हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # ८२२ ⇒ चेहरे पर चेहरा ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चेहरे पर चेहरा।)

?अभी अभी # ८२२ ⇒ आलेख – चेहरे पर चेहरा ? श्री प्रदीप शर्मा  ?

(THE BEARD)

क्या दाढ़ी चेहरे पर एक और चेहरा नहीं। केश को महिलाओं का श्रृंगार माना गया है और दाढ़ी को मर्दों की खेती, जब चाहे उगा ली, और जब चाहे काट ली। एक समय था, वानप्रस्थ और सन्यास के वेश में दाढ़ी का भी योगदान होता था। आज भी साधु, बाबा और संन्यासियों का श्रृंगार है यह दाढ़ी।

चलती का नाम गाड़ी की तर्ज पर किशोर कुमार ने एक फिल्म बनाई थी, बढ़ती का नाम दाढ़ी ! आप अगर काटो नहीं, तो दाढ़ी और नाखून दोनों बढ़ने लगते हैं। क्या विचित्र सत्य है, हमारे शरीर के नाखून और बाल, शरीर का हिस्सा होते हुए भी, इनमें खून नहीं है। इन्हें काटो, तो दर्द नहीं होता।

कैसी अहिंसक पहेली है यह ;

बीसों का सर काट लिया।

ना मारा ना खून किया।।

हमारे दिव्य अवतार राम, कृष्ण, बुद्ध और महावीर के मुखमंडल की आभा देखते ही बनती है। स्वामी विवेकानंद के चेहरे का ओज देखिए। कलयुग के फिल्मी सितारों को ही देख लीजिए, देव, राज और दिलीप। धरम, राजेश खन्ना, जीतू और गोविंदा ही नहीं एंग्री यंग मैन अमिताभ भी ! बेचारे अमिताभ को तो स्क्रीन टेस्ट में भी बड़ी परेशानी आई थी। भला हो सात हिंदुस्तानी आनंद, नमकहराम, मिली और शोले और दीवार जैसी फिल्मों का, जिसने अमिताभ को सदी का महानायक बना दिया और हमारे बिग बी ने एक चेहरे पर एक और चेहरा चढ़ा लिया।

कितनी पते की बात कह गए हैं हसरत जयपुरी साहब फिल्म असली नकली में ;

लाख छुपाओ छुप ना सकेगा

राज दिल का गहरा।

दिल की बात बता देगा

असली नकली चेहरा।।

साहिर ने अपने चेचक के दाग वाले चेहरे को कभी दाढ़ी में नहीं छुपाया लेकिन एक चेहरे पे कई चेहरे लगा लेने वालों की अच्छी खबर ली। गुलजार तो कह गए हैं, मेरी आवाज ही पहचान है, और आज इधर जहां देखो वहां, दाढ़ी ही मेरी पहचान है।।

एक समय था, जब मर्द की पहचान मूंछों से होती थी।

लिपटन टाइगर वाला मुछंदर याद है न? लिपटन माने अच्छी चाय। मूंछ पर ताव देना और शर्त हारने पर मूंछ मुंडवा देने की कसम खाना आम था। मूंछ तो हमने भी बढ़ाई थी, लेकिन जब दाढ़ी भी बढ़ने लगी तो पिताजी ने डांट पिला दी, यह क्या देवदास बने फिर रहे हो, जाओ दाढ़ी बनाकर आओ। पिताजी के सामने कभी हमारा मुंह नहीं खुला, मन मसोसकर रह गए। लेकिन मन ही मन बड़बड़ाते रहे, पिताजी क्या जानें, बिना दाढ़ी के कोई येसुदास नहीं बनता।

कभी दाढ़ी फैशन थी, आज तो दाढ़ी का ही प्रचलन है।

कबीर बेदी की दाढ़ी बड़ी स्टाइलिश थी। क्या जोड़ी थी कच्चे धागे में विनोद खन्ना और कबीर बेदी की। बेचारे संत महात्मा तो दाढ़ी बढ़ाकर भूल जाते हैं, लेकिन जो लोग शौकिया दाढ़ी रखते हैं, उन्हें तो दाढ़ी का बच्चों जैसा खयाल रखना पड़ता है। ब्यूटी पार्लर से महंगे होते जा रहे हैं आजकल मैन्स पॉर्लर।

वैसे हमें क्या, बंदर क्या जाने अदरक का स्वाद।।

बिग भी, हमारे नरेंद्र मोदी और विराट कोहली तीन टॉप के दाढ़ी वाले हैं आज के इस युग के। विराट की स्टाइल की कॉपी ने तो पुराने फैशन के सभी रेकॉर्ड तोड़ दिए हैं। सोलह बरस की बाली उमर से ही आज के युवा में विराट की छवि नजर आने लगती है।

आज के युवा अभिनेता हों या क्रिकेट प्लेयर, कॉलेज का छात्र हो या प्रोफेसर, टॉप एक्जीक्यूटिव और मोटिवेशनल स्पीकर, सभी जगह दाढ़ी वाले ही नज़र आएंगे आजकल।

आज अगर बिग बी और मोदी जी आपके सामने बिना दाढ़ी के प्रकट हो जाएं, तो वे कैसे लगेंगे ? हो सकता हैं, वे अपने आपको ही नहीं पहचान पाएं। अगर गांधी और नेहरू भी दाढ़ी भी रखते, तो कैसे नज़र आते। कई दार्शनिक और वैज्ञानिक तो इतने व्यस्त रहते थे, कि उन्हें दाढ़ी बनाने की फुर्सत ही नहीं होती थी।।

वैसे मनोविज्ञान तो यही कहता है कि पुरुष भी किसी महिला के लिए ही सजता, संवरता है। जरूर आज की युवतियों की भी पहली पसंद दाढ़ी वाले युवा ही होंगे। बुढ़ापे में तो दाढ़ी इंसान के कई ऐब छुपा लेती है। किस दाढ़ी में साधु है और किस दाढ़ी में शैतान, यह तो सिर्फ भगवान ही जानता है।

कभी अभिनय के लिए नकली दाढ़ी लगाते थे, आज तो असली दाढ़ी ही अभिनय के काम आती है। जो दाढ़ी में भी सहज और सरल है, बस वही सच्चा साधु है।

होंगे हमारे अधिकांश अवतार क्लीन शेव्ड, हमारी कृत्रिम बुद्धि, यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, तो यही कहती है कि अगला कल्कि अवतार भी हमारे आसपास कहीं किसी दाढ़ी में छुपा हुआ बैठा है, बूझो तो जानें।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्रीण…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ मैत्रीण…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(एक वाजला.. आता वासंतीताईंना सहन होईना.. अचानक त्यांना काल सुधाने त्यांच्या मोबाईलमध्ये भरलेला नंबर आठवला.. त्यानी कॉल लावला.. पलीकडे सुधा..) – इथून पुढे – – 

‘काय झाले वासंती?

‘सुधा.. तूझ्या मुलीला इथे ताबडतोब पाठव.. मला बाथरूमला जायचे आहे..

काय झाले असेल हे सुधाताईंनी ओळखले. त्यानी फोन खाली ठेवला आणि मुलगी प्रज्ञासह स्वतः हजर झाल्या. बेल दाबली.. मोबाईलवर गाणी ऐकणाऱ्या आशाने दार उघडले.. दोघी आत गेल्या.. सुधाताईंनी काल बेडरूम पाहिली होतीच.. त्यांनी वासंतीताईंचा हात पकडला आणि बाथरूमला घेऊन गेली. बाहेर आल्यावर त्या सुधाताई ना म्हणाल्या” सुधा.. मला इथे राहायचे नाही.. मला नेशील तुझ्याकडे?

‘हो चल ना.. म्हणूनच प्रज्ञाला सोबत आणलय.. तुझे डॉक्टर रिपोर्ट्स, औषधे, थोडे कपडे बरोबर घेऊ.. कुठे ठेवले आहेत ते दाखव. वासंतीबाईंनी जे जे दाखवले ते प्रज्ञाने एका बॅगेत भरले आणि त्यान्च्या हाताला धरून बाहेर आणले आणि गाडीत बसवून घरी घेऊन गेली.. तोंड उघडे टाकून आशा सारे बघत राहिली आणि तिने सुजाताला फोन लावला.

सुजाता आशाला म्हणाली.. ‘जाऊ दे.. जाऊन जाऊन कुठे जाईल? तिचे आहे कोण.. एक भाची वसु.. ती सांगलीला.. कोणी नेली ती संध्याकाळी आणून पोचवणार.

सुधाताईंनी हाताला धरून वासंतीताईना घरात आणलं.. खुर्चीवर बसवलं.. तोपर्यंत पटकन प्रज्ञा घरात गेली आणि गरमभात.. त्यावर तूप ओतून घेऊन आली. वासंतीताई त्या गरम भातावर तुटून पडल्या.. सकाळपासून त्या उपाशी होत्या. त्यांचे जेवण होईपर्यंत प्रज्ञाने त्यांना सुधाताईच्या खोलीत बेड घातला होता.

दोन घास खाऊन वासंतीताई शांत झाल्या.. मग प्रज्ञा त्याना तिच्या आईच्या खोलीत घेऊन गेली.

‘तू आराम कर वासंती.. संध्याकाळी बोलू.. ’ असे म्हणत सुधाताईंनी एक पुस्तक उघडले. चांगला दोन अडीच तास आराम करून वासंतीताई जाग्या झाल्या. सुधाताईंनी दोघीसाठी कॉफी करून आणली…

‘मग मघा बाहेरच्या खोलीत गाणी ऐकत बसलेली आशा की नवीन बाई? ’

‘आशाच ती.. मी सुजाताला सांगितले तिला बोलावू नकोस.. तरी सुजाता म्हणाली.. आशाच येणार, तिच्याकडूनच तुमचे काय ते करून घ्या.. ’

‘मग?

‘सकाळी नेहेमीसारखी आशा आली.. पण आज ती माझ्या खोलीत येईना.. तिने सुजाताची कामे उरकली आणि ती बाहेर गाणी ऐकत बसली.. मी तिला किती हाका मारल्या. पण ती ढिम्म.. काल रात्री मी तिला बोलले.. कामावरून काढते म्हणाले ना म्हणून.. माझा पगार घेते आणि त्या काळात नकोते धंदे हिचे.. मला असले सहन होत नाही ग सुधा.. ’

‘पण मी तुला इथे आणलं.. मग तुझा मुलगा सून काही म्हणायची नाहीत ना? ’

‘मला वाटत नाही तसं.. त्यांना आनंदच वाटेल.. म्हातारी माणसं कुणाला हवी असतात? पण आज बघू.. न्यायला येतात का? ’

‘वासंती.. मी तुला माझी मैत्रीण मानलंय.. तुला वाटेल तितके दिवस राहा.. पण तुला तुझ्या मुलाकडे जायचे असेल तेंव्हा सांग.. ’

‘खरच सुधा.. आपली कालची ओळख.. पाच मिनिटाच्या ओळखीवर तू मला मैत्रिण केलंस? ’

‘याचे क्रेडिट माझ्या नवऱ्याला मी देईन.. तो नाही आहे या जगात.. पण चेहेऱ्यावरून कसे माणूस ओळखायचे.. हे त्याने मला शिकवले. त्याने अनेक विद्यार्थ्यांना असेच घरात आणले.. त्यांना शिकवले आणि मार्गाला लावले. तुला आसरा हवा होता हे काल माझ्या लक्षात आले.. मुलगा सून आणि तुझे आजारपण या बेचकीत तू सापडली होतीस.. वाटेल तेवढे दिवस इथे राहा.. कायमची राहिलीस तरी माझी मुलगी तुझं सर्व करेल.. कारण बापाचे तिच्यावर तसे संस्कार आहेत. ’

‘तुझे कसे उपकार फेडू सुधा.. ’

‘अग उपकार कसले? उलट मी कंटाळते.. मुलगी आणि जावई कामात असतात.. माझ्याशी बोलायला कोणी नसतं.. आता तू आलीच आहेस.. आपण गप्पा तरी मारू. ’

एवढ्यात प्रज्ञा दवाखान्यातून आली. तशा सुधा आणि वासंती तयार झाल्या आणि सुधाने वासंतीचा हात पकडला आणि दोघी पार्कमध्ये फिरायला गेल्या.

वासंतीताईचा मुलगा आणि सून सुजाता घरी आली आणि त्यांनी दार उघडले. त्याना आशाने फोन करून कुणीतरी दोन बायका सासूला घेऊन गेल्याचे सांगितले होते.. पण त्यांना वाटले एव्हड्यात त्यांना आणून पोचवले असेल.. पण त्यानी वाकून बेडरूम मध्ये पाहिले.. सामसूम होती.

‘आई आलेली दिसत नाही.. ’ कपिल म्हणाला..

‘जाऊ दे.. नाहीतरी त्त्यांचे नाच बघायला कुणाला वेळ आहे? ही बाई नको… ती नको.. कुठे आहे तिथे सुखाने राहा म्हणावे.. आमच्या संसारात लुडबुड नको.. तू अजिबात फोन करू नकोस.. ती सांगून गेली का.. नाही, मग आपण चौकशी का करायची? ’

कपिल गप्प बसला.

पार्क मधून फिरून दोन मैत्रिणी घरी आल्या. प्रज्ञाने सरबत करून ठेवले होतेच. तोपर्यंत सुधाताईचा जावई प्रवीण आला. सुधाताईंनी त्याच्याशी ओळख ‘माझी मैत्रीण वासंती ‘म्हणून करून दिली. त्याने हाताने नमस्ते केले आणि तो आपल्या रूममध्ये गेला..

प्रज्ञा घरात आली तीच वासंतीताई समोर बसली. तिने त्यांना व्यवस्थित तपासले.. त्यांचे रिपोर्ट्स पाहिले… त्यांच्या डॉक्टरनी दिलेली औषधे पाहिली.. त्यांना थोडे चालवून पाहिले.. मग म्हणाली..

‘मावशी.. तुला फिजिओ करायची गरज आहे.. माझ्या ओळखीची मुलगी आहे मी तिला बोलावते.. ती मालिश करील.. व्यायाम करून घेईल. एक मावशी रोज येतात.. त्या आंघोळ घालतील.. बाकी पूर्ण दिवसभर आई आहेच आणि बाहेर मी दवाखान्यात आहे.. काही वाटलं तर ही बेल वाजवायची.. मी एक मिनिटात हजर. आमची म्हणजे माझ्या बाबांची छोटी लायब्ररी आहे.. भरपूर पुस्तके आहेत.. हवे ते पुस्तक घे आणि वाच. धार्मिक वाचायला आवडत असेल तरी पण ग्रंथ.. पुस्तके आहेत. या तुमच्या बेडरूमला लागून ग्यालरी आहे.. तिथे दोघी बसलात तर रस्त्यावरील रहदारी दिसते आणि आमची छोटी बाग पण दिसते.. तेंव्हा कसलीच काळजी करायची नाही.. एन्जॉय आणि मस्त रहा. ’

वासंतीताई तोंड उघडे ठेऊन ऐकत राहिल्या.. आपली मुले एव्हडी आपली काळजी घेऊ शकतात? त्यांना त्यांचा मुलगा कपिल आणि सून सुजाता आठवली.. आणि त्यांचे तोंड कडू झाले.

वासंतीबाईंना मुलाचा किंवा सुनेचा फोन आला नाही पण सांगलीच्या भाचीचा एक दिवस आड फोन येत राहिला. मावशी एका मैत्रिणीकडे आनंदात आहे, हे ऐकून तिला समाधान वाटले.. मध्येच घाईघाईत ती मुंबईला आली आणि मावशीला पाहून गेली.. तिची ओळख सुधाबाईशी आणि प्रज्ञा बरोबर झाली.

रोजची फिजिओ आणि व्यायाम यामुळे वासंतीताई स्वतः पाऊल टाकायला लागल्या.. हळूहळू चालू लागल्या. चांगले जेवण आणि विश्रांती यामुळे त्यान्च्या अंगात शक्ती आली. सुधा आणि त्त्यांची मैत्री घट्ट झाली होती. सुधा त्याना कथा, कविता वाचून दाखवी आणि दोघी चर्चा करत.. हळूहळू दोघी रिक्षा करून नाटकें पहायला जाऊ लागल्या.. संगीताचे कार्यक्रम ऐकू लागल्या.. हे सर्व सुख असले तरी वासंतीताईना आपला मुलगा आणि सून.. आपली साधी चौकशी पण करत नसल्याने वाईट वाटतं होत.. आणि त्यांना त्यांचा राग पण येत होता. खरे तर त्त्यांचा मुलगा सून रहात असलेली जागा त्यान्च्या नावावर होती आणि ही दोघे त्यात राहत होती. यांना चांगली अद्दल घडवायला हवी असे त्याना वाटतं होते.

एक दिवस त्या सुधाचा जावई आणि प्रज्ञाच्या नवऱ्यासमोर आल्या.

‘प्रवीण.. जर कुणी माझ्या जागेत मला भाडे न देता रहात असेल.. तर मी काय करू शकते?

‘त्याला नोटीस द्यायची.. घर खाली कर म्हणून…’

‘आणि तरी तो खाली करत नसेल तर?

‘कोर्टात जायचे.. तुम्हा जेष्ठ मंडळीसाठी वेगळे नियम आहेत.. तुमचा निर्णय शीघ्र गतीने लागणार.’

‘मग मला नोटीस काढायची आहे.. माझ्या जागेत माझ्या परवानगी शिवाय एक माणूस रहात आहे.. ’

‘कोण ग? कुणाला नोटीस काढणार तू? ’ तिथे बसलेल्या सुधाने विचारले..

‘माझ्या मुलाला नोटीस देणार मी? ’

‘काय? मुलाला नोटीस? ’

‘होय.. माझा मुलगा असला तरी काय झाले.. जो मुलगा आईच्या म्हातारपणी तिची साधी चौकशी करत नाही.. त्याने आई वडिलांच्या प्रॉपर्टी वर तरी हक्क का सांगावा? ’

‘खरे आहे वासंती.. आता आपण वृद्ध लोकांनी सजग व्हायला हवे.. अशा मुलांना धडा शिकवायलाच हवा.. पण काय होते.. आपण इमोशनल होतो… आपण मुलांना जन्म दिलेला असतो.. त्यानी काही केले तरी त्यान्च्या करणीवर आपण पांघरूण घालतो. ’

‘पण मी नाही घालणार पांघरुण.. मी माझ्या मुलाला सुनेला धडा शिकवणार.. ’

‘एव्हडी घट्ट कशी झालीस वासंती.. ’

‘तू पाठी आहेस म्हणून.. सुधा.. तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून.. ’

‘काय तो निर्णय घे. पण त्याच्याबद्दल फर्म रहा.. मुलाचा पुळका येऊ शकतो.. ’

‘नाही.. माझा निर्णय पक्का.. ’

वासंतीताईनी आपल्या मुलाला नोटीस पाठवली. ‘एक महिन्यात जागा खाली करावी’ म्हणून.

नोटीस मिळताच मुलाचा फोन आला..

वासंतीबाईंनी ‘माझी जागा खाली करा.. ती माझ्या माहेरहुन मला मिळालेली आहे.. तुझ्या बाबाकडून नाही.. ’ असे ठणकवले..

 मग मुलगा आणि सून भेटायला आले.. दोघे रडू लागली, ‘आम्ही दुसरी जागा घेऊ शकत नाही.. आमची परिस्थिती नाही म्हणून.. ’. वासंतीबाई स्थिर होत्या.. त्यानी मुलाला.. सुनेला ठणकवले..

‘जर तुम्हाला आजारी आईची देखभाल करता येत नसेल तर तिच्या प्रॉपर्टीवर हक्क का सांगता? तुम्ही जागा खाली करा.. नाहीतर ज्येष्ठाच्या कोर्टात जाऊन मी तुम्हाला बाहेर काढेन.. ’

 

चार दिवसात कपिलने जागा खाली केली.

जागेची किल्ली वासंतीताईच्या हातात आली.

‘वासंती… काय करणार या जागेत आता? ’

‘काहीही करेन.. मी राहीन काही काळ किंवा माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकांना देईन किंवा माझी सांगलीची भाची वसु… तिला देईन.. तिचा मुलगा दोन वर्षात दहावी पास होईल.. त्याला मेडिकलला जायचे आहे… तो शिकेल येथे राहून.. ’

‘खरच वासंती.. मला पार्कमध्ये टॉयलेटला जाण्यासाठी आशाची वाट पहात हवालदिल झालेली वासंती आठवते आणि आज स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणारी खंबीर वासंती.. माझ्या समोर बसली आहे.. ’

‘हे तुझ्यामुळे सुधा.. तुझ्यासारखी लाख मोलाची मैत्रीण मिळाली ना.. तिने माझ्यात आत्मविश्वास भरला.. श्रेय त्या मैत्रिणीला… आणि त्या मैत्रीला…‘ 

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्रीण…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ मैत्रीण…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

वासंतीताई सैरभैर झाल्या होत्या… आत्त्ता जाऊन येते, म्हणून सांगून गेलेली आशा दिड तास उलटला तरी आली नव्हती. काळोख पसरू लागला होता आणि वासंतीताईना टॉयलेटला जायचं होत.. त्यांना मदतीशिवाय चालता येत नव्हतं.. परत परत त्यांचे लक्ष पार्कच्या गेटकडे होत… आशा येईल आणि आपल्याला टॉयलेटला नेईल म्हणूंन त्या गेटकडे पहात होत्या.. मोठा निश्वास सोडत होत्या… त्यांची ही परिस्थिती पाहून त्यान्च्याच वयाची एक स्त्री पुढे आली..

‘तुम्हाला काही हवं आहे काय?

त्या स्त्रीचा त्यांना एकदम आधार वाटला..

‘होय हो.. मला आधाराशिवाय चालता येत नाही.. माझी मदतनीस आशा..’पाच मिनिटात येते.. म्हणून गेली ती आलेलीच नाही.. मला टॉयलेटला जायचंय हो.. नाहीतर गडबड होईल..

‘चला.. मी तुम्हाला नेते..

ती स्त्री पटकन पुढे आली आणि तिने वासंतीताईचा हात पकडला आणि त्यांना ती हळूहळू टॉयलेटकडे घेऊन गेली.

दोघी टॉयलेटमधून बाहेर आल्यावर वासंतीताई म्हणाल्या..

‘सहा महिन्यापूर्वी मला प्यारालिसिसचा अटॅक आला आणि डावी बाजू लंगडी झाली.. त्यातून मी आता सावरतेय.. एक बाई ठेवली मी.. माझ्यासाठी… मला नवऱ्याची अर्धी पेन्शन मिळते ना.. मुलगा सून माझ्या घरातच राहतात.. पण ती दोघे नोकरी करतात.. सुनेचे हिडीस फिडीस चालू असतेच..पण मी माझ्या पैशातून ही बाई ठेवली.. हल्ली थोडी थोडी फिरते मी.. संध्याकाळी त्या बाई बरोबर या पार्क मध्ये थोडा वेळ येते.. जरा बदल होतो..

‘पण गेली कुठे बाई तुमची?

‘हल्ली ती अशीच करते.. मला इथे सोडते आणि जरा जाऊन येते असे सांगून नाहीशी होते.. तिचे खूप नखरे पाहिले मी.. आता तिला हाकलूनच लावणार?

‘कुठे राहता तुम्ही?

‘त्या अश्वमेघ सोसायटीत.. दोनशे एक नंबरमध्ये..

‘माझा पण बंगला त्याच भागात आहे.. चला मी सोडते तुम्हाला..

त्या स्त्रीने वासंतीबाईचा हात पकडला आणि हळूहळू त्याना पार्कबाहेर आणले.

‘तुमचे नाव?

‘मी सुधा.. सुधा नाईक.. बँकेत नोकरी करायची मी. माझे मिस्टर प्रोफेसर होते पुण्यात. मला एकच मुलगी.. डॉक्टर आहे ती. जावई वकील आहेत.. दोघे माझ्यासोबत राहतात. माझी मुलगी आमच्याच बंगल्याच्या तळमजल्यावर प्रॅक्टिस करते.जावई इथल्या कोर्टात. चला माझ्याघरी..तुम्हाला आमचे घर दाखवते.

सुधाताई वासंतीताईचा हात पकडून आपल्या घरी घेऊन आल्या.

येताना वासंतीबाईंना आशा दिसलीच.. एका झाडामागे एका पुरुषाला खेटून थट्टामस्करी जोरात सुरु होती.. वासंतीबाईचा जळफळाट झाला… तिला हाकलून लावायचेच असे त्यानी ठरविले.

सुधाताईंनी वासंतीताईचा हात पकडून आपल्या घरात आणले… बंगल्यात आत जाता जाता उजव्या बाजूला त्यान्च्या मुलीचे.. प्रज्ञाचा दवाखाना दिसत होता.. तिचे पेशंट बाकावर बसले होते..

‘या.. ताई.बसा..

त्या घरात गेल्या बरोबर का कोण जाणे पण वासंतीताईना समाधान आणि शांती वाटली.

वासंतीताई कोचवर बसताच सुधाताई किचनमध्ये गेल्या आणि दोन सरबताचे ग्लास घेऊन आल्या..

‘घ्या.. बाहेरून आल्यावर तहान लागते ना, म्हणून प्रज्ञा सरबत तयार ठेवते.

वासंतीताईंना कौतुक वाटले… नाहीतर आपल्या घरी सकाळी गारढोण झालेला चहा.. संध्याकाळी आशाच्या मनात असेल तर चहा.. नाहीतर दोन बटर..

एवढ्यात डॉ. प्रज्ञा घरात आली.. आई सोबत अजून तिच्याच वयाची बाई पाहून ती म्हणाली..

‘मी केबिन मधून पाहिले, आई तुझ्यासोबत कोण ग या बाई?

‘ ही माझी मैत्रिण ग.. वासंती..

वासंतीबाईंनी चमकून पाहिले… जेमतेम पंधरा मिनिटांपूर्वी आपली ओळख झाली आणि ही चक्क म्हणाली..’ही माझी मैत्रिण..

वासंतीताईच्या डोळ्यात पाणी आले.. नवरा गेल्यावर हल्ली बरेच दिवसात कोणी प्रेमाचे दोन शब्द कधी बोलले नाही.. आणि ही सुधा पटकन बोलून गेली.. ही माझी मैत्रिण..

वासंतीताई इतक्या भावुक झाल्या हे पाहून सुधा त्यान्च्या जवळ आली..

‘, माझे काही चुकलं काय वासंती?

‘नाही ग सुधा.. अस प्रेमाने माझ्याशी कोण बोलत नाही ग.. सगळे हिडीसफिडीस..

‘तूझ्या घरी मुलगा आणि सून आहेत ना?

‘आहेत.. पण आहेत म्हणायचे.. दोघेही नोकरी करतात.. पण मुलाचा पगार कमी, त्यामानाने सुनेचा जास्त.. म्हणून सून जातायेत सुनावत असते मला आणि नवऱ्याला.माझा मुलगा पण तिच्याच हाताने पाणी पिणारा.. आई पेक्षा सासूवर प्रेम करणारा.. जोपर्यत मी खमकी होते.. तोपर्यंत सुनेचे काही चालत नव्हते.. पण मला अटॅक आला आणि मी परावलंबी झाले, पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होते, माझी भाची आली धावून सांगलीहून.. आपल्या छोटया मुलाला सासूकडे ठेवून.. उपकार झाले त्या वसूचे.. वसुमती.. तिनेच केले माझे. पंधरा दिवस रात्र आणि दिवस राहिली माझ्यासोबत. हॉस्पिटलचे बिल भरायला माझ्याकडे पैसे होते ग.. नवऱ्याची पेन्शन मिळते मला.. पण मायेचे कुणी हवे का नको? त्यावेळी माझ्या सुनेने चक्क मला रजा मिळतं नाही म्हणून सांगितले.. मुलगा कपिल दोन दिवस येत होता.. पण वसु आली म्हंटल्यावर तो पण येईनासा झाला.

‘मग हॉस्पिटलमधून तू घरीच गेलीस ना?

‘हो.. शेवटी माझे घर ना ते..बिल्डिंगमध्ये कामाला बाई येते.. तिच्या ओळखीने ही आशा मिळाली.

जवळजवळ सहा महिने आहे सोबत.. घटस्फोटीत आहे.. सुरुवातीला बरी होती पण सुजाताच्या नादाला लागून आता बिघडली.. गेले आठ दिवस मला पार्कमध्ये सोडते आणि नाहीशी होते…. आता आपण येताना दिसली ती.. कुणा पुरुषाला चिकटून बसली होती.. असले धंदे हिचे?

‘पण हा आशा गेली तर.. पुन्हा तुला प्रॉब्लेम नाही होणार?

‘मी मुलाला सांगते.. कुणीतरी दुसरी बाई बघ, नाहीतर तूझ्या बायकोला थोडे दिवस रजा घ्यायला सांग..बघू आईसाठी काय करतो ते..

‘बर.. वासंती.. तुझा मोबाईल दे.. त्यात माझा नंबर सेव्ह करते.. काहीही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर.. मी धावत येईन किंवा प्रज्ञाला पाठवीन..चल तुला आता तुझ्या घरी सोडते..

सुधाबाईंनी आपला फोन वासंतीबाईच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि त्यांनी हाताने त्यांना उचलले आणि हळूहळू त्यांच्या घरी पोचवले. त्यांच्या घरी लॅचने घर उघडून त्यांच्या बेडरूममध्ये त्याना बसवले आणि पुन्हा दार व्यवस्थित बंद करून त्या माघारी आल्या. 

 आशा पार्कमध्ये गेली.. तेव्हा वासंतीताई तिथे नव्हत्या. ती घाबरली आणि घरी आली.. किल्लीने दार उघडले तर बाई बेडरूमच्या खुर्चीत बसलेल्या होत्या.. त्या कडाडल्या..

‘कुठे फिरत होतीस?

‘, कुठ न्हाई..

‘मग पार्कच्या बाहेर कुणाला चिकटून उभी होतीस?

‘माजा भाव व्हता..

‘मग भावाला काय चिकटून बसायचं? मी बघितलं तुला… चालती हो.. किल्ली ठेव आणि परत मला तोंड दाखवू नकोस..

‘मला सुजाताबाय ने काम दिलाया… तेसनी बोलली तर मी जाईन.. आशाने त्याना जेवण दिले नाही आणि ती निघून गेली.

.

वासंतीबाईंना आशाचा भयंकर राग आला होता.. आपण हिला पगार देतो आणि ही उलट बोलते..’मला सुजाताताईंनी काम दिलय.. बेशरम.. मला पार्कमध्ये सोडून याराला चिकटते? पुन्हा तोंड पहाणार नाही हीच’.. मनातल्या मनात वासंतीबाई बडबडत होत्या.

लॅचने दार उघडले आणि त्त्यांची सून सुजाता आत आली.. चप्पल काढून सरळ सासूच्या खोलीत आली..

‘तुम्ही आशाला उद्यापासून कामावर येऊ नको अस सांगितलंत? मग कोण करणार तुमच? मी घरी राहू शकत नाही.. माझ्या पगारावर हे घर चाललंय.. तुमच्या मुलाचा पगार तो किती?

‘अग पण ती मला पार्कमध्ये एकटं सोडून तिच्या यारा बरोबर चाळे करत होती..

‘मग काय झाल? ती घटस्फोटित आहे माहिती आहे ना? तिला पण काही भावना असतील… मुंबई सारख्या शहरात बाई मिळतं नाही.. तुमचे काही चालू देणार नाही मी.. आशा उदया पण येईल… तिच्यामुळे मला घरकामात मदत होते.. भांडी कपडे होतात..

‘तू थोडे दिवस रजा घे.. तुझ्या आईच्या आजारपणात घेतलीस तशी..

‘माझ्या आईच्या आजारपणात रजा संपली माझी.. आता नाही मिळायची.. उद्या आशा येईल.. तिच्याचकडून काय ती सेवा करून घ्या.

वासंतीबाईचा नाईलाज झाला.. थोडयावेळाने त्यांचा मुलगा कपिल आला आणि गार झालेले जेवण टेबलावर ठेऊन गेला.. त्या मुलाशी काही बोलू पहात होत्या.. पण त्यांचे न ऐकता तो बाहेर गेला.

दहा वाजता सून आली.. त्यांना एकदा बाथरूमला नेऊन आणलं आणि ती झोपायला गेली.

सकाळ झाली.. वासंतीताई जाग्या झाल्या आणि चहाची वाट पहात राहिल्या.. आठ वाजता सून आली आणि त्याना बाथरूमला घेऊन गेली. ती गेली ती गेलीच.. त्या चहा नाश्त्याची वाट पहात राहिल्या. थोडया वेळाने त्यांना दार बंद केल्याचा आवाज आला.. त्यांनी ओळखले.. दोघे नोकरीवर गेले. आता आपण..

 साडेनऊला आशाने दार उघडले आणि ती घरात काम करत राहिली. त्याना भूक लागली होती.. तहान लागली होती… त्या हाक मारत राहिल्या.. आशा.. आशा.

पण आशा बाहेर ढिम्म होती. मोबाईल वर गाणी ऐकत होती.

बारा वाजले.. आज वासंतीताईची आंघोळ राहिली. तहान लागली पण पाणी मिळतं नव्हते.. भूक लागली होती. त्यांना बाथरूमला जायचे होते.. घाई लागली होती.

त्या हाक मारत राहील्या..’आशा.. आशा ग.. मला बाथरूमला ने ग.. नाहीतर..

एक वाजला.. आता वासंतीताईंना सहन होईना.. अचानक त्यांना काल सुधाने त्यांच्या मोबाईलमध्ये भरलेला नंबर आठवला.. त्यानी कॉल लावला.. पलीकडे सुधा..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाण्याची दुसरी बाजू… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ नाण्याची दुसरी बाजू…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(“सासूबाईंच्या नांवाने बॅंकेत कसलेच डिपॉझिट नाहीये तर त्यांच्या नावाने त्या स्वत: एक रिकरिंग खाते उघडायचे म्हणत होत्या आणि त्यासाठी कुठली स्कीम चांगली आहे, हे त्या मला विचारत होत्या.”) इथून पुढे – –

राघवसाठी हे सगळं नवीनच होतं. “मग तू काय सांगितलंस?” राघवनं अधीरतेनं विचारलं.

“पाच वर्षासाठी खाते उघडा. त्यात व्याजही जास्त मिळेल, असं मी सरळपणे सांगताच नम्रता वन्संनी लगेच फोन कट करून टाकला. तुम्ही कशाला त्यांचं रिकरिंग खाते उघडताय, आम्हीच सुरू करू की असं मी म्हणावं अशी त्यांची अपेक्षा असणार. आपणही शेवटी नोकरदारच. घराचे हप्ते, फर्निचर लोनचे, कार लोनचे हप्ते, कुकचा पगार, मोलकरणींचा पगार, फ्लॅटसचे जबरदस्त मेन्टेनन्स, असे एक ना अनेक खर्च आहेत. झालंच तर वर्षातून एखादी दुसरी लांबची सहल आणि लग्नमुंजीसाठी प्रवास असतोच.

आपण सगळ्याच सहलींना आईबाबांना घेऊन जातोच. त्यांना केरळला जायचं होतं. वर्षाखेरमुळे आपल्याला सुटी मिळत नव्हती तेव्हा ट्रॅव्हल कंपनीतर्फे तुम्ही त्यांना पाठवलं होतं. आपण दोघंही त्यांचा प्रत्येक शब्द झेलत असतो. त्यांचं औषधपाणी आणि अथर्वच्या पुढच्या शिक्षणाची चिंता डोक्यावर आहेच. बाबांना किती पेन्शन मिळते हे आपण कधी विचारलं नाही.

आता सासूबाईंच्या नावाने डिपॉझिट कशाला हवे आहे? थोडक्यात काय, अजूनही त्या दोघांना आपल्याकडे असुरक्षित वाटतं. हेच माझ्या मनाला खूप लागलं. जाऊ दे कुणाला काय वाटायचं ते वाटो. म्हणतात ना, अपेक्षांचं शेपूट कधी संपतच नाही म्हणून. दिवसागणिक अपेक्षा वाढतच जातात. ” बोलता बोलता जानकीनं वळून पाहिलं, राघव कधीच झोपेच्या आधीन झाला होता.

दुसऱ्याच दिवशी राघवनं बाबांचे मित्र विष्णु प्रभाकर यांना भेटायचं ठरवलं. फोन करून संध्याकाळी राघव आणि जानकी त्यांच्या घरी पोहोचले. सुदैवाने त्यावेळी ते एकटेच होते. राघवने आपल्या घरी झालेल्या पार्टीनंतर उमटलेले पडसाद ह्यासंबंधी त्यांना थोडक्यात सांगितलं. मग राघवच पुढे म्हणाला, “काका, तुम्हाला एक सांगू? कडक सोवळं ओवळं असणाऱ्या माझ्या आजीला मांसाहार केलेलं अजिबात खपायचं नाही. ‘काय शिजवायचं, खायचं असेल तर ते बाहेरच्या बाहेर करून खा, ’ असं म्हणायची. घरांत काहीच चालायचं नाही. तिने ती भांडी देखील मागच्या पडवीत ठेवून दिली होती. त्यावेळी मी बाबांना कधी रागावल्याचं पाहिलं नाही. कारण ते माझ्या आजीच्या साधनशुचितेचा, भावनेचा मान राखत होते. तसंच त्यांनी आता स्वत:च्या सुनेच्या भावनेचाही विचार करायला काय हरकत होती?” 

विष्णु प्रभाकर लक्षपूर्वक ऐकत होते.

“काका, मला अजूनही आठवतं. मी त्यावेळी नऊ दहा वर्षाचा असेन. एक चित्र रंगवायचं होतं. चित्रातले रंग बदलताना ब्रशला असलेला आधीचा रंग दुसऱ्या रंगात बुडवायच्या अगोदर ब्रश स्वच्छ करावा लागतो. स्वयंपाकघरातली वाटी कशाला घ्या म्हणून बाबा दाढी करताना वापरायचे ती वाटी घेतली. चित्र रंगवून झाल्यावर ती वाटी स्वच्छ धुवून ठेवणार होतो. बाबांनी ते पाहिलं. ती वाटी कशाला घेतलीस म्हणून त्यांनी माझ्या गालावर मारलेली थप्पड मी अजूनही विसरलेलो नाही. दाढीच्या पाण्यासाठी असलेली वापरलेली वाटी अधून मधून ब्रश साफ करण्यासाठी वापरली तर म्हणून त्यांना एवढा राग आला होता, मग मांसाहार करण्यासाठी वापरलेली प्लेट जानकीने बदलली असेल तर तिने अशी काय मोठी चूक केली होती सांगा. ” 

“होय, राघवा सदाशिवाचं चुकलंच. ” विष्णु प्रभाकर म्हणाले.

“काका, कोण चूक, कोण बरोबर आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. वरिष्ठांनी तरूणांच्या भावना समजून घ्याव्यात एवढंच मला वाटतं. लहानसहान गोष्टीवरून दर दोन तीन महिन्यांनी ‘आम्हाला इथं राहायचं नाही. आम्ही गावी परत निघालो’ असे ‘मानापमान’ नाटकाचे प्रयोग चालू असतात ना ते थांबवावेत. आम्ही दोघेही नोकरी करतो. शाळेतून आल्यावर अथर्वला कोण सांभाळणार, अशी आम्हाला सतत धास्ती वाटत राहते. मला आजीआजोबांच्या सहवासाचे सुख फार काळ मिळालं नाही. निदान माझ्या मुलाला तरी त्या प्रेमापासून कशाला वंचित करा म्हणून आम्ही त्यांची मनधरणी करत असतो. दुसऱ्या अपत्याचा विचार तर आम्ही कधीच सोडून दिला आहे. असो. ”

विष्णु प्रभाकर यांनी राघवचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, “राघवा, एक गोष्ट लक्षात घे. आजवर कार्यालयात वर्चस्व गाजवायची सवय असलेल्या ह्या निवृत्त मंडळींची स्थिती हवा गेलेल्या फुग्यांच्यासारखी असते. ही मंडळी आपल्या अहंकाराचा फुगा फुगवण्यासाठी घरच्या मंडळींवर डाफरायला लागतात. त्या अहंकाराला प्रतिरोध झाला की ते आक्रस्ताळेपणा करतात. मी पाहिलं आहे, बहुतेक वृद्ध मंडळी चिमूटभर दु:खाला कुरवाळत बसतात. किरकोळ अशा जखमांना स्वत:च्या नखांनी ओरबाडून घेतात आणि त्याच जखमा दाखवत सगळ्यांच्याकडून सहानुभूतिच्या मलमपट्ट्या मागत हिंडत असतात. राघवा, माझ्यावर विश्वास ठेव.

तसं पाहायला गेलो तर, ह्या परक्या राज्यात आम्ही सुदैवाने एकत्र आलो आहोत. तुझ्या बाबांनी ही घटना सांगणे तर लांबच. त्यांनी आजवर तुमच्याविषयी तक्रारीचा चकार शब्दही काढला नाही. आम्हाला सदानकदा त्यांच्याकडून तुम्हा दोघांचं कौतुकच ऐकायची सवय झालीय. खरं सांगू, सदाशिवरावांना असा मुलगा आणि सून लाभली ह्याचा इतरांना हेवा वाटत असतो. ” 

राघव नम्रपणे म्हणाला, “काका, बाहेरच्या लोकांत आमच्यावर कौतुकाची फुलं उधळण्यापेक्षा त्या फुलांतली एखादी पाकळी जरी बाबांच्याकडून आमच्या वाट्याला आली असती तरी आम्ही कृतार्थ झालो असतो. काका, ह्या तक्रारी करणाऱ्या वृद्धांनी एकदा ज्यांची मुलं परदेशात कायमची स्थायिक झाली आहेत अशा वृद्धांचे केविलवाणे चेहरे पाहावेत. कित्येक उच्चभ्रू मुलांच्या आपल्या चौकोनी कुटुंबात आई वडिलांना जागा नसते. हे आजूबाजूला असलेले विदारक सत्य पाहिले म्हणजे आपण स्वत: किती सुखी आहोत हे तुम्हा लोकांना कळेल. वृद्धांनी हट्ट सोडून थोडी तडजोडही स्वीकारावी.

दूर असलेल्या लेकीला जसा जीव लावता तसाच थोडा जीव सदैव सोबत राहणाऱ्या आपल्या सुनेवरही लावा. तिलाही थोडे प्रेमाने वागवा म्हणावं. मग बघा सगळ्याच घरातले निम्मे प्रश्न आपोआपच सुटतील.

काका, सगळीच मुलं नतद्रष्ट नसतात हो. त्यात एखादा श्रावणबाळ देखील असतो. खरं तर अनुभवातून तुम्हाला माणसं कळतात. मग तुम्हाला तुमची मुलंच कळत नाहीत, असं कसं म्हणता येईल? काका राग मानू नका. सगळेच लेखक आम्हा मुलांना नतद्रष्ट ठरवत, वृद्धांच्या व्यथांना आपल्या कथालेखनात गडदपणे रंगवून वाहवाही मिळवतात. काका, तुम्ही माझ्या बाबांच्या जागी आहात. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, मनात होतं ते बोलून गेलो. तुम्ही लेखक आहात, माझी तुम्हाला एक विनंती आहे. ही नाण्याची दुसरी बाजू मांडत तुम्ही एखादी कथा जरूर लिहा. माझ्या बाबांच्या वयाची वयोवृद्ध मंडळी तुमच्या लिखाणाने निदान विचारप्रवृत्त तरी होतील. येतो आम्ही. ” उभयतांनी निरोप घेतला.

काय जादू झाली कुणास ठाऊक, राघवने बेल वाजवताच दार उघडायला बाबा चक्क हसतमुखाने सामोरे आले. आज अथर्व आजीजवळ बसून चक्क गृहपाठ करत होता. असं वाटत होतं, जणू आकाश पूर्ण चांदण्यांनी भरून गेले होते !

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाण्याची दुसरी बाजू… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ नाण्याची दुसरी बाजू…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“फिफ्टीन वनSज फिफ्टीन, फिफ्टीन टूSज थर्टी…” अथर्व मोठमोठ्याने पाढे पाठ करत होता. सुभद्राबाई हातात कपडा घेऊन टीव्हीवरची धूळ साफ करत होत्या. राघव आणि जानकी ऑफिसहून थकून भागून नुकतेच घरी आले होते. राघव वैतागूनच म्हणाला, “अथर्व, शाळेतून आल्यापासून काय करत होतास रे? आता पाठ करतो आहेस ते.” अथर्व काही बोलला नाही. परंतु गेल्या चार पाच दिवसापासून हेच दृश्य दिसत असायचं. साडेसातला या किंवा आठला या, अगदी तेच दृश्य रिपीट व्हायचे. अथर्वचे पाढे म्हणणे आणि आईंच्या हातात डस्टिंगचा कपडा आणि बाबा बंद खोलीत बसलेले. 

जानकी पटकन आत जाऊन फ्रेश होऊन आली. अथर्वने अनपेक्षित गुगली टाकत विचारलं, “मम्मी, पप्पांचा पगार किती आहे ग?” 

जानकी क्षणभर गडबडून गेली परंतु ती पटकन म्हणाली, “मला नाही माहित. तुझ्या पप्पांना त्यांचा पगार किती आहे, मी हे कधी विचारलंच नाही.” 

“बघ तुलाच पप्पांचा पगार माहित नाहीये तर मला कसे माहित असेल? बरं ते असू दे. तुझा पगार किती आहे ते तरी सांग.”

अथर्वच्या त्या प्रश्नाचं उत्तर टाळत घड्याळाकडे पाहत ती म्हणाली, “बाळा, किती वाजलेत पाहिलंस का? चल आधी तुला जेवायला वाढते.” 

अथर्वचं जेवण आटोपताच तिने त्याचा गृहपाठ करवून घेतला. अथर्व अजूनही भरमसाठ स्पेलिंग मिस्टेक्स करत राहायचा. गृहपाठ संपल्यावर तिने हळूच विचारलं, “अथर्व, तू नेमके आम्ही घरी यायच्या वेळीच पाढे कसे पाठ करतोस रे?” 

अथर्व अगदी निरागसपणे म्हणाला, “अग, आजी खिडकीजवळ बसलेली असते ना, तुमची गाडी गेटमध्ये शिरताच ती मला लगेच जोरजोरात पाढे पाठ कर म्हणून सांगते. आणि मी ते करतो.” 

“काय रे, आज तू बाबांचा पगार किती म्हणून कशाला विचारलंस? शाळेतल्या मॅडमने हा प्रश्न विचारला होता का?” जानकीने सावधपणे प्रश्न टाकला. 

अथर्व हसत हसत म्हणाला, “ते होय, अग आजोबा आजीला डोळे मिचकावत म्हणत होते की, ‘अथर्वला त्याच्या बाबांचा पगार किती आहे माहीतच नसेल बघ’. त्यावर ते दोघेही खळखळून हसत होते.” 

जानकी हळुवारपणे अथर्वच्या केसांतून हात फिरवत होती, तसा अथर्व झोपून गेला. त्यानंतर तिचं जेवण, मग आवराआवरी. तिला रोजच रात्री झोपायला अकरा वाजून जायचे.

गेल्याच आठवड्यात सदाशिवरावांच्या घरी सिनियर सिटीझन्स मित्रांचे गेट-टुगेदर होते. आठ दहा लोकच होते. ते त्यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ग्रुपचे सदस्य होते. कुटुंब सदस्यांशी ओळख परेड झाली. सदाशिवरावांच्या तोंडून अधूनमधून त्यांची नावं ऐकलेली होती. त्यात रविवारच्या दैनिकात प्रासंगिक लेख वा कथा लिहिणारे विष्णु प्रभाकरही होते. शमी कबाब, चिकन करी, रोटी आणि बिरयानी असा मस्त मांसाहारी मेनू होता. विष्णु प्रभाकर यांच्यासाठी शुद्ध शाकाहारी मेनू होता. गप्पागोष्टींना ऊत आला होता. त्या सगळ्यांनीच मस्त एंजॉय केलं.

त्या नंतरच्या दिवसापासून मात्र घरात एक प्रकारची नि:स्तब्ध उदास शांतता पसरून राहिली होती. काय कारण असेल…? तेच तर समजत नव्हतं. 

“येत्या शुक्रवारी आम्ही नागपूरला जाणार आहोत, ” असं अचानकच सुभद्राबाईंनी सांगून टाकलं. बस्स. त्या व्यतिरिक्त त्या चकार शब्दही बोलल्या नाहीत. येण्याजाण्याच्या तिकीटाच्या रिझर्व्हेशनबद्दल काही बोलले नाहीत. मग हे दोघे अचानक असे कसे नागपूरला निघाले? काय बिनसलं असावं? राघवची आणखीनच चिडचिड होत होती. सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत असताना त्यांच्याशी बोलावं म्हटलं की ते दोघेही मॉर्निंग वॉकला गेलेले असतात. संध्याकाळी थकून भागून येतो तर बाबा आपल्या बंद रूममध्ये कोंडून बसलेले असतात. त्यांच्याशी बोलायचं तरी कधी?

अखेर राघवने आईला गाठलं आणि एकदाचे सोक्षमोक्ष लावायचेच या इराद्याने त्यानं विचारलं, “आई काय झालंय ग, तुम्ही दोघे असे आमच्याशी तुटक तुटक का वागताय ते? आमचं काही चुकलं का? तसं काही असेल तर स्पष्ट सांगा. मनांत काही ठेवू नका.”

त्या प्रश्नाचं उत्तरही सरळ न देता सुभद्राबाईनी तुटक तुटकच दिलं. ते सगळं बोलणं एकत्र जोडल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की, जानकीने बाबांचा काहीतरी घोर अपमान केला होता. 

झालं काय तर, त्या पार्टीच्या दिवशी सामिष मांसाहारी भोजनाचा बेत होता. कपाटात कित्येक नवीन डिनर सेट न वापरता तसेच पडून होते. त्यातले प्लेट्स आणि बाऊल वापरायचे सोडून, त्या पार्टीत जानकीची एक फेवरिट फिकट गुलाबांची फुलं रेखाटलेली पांढरी शुभ्र प्लेट आणि बाऊल वापरले गेले.

शुद्ध शाकाहारी असलेल्या जानकीने दुसऱ्याच दिवसापासून निमूटपणे नवीन प्लेट आणि बाऊल वापरायला काढलं. तिथंच सगळं बिनसलं. समजा मांसाहारी भोजनासाठी तो बाऊल आणि ती प्लेट वापरली गेली असेल तर धुवून पुसून घेतलं की झालं ना? त्यासाठी कपाटातून नवीन प्लेट आणि बाऊल काढायची काय आवश्यकता होती? बस्स, बाबांनी त्याचा फार मोठा इश्शू केला. बाबांचा अहंकार दुखावला गेला. ते कोप-भवनात गेले आणि हुप्प करून बसले. बाबांच्यासमोर तोंड उघडायची, आईची काय बिशाद? नेहमीप्रमाणेच या वेळीही ती हो ला हो म्हणणार. 

कारण तसं अतिशय क्षुल्लक होतं. बरं जानकीनं नवीन प्लेट आणि बाऊल घेतले म्हणून काय बिघडले? त्या प्लेटस आणि बाऊल काय वर्षानुवर्षे शोकेसमध्ये ठेवून मिरवायच्या आहेत का? बरं, शुद्ध शाकाहारी असलेल्या जानकीला सामिष भोजन केलेल्या प्लेटमध्ये जेवायला आवडलं नसेल तर तिने नवीन प्लेट आणि बाऊल काढलं असेल तर त्यात एवढा मोठा इश्शू काय करायचा? तिने फार मोठी चूक केली असल्यासारखे तिनेच दरवेळेप्रमाणे या वेळीही जाऊन त्यांची माफी मागावी का? राघव विचार करीत सुन्नपणे बसला होता. 

रात्रीची जेवणं संपून सगळं आवरता आवरता अकरा वाजले होते. जानकी राघवला म्हणाली, “राघव, आज दुपारी नम्रता वन्संचा ऑफिसमध्ये फोन आला होता. “सासूबाईंच्या नांवाने बॅंकेत कसलेच डिपॉझिट नाहीये तर त्यांच्या नावाने त्या स्वत: एक रिकरिंग खाते उघडायचे म्हणत होत्या आणि त्यासाठी कुठली स्कीम चांगली आहे, हे त्या मला विचारत होत्या.” 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फ्यूजन… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ फ्यूजन… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(त्यांनी विश्वेशला, आपल्या मुलालाही फोन लावला. तुम्हाला मुलगा चांगला वाटत असेल आणि कुसुमदीदीला चालणार असेल तर हरकत नाही, असं म्हणाला तो.) — इथून पुढे —- 

त्यांच्या धाकट्या मुलीने, उमाने मात्र त्यांना बजावलं, ‘ अम्मा, ताईवर कोणतीही जबरदस्ती करू नका. तिला मान्य असेल तरच पुढचा विचार करा. सुरेशकाकांवर विश्वास आहेच. पण शेवटी लग्न करून संसार ताईला निभावायचा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. इतर नातेवाईकांची पर्वा करण्याचं काही कारण नाही. ते नुसती तोंडपाटिलकी करणार आणि दोन्ही बाजूंनी बोलणार. माझ्या लग्नात सगळ्यांचे मानपान केले तरी कुजबूज चालूच होती या लोकांची. जातीपातीच्या गोष्टीला आजकाल कोणी महत्त्व देत नाही. शाकाहारी म्हणवणारे पण सर्रास मांस-मच्छी खातात आणि मांसाहारी असलेले कित्येक जण पूर्ण शाकाहार घेतात.

 कुसुमने मात्र लग्नाला सहमती दर्शवली. विभाताईंनी सुरेशरावांना महेशबद्दल, सगळी खरी माहिती मुलीकडच्यांना द्यायला सांगितली, त्यामुळे तिला त्यांच्याबद्दल विश्वास वाटला. नाहीतर कितीतरी लग्नांच्या बाबतीत झालेल्या फसवणूकीचे किस्से तिने आजूबाजूला आणि दूरदर्शनवर ऐकले होते, पेपरमध्ये बातम्यांमध्ये वाचले होते. शेवटी लग्न म्हटलं की तडजोड आलीच. आजवर कमी का प्रयत्न केले अम्मा-अप्पांनी आपल्या लग्नासाठी? पण कधी आपल्या रंग-रूपा मुळे मुलाकडून नकार तर कधी त्यांच्या होकारासोबत अवास्तव मागण्यांमुळे आपल्याकडून नकार हेच घडत आलं. त्यामानाने हा प्रस्ताव चांगला आहे आणि नशिबात असेल तसंच होणार की! निदान अम्मा-अप्पांच्या डोक्याची चिंताही कमी होईल. शिवाय विश्वेशच्या लग्नाचा मार्गही सुकर होईल, असा विचार तिने केला.

सुधाआंटी आणि बसप्पांनीही मग विचार केला की निदान लग्न झाल्याचं सुख तर मुलीला मिळेल. पुढचं पुढे बघता येईल. सगळं चांगलं दिसत असतानाही आजकाल किती घटस्फोट होताना दिसतात. इथे मुलाची सगळी माहिती असताना काळजीपूर्वक वागलं तर कदाचित कुसुमचं भाग्य उजळेलही!

संध्याकाळी सहा वाजताच मग बसप्पांनी सुरेशरावांना फोन करून आपली संमती कळवली आणि पुढची बोलणी कधी करायची ते सांगा म्हणाले. विभाताईंची निघायची तयारी सुरू होती. सुरेशरावांनी बसप्पांचा निरोप त्यांना दिला, तसं त्या खूष झाल्या. सुरेशरावांनी एजंटला फोन करून त्यांचं रात्रीचं बसचं रिझर्वेशन रद्द करायला सांगितलं. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी बसप्पांसोबत पुढची बोलणी करण्याचं ठरलं. कुसुम आणि महेशची समोरासमोर भेट होणं देखील आवश्यक होतं. कुसुमबद्दल आणि लग्नाबाबत विभाताईंना महेशशीदेखील बोलायचं होतंच. बसप्पांच्या होकारामुळे त्यांना आता हुरूप आला होता.

महेशवर उपचार करणाऱ्या नेहमीच्या डाॅक्टरांशी त्यांनी आधी संपर्क साधला. त्यांनी लग्नाच्या प्रस्तावाला अनुमोदन देत सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. विभाताई मग महेशशीदेखील बोलल्या. लग्नाच्या कल्पनेने त्याच्या चेहर्‍यावरही आनंद पसरला. कुसुमला त्याने लग्नात एकदाच पाहिले होते. पण आपली आई आपल्या भल्याचा निर्णय घेईल यावर त्याचा विश्वास होता. आपल्यातल्या कमतरतेची जाणीवही त्याला होतीच. त्यामुळे त्याने या लग्नाला होकार दिला. मग रात्री उशिरापर्यंत सर्व मंडळी लग्नाविषयी चर्चा करण्यात मश्गुल राहिली.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सुधाआंटी, कुसुम आणि बसप्पा असे तिघेही प्रभाताईंकडे आले. विभाताईंनी सरळ विषयालाच हात घातला.

कुसुम तू आणि महेश, आतल्या खोलीत बसून हवंतर एकमेकांशी बोलून घ्या आणि मग काय ते ठरवा, असं म्हणून त्यांनी दोघांना आत पाठवलं.

महेशबद्दल तुम्हाला सर्व माहिती सांगितली आहेच. तो सुपरमार्केटमध्ये काम करतो, त्याला दरमहा पंधरा हजार पगार मिळतो. त्याच्या वडिलांच्या दोन एल. आय. सी. पेंशन पाॅलिसीचे दरमहा सोळा हजार त्याच्या खात्यात जमा होतात. मला दरमहा ४५०००रू. पेंशन मिळते. शिवाय त्याच्या नावावर मी पोस्टाची एजन्सी घेतली आहे. त्याच्या कमिशनपोटीही किमान दोन-तीन हजार मिळतात महिन्याला. ठाण्यात आमचा तीन खोल्यांचा ब्लाॅक आहे, सातशे चौरस फुटांचा. ब्लाॅक चौथ्या माळ्यावर आहे, ग्रीन व्हॅली काॅम्प्लेक्स, खोपट भागात. घरात मी आणि महेश असे दोघेच आहोत. सात मजली पंधरा इमारतीआहेत या काॅम्प्लेक्समध्ये. दूध, भाजी, किराणा सामान, डाॅक्टर अशा दैनंदिन गरजा पूर्ण होण्याची सगळी सोय तिथे आहे. शिवाय मध्यभागी तरणतलाव आणि बगिचादेखील आहे. एक दीर-जाऊ ठाण्यात राहतात, पण त्यांचा संबंध फक्त सण-समारंभात मिरवण्यापुरवताच. लग्नाचं पक्कं ठरवण्याआधी तुम्ही ठाण्याला आमच्याकडे या. म्हणजे घरही बघता येईल आणि महेशच्या डाॅक्टरांशीही तुमची भेट घालून देईन. तुम्हाला या लग्नाबाबत काही शंका असतील तर त्यांना विचारता येतील.

बसप्पा म्हणाले, आम्ही येऊ तसं, पण तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणे सगळं सांगितलं आहे तर आपण पुढच्या गोष्टी ठरवायला आमची काही हरकत नाही. हो ना सुधा? सुधाताईंनी हसून होकार भरला.

लग्नसमारंभ विधिवत पण मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावा असं मला वाटतं. मी कुसुमला मंगळसूत्र आणि दोन सोन्याच्या बांगड्या घालीन. तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर निःसंकोच विचारा.

आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. अंडपण खात नाही आम्ही…. सुधाआंटी म्हणाल्या.

आम्ही तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही त्यासाठी. वयानुसार मी पण आजकाल क्वचितच मांसाहार करते. महेशसाठी आठवड्यातून एक – दोनवेळा बनवते, पण ती भांडी मी नेहमीच वेगळी ठेवते. हां आता मासळीचा थोडाफार वास मात्र सहन करावा लागेल तिला.

बसप्पा म्हणाले, ‘ लग्न बेळगावला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करायला आमची काही हरकत नाही. तुमची किती माणसं येणार ते कळलं तर त्याप्रमाणे सर्व व्यवस्था करणं सोपं होईल. त्यांचे मानपान पण आम्ही रीतसर करू. आम्ही धाकट्या मुलीला दहा तोळ्याचे दागिने घातले, तसेच कुसुमलापण देणार. ‘

विभाताईं म्हणाल्या, ‘ एक सांगू का? नातेवाईकांचा मानपान म्हणजे ४-५ जणांना साड्या – शर्टपीस किंवा तत्सम एवढाच. त्यावर जास्त खर्च करण्याची गरज नाही. मुंबईत सोन्याचे दागिने घालून फिरण्याची काही सोय नाही. त्यापेक्षा ती रक्कम तुम्ही कुसुमच्या नावाने फिक्स डिपाॅझिटमध्ये ठेवलीत तर भविष्यात तिलाच उपयोगी पडेल. ‘

विभाताईंचं हे बोलणं उभयतांना पटलं. मग लग्नाचा मुहूर्त काढून, बाकी तपशील ठरवू असं ठरलं. कुसुम आणि महेशही बाहेर येऊन बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने, त्यांचा होकार निश्चित केला होता.

आणि मग दोन महिन्यानंतर हे लग्न ठरवल्याप्रमाणे पार पडलं. कुसुम ठाण्याच्या घरात सून म्हणून राहायला आली. सुरुवातीला भाषेची अडचण जाणवत होती. विभाताईं मदतीला होत्याच. पण हळूहळू ती कामचलाऊ मराठी बोलायला लागली. डाॅक्टरांशी चर्चा करून तिचं आणि महेशचं सहजीवनही सुरू झालं. ग्रीन काॅम्प्लेक्समधल्या इतर लोकांशीही कुसुमचा परिचय झाला. काही चांगल्या मैत्रिणीही मिळाल्या. कुसुमनं पोस्टाच्या एजन्सीच्या कामातही लक्ष घालायला सुरुवात केली.

कुसुमच्या सुगरणपाचा अनुभव घेतल्यावर, एका मैत्रिणीने तिच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीची आॅर्डर घेशील का म्हणून विचारलं. २५ जणांसाठी वडा – सांबार आणि अननसाचा शिरा बनवून हवा होता. विभाताईंशी बोलून तिने ही आॅर्डर स्वीकारली आणि त्यांच्या मदतीने ती पूर्णही केली. त्या मैत्रिणीकडे आलेल्या सगळ्यांनी या पदार्थांची खूप तारीफ केली. आता इतरांकडूनही तिला अश्या प्रकारच्या आॅर्डर घेण्यासाठी विचारणा होऊ लागली. अर्थप्राप्ती आणि स्वावलंबनाचं हे एक नवं दालन कुसुमसाठी खुलं झालं. तिचा आत्मविश्वास वाढला.

दरम्यान तिच्या संसारवेलीवर पार्थ नावाचं फुलही उमललं. हा सगळा प्रवास खूप अवघड होता. पायातील व्यंगामुळे तिच्या उभं राहण्यावर, हालचालींवर काही मर्यादा होत्या. शिवाय महेशशी जुळवून घेण्यासाठीही तिला खूपच प्रयत्न करावे लागत होते. पण कुसुमने ही आव्हानं समर्थपणे झेलली.

इकडे तिला रोजच नवनवीन आॅर्डर मिळू लागल्या. विभाताईंनी वयोमानानुसार 

तिला मदत करणं कठीण जाऊ लागलं. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व करायचं तर रगडा, मोठी भांडी अशा अनेक गोष्टींची आवश्यकता होती. शिवाय पार्थला सांभाळून सगळं करणं कुसुमसाठी पण अवघड होत होतं. आॅर्डर पोचवण्यासाठी काहीवेळा महेशची मदत व्हायची, पण त्याची नोकरीची वेळ सांभाळून! त्यामुळे आता एखाद्या मदनिसाचीही गरज होती. त्याचवेळी त्यांच्या काॅम्प्लेक्समध्ये एक गाळा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं कळलं.

 मग या तिघांनी थोडा विचार विनिमय करून तो गाळा विकत घ्यायचं ठरवलं. महेशनी नोकरी सोडून या व्यवसायातच मदत करण्याचा निर्णय घेतला. कुसमच्या आई-वडिलांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली. लग्नाच्या वेळी विभाताईंच्या सल्ल्यानुसार फिक्समध्ये ठेवलेले पैसे याकामासाठी उपलब्ध करून दिले.

 विभाताईं आता फक्त पार्थला सांभाळतात आणि जमेल तशी कुसुमच्या व्यवसायात देखरेख करतात. महेशच्या जीवनाला अशी कलाटणी मिळेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. कुसुमने आणखी तीन बायका मदतीला ठेवल्या आहेत. तिने महाराष्ट्रातील पुरणपोळी, गुळपोळी, अळूवडी, कोथिंबीरवडी यांसारखे पदार्थही शिकून घेतले आहेत. दाक्षिणात्य पदार्थ तर तिची खासियतच आहे. कुसमच्या साथीने महेशचाही आत्मविश्वास वाढला आहे. सुपरमार्केटमधील कामाचा त्याचा अनुभव, मालाची खरेदी – विक्री करताना उपयुक्त ठरतो आहे. आता तिचं हे मराठी-कानडी फ्यूजन एकदम जोरात चालू आहे.

— समाप्त —

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फ्यूजन… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ फ्यूजन… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

धाकट्या बहिणीच्या, प्रभाच्या मुलाचं लग्न दोन दिवसांपूर्वी पार पडलं. काल सत्यनारायणाची पूजा झाली आणि नवपरिणित जोडपं आज सकाळी मधुचंद्रासाठी नैनितालला रवाना झालं. विभाताई आणि त्यांचा मुलगा महेश ठाण्याहून या लग्नासाठीच बेळगावला आले होते. तीन वर्षांपूर्वी करोनामुळे विभाताईंचा नवरा गेला, त्यानंतर प्रथमच त्या अशा समारंभाला उपस्थित राहिल्या होत्या. प्रभाने मुळी तसा हट्टच धरला होता, तू जर लग्नाला आली नाहीस तर इथून पुढे आपली कट्टी! मला तरी माहेरचं कोण आहे दुसरं? आणि ती म्हटल्याप्रमाणे करेल याची विभाताईंना खात्रीच होती. विभानं आपलं दुःख विसरून चार माणसात मिसळावं हीच प्रभाची इच्छा होती.

‘आणि लग्न झाल्यावर लगेच घरी पळायची घाई करायची नाही. नंतरचे पसारे आवरायला मला मदत कोण करणार? ‘ असा प्रेमळ दमही भरला होता प्रभानी.

बाकीचे पाहुणे-रावणे पूजा झाल्यावर आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले होते.

प्रभाचे यजमान सुरेशराव नाश्ता करून, बाहेरची काही कामं पूर्ण करण्यासाठी काही वेळापूर्वीच घरातून बाहेर पडले होते. महेशलाही सोबत घेऊन गेले होते. त्यामुळे कामं करता करता दोघी बहिणींच्या गप्पा रंगल्या होत्या.

‘ताई, महेशही बत्तिशीचा झाला ना? त्याच्याही लग्नाचं बघायला हवं ना! त्याची सुपरमार्केटमधली नोकरी कशी काय चाललीय? ‘

‘नोकरी ठीक चाललीय ग! पण लग्नाचं कसं बघणार? त्याच्यासारख्या गतीमंद मुलाला स्वीकारायला कोण मुलगी तयार होईल! कसाबसा रखडत दहावी पास झालाय. वयानुसार त्याच्यातही शारिरीक बदल होताहेत आणि त्यामुळे काही वेळा खूप आक्रस्ताळेपणा करतो. मला एकटीला हे सगळं नाही ग सांभाळता येत. डाॅक्टर म्हणताहेत की त्याचं लग्न करायला हरकत नाही. कदाचित त्यानंतर त्याची चिडचिड कमी होईल. तसं दैनंदिन व्यवहार तो नीटपणे पार पाडतो. पण आकडेमोड, हिशेब काही जमत नाही. काही गोष्टी पुन्हा पुन्हा समजावून सांगायला लागतात. शिवाय याचा पगारही मोजका, माझं पेंशन व्यवस्थित आहे, म्हणून घर नीट चाललंय. लग्न करायचं तर मुलीकडचे या सगळ्या गोष्टींचा विचार करणारच की! काय त्याच्या नशिबात आहे कोण जाणे! ‘

‘ खरंय तुझं, पण अशी निराश होऊन, हातावर हात ठेवून बसलं तर कसं होईल? त्या दृष्टीने प्रयत्न तर सुरू केला पाहिजे ना! ‘

रंगरूप चांगलं दिलंय देवानं. आता स्वतःचं पोट भरण्याइतपत तर कमवतोय की महेश!

संथ असला तरी वागणं बरंच नाॅर्मल आहे त्याचं. एकदम दहा गोष्टी सांगितल्या तर गोंधळतो. पण सावकाश सांगितलं तर कळतं सगळं नीट!

‘ प्रभाताई, थोडं इडली-सांबार आणलंय, म्हणजे तुम्हाला स्वैपाक करायला नको आज! लग्नाच्या धावपळीनं दमला असाल ना! ‘ आले’, म्हणत प्रभा बाहेर गेली. कोण बरं हे, म्हणून विभाताईंनी डोकावून पाहिलं तर एक साधारण पन्नाशीची स्त्री, घराच्या मागच्या भिंतीपलीकडून प्रभाला दोन मोठे स्टीलचे डबे देताना दिसली. तिचा काळा रंग मात्र अगदी डोळ्यात भरत होता.

डबे स्वैपाकघरात ठेवून प्रभा परत आली, आणि विभाताईंना म्हणाली.. अग या सुधाआंटी, कन्नड ब्राह्मण आहेत. दोन वर्षांपूर्वी शेजारचं घर त्यांनी विकत घेतलं आणि मला छान शेजार मिळाला. मदतीला नेहमी तत्पर असतात. त्यांचा नवरा सरकारी खात्यात नोकरीला होता, नेहमी बदल्या व्हायच्या. आता रिटायर झाल्यावर मात्र त्यांनी इथे राहायचा निर्णय घेतला. बरीच वर्ष हे लोक कर्नाटक, आंध्र प्रदेशात होते. पण सुधाआंटी लहानपणी मुंबईत राहिलीय, त्यामुळे मराठी चांगलं बोलते. दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांना. एकीचं लग्न झालंय आणि मुलगा नुकताच इंजिनीअर होऊन बेंगलोरला नोकरीला लागलाय.

पण प्रत्येकाला काही ना काही दुःख दिलंय बघ देवानं! यांची मोठी मुलगी कुसुम, तिशीची आहे ती! जन्मताच तिचा उजवा पाय, डाव्या पायापेक्षा आखूड आहे

त्यामुळे पाय ओढत चालते आणि कमरेचा भागही बेढब आहे.

बारावी पास झालीय जेमतेम, पण शिक्षणात फारशी गती नाही, म्हणून पुढे शिकली नाही. शिवाय रंगही आईसारखा, एकदम काळा. रूपही सामान्यच. त्यामुळे लग्न जमलं नाही. खरंतर बोलणं वागणं खूप छान आहे. सुधाआंटीच्या बरोबरीनं घरातलं सगळं कामही करते. पण फारशी घराबाहेर पडत नाही. आपल्याकडे लग्नाला मोठ्या मुश्किलीने आली आणि लग्न लागताच घरी गेली. धाकटी उमा जरा रंगानं उजळ आणि ग्रॅज्युएट पण झाली. तिचं तिनंच जमवलं लग्न, मग यांनी करून दिलं. धारवाडला असते ती. पण कुसुमची चिंता आहेच दोघांना. असतं एकेकाचं नशीब! ‘

तेवढ्यात सुरेशराव आणि महेश बाहेरून आले आणि यांच्या गप्पा थांबल्या. मग जेवणं उरकली आणि दोघीजणी आतल्या खोलीत आणि ते दोघं दुसर्‍या खोलीत आडवे झाले. चहापाणी झाल्यावर पुन्हा दोघी घरातली आवरा-आवर करत राहिल्या. लग्नघर म्हटलं की पसारा केवढा असतो.

सुरेशरावांनी विभा आणि महेशचं दोन दिवसानंतरचं स्लीपरबसचं रिझर्वेशन करून आणलं होतं. विभाताईला बरोबर काय काय द्यायचं याची प्रभाची जमवाजमव चालली होती. दुसऱ्या दिवशी दोघी बाहेर पडून काही साड्या, कलाकंद आणि इतर सटरफटर खरेदी करून आल्या.

विभाताईंना त्यांच्या सोसायटीतल्या मैत्रिणींसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या.

उद्या संध्याकाळी सातला निघायचं होतं, साडेआठची बस होती ठाण्यासाठी. बसस्टँड घरापासून तसा तासभर अंतरावर होता. विभाताईंनी पण आपलं सामान गोळा करून बॅग भरली. महेश जेवणानंतर गोळी घेऊन आतल्या खोलीत आडवा झाला होता, त्याला जरा कणकण वाटत होती. रात्रीची जेवणानंतरची आवरा-आवर करून त्या दोघी बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या.

सुरेशराव म्हणाले, महेशमध्ये खूप चांगला बदल झाला आहे. स्वतःहून चार गोष्टी बोलतो, विचारतो. पूर्वीसारखा बिचकत नाही. अंगानेही भरलाय. खूप बरं वाटलं त्याची प्रगती बघून.

‘हो ना! मी ताईला तेच म्हटलं. आता त्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. ‘ 

विभाताई, मी एक सुचवू का? महेशसाठी कुसुमचं स्थळ कसं वाटतं? सहज मनात आलं ते बोललो हं. म्हणजे तुम्हाला पटलं तर बघा हं. ‘

‘अहो, काहीतरीच काय बोलता? महेश किती देखणा आहे! शिवाय ते ब्राह्मण आणि आपण मांस-मच्छी खाणारे, कसं जमणार हे? प्रभा पटकन म्हणाली.

‘ दिसण्याचं काय घेऊन बसलीस बाई, त्याच्यातही कमतरता आहेच की! पण

मुलीला आणि तिच्या घरच्यांना असं स्थळ चालेल का? , विभाचा सूर निराशेचा होता.

‘ तुम्हाला चालणार असेल तर मी बसप्पांशी बोलून तर बघतो, नाही पटलं तर राहिलं. पण पटलं तर दोघांचही भलं होईल असं मला आपलं वाटतं ‘, सुरेशराव म्हणाले.

तुम्ही बोलायला माझी काही हरकत नाही. पण मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना सर्व परिस्थितीची स्पष्ट कल्पना द्यायची. उगाच खोटंनाटं सांगून, मला कोणाची फसवणूक करायची नाही.

हो हो, मी उद्या सकाळीच त्यांच्या कानावर घालतो हे. मग बघू काय म्हणतात ते! योग असेल तर जमून जाईल.

दुसर्‍या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरेशराव बसप्पांकडे गेले. त्यांनी 

कुसुमसाठी महेशचं स्थळ सुचवलं. बसप्पांनी लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही. सुरेशरावांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध घरोब्याचे होते. त्यामुळे त्यांनी सुधाआंटींना बाहेर बोलावलं, ‘ हे सुरेशराव काय म्हणतात ते ऐका’. त्या काॅफीचे मग घेऊन बाहेर येतच होत्या. सुरेशरावांनी त्या दोघांना महेशची सर्व माहिती सविस्तर सांगितली. दोघेही विचारात पडले. कुसुमचं लग्न ठरत नव्हतं हे जरी खरं असलं, तरी असं जातीबाहेरच्या आणि ते पण गतिमंद मुलाशी तिची सोयरीक जुळवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं. कुसुमला मराठी बोलता येत नव्हतं पण बोललेलं बरंचसं समजत होतं.

सुरेशराव म्हणाले, ‘ दोन्ही मुलं आपल्या जवळची म्हणून मी सुचवलं. तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या. ‘ तसं बसप्पा त्यांना म्हणाले, ‘तुम्ही आमचे हितचिंतकच आहात. पण आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. कुसुमशीही बोलायला हवं. शिवाय आमच्या गोतावळ्याचाही विचार घ्यायला हवा ना? ‘ 

‘ हो हो काही हरकत नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या. ‘ असं म्हणून सुरेशराव तिथून घरी आले.

प्रभाताईंकडच्या लग्नात सुधाआंटींनी महेशला बघितलं होतं. किती छान गोरापान आणि राजबिंडा दिसत होता तो. पण त्याचं गतिमंदत्व नजरेआड करता येत नव्हतं. आपल्या पोटचा गोळा कुरूप असला म्हणून काय झालं? शिवाय आपण कट्टर शाकाहारी आणि हे रोज मच्छी खाणारे. आपल्या घरात तर अंडसुद्धाआणलं जात नाही. त्यांनीआणि बसप्पांनी मग आपल्या बहिण-भावांशीही फोनवरून चर्चा केली. पण कोणी फारसं अनुकूल मत दिलं नाही. त्यांनी विश्वेशला, आपल्या मुलालाही फोन लावला. ‘ तुम्हाला मुलगा चांगला वाटत असेल आणि कुसुमदीदीला चालणार असेल तर हरकत नाही, असं म्हणाला तो.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मले बी रील कराचं हाय – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ मले बी रील कराचं हाय – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

घट बसायचे दिस जवळ आले न सखीनं मिटिंगसाठी शेजारच्या सखु बह्यनींना बबल्याच्या हाती निरोप धाळला. बबल्या तसं इच्चक पोट्टं! पण अशे कामं लय उड्या मारत करे. कमळी, विमली, यशोदी, धुरपदी, माली असा आट-धा जनींचा ग्रुप होता त्यायचा. नवरातीत भजनंयी कराच्या थ्या! कमळीची सासू लयच खराब! दादला बी सासूवानीच! मंग तिचे चारचौगीत उठनं बसनं व्हते मून बोलवेच कमळीले थे.

सगळ्यात पहिली कमळीच दबकत दबकत आली. तं ये सखी मोबाईल पाहत बसलेली! “काय पाहून रायली वं सखे! जंवा पायलं तवा मोबाईल घेऊन बसतं तं? ” कमळी तिले मने.

“अवं ये कमळे! सासू नं बरं लवकर धाळलं तुले” सखी 

“अवं ते कायची धाळते! म्याच आलू नजर चुकवून! थ्या समद्या येऊन राहिल्या बग. आटप तुयी मीटिंग लवकर. ” 

तशी सखीला आयळिया सुचली. ते म्हने; “कमळे! आपन या नवरातीला रील बनवू! पाय जो मोबाईलवर मस्त मस्त रिल टाकतात समदे.

कमळी कशी मनते; ” तुले कायी येळ बिळ तं नायी लागलं वं! नवरातीत देवीचे भजन करावं का रील बनवावं! ” 

“आवं तेच तर म्हणतो मी! आपन भजनाचच रील बनवू. “सखू मनली. तंवर समद्या जमल्या होत्या, त्यायनं बी येक जात ‘होऽऽ… ‘ मनलं.

कमळी काही नवरातीचं भजन सोळून रील बनवायला तयार नवती. परत सासूची भीती! तिनं पायलं म्हंजे!

मंग यशोदी मनली, “आपन अष्टमीले घागरी फुकतात त्याचंच रील बनवू. अन तुया सासूले सांगायलाच कोन चाललं वं? तुझ्या सख्यांना येवळंयी वळखत नाय का तू?

कशीबशी कमळी तयार झाली न् अष्टामीला रील बनवायचं ठरलं. येटाळ्यातल्याच पोट्ट्याला विडिओ काढायला तयार केलं.

थ्या दिवशी उपास म्हनून समद्या घरचं आटपून सखी कडे जमल्या तिच्या देवीपुढे घागरी फुकू लागल्या. फूऽऽ फूऽऽ…..

कमळीच्या सासूला कोन्या पोट्ट्यांनं जाऊन सांगितलं काय जनं? थे खिळकीतून पायत उभी होती अन मागून पोट्टे तिला दाखवत व्हते, आजी कमळी काकीले पायना!

कमळीनयी डोळ्याच्या कोपऱ्यातून तिले आमासक पायलं अन जोर जोरात घागर फुकू लागली. अंगातच आल्यावानी!

आई माय! इच्या तर खरंच अंगात आलं नायी वं! कमळीची सासू बळबळ करतच आत घुसली. कमळीने ऐकलं पन न ऐकल्यासारखंच दावलं. तिची सासू, “आई चुकलं माकलं माफ कर” मनत तिच्या पाया पडू लागली. कमळी तशी हुश्शार! लगेच तिच्या ध्यानात आलं काय करायला पायजे तं!

मोठ्यानं वरडून सासूला मने, “कमळीला नायी आनलं पाया पळायले? सून वायरी व्हंय मून शान दावा साधतो व्हय तिच्या संगं! ” तिच्या सासूची जोऽऽ तंतरली आन खातरीच पटली कमळीच्या अंगात देवीच हाय मून!

कमळीनंयी हुश्शारीनं साडी चोळीले हजार कबूल करून घेतले पयले. आन मंग सासूला म्हनली, “कमळी माझी लय भक्तीन हाय. तिले तरास देशील तं तुवं वाट्टोळं करीन! तिले खायला प्यायला नीट देत जा. अन काय वं! तुया पोराचे हात काय केळी खायला गेले काय वं? पानी भरायले बी तिलेच लावतो तं! कमळीनेयी आपलं समदं साधुनच घेतलं अन कबुल करून घेतलं समदं देवीपुढे. कमळीले त्रास द्यायचा नाय मून! ” 

हिकडं तिकडं पायत पायत अन् अंगात आलेल्या कमळीच्या पाया पडू पडू तिची सासू मनते कशी, “आता नाही तरास देनार वं आई कमळीले मी”.

कमळीच्या नव्या अवताराला अन तिच्या सासूच्या बी नव्या रूपाकडं बगून तिच्या समद्या सख्या टक्का मक्का बगतच रायल्या.

रील झालं तयार! अन फेसबुक वर टाकलं बी! रील टाकल्यावर तं कमळीची सासू लयच शेळीवानी झाली. इकडे नवराती झाल्यावर सखी अन तिच्या मैतरनी मने, “कावं तू तं शिक्सर का काय मनतात थेच टाकला सासूवर! आधी तं रील करायले बी तयार नवती! ” 

कमळीचं काम चांगलंच फत्ते झालतं. थ्ये कायदे बोल्ते आता कायी? निरा दातकाड काडू काडू हसू लागली.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रेश्माची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ रेश्माची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

” गेले पंधरा दिवस भुर्रकन निघुन! उद्या तुम्ही पण जाल! मग मात्र सासुबाईशिवाय हे घर मला आणि अविला खायला उठेल हो ताई! ” 

…. एवढं बोलून शरु ढसढसून रडायला लागली,…

ह्या पंधरा दिवसात ती बरीच खम्बीर होती. खरंतर, आईचं पडल्यापासूनच दुखणं या आठ महिन्यात तिनेच केलं होतं! आपण फक्त नावाला लेक होतो. तिच्या कर्तव्याने खरी लेक शरुच झाली होती!

त्यामुळे आपल्याला आईची उणीव जाणवणारच! पण शरुला ती जास्त प्रखर जाणवेल… स्मिताने तिला पटकन जवळ घेतलं.

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही,.. कारण, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे आता सगळेच अनुभवत होते,… “

तिघांनी परत मनसोक्त रडून घेतलं.

मग अलगद शरु उठली. कपाटातून तिने सासुबाईचे कानातले जोड आणि बांगड्या नणंदेपुढे ठेवल्या,.. कपाटही उघडच ठेवलं.

ती स्मिताला म्हणाली,

“ताई, आईची आठवण’ म्हणून हे दागिने आणि त्यांच्या ज्या साड्या पाहिजेत, त्या घेऊन जा! “

स्मिता उदास हसत म्हणाली,.. “अग, माणूस आठवणींनी मनात हृदयाच्या कप्प्यात जपलेला असतोच.. ह्या वस्तू, हे दागिने….. हे सगळं गौण आहे ग! मला काही नको ग! असु दे तुमच्याकडेच! आईचा एवढा दवाखाना, खर्च तुम्ही सगळं कसं पेललं असेल ह्याची कल्पना आहे मला. हे दागिने तुमच्याकडेच ठेवा,.. पण एक वस्तु मात्र मी हक्काने मागेन,… आईने रेशीम दोऱ्याची एक सुंदर झुल शिवली होती,.. ती मला दे! त्याच्या फार सुंदर आठवणी आहेत ग, माझ्या मनात! “

शरुने लगेच खालच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली ती झुल काढली. स्मिताने ती गच्च छातीशी धरली. तिला परत आईची खुप आठवण आली. रडणं ओसरल्यावर ती बोलू लागली… 

“एकदा आमच्या घराच्या मागच्या अंगणात एक गाभण गाय हंबरत उभी होती. आईने तिला बघितलं आणि म्हणाली, “अग बाई इथेच पाडस जन्माला घालते कि काय,..? हिचा मालक कुठे गेला, का ही वाट चुकून इकडे शिरली? ” पण तिला आता हाकलून लावणं शक्य नव्हतं. अवि तुला आठवतंय का? त्या गावी बाबांची बदली झाली होती, तिथं आपलं मागच्या पुढच्या अंगणाचं घर होतं बघ. “

त्यावर अवि म्हणाला, ” फार काही आठवत नाही, पण त्या कच्च्या दुधाच्या वड्या.. खरवसाच्या वड्या आठवतात,.. पोटभर खायला मिळाल्या होत्या बघ! ” 

स्मिता म्हणाली, ” हं sss! तू लहान होतास फार! मला मात्र स्पष्ट आठवत सगळं! आपल्याकडे कामाला येणाऱ्या शामलाबाईंना आईने लगेच बोलवलं. त्यांना सगळी माहिती होती… 

आई म्हणाली, ” मुकं जनावर असलं, तरी त्रास आणि लाज दोन्ही असतातच प्राण्याला. ” 

भिंतीच्या कोपऱ्यात घुसून हंबरत होती ती गाय! मग आईने तिला आडोसा केला. गरम पाण्याचा शेक,…. अगदी जणू लेकीचं बाळंतपण केल्यासारखं केलं. पाडस तर किती सुंदर होतं! आणि काही क्षणात चार पायावर उभं राहिलं.

आई म्हणाली, “देवाला काळजी सगळ्या जीवांची! ह्या मुक्या प्राण्यांना बघा मिनिटात उभं करतो तो. आपली लेकरं वर्षं घेतात,.. “.

शामला बाई आईला म्हणाल्या, “फार जीव लावू नका. कधी मालक येईल आणि घेऊन जाईल तर करमणार नाही,… ” 

…. आईने तेंव्हा त्या पाडसासाठी ही झुल केली,.. अगदी रातोरात जागुन!

 म्हणाली, “आपल्याकडे नव्या लेकराला कपडे करतात त्याला झुल तरी करू! मला फार आवडली होती रेश्मी झुल! सुंदर रंगांची! मऊमऊ! मी पण जागी होते त्या रात्री. सकाळी उठून कधी त्या पाडसावर घालू असं झालं होतं! पण सकाळी जाग आली ती आईच्या रडण्याने! गाय, वासरू निघून गेल होतं आपल्या वाटेने! तू खुप रडला होतास! “बांधलं का नाहीस? ” तिला विचारत होतास.

आई म्हणाली, “ती आपली मालकीची नव्हती. तिची अडचण, म्हणून आडोश्याला उभी राहिली. आपलं मन वेडं! लगेच गुंतल त्यात! ” मी ही झुल छातीशी घट्ट धरून रडत होते.

आई म्हणाली, “रडू नकोस. स्त्री जन्म अगदी असाच असतो, बघ! तुझ्या या वयात ही गाय येऊन तुला काय काय शिकवून गेली बघ! लज्जा, वेदना, मातृत्व! बघितलंस ना, वासराला कशी चाटत होती? आनंदाने दूध पाजत होती! सगळ्या वेदना विसरून… परत आपण दिलेल्या आरामाच्या मोहात रमली नाही. गेली निघून, आपल्या कर्तव्यांचं पालन करायला! असंच असतं स्त्रीचं जगणं! माहेरी दोन दिवस यायचं, लाड करून घ्यायचे, आणि जायचं निघून परत आपल्या भूमिकेच्या युद्धावर! ” 

आईने झुल हातात घेतली. म्हणाली, ” आता येणाऱ्या प्रत्येक चैत्र गौरीला मी ही झुल घालेन. त्यावर माझी गौर बसेल. कारण, ही गाय माझ्या लेकीसारखीच आली माझ्या आयुष्यात, राहिली आणि निघून गेली. पण ह्या रेशमी झुलीवर तिच्या आठवणींच्या पाऊल खुणा सोडून गेली. ” 

…. “ आईने ह्या झुलीतून मला खूप काही शिकवलं, आयुष्यभरासाठी! ही तिची आठवण मात्र मला द्या! “

अविने आणि शरुने स्मिताला जवळ घेतलं. तिघेही आईच्या आठवणीने रडत होते, आणि ‘रेशमी झुल म्हणजे आईनेच हातात हात धरलाय, ‘ असं अनुभवत होते!

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय…. – मूळ हिन्दी लेखक : श्री गौतम राजर्षी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

आय लव्ह यू फ्लाय बॉय…. – मूळ हिन्दी लेखक : श्री गौतम राजर्षी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

27 जानेवारी : जम्मू-नगरौटा दरम्यान एका ठिकाणचे सैन्याचे हेलीपॅड

दुपारचे चार वाजले आहेत. दिवसभराची धावपळ झाल्यानंतर, धुकं चिरत सूर्यदेव शेवटचं स्मितहास्य करत आहेत. आपलं हेलीकॉप्टर घेऊन, आर्मी एव्हिएशनचे दोन पायलट, एक मेजर आणि एक कॅप्टन, इथल्या हेलीपॅडवरून, मध्य काश्मीरमधील एका भागात असलेल्या आपल्या एव्हिएशन बेसकडे जाण्यासाठी आपल्या कडक, स्मार्ट युनिफॉर्ममध्ये सज्ज आहेत. इथल्या हेलीपॅडपासून ते एव्हिएशन – बेसपर्यंतचा प्रवास सव्वा तासाचा आहे. हे अ‍ॅडव्हान्स लाइट हेलीकॉप्टर ‘ध्रुव’ घेऊन, पीरपंजालची बर्फमय शिखरांची साखळी ओलांडत परवाच तर दोघे इथे आले होते. 26 जानेवारीला मिळालेल्या अनेक धमक्यांना अनुलक्षून अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी ते इथे आले होते.

हेलीकॉप्टरचे पंखे हळू हळू गती घेऊ लागले आहेत. मेजर वर्मा सगळीकडे धावती नजर टाकून कॉकपीटमध्ये येऊन बसले आणित्यांनी हलकेच मान हलवत कॅप्टनला इशारा दिला. कॅप्टनच्या उजव्या हाताचा जॉय- स्टिकवरचा दबाव त्यांनी वाढवला. फूल थ्रॉटल. धुळीची वावटळ उठली. पंखांची फिरण्याची गती, एका मिनिटाला तीनशे पंधरापर्यंत पोचली, तेव्हा ते मोठसं पाच टनी वजन असलेलं हेलीकॉप्टर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला वाकुल्या दाखवत हवेमध्ये उचललं गेलं.

थोड्याशा खालच्या बाजूला रेंगाळणारी भटक्या ढगांची टोळी, मेजर वार्मांच्या कपाळावर आधीच उठलेल्या आठयांमध्ये आणखी एक दोन आठयांची भर घालते. भटक्या ढगांशी खेळ करत हेलीकॉप्टरचे पंखे आता हेलीकॉप्टरला एका सुरक्षित उंचीवर घेऊन येतात… दूरच्या क्षितिजावर क्षणोक्षणी जवळ येणारी पीरपंजालची शुभ्रशी शिखरे दिसू लागतात. बस! एवढी शिखरं पार केली की झालं. मग पुढचं व्हॅली फ्लॉवरचं उड्डाण म्हणजे मुलांचा खेळ. तिकडे पीरपंजालवर लटकलेल्या ढगांची गर्दी जशी काही कुठल्याशा षड्यंत्रात सामील होऊन, येणार्‍या हेलीकॉप्टरकडे बघत हसते आहे. कॅप्टन काहीसा बेफिकीर आहे. या बाजूचं त्याचं बहुतेक पाहीलंच उड्डाण आहे.

मेजरच्या ललाटावर इथे तिथे पसरलेल्या रेषांवर उमटलेले घामाचे बिंदू वेगळंच काही तरी सांगताहेत. धुकं आणि ढग यांच्यामुळे हेलीकॉप्टरची गती अगदी कमी आहे. आदेशानुसार संध्याकाळी साडे पाचपूर्वी बेसवर पोचणं जरूरीचं आहे. या काकडणार्‍या थंडीत दिवसाला लवकर पळून जाण्याची घाई असते आणि रात्र तर जशी कंबर कसून बसलेली असते. सहा वाजतात न वाजतात, तोच येऊन धडकते. म्हणण्यापुरतं हे अ‍ॅडव्हान्स हेलीकॉप्टर आहे, पण रात्री उडण्याची याची क्षमता शून्याबरोबर आहे.

 27 जानेवारी : पीरपंजालच्या खाली द्क्षिण काश्मीरमधील एक जंगल

सकाळचे साडे नऊ वाजले आहेत. पीरपंजालच्या घाटीमधील या जंगलाचा एक भाग अचानक गोळ्यांच्या धमाक्याने गुंजत उठलाय. आदल्या दिवशी रात्री जवळच्याच राष्ट्रीय राइफल्स बटालियनला, चार आतंकवादी जंगलात लपून बसल्याची पक्की खबर मिळाली होती. सूर्यदेवाचं पहिलं दर्शनच चकमकीचा बिगुल वाजवत होतं. दोन आतंकवादी मृत झाले आहेत आणि दोघांचा शोध सुरू आहे. ही सगळी कार्यवाही होता होता सात तास होऊन गेले आहेत. आता पाठलाग करणारी सैन्याची एक तुकडी जंगलाच्या खूप आतपर्यंत पोचलीय. उरलेल्या दोघांपैकी आणखी एक आतंकवादी मारला गेलाय. दुसर्‍याची मात्र कुठे चाहूल लागत नाहीये. तुकडीचा लांस नायक जखमी झालाय. त्याला पोटात गोळी लागलीय. प्राथमिक उपचारानंतर रक्त वाहणं थांबलय, परंतु त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचवणं गरजेचं आहे. सगळ्यात जवळच्या रस्त्यापर्यंत जायचं झालं, तरी कमीत कमी चार तास लागतील. एव्हिएशन बेसला लवकरात लवकर हेलीकॉप्टर पाठवण्याविषयी वायरलेसवरून संदेश पाठवला गेलाय.

27 जानेवारी : पीरपंजालच्या बरोबर वर

संध्याकाळचे पाच वाजू लागले आहेत. हेलीकॉप्टरचं पूर्ण नियंत्रण मेजरने आपल्या ताब्यात घेतलय. थोड्या वेळापूर्वी बेफिकीर वाटणारा कॅप्टन आता उत्तेजित झालाय. धुकं आणि षड्यंत्री ढगाच्या टोळीशी झुंजत झुंजत हेलीकॉप्टर आता पीरपंजालच्या बरोबर वर आहे. मेजरला बेसकडून, त्याच्या बरोबर खाली चाललेल्या चकमकीविषयी आणि या चकमकीच्या दरम्यान घायाळ झालेल्या जवानाविषयी रेडिओ- सेटवर संदेश मिळतो. बेस अद्यापही अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. अंधारही वाढतोय. मेजरच्या मनात संभ्रम आहे. कायद्यानुसार तो आपल्या बेसच्या दिशेने उडू शकतो. त्याच्यावर कोणताही दबाव नाही. नियम आणि आदेशानुसार त्याला आपलं हेलीकॉप्टर साडे पाच वाजता बेसवर लॅंड करायला हवं. महागडं हेलीकॉप्टर आणि दोन प्रशिक्षित पायलट यांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे. संभ्रमाच्या या पराकोटीच्या अवस्थेत त्याला आपल्या मेजर दोस्ताची सक्सेनाची आठवण होते. त्यांचा जिगरी दोस्त. तो त्या राष्ट्रीय राइफल्स बटालियनमधेच आहे आणि अचानक हेलीकॉप्टरची दिशा बदलते. पीरपंजालच्या जंगलाच्या दिशेने ते वळतं. कॅप्टनच्या विरोधस्वरूप बडबणार्‍या ओठांकडे दुर्लक्ष करत, मेजर आपल्या कपाळावर डावा हात फिरवत त्यावर उमटलेल्या वाकड्या तिकड्या रेषा, स्लेट पाटीवर आखलेल्या वेड्या-वाकड्या रेषा पुसून टाकाव्या, तसा मिटवून टाकतो.

27 जानेवारी : पीरपंजालच्या खाली दक्षिणी काश्मीरी घाटीचा निबीड जंगलाचा एक भाग 

संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आहेत. जंगलातल्या या आतल्या भागात संध्याकाळ जरा लवकरच उतरून आलीय. रातकिड्यांच्या किरकिरीत विव्हळण्याचा आवाजही मिसळलाय त्या घायाळ लांस नायकाच्या अवती भवती असलेल्या त्याच्या साथीदार सैनिकांच्या नजरा वारंवार आकाशाकडे वळताहेत. घेरून येणार्‍या अंधारात विव्हळणार्‍या नायकाचा आवाज मंदावत चाललाय. रातकिड्यांच्या करकरीत मधेच एक आवाज आकाशातून येतो. झाडांच्या वर दिसणारं हेलीकॉप्टर, त्याचे मोठे फिरणारे पंख, निराश लांस नायकासाठी संजीवनी घेऊन आले आहेत. पृष्ठभागापासून थोड्या उंचीवर थांबेलेलं हेलीकॉप्टर सगळ्या जंगलाला थरथरायला लवतय. घायाळ लांस नायक आणि त्याचा एक साथीदार, हेलीकॉप्टरमध्ये बसलेले मेजर आणि कॅप्टन यांच्या साथीला येतात. झाडांना, वृक्षांना हलवत, डोलवत हेलीकॉप्टर अंधारात आपला मार्ग शोधत आपल्या बेसच्या दिशेने उडू लागतं. कॉकपिटमध्ये चमकणारं घड्याळ ठरलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे जास्त झाल्याची चेतावणी देतं.

२८ जानेवारी: मध्य काश्मीर घाटीतील एव्हिएशन – बेसची छावणी 

सकाळचे सात वाजलेत. घायाळ लांस नायक तज्ज्ञ चिकित्सकांच्या देखरेखीखाली, गेले बारा तास आय. सी. यू मध्ये सुरक्षित श्वास घेऊ लागलाय.

मेजर वर्मा आपल्या बिछान्यात गाढ झोपलेत. त्यांचा मोबाईल वाजतो. चिडून, वैतागून, अस्वस्थ होत ते मोबाईल स्क्रीनकडे टवकारून पाहतात. स्क्रीनवर त्यांचे जिगरी दोस्त मेजर सक्सेनांचा नंबर फ्लॅश होतो. अस्वस्थ होत ते मोबाईल उचलतात.

मेजर वर्मा : हा! बोल! 

मेजर सक्सेना : कसा आहेस तू?

मेजर वर्मा : थँक्स म्हणायला फोन केलायस का?

मेजर सक्सेना : नाही.

मेजर वर्मा : मग? 

मेजर सक्सेना : आय लव्ह यू, फ्लाय-बॉय!*

मेजर वर्मा : चल… चल…

आणि मोबाईलच्या दोन्ही बाजूंनी एकदमच गडगडाटी हसण्याचा आवाज गुंजत राहातो.

* फ्लाय-बॉय – हेलीकॉप्टर चालवणार्‍याला फ्लाय-बॉय म्हणतात.

मूळ हिन्दी लेखक : श्री गौतम राजर्षी 

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares