अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – अंतः अस्ति प्रारंभः… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

“शेवट हीच सुरुवात आहे” किती गहन विचार आहे जो जीवनातील प्रत्येक समाप्तीतून नवीन संधी, शिकवण आणि बदलाची नवी दिशा कशी मिळते हे सांगत असतो ज्यात संकट, पराभव, अपयश किंवा एखादी गोष्ट संपल्यावर नवीन प्रवास सुरू होतो, हा विचार जीवनचक्राचे चक्र आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो.. निसर्गातील अशा कित्येक उदाहरणांमधून अंतः अस्ती प्रारंभः ह्याच दर्शन घडत असत.. एखाद वठलेलं झाड, पान गळतीने निष्पर्ण झालेला बगीचा मनात उदासीनतेचे भाव आणत असतो तोच बगीचा चैत्र पालवीने सोनेरी रंगात जेंव्हा बहरून फुलतो तेंव्हा मनाला सुखावत असतो.. इथे पान गळती हा शेवट आणि चैत्र पालवी ही सुरुवात असते पुन्हा नव चैतन्य फुलविण्याची.. एखाद अपयश एखाद संकट आपल्याला दुःखी करत संपल आता सगळं अस वाटत असताना एक नवी संधी चालून येते एक नवा मार्ग सापडतो तेंव्हा अपयशाकडे पाहण्याचा ही दृष्टिकोन बदलतो.. आपण नेहमी आपल्यासाठी योग्य तेच निवडतो आहोत अस वाटत असत आपल्याला पण त्या विधात्याचे खेळ काही निराळे असतात आपल्यासाठी आपण निवडलेल्या पर्याय शिवाय त्याचे पर्याय जास्त योग्य असतात.. तो जेंव्हा एखाद संकट देतो तेंव्हाच त्याचा शेवट ही त्याने ठरविलेला असतोच.. पण आपला नकारात्मक दृष्टिकोन मात्र आपल्याला दुःखी करत असतो.. जर शेवट ठरलेला आहे तर नवी सुरुवात ही निश्चित असते पण त्यासाठी गरजेचा असतो तो संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन.. पण आपण नेहमी उलटाच विचार करत असतो हे अस माझ्याच बाबतीत का होत नेहमी वाईटच होत हा दृष्टिकोन आपल्या प्रगतीतील मोठा अडथळा ठरतो.. कोणतीच गोष्ट चिरकालीन नसते प्रत्येकाचा शेवट हा ठरलेलाच असतो आणि जिथे शेवट असतो तिथे नवी सुरुवात ही असतेच.. हा विश्वास मात्र आपल्या मनाशी पक्का हवा.. एखादी गोष्ट जर अचानक बदलत असेल नव वळण घेत असेल तर येणाऱ्या प्रत्येक वळणावर एक नवी दिशा एक नवी संधी किंवा एक नवी सुरुवात असतेच हा सकारात्मक दृष्टिकोन मनात असेल तर कोणताच पराभव संकट किंवा आयुष्यात येणारे अवघड वळण ही सोप्पे होते.. आयुष्याच्या प्रवासात अनेक अशी वळणं येतात जिथे आपण मानसिक रित्या पूर्णपणे कोसळून जातो.. कुठे जिवलग नात्यांचा शेवट असतो कुठे समाजाने दिलेले धोके असतात कुठे आलेली अनेक संकटे आव्हाने असतात तर कुठे सतत होणारा पराभव असतो अशावेळी स्वाभाविकच आपण कोलमडतो, दुःखी होतो पण अशा वेळी हा शेवट सकारात्मकतेने स्वीकारून त्यातून येणाऱ्या नव्या संधी कडे वाटचाल करत ध्येय ठरवाव लागत आणि हे जेंव्हा आपण स्वीकारतो तेंव्हा तिथे आयुष्याला एक नवी कलाटणी मिळते एक नवी सुरुवात आपली वाट बघत असते.. गरज असते ती आपल्या संयमाची आणि चिकाटीने चालत राहण्याची.. जिथे एक गोष्ट संपते, तिथूनच दुसऱ्याची सुरुवात होते.

हा विचार जीवनातील बदल आणि निरंतरतेचे प्रतीक आहे, प्रत्येक शेवट नवीन संधींना जन्म देतो. अपयश किंवा संकट हे नवीन कौशल्ये शिकण्याची आणि अनुभवांची संधी असते. हा विचार खचलेल्या व्यक्तीला नवी उभारी देतो आणि जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास शिकवतो.

‘अंतः अस्ति प्रारंभः’ हे जीवनाचे सार आहे. हे तत्त्व आपल्याला अपयशातून शिकायला, नवीन मार्ग शोधायला आणि आव्हानांना संधी म्हणून बघायला शिकवते. त्यामुळे, आयुष्यात जेव्हा गोष्टी संपल्यासारखे वाटतात, तेव्हा निराश न होता नवीन प्रवासाची तयारी करणे महत्त्वाचे आहे.

थोडक्यात, ‘अंतः अस्ति प्रारंभः’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हा विचार आपल्याला प्रत्येक शेवटाकडे एका नव्या सुरुवातीच्या आशेने पाहण्यास शिकवतो, ज्यामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सकारात्मक बनते.

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments