श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “पाऊस वेगवेगळ्या प्रदेशातला…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

गोव्याचा पाऊस गोव्याच्या दारूसारखा आहे.

जशी गोव्याची दारू भरपूर पितात, पण चढतच नाही.

तसा पाऊस भरपूर पडतो पण  दिसतच नाही.

 

कोल्हापूरचा पाऊस. घरजावयासारखा.

घुसला की मुक्कामच.

राहा म्हणायची पंचाईत आणि

जा म्हणायचीपण पंचाईत…

 

अन मुंबईचा पाऊस

प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..

कधी येऊन टपकेल

धो धो आपल्याला धुऊन निघून जाईल सांगता येत नाही.

 

पुण्याचा पाऊस बायकांसारखा.

त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलत नाहीत.

नुसती दिवसभर पिरपिर चालू .

पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते. नुसता वैताग!

 

कोकण चा पाऊस

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा

एकदा सुरवात झाली की शेवटपर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …

 

खानदेशातील पाऊस म्हणजे लफडं!

जमलं तर जमलं नाहीतर सारंच  हुकलं !     

 

बेळगावचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभविक बायको सारखा…!

प्रेमाची रिमझिम, आपुलकीच्या धारा

व वरून वर्षाव करत असतात मायेच्या गारा..

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments