सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ महत्वाची सूचना!! 📖 ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 संपादकीय निवेदन 💐

📖  दि. ५/६ ते ९/६/२५ अंक बंद असल्याबद्दल महत्वाची सूचना!! 📖

कृपया सर्वांनी नोंद घ्यावी – – 

गुरुवार दि. ५/६/२५ ते सोमवार दि. ९/६/२५ असे पाच दिवस काही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे आपल्या ई- अभिव्यक्तीचे दैनिक अंक प्रकाशित करता येणार नाहीत.

यासाठी सर्व लेखक / लेखिका, कवी / कवयित्री आणि तमाम वाचकवर्ग यांच्याप्रती आम्ही दिलगीर आहोत. मंगळवार दि. १०/६/२५ रोजी अंक नेहेमीप्रमाणे प्रकाशित होईल. आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ व्यंग्यम् जबलपुर की मासिक व्यंग्य गोष्ठी सम्पन्न ☆ साभार – श्री रमाकांत ताम्रकार ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ व्यंग्यम् जबलपुर की मासिक व्यंग्य गोष्ठी सम्पन्न साभारश्री रमाकांत ताम्रकार

जबलपुर। संस्कारधानी में व्यंग्य में रुचि रखने वाले शहर के लब्धप्रतिष्ठ व्यंग्यकारों की उपस्थिति में व्यंग्यम् जबलपुर द्वारा मासिक व्यंग्य गोष्ठी का आयोजन किया गया।

गोष्ठी की शुरूआत व्यंग्यकार श्री रमाकांत ताम्रकार जी ने व्यंग्य गोष्ठी के संस्थापक स्व. जय प्रकाश पांडे जी के स्मरण से की। व्यंग्य पाठ की मासिक गोष्ठी में उपस्थित श्री राकेश सोहम जी ने बिन डाटा सब सून, श्री प्रतुल श्रीवास्तव जी ने  ज्योतिषाचार्यों की कैद में गृह नक्षत्र, श्री निरंजन द्विवेदी ‘वत्स’ जी ने व्यंग्य जमीर और उसूल बेचते हैं, श्री विजय नेमा ‘अनुज’ जी ने पराजय, आचार्य विजय तिवारी ‘किसलय’ जी ने विद्या वकील, श्री अभिमन्यु जैन जी ने खोटी नीयत, श्री विनोद खंडालकर जी ने रंगों में छिपा अंधविश्वास, श्री यशोवर्धन पाठक जी ने बस एक मिनट में, श्री सुरेश ‘विचित्र’ जी ने सब कुछ ठीक ठाक है, श्री रमाकांत ताम्रकार जी ने देवदूत तथा कार्यक्रम के यशस्वी अध्यक्ष डॉ. कुंदन सिंह परिहार जी ने गुस्ताख हँसी नामक व्यंग्यों का पाठ किया।

कार्यक्रम का संचालन वरिष्ठ व्यंग्यकार श्री सुरेश विचित्र ने किया। कार्यक्रम की अध्यक्षता देश के प्रसिद्ध कथाकर एवं व्यंग्यकार प्रो. कुंदन सिंह परिहार जी ने की तथा आभार श्री प्रतुल श्रीवास्तव जी द्वारा व्यक्त किया गया।

साभार – श्री रमाकांत ताम्रकार, जबलपुर  

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ महत्वपूर्ण सूचना – 5 जून से 9 जून तक प्रकाशन में विराम ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖  महत्वपूर्ण सूचना – 5 जून से 9 जून तक प्रकाशन में विराम 📖

सम्माननीय लेखक एवं पाठक गण सादर अभिवादन,

कुछ तकनीकी कारणो से5 जून से 9 जून तक ई-अभिव्यक्ति के प्रकाशन में विराम रहेगा। 10 जून से ई-अभिव्यक्ति का प्रकाशन पुनः प्रारम्भ हो जाएगा। हम अभिभूत हूँ आपके अथाह प्रेम, स्नेह और ई-अभिव्यक्ति को इतना प्रतिसाद देने के लिए। 

आपके आत्मीय स्नेह के लिए पुनः हृदय से आभार। 💐🙏

सस्नेह

हेमन्त बावनकर 

संपादक (ई-अभिव्यक्ती)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सौ अंजली दिलीप गोखले – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ अंजली दिलीप गोखले

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील लेखिका सुश्री अंजली गोखले यांनी ‘ विज्ञान ‘ विषयावर आयोजित केलेल्या एका कथा स्पर्धेत भाग घेतलेला होता आणि डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या कथेची दखल घेतल्याबद्दलचे स्वतः लिहिलेले पत्र त्यांच्या स्वाक्षरीसह अंजलीताईंना पाठवले होते. तेच हे पत्र…

या गोष्टीला आता जरी काही वर्षे उलटून गेली असली तरी पद्मविभूषण डॉ. नारळीकर यांचे हस्ताक्षर आणि स्वाक्षरी हा फक्त अंजलीताईंसाठीच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी आता एक अनमोल ठेवा असणार आहे, यात दुमत असणार नाही असे खात्रीने म्हणावेसे वाटते. म्हणूनच अंजलीताईंना त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेली ही कथा आजच्या जीवनरंग सदरात प्रकाशित करत असतांना हे पत्रही आवर्जून प्रकाशित केले आहे. डॉ. नारळीकर यांना आपल्या सर्वांतर्फे पुन:श्च भावपूर्ण आदरांजली आणि अंजलीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन!! 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सुश्री गायत्री हेर्लेकर यांची दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. ‘सेल्फी’ हा लेखसंग्रह व ‘परतीचा पाऊस’ हा कथासंग्रह नागपूर येथे ‘आम्ही सिद्ध लेखिका’ समुहाच्या स्नेहसंमेलनात प्रकाशित झाले आहेत. यापूर्वी त्यांचा “बीज अंकुरे अंकुरे” हा कवितासंग्रह ही प्रकाशित झाला आहे.

त्यांच्या या साहित्यिक वाटचालीबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. 💐

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर – ॥भावपूर्ण आदरांजली॥ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 पद्मविभूषण  डॉ. जयंत विष्णू नारळीकर 💐

(जन्म : १९ जुलै १९३८ / मृत्यू : २० मे २०२५)

🙏 संपादकीय निवेदन 🙏

💐 ॥ भावपूर्ण आदरांजली ॥ 💐

अखिल भारत देशाचे भूषण असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, विज्ञानयोगी, जगप्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे काल दु:खद निधन झाले. आपल्या ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे डॉ. नारळीकर यांना अतिशय मनःपूर्वक श्रद्धांजली. 💐

डॉ. नारळीकर यांचा परिचय थोडक्यात करून देता येणे खरंच अशक्य आहे … पण तरीही एक प्रयत्न करत आहोत – – 

त्यांचा जन्म कोल्हापूर इथे एका प्रज्ञावंत कुटुंबात झाला होता. तेव्हाचे प्रसिद्ध गणितज्ञ रँग्लर विष्णू वा. नारळीकर हे त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात गणित शाखेचे प्रमुख म्हणून कार्यरत असल्याने डॉ. जयंत यांचे शालेय शिक्षण वाराणसीलाच झाले होते. त्यांच्या आई सुमती यांची त्या काळातल्या ‘संस्कृत विदुषी‘ अशीच ओळख होती. बुद्धीचा हा समृद्ध वारसा डॉ. जयंत यांनी आणखीच दिमाखदारपणे पुढे चालवला असे निश्चितच म्हणायला हवे. 

पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनला गेले आणि तिथे त्यांच्या यशाचा झेंडा दिमाखात फडकताच राहिला. तिथे त्यांनी पी.एच.डी. ही पदवी, तसेच रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्रातील टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक पारितोषिके मिळवली. भारतात परतल्यावर त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू केले आणि अखेरपर्यंत त्यांचे हे काम अव्याहत सुरूच होते. सुरुवातीला मुंबईतल्या “Tata Institute of Fundamental Research” या विख्यात संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुख म्हणून ते रुजू झाले. पुढे काही वर्षांनी पुण्यात स्थापन झालेल्या “आयुका” संस्थेचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 

सर फ्रेड हॉएल यांच्या बरोबर काम करत असतांना त्यांनी ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’  हा महत्वपूर्ण सिद्धांत मांडला. अखेरपर्यंत ते स्वतःला याच क्षेत्रात झोकून देऊन काम करत राहिले होते. 

या जराशा रुक्ष समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात अगदी अचानकपणे त्यांच्यातला साहित्यिकही जागा झाला होता. त्यासाठी सुरुवातीला ते ‘ नारायण विनायक जगताप ‘ या टोपण नावाने विज्ञान कथा-स्पर्धेत भाग घेत असत हे अनेकांना बहुदा ज्ञात नसावं. पुढे त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला . तर ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या सुंदर आत्मकथनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या व्यतिरिक्त विज्ञानकथा सांगणारी त्यांची २५ हूनही अधिक प्रकाशित पुस्तके प्रसिद्ध आहेत. विविध मराठी नियतकालिकांमध्येही त्यांचे विज्ञानविषयक ललित लेखनही सतत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले गेले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पुस्तकांचे जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादही झालेले आहेत. 

नाशिक येथे आयोजित केल्या गेलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

लेखिका डॉ. विजया वाड यांनी “विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर” या नावाने त्यांचे चरित्र लिहिलेले आहे. 

त्यांनी विविध माध्यमांमधून विज्ञान प्रसाराचे मोलाचे काम ‘आपले आद्यकर्तव्य’ समजून शेवटपर्यंत अगदी जोमाने केलेले आहे. खरं तर डॉ. नारळीकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. पण जाताजाता त्यांची समाज हिताची तळमळ अधोरेखित करायलाच हवी. समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हायला हवे ही त्यांची मनापासूनची तळमळ होती. पण त्याबाबतीतले त्यांचे विचार त्यांनी कधीच लोकांसमोर आक्रस्ताळेपणाने..अवास्तव भडकपणाने मांडले नाहीत. ते विचार नेहेमीच समाजाचा साकल्याने विचार करणारे, संतुलित, आणि ज्ञान-विज्ञान-तत्वज्ञान या तिन्हींचा उत्तम मेळ साधणारेच असत. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हाती घेतलेल्यांना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी असे म्हणावेसे वाटते. 

डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी सुश्री मंगला नारळीकर ही दोन एकमेकांना अगदी पूरक अशी व्यक्तिमत्वे “माणुसकीचा खळाळता झरा” म्हणूनही का ओळखली जायची हे सांगणारा एक लेख आपण आजच्याच अंकात वाचणार आहोत. 

🙏💐पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. 💐🙏

– संपादक मंडळ

ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पराधीन… भाग – १ + संपादकीय निवेदन – सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

‘आम्ही सिद्ध लेखिका संस्था‘ पुणे जिल्हा शाखा यांच्यातर्फे ‘१ मे २०२५ – महाराष्ट्र दिना’ निमित्त घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री राधिका भांडारकर यांना त्यांच्या “पराधीन” या कथेसाठी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आपल्या समूहातर्फे राधिकाताईंचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.💐

आजच्या व उद्याच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा पराधीन – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ पराधीन… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर

शोभाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीने प्रयत्न चालू होते. तिच्या हृदयाची क्षमता दहा टक्क्यावर आली होती. मॉनिटरवरच्या आलेखावरून फिरणारा तो हिरवा प्रकाशाचा ठिपका धोक्याच्याच सूचना देत होता. शोभाचे सारे चैतन्यदायी घटक हळूहळू उतरत होते. व्हेंटिलेटर वर असूनही तिला श्वास घेणं प्रचंड त्रासदायक होत होतं आणि तिची छाती जोरजोरात उडत होती.

ताईला कळुन चुकलं होतं की शोभाला आता निरोप द्यायची वेळ आली आहे, या यातनांमधून शोभाला फक्त मृत्यूच सोडवू शकत होता. ताईला हे सत्य पटत होतं पण कितीही झालं तरी धाकट्या बहिणीने आपल्या आधी जावे हे सत्य स्वीकारणे तिला कठीण जात होते. शिवाय शोभाच्या जाण्याने काही नवीन प्रश्न उपस्थित होणार होते ते वेगळेच. सायलीचे काय?

खूप दिवसांपूर्वी शोभा ताईला म्हणाली होती, ” आयुष्यभर देवाने माझ्या पदरात नकारात्मक दानच टाकले. आता मात्र देवाजवळ माझं एकच मागणं आहे. माझं काही बरं वाईट व्हायच्या आधी सायलीने या जगाचा निरोप घ्यावा. कोण करेल ग तिचं? कोण जबाबदारी घेईल तिची? आणि सायली ही माझीच जबाबदारी नाही का? ती मी अशी कशी कुणावर सोपवू शकेन? ”

बोलता बोलता तिला हुंदके आवरत नव्हते.

कोपऱ्यात एका टेबलावर सायली बसली होती. स्वतःशीच हसत होती, काही बडबडत होती. जणू काही आईचं दुःख, तिचं अश्रू गाळणं या साऱ्यांच्या पलीकडे तिचं वेगळं जग होतं.

त्यादिवशी ताईने शोभाला समजावले. मोठ्या बहिणीच्या मायेने तिला जवळ घेतले. पाठीवर थोपटले.

“अग! असं का म्हणतेस आणि तुला कशाला काही होईल? तू असे विचार करू नकोस. शेवटी आपल्या हातात काय आहे? माणूस हा पराधीन आहे. जे ईश्वराच्या मनात असेल तेच घडेल पण एक लक्षात ठेव जो चोच देतो तो चाराही देतो. तू विश्वास आणि श्रद्धा ठेव. ”

भैय्यासाहेब गेल्यानंतर ताई, शोभा आणि सायलीला स्वतःच्या घरी घेऊन आली होती.

“आता तुम्ही इथेच रहा. मीही तर एकटीच असते. विनयला मी सांगितलं आहे आणि त्याची काहीच हरकत नाही. ”

तसं पाहिलं तर सगळ्यांचीच आयुष्यं एकमेकात गुंतलेली. स्वतंत्र तरीही गुंतलेली. काही वर्षांपूर्वीच ताईच्या पतीचे निधन झाले होते. ताईला एकच मुलगा. विनय. तो अमेरिकेत स्थायिक. बाबा गेल्यानंतर ताई काही महिने विनय सोबत अमेरिकेत राहिलीही पण तिने जाणले की असे इथे परदेशात कायम राहणे मानसिक दृष्ट्या तिला शक्य नव्हते. विनयला तिने न दुखवता पटवूनही दिले

खरं म्हणजे जो तो आपापले आयुष्य जगत असतो. टप्प्याटप्प्यावर बदललेल्या आयुष्याची घडी सावरत असतो. पुढे जात असतो. भविष्यात काय घडणार हे कुठे ज्ञात असतं?

भैय्यासाहेब गेले. शोभा आणि सायलीचा आधार ढासळला. तशा त्या अनाथ नव्हत्या, शोभाच्या सासरची माणसं तशी जबाबदार आणि समंजस होती. जरी ती नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेली होती तरी कुणीही सायलीला आणि शोभाला नाकारलं नव्हतं, डावललं नव्हतं. पण ताईने आपणहून शोभाला मदतीचा म्हणण्यापेक्षा मायेचा, अपार विश्वासाचा, आधाराचा हात दिला. त्या दोघींचं एक प्रकारचं केविलवाणेपण ताईच्या काळजाला कुठेतरी चिरून जात होतं.

तेव्हापासून ताई, शोभा आणि सायली यांचं एकत्र जीवन सुरू झालं.

सोपं नव्हतं. प्रत्येकाचे आपापल्या आयुष्याचे कम्फर्ट झोन होतेच. आता एका निराळ्या समूहात आयुष्याची नवी सुरुवात करताना त्रास हा होणारच होता. शिवाय सायलीची स्वमग्नता हा त्यातला सर्वात दुबळा भाग होता. शोभाला सायलीची सवय झालेली होती. तिच्या वागण्या बोलण्यातला विचित्रपणा, तिचे कधी घसरणारे तर कधी प्रखर झालेले मानसिक कल, शोभाला सायलीच्या जन्मापासून तसे अंगवळणी पडले होते. आणि शेवटी शोभा एक “आई” होती. सायली तिच्या रक्तामांसाचा गोळा होता.

मावशी या नात्याने ताईला सुद्धा सायलीचा ऑटिझम ज्ञात होताच पण दूर असणं आणि सहवासात राहणं यात खूप फरक होता.

सायलीला तिच्या कुठल्याही वस्तुंना हात लावलेला चालत नसे. तिचे कपडे, तिच्या वस्तू, चपला अगदी केसाला लावायच्या पिना सुद्धा कोणी जागेवरून हलवल्या तर ती प्रचंड क्रोधित व्हायची. तिला सतत टीव्ही लागायचा. तिने लावलेला चॅनल कोणीही बदलायचा नाही. आवाज सहन न झाल्यामुळे तिला न विचारता जर टीव्ही बंद केला तर तिचा पारा चढायचा. शेवटी ती असाधारण आहे, वेगळी आहे, तिला कळत नाही, विचार करण्याची क्षमता तिच्यात नाही असा विचार करून, सायलीलाच केंद्रस्थानी ठेवून सारे व्यवहार करणं क्रमप्राप्त होतं.

एक दिवस ताई शोभाला म्हणाली,

“शोभा चूक तुझी आहे. अगं! अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात तिथे का नाही तू तिला घातलेस? तिथे ती काही शिकली असती. वेळीच तुम्ही दोघांनी हा विचार का नाही केला? ”

“ताई तिच्यासाठी जे जे करता येईल ते सगळं आम्ही केलं होतं ग! तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आम्ही दुसऱ्या मुलाचाही विचार केला नाही पण नशिबाचे फासे उलटेच पडले. ”

शोभाचा आवाज रडवेला होत गेला, डोळे वहायला लागले.

सायली भिंतीला टेकून ताठ उभी होती, तिचे डोळे वटारलेले होते. चेहऱ्यावर विचित्र भाव होते. तिला पाहताच ताईने संवाद तोडला. विषय बदलला.

ताईला का माहित नव्हत्या शोभाच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना?

भैय्यासाहेबांना लोकल गाडीत चढताना झालेला तो भयाण, जीवघेणा अपघात! त्यातून ते वाचले तरीही पूर्ववत कधीच झाले नाहीत. कायमचे अपंगत्व आले, नोकरी सोडावी लागली.

थोडीफार सेव्हींग्ज, साचलेले प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, घरून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा आणि पुढे उरलेलं लांबलचक आयुष्य.

शोभा साठी तर साराच अंधार होता. स्वमग्न सायली आणि अपंग नवरा.

देव एकाच माणसाला इतकी दुःखं का देतो?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ श्री शारदा दयाल श्रीवास्तव का व्यंग्य संग्रह “ज्ञानगंगा में गधों का आचमन” लोकार्पित ☆ प्रस्तुति – श्री सुरेश पटवा ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹 श्री शारदा दयाल श्रीवास्तव का व्यंग्य संग्रह “ज्ञानगंगा में गधों का आचमन” लोकार्पित ☆ प्रस्तुति – श्री सुरेश पटवा 🌹

श्री शारदा दयाल श्रीवास्तव के व्यंग्य संग्रह “ज्ञानगंगा में गधों का आचमन” का लोकार्पण दुष्यंत संग्रहालय में डॉ. साधना बलबटे, की अध्यक्षता में संपन्न हुआ। मुख्य अतिथि सेवानिवृत्त गृह सचिव, मध्य प्रदेश शासन श्री ओम प्रकाश श्रीवास्तव, सारस्वत अतिथि  श्री सुरेश पटवा, संयुक्त सचिव दुष्यंत संग्रहालय और विशिष्ट अतिथि श्री मंगत राम गुप्ता, श्री गोकुल सोनी और श्री विवेक रंजन श्रीवास्तव रहे।

इस अवसर पर सारस्वत अतिथि सुरेश पटवा ने सर्वप्रथम शारदा दयाल श्रीवास्तव के लेखकीय व्यक्तित्व का परिचय देते हुए कहा कि शारदा दयाल ऊपर से शांत दिखते हैं लेकिन अंदर ज्वालामुखी छुपाए हैं। तभी इनके भीतर से विसंगतियों के विरुद्ध तीखी प्रतिक्रिया निकलती है। वही इनके व्यंग्य को धार प्रदान करती है।

इस अवसर पर शारदा दयाल श्रीवास्तव ने संदर्भित व्यंग्य संग्रह की रचना प्रक्रिया के अनुभव साझा करते हुए “मेरा देश मेरा भेष” व्यंग्य का पाठ अनोखे अंदाज़ में किया। उन्होंने पुस्तक के नामकारण के बारे में बताया कि मुझमें और गधे में कुछ लाक्षणिक समानताएं हैं और मैं भी ज्ञान गंगा में डुबकी लगाता रहता हूँ इसलिए इस पुस्तक का नाम  “ज्ञानगंगा में गधों का आचमन” तय पाया गया।

डॉ. साधना बलबटे ने कहा की इस व्यंग्य संग्रह में सामयिक नहीं अपितु वैश्विक परिस्थितियों पर शाश्वत व्यंग्य शामिल हैं। आजकल व्यंग्य में बोथरापन भटकाव अधिक नज़र आता है। इन्होंने अपने व्यंग्य में व्यंजना के माध्यम से साहित्य को ज़िंदा रखा है। ये एक कुशल और कलात्मक व्यंग्यकार हैं। इन्होंने पहली कृति में ही छक्का मारा है।

श्री ओम प्रकाश श्रीवास्तव ने कहा कि आजकल व्यंग्य लिखना खतरे से खाली नहीं है। लेकिन शारदा दयाल श्रीवास्तव ने सामयिक और शाश्वत विषयों पर व्यंग्य और हास्य का अद्भुत मिश्रण किया है। जो इनकी पुस्तक को अनोखा बनाती है।

श्री गोकुल सोनी ने कहा कि व्यंग्य समाज की विसंगत एवं रुग्ण मानसिकता के लिए “शुगर कोटेड” कड़वी दवाई की तरह है। वास्तव में जो व्यंग्य तात्कालिक परिस्थितियों पर लिखे जाते हैं, वे अल्पजीवी होते हैं, परंतु मानवीय कुप्रवृत्तियों पर एवं कुप्रथाओं पर लिखे गए व्यंग्य कालजयी होते हैं। श्री एस डी श्रीवास्तव के व्यंग्यों में पर्याप्त पैनापन है, जो पाठक को चमत्कृत करता है।

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ने कहा कि शारदा दयाल श्रीवास्तव का लेखन उनके सरल, विद्रोही और अनुभवी व्यक्तित्व का ऐसा दर्पण जो पाठकों से सीधा संवाद स्थापित करता है। उनकी शैली में व्यक्तिगत अनुभवों की सच्चाई झलकती है। इन्होंने बैंक कर्मचारियों के शोषण, नौकरशाही की जड़ता और सामाजिक पाखंड पर प्रहार किया।

श्री विवेक रंजन श्रीवास्तव जी द्वारा ज्ञानगंगा में गधों का आचमन की पुस्तक समीक्षा पढ़ने के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 180 ☆ “ज्ञान गंगा में गधों का आचमन” – व्यंग्यकार… श्री शारदा दयाल श्रीवास्तव ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’☆

श्री मंगत राम गुप्ता ने शारदा दयाल श्रीवास्तव के व्यक्तित्व पर प्रकाश डालते हुए कहा कि इनके शान्त व्यक्तित्व में एक चिंतनशील बेचैन व्यक्ति छुपा है। जिससे इनके भीतर भीतर से चुटीलापन प्रकट होता है।

दुष्यंत संग्रहालय के संयुक्त सचिव और कार्यक्रम संयोजक श्री सुरेश पटवा ने जानकारी दी है कि सरस संचालन श्रीमती जया केतकी शर्मा ने किया और सरस्वती वंदना सुश्री सुनीता शर्मा ने प्रस्तुत की। 

  साभार – श्री सुरेश पटवा

कार्यक्रम संयोजक / संयुक्त सचिव

दुष्यंत संग्रहालय भोपाल

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ जी की कहानियाँ  ‘कलम की पूजा’ और ‘मोक्षदायिनी शिप्रा की कहानी’ पाठ्यक्रम में शामिल, अभिनंदन ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ जी की कहानियाँ  ‘कलम की पूजा’ और ‘मोक्षदायिनी शिप्रा की कहानी’ पाठ्यक्रम में शामिल, अभिनंदन

रतनगढ़/ नीमच (निप्र)। देश के प्रसिद्ध बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ की लेखनी ने एक बार फिर साहित्य जगत में नया कीर्तिमान स्थापित किया है। उनकी कालजयी गद्य रचनाएँ कलम की पूजा और शिप्रा की आत्मकथा अब देश भर के स्कूली बच्चों के पाठ्यक्रम का हिस्सा बनेंगी। न्यू सरस्वती हाउस प्राइवेट लिमिटेड की कक्षा-5 और कक्षा-8 की आगामी पाठ्यपुस्तक शृंखला में इन रचनाओं को शामिल किया गया है, जो देश और मध्य प्रदेश के लिए गर्व का क्षण है।

शिप्रा की आत्मकथा जो पवित्र नदी शिप्रा के आध्यात्मिक और सांस्कृतिक महत्व को दर्शाती है, बच्चों को न केवल साहित्यिक संवेदनशीलता से जोड़ेगी, बल्कि उन्हें भारतीय संस्कृति की गहराइयों से भी परिचित कराएगी। दूसरी ओर, कलम की पूजा लेखन की शक्ति और ज्ञान के प्रति श्रद्धा का संदेश देती है। ये दोनों रचनाएँ अपनी गहनता और प्रेरणादायक शैली के लिए जानी जाती हैं, और अब ये स्कूली बच्चों के लिए एक अमूल्य उपहार बनेंगी।

न्यू सरस्वती हाउस, जो शैक्षिक प्रकाशन में अपनी गुणवत्ता के लिए विख्यात है, ने श्री क्षत्रिय की रचनाओं को उनके मौलिक महत्व को पहचानते हुए चुना है। संपादक श्री शशि प्रकाश द्विवेदी ने अपने पत्र में स्पष्ट किया कि रचनाओं का कॉपीराइट श्री क्षत्रिय के पास ही रहेगा, और वे भविष्य में इनका उपयोग स्वतंत्र रूप से कर सकेंगे। प्रकाशन के बाद पाठ्यपुस्तक की प्रतियाँ लेखक को संस्थागत नियमों के अनुसार भेजी जाएँगी। यह पारदर्शी और सम्मानजनक दृष्टिकोण प्रकाशन जगत में एक मिसाल है।

श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ने इस सम्मान पर हर्ष व्यक्त करते हुए कहा, “मेरी रचनाएँ, विशेष रूप से शिप्रा की आत्मकथा, जो मेरे हृदय के करीब है, अब बच्चों के बीच जाएँगी। यह मेरे लिए साहित्यिक जीवन का सबसे बड़ा पुरस्कार है। मैं न्यू सरस्वती हाउस का आभारी हूँ कि उन्होंने मेरे शब्दों को इतना बड़ा मंच दिया।”

साहित्य जगत में इस खबर ने उत्साह की लहर दौड़ा दी है। प्रसिद्ध साहित्यकार एवं मध्य प्रदेश साहित्य अकादमी के  निदेशक श्री विकास दवे ने कहा, “ओमप्रकाश जी की रचनाएँ हमारी सांस्कृतिक धरोहर का हिस्सा हैं। शिप्रा की आत्मकथा जैसी रचना बच्चों को अपनी जड़ों से जोड़ेगी और कलम की पूजा उन्हें ज्ञान का महत्व सिखाएगी। यह नीमच के लिए ऐतिहासिक उपलब्धि है।”

यह उपलब्धि न केवल श्री क्षत्रिय की साहित्यिक प्रतिभा को रेखांकित करती है, बल्कि छोटे शहरों के लेखकों के लिए एक प्रेरणा भी है। न्यू सरस्वती हाउस की यह पहल स्कूली शिक्षा में साहित्यिक और सांस्कृतिक मूल्यों को समृद्ध करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है।

श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ को इस अभूतपूर्व उपलब्धि के लिए ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से हार्दिक बधाई! मप्र का यह साहित्यिक रत्न निश्चित रूप से भविष्य में और अधिक ऊँचाइयाँ छूएगा।

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ डॉ. शैलजा करोडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ डॉ. शैलजा करोडे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन!! 💐

दि. ४ मे रोजी ठाणे येथे “शब्दसाज साहित्यिक स्नेह-संमेलन 2025” आयोजित केले गेले होते. आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री डॉ. शैलजा करोडे यांना या संमेलनात “साहित्य भूषण” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणूनही त्यांना निमंत्रित केलेले होते.

तसेच या संमेलनात “साहित्य लेखन करतांना नवोदित लेखकांनी घ्यावयाची काळजी ” या विषयावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. या संमेलनात त्यांच्या हस्ते

(1) शब्दांचा डोह—प्रातिनिधिक कथासंग्रह (2) भाव स्पंदन—प्रातिनिधिक कवितासंग्रह.. या दोन पुस्तकांचे प्रकाशनही संपन्न झाले.

या गौरवास्पद पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे डॉ. शैलजा करोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या पुढील त्यांच्या अशाच सातत्यपूर्ण साहित्यसेवेसाठी असंख्य शुभेच्छा.

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares