श्री दिवाकर बुरसे
☆ क्षण सृजनाचा ☆ ‘रंग… नको बेरंग..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
होळी व धूलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा!
या शुभेच्छा देताना ‘यंत्रदास’ आम्हाला सुरक्षिततेच्या काही सूचनाही आवर्जून देतो. सणाच्या रंगांचा बेरंग होऊ नये म्हणून या सूचनांचे पालन करावे आणि सणाचा आनंद लुटावा अशी त्याची आग्रहाची विनंती आहे.
‘श्री सुरक्षितताबोध’ या ग्रंथाच्या ‘बालक्रीडनसुरक्षिततानाम’ अध्याय ५. श्लोक १२ ते १४ मधे यंत्रदास सांगतोय.
*
आहा. बाळके खेळतीं रंग होळी
जळीं लोळतीं (लावुनी भांग गोळी?)
फुगे फोडितीं. फेकितीं रंग नाना
सिनेमानटासारखे छंद नाना ll१२ll
*
किती रंग ते. काय त्यांची झळाळीं!
तेलातले रंग. ख्याती निराळी
निळे. तांबडे. पांढरे वा रुपेरी
जरा लागता… त्याहुनी मिर्चि बsरी! ll१३ll
*
मना! ऐशिं होळी न केव्हाच खेळीं
(रहावे सुखे खाउनी फक्त पोळी!)
असे रंग ते भंगवीतीं शरीरा
तसा लागतो रे करावा खरारा ll१४ll
*
टीप:-
खरारा: घोड्याचे अंग स्वच्छ करण्याच्या क्रियेला ‘खरारा करणे’ म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणा-या बोथट दातेरी. काटेरी पत्र्यालाही ‘खरारा’ म्हणतात.
यंत्रदास: ‘यंत्रदास’ या टोपण नावाने १९९३ साली ‘ श्रीसुरक्षिततोध ‘ नावाचा. ‘सुरक्षितता’ (Safety ) या विषयावर मी लिहिलेला ग्रंथ पुण्याच्या ‘टेल्को’ – आताची ‘टाटा मोटर्स’ या कंपनीने प्रकाशित केला होता. ‘ सुरक्षिततेविषयी सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारा उत्कृष्ट ग्रंथ’ म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार देऊन या ग्रंथास सन्मानिले आहे.
☆
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




