सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ केस आणि नातं…. ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“केस आणि नातं यामध्ये साम्य आहे. जोपर्यंत बंधनात असतं, तोपर्यंत बांधिलकीच आहे. एकदा का मोकळं सोडलं की दोघांचाही गुंता होतो.”…….

माझ्या लहान बहिणीला, अनघाला बघायला आज देशमुख कुटुंब आले होते. आमच्या सारखाच मध्यमवर्गीय परिवार. घरी आई- वडील, बहीण, भाऊ, आजी -आजोबा आहेत. मुलाला एक बहिण, एक भाऊ आहे हे ऐकून छान वाटलं. आम्ही दोघी बहिणीच व आई-बाबा. आजी आजोबा येऊन जाऊन असतात. आज या कार्यक्रमाला आवर्जून आले आहेत. आणि आता एक नवीन सदस्य परिवारात सामील झालाय, तो म्हणजे माझा नवरा. देशपांड्यांचा मोठा जावई……

आजचा हा कार्यक्रम जरा ‘हटके’ झाला. दोन्ही घरची सर्व मंडळी एकत्र आली होती. तीन पिढ्या एकत्र बसल्या होत्या. आम्ही सात जण, आणि तेही सातच होते.

सकाळ पासून तयारी चालू होती. उगाच दिखावा करणे, जे नाही ते दाखविणे, ही पद्धत आमच्या घरी नाही. जे आहे त्यात ‘The Best’ करायचा प्रयत्न असतो आमचा. अशा परिस्थितीत टेंशन नसते. जमवा जमवी, लपवाछपवी नसते. विचारांचा किंवा वस्तूंचा सरळ, सोपा, साधा हिशोब असतो. दिखावा नसला तर, बोलणेही आरामात होते. काय बोलायचे? ? अन् काय लपवायचे? ? मुद्दाम काय सांगायचे? ? दाखवायचे? ? असे विचार मनात येत नाही. ‘Manipulations’ नसतात. उगीच’ self created tension’ नसते. आणि या अशा कार्यक्रमांत तर अजिबात नकोच. असे संबंध जे नेहमी करिता असतात, तेथे स्पष्टता असणे हे सर्वात आवश्यक, प्रमूख कर्तव्य व मुद्दा असावा…..

अजय देशमुख परिवार, आमच्या देशपांडे परिवारापेक्षा थोडा उजवाच असावा असा आमचा अंदाज होता. दोघे भाऊ नोकरीत, बहिण पण चांगली शिकलेली व लग्नाचीच आहे…..

आमची अनघा पण चांगली शिकलेली. सध्या नोकरीच्या शोधात आहे…..

आज देशमुखांच्या घरी आम्हाला बोलविले आहे. “तुम्ही पण आमचे घर बघावे अशी आमची इच्छा आहे.” असे देशमुख आजोबांनी, आमच्या आजोबांना फोन करून आमंत्रण दिले. बहुतेक ‘हो’ कडे कल असावा, असा आम्ही अंदाज बांधला…..

आता आमचा निर्णयही आम्हाला घ्यायचा होता. ‌आजतर अगदी गोलमेज परिषदच भरली. खूप गोष्टी झाल्या. या भेटीत ज्याने जे बघीतले, त्यावरून अनुमान काढले. त्यासंदर्भात गोष्टी झाल्या. प्रत्त्येक व्यक्तीने आपल्या वयानुसार अवलोकन केले व चर्चेत भाग घेतला. एकंदरीत परिवार चांगला आहे असे फायनल ‘conclusion’ निघाले. अनघा ला पण अजय पसंत पडला असावा असे वाटले…..

ज्या घरी तीन पिढ्या एकत्र राहतात. तेथील बऱ्याच गोष्टी न सांगताच कळतात. त्यांचे आपापसातील संबंध adjustments चांगले असावे. जूनी पिढी घरी म्हणजे बऱ्यापैकी नियम, सणवार असावेत असा आमचा समज झाला.

वर वधू शोधणे किंवा बघणे म्हणजे सूरवात, अंदाज, समज, judgementsच असतात. जे आपण बघतो, त्यावरून काही तरी ठरवतो. खरं काय आहे? ? ? हे कळायला तर आयुष्यही कमी पडतं…..

आज आम्ही श्री देशमुखांच्या घरी गेलो. ही आमची दुसरी भेट. यावेळी वातावरण जास्त सहज होतं. ओळख झाल्यावर थोडं मोकळं वाटतं. आता दोन्ही आजोबा, आजी, आई- वडील आपले जूने प्रसंग, नोकरी बद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल बोलत होते. Young generation आपल्या नोकरीच्या, projects, politics, cricket, picture अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात दंग होती. एकंदरीत “every thing was going well.”….

आता मात्र पूढच्या गोष्टी करायची वेळ आली होती. आज आजी -आजोबा, आई- बाबा अनघा शी बोलणार होते. आपल्या अनुभवातून काही गोष्टी सांगणे, समजाविणे गरजेचे असते. 

बाबा म्हणाले, “तूझाच निर्णय महत्त्वाचा आहे अनघा. आपल्याला एकतर घाई नाही. तुझ्यावर काहीही दबाव नाही. फक्त व्यवस्थित विचार कर व निर्णय घे. आज नाही तर उद्या लग्न करायचे आहेच. कोणताही मुलगा आपण शोधला तरी adjustment ही असतेच. ते दोघांना अगदी शेवटपर्यंत करायचे असते. फक्त काही वर्षांनी त्याची सवय होते. सुरवातीला जपून, सांभाळुन, शांत राहून वागायचे असते. बोलण्यापेक्षा ऐकायचे काम जास्त करायचे. सर्व चांगलं, अगदी तूझ्या मनासारखं येथे आपल्या घरी पण नेहमीच होतं असं नाही. आम्ही नेहमीच तुझ्या बरोबर असणार आहोत. पण तुझ्या चूकीचे, चूक वागण्याचे, चूकीच्या गोष्टींचे समर्थन आम्ही कधीच करणार नाही.

लग्न झाल्यावर काही नियम पाळणे अपेक्षित असतेच. घरचे, समाजाचे नियम, शिस्त असते व त्याप्रमाणेच वागणे अपेक्षित असते. याला बंधन समजले तरी चालेल. सूखी संसारासाठी असे नियम, शिस्त पाळलीच पाहिजे.

म्हणतात ना, ‘केस आणि नातं यांत साम्य आहे, जोपर्यंत बंधनात असतं तोपर्यंत बांधिलकीच. एकदा का मोकळे सोडले की दोघांचाही गुंता होतो…..”

बाबा पुढे म्हणाले, “रोज नवीन समस्या समोर येतील. त्या स्वतःच सोडवायचा प्रयत्न करायचा. रोज उठून आईला, आजीला फोन करायचा नाही. तुझ्या घरच्या चांगल्या गोष्टी ऐकायला आम्हाला आनंदच होईल, पण लहान सहान तक्रारींचा पाढा उठसूट वाचायचा नाही. याचा अर्थ काहीही सहन कर असे माझे म्हणणे नाही.

सुरुवातीपासूनच काही नियम पाळायचेच. आम्ही तुझ्या बरोबर नेहमी आहोतच. मित्र मैत्रिणींच्या सल्ल्यापेक्षा घरच्यांचा सल्ला घ्यावा. घरचे घरचेच असतात. बाहेरच्यांना आपल्या घरात शिरायची परवानगी द्यायची नाही. ‘स्पर्धा व तुलना’ या भानगडीत पडायचे नाही. आपल्या नशिबात जे असेल, जेवढं असेल, ते आपल्याला मिळतच. Be patient. Every thing comes to you in the right moment.” 

आज देशपांडे व देशमुख परिवार पुन्हा एकत्र बसले आहेत. अजय अनघाने सर्वांसमोर पसंती दिली आहे. दोन्ही कुटुंबे पुढच्या तयारीला लागली आहेत. लवकरच बार उडणार आहे.

अनघाचा सध्या ‘Training Period ‘सुरू आहे. ज्या प्रमाणे कुंभार ओल्या मातीला हळुवारपणे, प्रेमाने आपला जीव ओतून त्याला आकार देतो, ‘Perfect’ भांडं बनवायचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर, प्रेम, काळजी, जिव्हाळ्यापोटी आई वडील मुलांना सांगत असतात, सावध करत असतात. पूढच्या येणाऱ्या संभाव्य गोष्टी लक्षात घेऊन मुलांना घडवत असतात. ही आई-वडिलांची जबाबदारीच आहे….

बरोबर आहे, 

‘मामुली से कांच के बर्तन का हम कितना ख्याल रखते हैं। ये तो संबंधोंकी बात हैं। संबंध तो अनमोल होते है, उन्हे सदैव संभालकर रखिए ।’

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments