सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ व्यास पौर्णिमा– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
जीवन ज्यावेळी जाहले सुरू
माता माझी झाली हो प्रथम गुरू ॥
*
गेले मी शाळेत शिक्षणाला
अनेक विषय ते शिकण्याला
सुरवंटाचे केले ज्यांनी फुलपाखरू
शिक्षक माझे सारे जीवन गुरू ॥
*
जाण हो आली अशी मम मनाला
गुण सा-यांचे येती निदर्शनाला
म्हटले गुण घेण्याचा तो प्रयत्न करू
सृष्टी सारी झाली हो आदर्श गुरू ॥
*
कळेना कसा हा काळ लोटला
सा-यांनी नकळत गुरू बदलला
गुरूंनाही वाटे जो त्यांचाच गुरू
मोबाईल जाहला सकल गुरू ॥
*
नको आता आई ही , नको शाळा ही
नको ते निरीक्षण , नको लिखाण ही
मोबाईल तो सर्वकाळ हातात धरू
इ जगात वावरताना , बरा इ गुरू ॥
*
कोणताही असो गुरू , आम्ही घडलो
जगामधे त्यांच्यामुळे आम्ही तरलो
व्यासपौर्णिमेला त्यांचे स्मरण करू
लीन होऊनिया जरा चरण धरू ॥
*
गुरू सारखा ना जगी दुसरा महा
तस्मै श्री गुरवे नम:
म्हणा तस्मै श्री गुरवे नम:
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




