सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शब्द बंबाळ जग आहे हे,

  शब्दांचा बडिवार तो किती!

कधी गोड तर कधी कडू,

  सारी शब्दांचीच दिठी !

 

कधी शब्द माणिक मोती,

  कधी मुक्ताफळे उधळती !

ओथंबून   मायेपोटी ,

  नाटकी पणी ही कधी येती!

 

शब्द सखा बनून  येती,

  ओढ जीवाला लावती!

शब्द भाव भरून येती,

  काळजाला जाऊन भिडती!

 

कधी शब्द नि:शब्द बनून येती,

  अन्  अंतरात  घुसती !

खोल रुतून बाणा परी ,

  जखमी करून जाती!

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments