श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – आधारावाचुनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
आधारावाचुनी /
काय सांगशील कहाणी//१//
*
ठावा नाही पंढरीराव /
तोंवरी अवघेचि वाव //२//
*
मानिताहे कोण /
तुझे कोरडे ब्राह्मज्ञान //३//
*
तुका म्हणे ठेवा /
जाणपण एक सवा //४//
*
– संत तुकाराम.
तुका म्हणे
सामान्यपणे माणसांची समजूत काय असते आणि त्याने ती कशी बदलायला पाहिजे याविषयी सांगताना तुकाराम महाराज स्वानुभवातून आपले विचार मांडताना म्हणतात. तुमच्या जवळ भक्कम आधार असल्या शिवाय तुम्ही कुठलीही कहाणी सांगू शकतनाही. हा वरवरचा अर्थ आहे. पण त्यातून त्यांना , “कोणत्याही बाबतीतले तत्वज्ञान सांगताना तुमचा त्याविषयीचा परिपूर्ण अभ्यास असल्या शिवाय तुम्ही त्याविषयी काही ही बोलू शकत नाही किंवा मनघडंत कुठल्याही थापा मारू शकत नाही ” हे नेमके पणाने सुचवायचे आहे. पुढे ते म्हणतात “जोपर्यंत तुम्हाला पंढरीरायाच्या सामर्थ्याचे योग्य आकलन होत नाही तो पर्यंत तुम्हाला काहीही बोलण्यास वाव आहे .पण जेंव्हा पांडुरंग तुम्हाला परिपूर्णतेने कळेल तेव्हा तुम्ही अंतर्मुख होऊन विचार कराल आणि कुठलीही वायफळ बडबड मुळीच करणाक नाही. जर विठ्ठलाच्या स्वभावाचे आणि त्याच्या गुणसंपन्न तेचे तुम्हाला आकलनच झाले नाही तर तुम्ही सांगत असलेले तुमचे कोरडे ब्रम्हज्ञान कोणीही ऐकून घेणार नाही. कारण या जगात असणारे अनेक शेरास सव्वाशेर तुम्हाला भेटतील. आणि तेव्हा तुमचे ब्राह्मज्ञान त्यांच्या समोर उघडे पडेल. याची जाणीव ठेवा .आधी तुम्ही पांढरीराया निट समजून घ्या आणि तो तुमच्यात आहे असे समजून वागा.म्हजे मग सगळेच सोईस्कर होईल.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







