कोण आहेत हे लोक?
हे आपल्याला खरंच ओळखतात का?
– हे आपल्या संघर्षात सोबत होते का?
– हे आपलं सुख-दु:ख वाटून घेतात का?
हे तीन प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत अस मला वाटत.. आपले निर्णय जर लोक काय म्हणतील ह्यावर अवलंबून असतील तर ह्या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्याकडे हवीत.. आणि ह्या प्रश्नांची उत्तर जर “नाही” अस असेल तर मग मात्र उडत गेले हे लोक म्हणाव आणि आपले निर्णय आपल्याला हवेत तसे घ्यावेत..
“लोक काय म्हणतील? ” हा प्रश्न आपल्याला अडवत असेल, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे –
‘आपलं आयुष्य, आपले निर्णय, आपली जबाबदारी! ’
लोकांचं मत हा एक ट्रेंड आहे – ते दर मिनिटाला बदलतं.
पण आपल्या निर्णयाचा परिणाम आपल्यावर होतो – त्यामुळे जो भी करेंगे आपने लिये करेंगें.. मग जो होगा देखा जाएगा.. कोणताही निर्णय घेताना लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्या निर्णयांचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत हे महत्वाचं असत.. लोकांच काय आहे उद्या लोक तेराव्याच जेवायला आल्यावर ही ऊन जास्त आहे मसाला ताक हव होत यार हे ही बोलून दाखवतील.. त्यामुळे लोगोको मारो गोली और मस्त जियो..
अपना हर दिन ऐसे जियो
जैसे कि आखिरी हो..
अस गाणं गुणगुणत मस्त आयुष्य जगायचं.. शेवटी काय जिंदगी एक पहेली है सुलझावो तो सुलझेगी और उलझावो तो उलझेगी.. म्हणून लोगोंका काम है कहेना म्हणायच आणि चालत रहायचं.. फारच लोक मागे लागले तर आपण पाठमोर होऊन एक झक्कास सेल्फी घ्यायची की मग सगळे आपल्याकडे बघतात आणि खुशी खुशी हसतात.. सो चला तर जलने वालोंको और जलाओ और खुद जी भर के जियो…
अपनी लाइफ अपने रूल..
बाकी सबको जाओ भूल..
© अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




