सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
इंद्रधनुष्य
☆ हनुमान आणि समर्थ रामदास ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
महारुद्र जे मारुती रामदास
कलीमाजि जे जाहले रामदास
श्री समर्थ रामदास स्वामींना मारुतीचा कलियुगातील अवतार असे म्हणतात. त्यांना सुरुवातीपासूनच हनुमंता बद्दल अत्यंत ओढ होती. हनुमानावर त्यांची श्रद्धा होती. भक्ती होती. प्रभू श्रीरामांनी त्यांना दृष्टांत दिला तेव्हापासून समर्थांनी ” समर्थ ” होईपर्यंत पुढे कार्य समाप्ती पर्यंत हनुमानाची अखंडित सेवा, साधना केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
शक्तीने मिळती राज्ये
शक्ती नसता विपन्नता
मोंगलांच्या आक्रमणाच्या काळात श्री रामदास स्वामींचा अवतार झाला. मोगलांनी जनतेला सळो कि पळो करून टाकले होते. त्यांची केव्हाही धाड पडायची. घरावर नांगर फिरवला जायचा. आपलीच माणसे क्षुल्लक वतनांसाठी, जहागिरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान कोणाकडेच नव्हता. समाज अस्वस्थ झाला होता. समाज आपले शौर्य, धैर्य विसरला होता. या सर्व परिस्थितीवर समर्थांनी मात केली. आणि बल उपासनेसाठी त्यांनी हनुमंताची मंदिरे स्थापन करण्यास सुरुवात केली. शक्ती आणि भक्ती चा प्रचार केला. मठ स्थापन केले. त्यातून तरुण बलवान व्हायला लागले.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






