श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ परतीचा क्षण… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
परतीचा क्षण मनुष्याला नकोसा असाच वाटतो, नाही का?
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात परतीचा प्रसंग कधीकधी रोज किंवा आयुष्यात एकदा तरी नक्कीच येतो…
आयुष्यात उपभोगलेले सुखदुःखाचे क्षण सोडून परतीचा प्रवास सुरू करणे, प्रत्येकाला जमतेच असे नाही…
काही लोकं जाण्याआधीच आपल्या परतीच्या प्रवासाची भौतिक आणि मानसिक तयारी करून ठेवतात…
त्यामुळे त्यांना यातून बाहेर पडणे सोपे जाते…
या सर्वाचे एका वाक्यात सार पुढील एका वाक्यात सांगता येईल…
बॅग भरून तयारी असावी…
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर




