सौ राधिका भांडारकर

?  कवितेचा उत्सव ? 

☆ निरोप ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आला गणराया

दहा दिवस राहिला

मंगलमूर्तीने

कोपरा उजळला…

 

आरत्यांच्या गजरात

टाळ मृदुंग नादात

नैवेद्याच्या सुगंधात

आनंदाची बरसात…..

 

हरल्या चिंता

हरले वाद

मन झाले मुक्त

होता गणाशी संवाद….

 

निरोपी एक वचन

कास धरु सत्याची

नको क्रोध मद मत्सर

कर्मे करु मानवतेची

 

गणेशाचे निर्गुणत्व

मृत्तीका जल तत्व

पूजीली मूर्ती सगुणाची

विसर्जनी पावे एकतत्व..

 

निरोप देता उदास मन

जरी माझे मोरया

दृढ विश्वासे विनवितो

पुढच्या वर्षी लवकर या……

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments