श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पौर्णिमा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

पौर्णिमा येईल तेव्हा चंद्र पूर्णाकार होतो

विश्व सारे शांतवाया अमृताची धार होतो

*

 फार चिंता वाढताना गात गाणे रात जाते

आवसेला वेढणारा रंग काळाशार होतो

*

 रोज दारी चांदण्याची रांग येते सोबतीला

त्या घडीला रोज त्यांचा चांगला सत्कार होतो

*

संकटानी ग्रासले की कोण नसते सोबतीला

आपला निर्धार तेव्हा आपला आधार होतो

*

रीत आहे या जगाची दूरदृष्टी पाळण्याची

काळ पुढचा त्यामुळे तर शेवटी साकार होतो

*

काळजीच्या संगतीने सर्वकाही योग्य होते

धुर्ततेने वागले की चांगला संसार होतो

*

सत्य आहे नित्य येथे चांगल्याला साथ देते

बंध सारे पाळताना नेमका संस्कार होतो

*

तो खरा तर लाच खावू हे कधी कळलेच नाही

घेत जातो देत जातो तोच दावेदार होतो

*

रोज मंत्री ऐतखाऊ बैठकाचा स्वाद घेतो

आणि तेथे नेमका तो भामटा सरदार होतो

*

प्रेम खोटे कोणतेही फार होते स्वार्थ साधू

गरजवंताच्या पुढे मग नेमका अंधार होतो

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments