सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “गाठ नात्याविना…” ☆ सुश्री शीला पतकी 

नात्याविना नात्यात गुंतण्याची ही गाठ तु का बांधितो

कधी धागे रेशमी कधी दोरखंड सांधतो

*

कधी धागे कच्चे…. गाठ विरते

कधी तुटते कधी अर्ध्यावरही सुटते

*

रेशमी गाठी सुखाने नांदती… दोरखंडे मारती आवळून पाठी

विरल्या धाग्यांची गाठ कधी न बसते

धागा तुटलेला… गाठ मात्र सलते

*

विरलेले फसवे धागे मोहाचे असेच विरून जातात

आठवणी तयांच्या धूसर होतात करकचणाऱ्या गाठीतून

.. सुटका नसते कधीही

.. रक्तबंबाळ होण्याशिवाय पर्याय नसतो

*

गुदमरणारा श्वास दैवाचा फास तुटता तुटत नाही

तुटलेल्या गाठीचा सल हाती

.. तो जखम कुरवाळतो

.. रोज अश्रू ढाळतो

.. आतल्या आत रडतो

*

– – आणि जगाला सांगतो

हसते रहो यार हसना मना नही……! “

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments