संध्या बेडेकर
जीवनरंग
☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – २ लेखिका : चेतना वैद्य ☆ संध्या बेडेकर ☆
(बाबा म्हणाले… अग! मी आहे ना तुझ्या बरोबर. काळजी करू नको. सर्व ठीक होईल. आता एडव्हांस टेक्नोलॉजी आहे. काल मी आणि शाल्मली डाॅक्टरला भेटून आलो. सध्या अगदी सुरवातच आहे. आपल्याला लगेच कळल, हे खूप बर झाल.)
इथून पुढे – – –
शेवटी समोर असलेल्या नवीन प्रोजेक्ट वर फोकस करून आईची ट्रीटमेन्ट सुरू झाली. हे काही लगेचच पूर्ण होणार प्रोजेक्ट नव्हतच. पण सुरवात महत्वाची होती.
म्हणतात ना…
As you start to walk on the way, the way appears. Clarity does not appear before action. It comes from actions.
पुण्याला दिनानाथ मध्ये Step by step treatment सुरू झाली.
पेशंट बरोबर फक्त एक attendant राहू शकतो. असा दवाखान्याचा नियम. म्हणून शाल्मली आई बरोबर, तर दुसरी रिदिमा ने सांगलीत राहून घरची जबाबदारी सांभाळली.
2022 चा year end चा तो महिना, सर्वानी new year eve एकत्र celebrate करायची, धम्माल करायची, असा कार्यक्रम ठरला होता.
पण म्हणतात ना…
Man proposes… God disposes. …
त्याच दिवशी आईचे operation झाले.
व्यवस्थित झाले… अस डोॅक्टर म्हणाले. तेंव्हा त्या असहनीय वेदना असताना सुद्धा आईला वाटल..
चला आता लवकरच आपला सांगलीला जायचा परतीचा प्रवास सुरू होणार.
पण नाही…
आईची परीक्षा पूर्ण झालीच नव्हती. परीक्षेतील प्रश्न out of syllabus होते ना. अनेक चढ उतार, अनेक comlications. पुन्हा पुन्हा त्या मोठमोठ्या मशीनी, नाका तोंडात नळ्या. त्याचवेळेस
मी शाल्मली (attendant)
येथे तापाने फणफणली होती तर, तर सांगलीला रिदिमा आणि तिच्या नवर्याला कोरोना झालेला.
पहिलाच प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू होते, तर पूढे दुसरे प्रश्न तयारच होते. म्हणजे washing mavchine मध्ये जसे कपडे गोल गोल फिरतात ना, तसे झाले होते. कोणचा धागा पकडावा, आणि कोणता सोडावा. हेच कळत नव्हत. सर्वच महत्वाच होत. शांत राहून सर्व सांभाळायच होत..
आई ICU मध्ये नऊ दिवस होती. या गोष्टी आईला कळल्याच नाहीत. मला मात्र आईला भेटायची परमिशन नव्हती. मग ICU मधील ते नऊ दिवस आईची काळजी कोणी घेतली असेल बर ? आश्चर्यच आहे नाही का ?
ICU मध्ये देवाच्या रूपात डोॅक्टर नर्स तर होतेच, बरोबर पाठीशी घाबरू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. असा आधार देणारे, श्री स्वामी पण होतेच ना.
किमोथेरेपी, injections. नंतर तीन वर्ष रोजची गोळी. हा प्रवास सोपा नव्हताच. या पिरेड मध्ये खूप उतार-चढ़ाव आले. आईने मात्र खंबीर पणे सर्व फेस केल. बाबा आईच्या पाठीशी होतेच.
या पिरेड मध्ये एक गोष्ट लक्षात आली की बाबा खाडकन ऊभे राहिले. आता भूमिकांची/ जबाबदारी ची अदलाबदल झाली आहे, हे त्यांच्या लक्षात आल.
Finally तो दिवस उजाडला, आई दिनानाथ मधून घरी सांगलीला परत आली. औषधोपचार चालू होतेच. पण दवाखान्यात राहणे आवश्यक नव्हते..
मनाला विरंगुळा म्हणून तिने या दरम्यान दोन एकांकिकांचे दिग्दर्शन केले, स्वतःचे यु ट्युब चॅनेल सुरू केले. छान उत्साहवर्धक positive लेख ती वाचत असे. कुठे तरी स्वतः ला active ठेवण, posiitive ठेवण गरजेचे आहे. हे तिला समजत होत. त्या निमित्ताने ती चार लोकांच्या संपर्कात होती. वेगवेगळया विषयांवर बोलत होती.
Strong mind always finds opportunities in difficult situatios.
बरोबर आहे…
उदास राहून कोणताच प्रश्न सुटत नसतो.
फायनली औषधांचे हे चक्र संपल. आणि पुन्हा एकदा पेट स्कॅन करून तो रिपोर्ट आज मिळाला.
रिपोर्ट आला…
डोॅक्टर ने वाचून म्हंटल… Wonderful ! अभिनंदन ! Mrs Vaidya. You have won the battle.
every thing is OK now.
एक डार्क काळ्याकुट्ट लांबलचक पिरेड finally संपला.
आजची सकाळ आधी सारखीच सुंदर, आनंदी होती. मुख्य म्हणजे आज कोणतीही गोळी घ्यायची नव्हती.
आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा सर्वांनी मिळून आल टाकलेला कडक चहा घेतला.
पुन्हा एकदा… आई जिंकली
खरय…
What is life ?
Life is about adjustment between your feelings and reality. life has many such situations where you have to leave your emotions and accept reality.
मला नेहमी वाटत…
आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांचे कौतुक करतो, त्यांच्या हुशारीची, त्यागाची, हिंमतीची, शौर्याची उदाहरण वाचतो, लोकांना सांगतो.
मग एका सर्व सामान्य घरातील सर्व सामान्य स्त्री आयुष्यात येणार्या कठीण प्रसंगाना धैर्याने, हिम्मतीने तोंड देऊन पुन्हा उभी राहते, हे पण कौतुकास्पदच आहे नाही का ?
आज पुन्हा एकदा चेतना बरोबर बोलण झाल.. आजपर्यंत मी त्यांना भेटलेली नाहिये… आज मला चेतना म्हणाली…
आता हे चौथं वर्ष सुरू आहे. या काळात मी दंड थोपटून उभी आहे.
माझ्या धाकट्या नातवंडा सकट सगळं मी पाहिलंय.
Quality life मी जगली आहे.
मोह हा मनाला नाहीच आहे.
फक्त माणसांचा मोह… मग विचार केला काय करावं आपण आता? जितके आयुष्य दिले परमेश्वराने त्याचे सोनं कसं करायचं ?.. त्याचे उत्तर मला माझ्या लेखणी न दिलं…
ती म्हणाली… अग! मी आहे ना… उचल मला आणि कर सुरुवात.
अशा तऱ्हेने मी चारोळ्या लिहायला सुरुवात केली..
नाटक हे तर माझं पॅशन आहेच..
नाटकं बसवायला लागले, एकांकिका बसवायला लागले..
आणि मग वाटलं सांगली पर्यतच हे सगळं सिमित होतंय… आपण जगभरातल्या लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतोय. इतकं सगळं जग आपल्या हाताच्या पंजात आलय… त्याचा फायदाही करून घ्यायला हवा ना… मग
Chetana Vaidya… चे वै
या नावाने चॅनल उघडलं… उद्देश एकच होता… की लाखो लोकांपर्यंत पोहोचता येईल… आणि एक असाही स्वार्थी विचार येऊन गेला मनात… की उद्या परमेश्वराचा कॉल आलाच तर तेंव्हा लोकांच्या दोन लाख डोळ्यात तरी पाणी येईल.
बस इतकच.
– – – मी म्हंटल…
सलाम तुम्हाला चेतना ताई… अशाच आनंदी रहा.
– समाप्त –
लेखिका : चेतना वैद्य
प्रस्तुती संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




