सौ.अंजली दिलिप गोखले

Author: Hemant Bawankar - साहित्य एवं कला विमर्श

 ☆ जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

पण ती आमची शेवटचीच भेट ठरली. परत आल्यावर तब्बल दहा वर्षांनी मी निलेश ला आणि चं दाला भेटतोय. पण हा असा, दोघांच्या समाधीपुढे. म्हणजे हे मोठे वृक्ष आहेत ना. हाच तो प्रयोग प्रयोग केलेला आडवा वाटलेला हिरवागार पानांनी वेढलेला वृक्ष म्हणजे माझी मैत्रीण चंदा ! आणि त्या शेजारच्या त्याला वेढुन डेरेदार वाढतोय तो माझा निलेश. खरंच हे दोन वृक्ष म्हणजेच चंदा आणि निलेश.

ठरवल्याप्रमाणे निलेशने आपला प्रयोग चंदावर सुरू केला. सलाईन लावून त्यातून क्लोरोफिल, झिंक, मॅग्नेशियम मोजून-मापून तिच्या शरीरात इंजेक्ट केलं. तिच्याशी गप्पा मारत बसत असे. त्याला विद्यापीठातही जावे लागत होते. कारण दोघेही एम एस सी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले होते आणि तिथेच डिपार्टमेंटमध्ये त्याला रिसर्च साठी फेलोशिप मिळाली. त्यामुळे त्याचे काम सुरू होते. विद्यापीठातले काम झाले की लगेच गाडी वरून इकडे चंदा जवळ येई. तिच्याशी गप्पा मारत, डोस ऍडजेस्ट करत, सलाईन बदलत याचा दिवस कसा जाई त्याचे त्याला समजत नसे.

एकदा मात्र तो विद्यापीठात गेला आणि गावांमध्ये काही कारणाने दंगा उसळला. इतका की कर्फ्यू पुकारावा लागला आणि निलेश दोन दिवस तिकडेच अडकून पडला. दोन दिवसांनी कर्फ्यू उठल्याउठल्या तो धावतच चंदाकडे आला आणि समोरचे दृश्य बघून हबकूनच गेला. चंदा कॉटवर कुठे दिसतच नव्हती. कॉटच्या खालून जमिनीकडे मूळं वाढत होती आणि तिच्या शरीरावर छोटी छोटी हिरवीगार पालवी फुटली होती. तिचे डोळे नाक हेही नक्की कुठे आहे ते निलेश ला दिसेना. कॉट जवळ जाऊन जोराने तो चंदा, चंदा हाका मारू लागला. पण पाने जागच्याजागी थरथरल्याचा त्याला भास झाला.

त्या चा आपल्या स्वतःवर, डोळ्यांवर विश्वासच बसेना. हे घडतंय ते त्याला अपेक्षित होतं. पण चंदा कुठे गेली? तिचं अस्तित्वच नाहीसं झालं. याचा आपण विचारच कसा केला नाही? निसर्गाच्या नियमानुसार न वा गता आपण भलत्याच फंदात पडलो आणि मानवी चं दाला मुकलो. हे त्याला कळून चुकले. आता वाईट वाटून नही काहीच उपयोग नव्हता.

त्याच क्षणी त्याने आपला प्रयोग लिहून ठेवला आणि पाकिटात घालून माझे नाव घालून पाकीट बंद केले आणि तेव्हापासून स्वतःही अन्नपाणी न घेता तो चंदा जवळ बसून राहिला.

सलग आठ दहा दिवस विद्यापीठात आल्याने त्याचे गाईड सर त्याला शोधत इकडे आले आणि त्या ना मरणासन्न निलेश दिसला. प्रयत्न करूनही ते निलेशला वाचवू शकले नाहीत. अखेर चंदाच्या शेजारीच नवीन रोप लावून त्याची राख, त्याच्या शरीराची हाडं तिथे रोपा बरोबर पुरण्यात आली आणि तोच हा वृक्ष वाढला.

आज दहा वर्षांनी हे पाकिट मला मिळालं आणि निलेश चंदाच्या अमर प्रयोगाची माहिती सर्वांना झाली. त्याच्या पत्रातल्या काही ओळी अजून माझ्या डोळ्यापुढून हलत नाहीत.

“निसर्गाच्या विरुद्ध प्रयोग करायला मी गेलो आणि चंदा सारख्या हुशार जिद्दी आणि मनापासून प्रेम करणाऱ्या प्रिय व्यक्तीला मुकलो. तिच्या बलिदाना पुढे मला जगावेसे वाटत नाही.. तिच्या या परिस्थितीस सर्वस्वी मीच जबाबदार आहे.. केवळ म्हणूनच मी अन्नत्याग करत आहे. अजूनही खूप काही करायचे मनात होते पण यंदा शिवाय करणे केवळ अशक्यच! म्हणून मी इथेच थांबतोय.”

“इथून पुढेही कोणीही प्रयोग जरूर करावेत पण परिणामांचा फार विचार करून आणि मुख्य म्हणजे निसर्गाबरोबर काम करायला हवे निसर्गाविरुद्ध नको!”

     …. झाडांशी निजलो आम्ही

             झाडात पुनः उगवाया….

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments