श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ शाश्वत निळाई… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
सद्विचार आपुले
पंख पसरोन उडती
वर वर जावूनी
भगवंतासी भेटती..
*
स्वर्गीय शांतीचा
अनुभव ती घेती
तीच शांती मग
अलवार मनी नांदती…
*
सद्विचारांचा खग
उडता उडता लुप्त होई
अथांग त्या गगनी
निर्विचार मन मग होई…
*
आता मन निर्मळ
नाही विचारांचे येणे-जाणे
शाश्वत निळाईच्या
आत्मानंदात डुंबणे..
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈





