पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆
☆ निश्चयाचे बळ… – भाग – २ – ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆
(पलीकडच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मैत्रिणींबरोबर ती सकाळची फिरायला जाऊ लागली. आणि त्यांच्या ग्रुपमध्ये केंव्हाच मिसळून गेली. सकाळच्या वाऱ्याबरोबर, व्यायामाबरोबर हास्यविनोद, तिला उत्साहाचे आनंदाचे टॉनिक मिळू लागले. पुन्हा विनय उठायच्या वेळी घरी येऊन चहा करायला ती हजर असायची.)
इथून पुढे – –
एकदा ग्रुपमधल्या मीनाताईंनी त्यांच्या चार वर्षाचाच्या नातवाची मजेशीर गोष्ट सांगितली. ती आठवंत हसऱ्या चेहऱ्याने सुनंदा घराकडे येत होती. एकदा ग्रुपमधल्या मीनाताईंनी त्यांच्या चार वर्षांच्या नातवाची मजेशीर गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले की एकदा चिकू खाल्ल्यानंतर सौरभने -त्यांच्या नातवाने- चिकूच्या बिया आपण कुंडीत रूजत घालूया म्हणजे त्याला झाड येऊन आपल्याला छान चिकू खायला मिळतील. असा हट्ट धरला तेव्हा मीनाताईंनी त्याला समजावले की चिकूचे झाड मोठे होते ते कुंडीत होणार नाही. आपण खाली कंपाऊंडच्या कडेला या बिया लावूया. बिया लावून त्या भोवती दगड ठेवून सौरभ तिथे रोज पाणी घालत असे. तळमजल्यावर राहणाऱ्या गोरे आजी त्याला पाणी घालायला देत असत. एकदा आजी त्याला म्हणाल्या अरे सौरभ मी तुला रोज तुझ्या चिकूच्या झाडाला घालायला पाणी देते. मग तुझ्या झाडावर चिकू आले की मला देशील ना चिकू? तर एक मिनिट विचार करून सौरभ उत्तरला झाडाला चिकू आले की मी तुमचं पाणी परत करेन. हे ऐकल्यावर ग्रुपमध्ये हसण्याचा एकच खळखळात झाला होता. आनंदी प्रसन्न चेहऱ्याने सुनंदा घरात शिरली होती. त्या विनोदाचा मूड मनावर होता. चहा घेता घेता ती हसत हसत सौरभचे मजेशीर उत्तर सांगू लागली. मध्येच विनय खेकसला मॉर्निंग वॉकच्या नावाखाली असला धूडगूस घालायला बरी सवकली आहेस. सुनंदाने पुढचे शब्दआणि डोळ्यातले पाणी गिळून टाकले. मनात निश्चय केला की यापुढे घरात येताना बाहेरचे जग बाहेरच ठेवून यायचं. नाहीतर काहीतरी कारण काढून हा मनाला उभारी देणारा आनंदसुद्धा बंद होईल.
मागच्या महिन्यात तर विनयने कहरच केला होता. विनयचे आजारपण, त्याचे घालून पाडून बोलणे यामुळे चारू अलीकडे माहेरी येण्याचे टाळत असे. आणि तिच्या छोट्या सुदीपला सांभाळायला छान मावशी. मिळाल्या होत्या. जोडून सुट्टी होती म्हणून सुनंदाच्या आग्रहाखातर ती राहायला आली होती. मायलेकींच्या मजेत गप्पा चालू होत्या. सुदीप केंव्हा झोपेतून उठून रडायला लागला ते कळलंच नाही. माय लेकींचे हसणे आणि सुदीपचे रडणे सहन न होऊन शुभेच्छा पाठीत घातला की ते पोर कळवळून आणखी रडायला लागले. सुनंदा कावरीबावरी झाली. चारूने सुदीपला जवळ घेऊन त्याची समजून घातली. त्याला शांत केले आणि दुसऱ्या दिवशी बाबांचा हसत मुखाने निरोप घेऊन काढता पाय घेतला. आत्तासुद्धा सुनंदा पंधरा दिवस जायचं म्हणते आहे ते चारूच्या जीवावर. आईला पंधरा दिवस चांगला बदल होईल, ताई मावशीची सोबत आहे, सुजलच्या लग्नाला या दोघी हजर राहतील तर सविता मावशीलाही आनंद होईल. शिवाय दुबई आणि इंग्लंडही पाहून होईल. म्हणूनच चारूनेही आईला जाण्यासाठी गळ घातली होत गेली सात आठ वर्ष ती आईची अवस्था पहात होती. ती बाबांना स्वतःकडे राहायला घेऊन जाणार होती. सुदीपला सांभाळणाऱ्या मावशी महिनाभर रजेवर जाणार होत्या. म्हणून तेव्हा चारुही महिनाभर रजा घेणार होती. आणि अनायसे आईच्या जाण्याची वेळही तीच होती. सर्वांनाच थोडा आवश्यक तो बदल झाला असता. पण विनयची कसल्याचं तडजोडीला तयारी नव्हती. चारूकडे मला करमत नाही. तिच्याकडून डॉक्टर लांब पडतील, जावयाकडे कुठे इतके दिवस राहू, चारूला माझं पथ्यपाणी, औषधपाणी सांभाळायला जमेल का? यापेक्षा तूच जाऊ नको असा त्याचा हट्ट वाढत होता. आणि जसा जसा त्याचा विरोध वाढत होता तसा सुनंदाचा जाण्याचा निश्चय वाढत त्याचा विरोध झाला होता तसा तसा सुनंदाचा जाण्याचा निश्चय ठाम होत होता. काय झालं मी फक्त पंधरा दिवस जाऊन आले तर? आत्ता ताईच्या सोबतीने नाही गेले तर पुन्हा कधीच ही संधी कधीच मिळणार नाही. थोडी दुबई बघायला मिळेल. भाचीच्या लग्नाला हजर राहता येईल. आणि पंधरा दिवसांनी मी येणार आहेच ना परत! मी माझी जबाबदारी टाळत नाही. विनय येऊ शकत नाही याचे मलाही वाईट वाटत आहे. त्याचवेळी तिला इतके दिवस केलेली खटपट वाऱ्यावर सोडून द्यायची नव्हती आणि विनयच्या चेहऱ्यावरचे छद्मी हास्यही बघायचे नव्हते. तिला ताईकडे भरगच्च अहेर करायचा होता. दुबईत मृणालकडे छान गिफ्ट द्यायची होती. शिवाय मौज मजेने पंधरा दिवस मुक्त फिरायचे होते..
क***** ढगातून लख्ख लखन तसे तिला एकदम आठवले त्यांच्या फॅक्टरीच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता या त्या दिवशी पाठ दुखीने हैराण झाल्यामुळे विनय वकिलांबरोबर जाऊ शकत नव्हता. व्यवहार तर त्याच दिवशी पूर्ण करायला हवा होता. शेवटी धंद्यामध्ये पार्टनर असलेल्या सुनंदाने वकिलांबरोबर जावे असे ठरले. त्यावेळी वकिलांनी जरूर लागली तर असू दे एक तुमच्या सहीचा पोरा कागद चेक असे म्हणून विनयची एका कोरिया चेक कर सही घेऊन ठेवली होती नंतर विणायचे ऑपरेशन हॉस्पिटल या गडबडीत ते सारे कागदपत्र तसेच ठेवलेले होते सुनंदा काढणार होती ती रक्कम तशी मोठी होती आणि बँकेच्या नियमांप्रमाणे बँक दुसऱ्या अकाउंट होणार ला कन्फर्मेशन विचारण्याची शक्यता दाट होती. आणि विनायक कडून कन्फर्मेशन मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. विनयची अजिबात गैरसोय होत नाहीये मग काय झालं मी गेले पंधरा दिवस तर? असा विचार करून सुनंदाने विनयच्या विरोधाला डावलून ताईबरोबर जाण्याची तयारी सुरू केली. अकस्मात तिला हे सारे आठवले आणि तो विनयच्या सहीचा कोरा चेक तिला मिळाला तिचा आनंद गगनात मावेनासा झाला
त्याचवेळी तिला इतके दिवसांची तिची धडपड खटपट अशी वाऱ्यावर सोडून द्यायची नव्हती.
आता यातून कसा मार्ग काढायचा या विचारांमध्ये तिला एकदम आठवले की त्यांच्या फॅक्टरीच्या विक्रीच्या व्यवहार पूर्ण होणार होता त्या दिवशी पाठ दुखीने हैराण झाल्यामुळे विनय वकीलांबरोबर जाऊ शकत नव्हता. व्यवहार तर त्याच दिवशी पूर्ण करायला हवा होता. शेवटी धंद्यामध्ये पार्टनर असलेल्या वकिलांबरोबर जावे असे ठरले त्यावेळी वकीलांनी जरूर लागली तर असू दे एक तुमच्या सहीचा कोरा चेक असे म्हणून विनयची एका कोऱ्या चेकवर सही घेऊन ठेवली होती. नंतर विनयचे ऑपरेशन हॉस्पिटल या गडबडीत ते सारे कागदपत्र तसेच ठेवलेले होते. आता अकस्मात ते सारे सुनंदाला आठवले. आणि विनयच्या सहीचा चेक घेऊन तिने उद्या सकाळी निलेशला भेटायचे ठरले. त्या चेकवर स्वतःची सही करून तो चेक बँकेत देणार होती आणि तिचे स्वप्न पूर्ण होणार होते.
अंथरुणावर पडल्या पडल्या सुनंदा विचार करू लागली कुठची बॅग न्यावी बरं प्रवासाला? लग्नासाठी कुठल्या कुठल्या साड्या घ्याव्या? आहेर काय करावा? मृणालसाठी काय भेट द्यावी? मनातल्या या विचारांनी तिला एकदम दचकायला झाले. अपराधी वाटले. पण दुसरे मन तिची समजूत घालू लागले, अग पंधरा दिवसांनी येणारच आहेस ना तू या घरट्यात परत! उलट या पंधरा दिवसांच्या मोकळ्या मुक्त हवेमुळे तुझ्या पंखांमध्ये चांगले बळ येईल तुझे कर्तव्य पार पाडण्यासाठी. झोप शांतपणे. रोजच्यासारखं लवकर उठून फिरायला जायचं ना? निलेशजवळ तो चेक द्यायचाय ना !
– समाप्त –
© सौ. पुष्पा चिंतामन जोशी
कोथरूड, पुणे
मो ९९८७१५१८९०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





