☆ इंद्रधनुष्य : सुरीनाम देश – संग्राहक – श्री माधव केळकर ☆

सुरीनाम हा देश कुठे आहे हे अनेक जणांना माहिती नसेल. पण तिथे घडलेल्या सत्तांतरानंतर ह्या देशाबद्दल जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे.

सुरीनाम हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर, ब्राझील देशाच्या अगदी डोक्यावर आहे. इथे पूर्वी डचांची वसाहत होती. इंग्रज आणि डच यांच्यात झालेल्या करारानुसार हजारो भारतीयांना इंग्रजांनी सुरीनामला कामगार म्हणून पाठवले. त्यांची गरज संपल्यावर त्यांना २ पर्याय दिले गेले १. स्वखर्चावर मायदेशी परतणे २. मोबदला म्हणून जमीन/थोडे पैसे स्विकारुन सुरीनाम मध्येच स्थायिक होणे. बहुतांश मजुरांनी दुसरा पर्याय निवडला आणि ते कायमचेच सुरीनामीज झाले. आज तिथे एकूण लोकसंख्येच्या जवळपास ३०% लोक भारतीय वंशाचे आहेत आणि हिंदुस्तानी ही प्रचलित भाषा आहे.

नुकत्याच आलेल्या निवडणूक निकालानंतर Chandrikapersad Santokhi यांनी सुरीनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. (भारतात अजून पर्यंत फक्त रिपब्लिक चॅनलने ह्या घटनेची दखल घेतली आहे.) कारण सांतोखी यांनी वेद ग्रंथांवर हात ठेवून संस्कृत मध्ये शपथ घेतली. हे खरंच interesting (किंवा विरोधाभासी) आहे. कारण, सुरीनाम मधील ह्या ऐतिहासिक घटनेच्या काही महिने अगोदर म्हणजे देशव्यापी Lockdown घोषित होण्याच्या एक आठवडा आधी भारतीय संसदेच्या वरच्या गृहात काँग्रेस, MDMK आणि इतर विरोधी पक्षांनी संस्कृत भाषेला “dead language” म्हणत सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला तीव्र विरोध केला होता. पहिली Central Sanskrit University स्थापन करण्यासाठी सरकारने २०१९ मध्ये एक विधेयक आणले होते. त्यावरील चर्चेत काँग्रेसने संस्कृत भाषेला “dead” घोषित केलं.

भारताच्या समृद्ध वारशाची जाण भारताला इतर राष्ट्रांनी करुन द्यावी लागते हेच भारतीयांचे (वैचारिक & otherwise) दारिद्र्य आहे.

बाकी, सुरीनाम मध्ये खनिज संपत्ती मुबलक आहे आणि ह्या क्षेत्रात भारतातून गुंतवणूक यावी अशी तेथील सरकारची इच्छा आहे. आपल्याला economic opportunities आहेत हे ह्यातून वेगळं सांगायलाच नको. एक बर्याच जणांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे सुरिनाम मधील ह्या पूर्वीचं सरकार सुद्धा भारताला अत्यंत अनुकूल होतं. एवढं की तिथले ह्या आधीचे उप-राष्ट्रप्रमुख अश्र्विन अधिन हे चक्क रा.स्वं.संघाचे स्वयंसेवक होते (किंवा आहेत). इतकंच नाही तर २०००-२०१० च्या दरम्यान त्यांनी संघाच्या शिक्षा वर्गाचे तृतीय वर्ष पण पूर्ण केले आहे. २०१५ च्या प्रवासी भारतीय दिनाचे ते प्रमुख पाहुणे होते. मोदी आणि अधिन ह्यांच्या भेटी नंतर काही दिवसांतच PIO (Person of Indian Origin) आणि OCI (Overseas Citizen of India) चे नियम बदलण्यात आले होते ज्यामुळे फिजी, मॉरिशस, USA आणि सुरीनाम सारख्या बहुतांश भारतीय असणाऱ्या देशांशी भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यात मदत झाली आहे.

  • संग्राहक-माधव केळकर

 

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागतम् आणि अभिनंदन.
खूप छान आणि दुर्मिळ माहिती मिळाली.??