श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

जयंत श्रीधर टिळक

जयंतराव टिळक हे लो.टिळकांचे नातू. टिळकांनी सुरू केलेल्या ‘केसरी’ वर्तमानपत्राचे ते अनेक वर्षे संपादक होते. १९५० साली त्यांनी ‘केसरी’च्या संपादकपदाची धुरा हाती घेतली. पूर्वी केसरी आठवड्यातून २ वेळा निघायचा. नंतर ३ वेळा निघू लागला. गोवा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्रया दोन्ही लढयांचा ‘केसरी’ने पाठपुरावा केला. त्यामुळे पुढच्या काळात केसरी दैनिक वर्तमानपत्र झाले. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘केसरी’ दैनिक झाले.

पुढे ‘केसरीत अनेक बादल झाले. जयंतराव पुढे कॉंग्रेसमध्ये गेले. नंतर राज्यसभेवर गेले. ‘केसरीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा पुरस्कार झाला. ८० नंतर ‘केसरी’ दलिताभिमुख झाला. जयंतरावांनी ‘‘केसरी’त नाविन्य आणायचा प्रयत्न केला. जयंतराव मंत्री झाल्यानंतर केसरीचे संपादन अनुक्रमे चंद्रकांत घोरपडे, शरच्चंद्र गोखले, अरविन्द गोखले इ.नी  सांभाळले.

लो.टिळकांच्या काळात जहाल असलेला ‘केसरी जयंतरावांच्या कारकिर्दीत मवाळ झाला..

जयंतरावाववी ‘वारसा’ हे पुस्तक लिहिले. विविध विषयांवरील आत्मचरित्रात्मक लेखांचा हा संग्रह आहे.    

जयंतरावांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला प्रणाम ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments