सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ व्यास पौर्णिमा– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जीवन ज्यावेळी जाहले सुरू

माता माझी झाली हो प्रथम गुरू ॥

*

गेले मी शाळेत शिक्षणाला

अनेक विषय ते शिकण्याला

सुरवंटाचे केले ज्यांनी फुलपाखरू

शिक्षक माझे सारे जीवन गुरू ॥

*

जाण हो आली अशी मम मनाला

गुण सा-यांचे येती निदर्शनाला

म्हटले गुण घेण्याचा तो प्रयत्न करू

सृष्टी सारी झाली हो आदर्श गुरू ॥

*

कळेना कसा हा काळ लोटला

सा-यांनी नकळत गुरू बदलला

गुरूंनाही वाटे जो त्यांचाच गुरू

मोबाईल जाहला सकल गुरू ॥

*

नको आता आई ही , नको शाळा ही

नको ते निरीक्षण , नको लिखाण ही

मोबाईल तो सर्वकाळ हातात धरू

इ जगात वावरताना , बरा इ गुरू ॥

*

कोणताही असो गुरू , आम्ही घडलो

जगामधे त्यांच्यामुळे आम्ही तरलो

व्यासपौर्णिमेला त्यांचे स्मरण करू

लीन होऊनिया जरा चरण धरू ॥

*

गुरू सारखा ना जगी दुसरा महा

तस्मै श्री गुरवे नम:

म्हणा तस्मै श्री गुरवे नम:

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments