उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ वाटणी – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ उज्ज्वला केळकर ☆
डॉ. हंसा दीप
(प्रत्येक करकरणार्या भीतीमागे आईची मजबूत नजर होती. त्याच्यावर आजपर्यंत कुणी दृष्टी टाकू शकलं नाही. तिच्या नालायक मुलांनाही ते जमलं नाही. किती वर्षांपासून आईच्या जाण्याची वाट पाहत होते, कुणास ठाऊक? जितकी त्यांची बेचैनी वाढायची, तितकी आईची जीवनेच्छा वाढायची.)
इथून पुढे – –
तिघे भाऊ अधून मधून घरी यायचे आणि टोमणे मारायचे, ‘दादा रोज फोन करत असेल. रोज गप्पा मारत असेल. ‘
‘सगळे आशीर्वाद त्यालाच देऊन झाले असतील. काही शिल्लक असेल, तर मलाही दे. ’
आईला हे सगळं ऐकायची सवय झाली होती. कधी जर कुणी चक्कर मारली आणि टोमणे नाही मारले, तर ते नातवंडांना हळूच विचाराची, ‘तुझ्या बाबांची तब्बेत ठीक नाहे ना!’ दुसर्या दिवशी पुन्हा कनी न कुणी येऊन टोमणे देऊन गेलं की आईला वाटायचं, ‘चला! सगळं ठीक-ठाक आहे. मधला, धाकटा, मुन्ना, सगळे जसे काही एका मातीचे बनले होते.
आईने बिछाना धरलाय, या अपेक्षेने जेव्हा ते बघायला जायचे, तेव्हा स्वाईपाकघरातून शुद्ध तुपातील शिर्याचा किंवा आंब्याच्या बर्फीचा वास दरवळत असायचा. खाण्याच्याच आवडीने तिला जीवंत ठेवलं होतं खरं तर! किंवा असंही म्हणता येईल की खाण्याच्या आवडीमुळे आई सक्रीय राहायची. नव्वद वर्षापर्यंत खूप गोड खाऊन ती गोड राहिली. अखेर निघून गेली. किती काळ थांबणार? मुलांचे पांढरे केस म्हणू लागले की आम्ही थकलो पण ही आई काही थकत नाही. आपली भाकरी अजूनही स्वत: बनवून खाते. फिरत फिरत नातवंडं, आजी काय करतेय, बघायला येत. तिच्याकडून काजू, बदाम, बेदाणे घेऊन खात. सुका मेवा किंवा ताजी मिठाई खाण्याची लालसा आजीच्या घरी चक्कर मारायला लावी. त्यांना कळायचं नाही की आजी एकटीच का रहाते. त्यांना तर आजी खूप चांगली वाटायची. आजी देखील त्यांच्याकडून घरातल्या सगळ्या गोष्टी वदवून घ्यायची. ‘तुझी मम्मी काय म्हणाली? मग त्यावर पापा काय म्हणाले? जास्त भांडण तर झाला नाही ना? मिठाई खायची आहे ना? मग सांग लवकर!’ मुलं मग सगळं सांगायची. करपलेली भाकरी खावी लागली किंवा मग मम्मी-पापा दोघेही खूप रागावले. आई हसायची. सीसीटीव्ही कॅमेर्याशिवाय घराचं चित्र आईपुढे उभं राहायचं.
सगळच जाणून, समजून असल्यामुळे आई मृत्यूपत्र करून गेली नाही. कदाचित तिला माहेत असावं, ही तिघं मुलं असताना कागदाच्या तुकड्याला काही महत्व नाही. त्यांच्यात इतकी ताकत होती की ते आईकडून काहीही लिहून घेऊ ते प्रमाणित करू शकले असते. किती तरी वर्षांपूर्वीचं जुनं सामान तिचे डोळे मिटताच गायब झालं. उरलं होतं, ते वडिलोपार्जित घर. त्याची किंमत कोटींमधे होती. चार मुळे, सुना, नातवंडे एव्हा परिवार असूनही आई एकटी राहिली होती. सगळ्यात धाकट्या मुलाचं लग्न झालं, तेव्हा तिला वाटलं होतं, हा तरी घरात टिकेल. पण काही दिवसांनी तोही बाहेर पडला. म्हणाला, ‘मी माझ्या भावांचं अनुकरण करतोय. ’
माझ्या डोक्यातून आईचं ते मृत्यूपत्र जात नव्हतं. त्यात मी कुठेच नव्हतो पण माझ्या आईचा मुलगा तर होतो. कदाचित त्या तिघांपेक्षा अधीक जवळचा होतो. माझ्या खुर्चीवरील सेलफाट आईचा फोटो आहे. माझ्या प्रत्येक कामानंतर तिचा हास्य अधिकाधिक रुंद होत जातं. घरात आमच्या क्रमानुसार आमहाच्या नावाने आम्हाला पुकारलं जायचं. मोठा, मधला, धाकटा आणि मुन्ना. मोठा मी होतो. केवळ वयाने मोठा होतो असं नाही, तर प्रत्येक बाबतीत मोठा होतो. आईच्या प्रेमाच्या बाबतीत, घरच्या भिंतीं बाबतीतआणि आकाशाची उंची मोजण्याच्या बाबतीतही. आईलाही मी मोठं केलं होतं. तिच्या इच्छा-आकांक्षांना खूप ऊंची दिली होती मी. एअरपोर्टवरून टॅक्सी घेऊन मी गावात पोचलो, की माझ्या आस-पास खूप गर्दी जमायची. घर असं काही चमकायचं, प्रकाशमान व्हायचं, जशी काही एखादी जत्राच सुरू आहे. परदेशातून मुलगा आलाय. माझ्या स्वागतासाठी घरात उत्सव सुरू व्हायचा. भेटायला येणार्यांची चढाओढ लागायची. प्रत्येकाला भेटीची लालसा असायची. आई म्हणायची, ‘थोडं थोडं प्रत्येकाला दे. कुणी या आपल्या इज्ल्हयाच्या बाहेर नाही गेलं आणि तू तर परदेशात जाऊन आला आहेस. आशा असणारच ना सगळ्यांना. माझ्यासाठी काही आणू नकोस पण या सगळ्यांना दे. ’
तिघं भाऊ टोमणे मारायचे, ‘आईचा मोठा मुलगा आलाय. ब्घूयात, काय काय माल बाहेर पडतोय. तू ना आई सगळ्यात जास्त त्याच्यावर प्रेम करतेस आणि तो… तुला सोडून जातो. ’
यावर आईचं उत्तर तयार असे. ‘ मग, तुम्ही आधी यायचात. तुमच्यावर जास्त प्रेम केलं असतं. मीच त्याला पाठवलय… पुढे जाण्यासाठी… तुमचा बाप निघून गेला. तुमच्याकडे लक्षही त्यानेच पुरवलय. तो शिकत होता. तुम्हाला शिकवत होता. ’
‘शिकवत नव्हता. या निमित्ताने सगळ्यांना छड्या मारत होता. त्याला स्वातंत्र्य मिळालं होतं.
मी सगळं ऐकायचो पीएन प्रतिवाद कधी केला नाही. आखडूपानाशी कितीही टक्कर घेतली, तरी जखमा होतातच. आईच्या अतिरिक्त प्रेमाचा खूप फायदा घेतला मी. आईला बरोबर घेऊन जाण्याबद्दल मात्र कधी बोललो नाही. घबराट होतो. हो म्हणाली तर… तिथे राहील कशी? माझी इटालियन पत्नी तिच्याबरोबर काशी राहू शकेल? जिथे आसापासचे लोक एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत, त्या वातावरणात काशी रुळू शकेल ती? मनाची पक्की धारणा करून घेतली होती की आई आपली जमीन-माती कधी सोडणार नाही. कुठल्याही प्रकारे का होईना, मी तिला तिकडे घेऊन जाऊ इच्छित नव्हतो. तिकडे नेऊन तिचं मन दुखवू इच्छित नव्हतो. एकटेपणाचं ओझं उचलणं, तिच्यासाठी सोपं झालं नसतं.
इथे आलो की छोट्या छोट्या गोष्टी तिला किते आनंद देत. हिरवे हरभरे भाजून दाणे काढून द्यायची. ‘शिकला- सावरलेला आहे. सूट बूट खराब व्हायला नको. ’ मक्याच्या कानसतले दाणेदेखील काढून द्यायची. ‘हात घाण करू नको. ’ माझे कपडे धुण्यासाठी धोबिणीला कधी द्यायची नाही. म्हणायची, ‘महागातले कपडे आहेत. हलक्या हाताने धुवीन. ‘ माझे ते कपडे धुताना तिला आमच्या लहानपणाची आठवण येत असावी. तेव्हा ते छोटे छोटे कपडे धुताना तिला अपार आनंद होत असे. तेव्हा तर बाबाही होते. एक सुखी आणि सापन्न असा घर होतं आमचं. आईला आकापाठोपाठ एक मुले होत गी, तिकडे बाबा दूर होत गेले.
‘मोठ्या मुलाला मोठा मान मिळतोच. याने तर सगळ्या गावा मन मिळवून दिलाय. ’ आईचा चेहरा जितका तेजाळायचा, तितका भावांचा चेहरा विझत जायचा. हळू हळू सगळ्यांच्या बायका आल्या. आईला मारले जाणारे टोमणे आता तिप्पट झाले.
मला चांगलं आठवतय, एकदा मधल्याच्या बायकोने भाजीत मिरची जास्त घातली होती. ते घशात अडकली. इकडे मी खोकत होतो, तिकडे आईचा जीव वर खाली होत होता. स्वाईपाकघरात जाऊन सुनेला रागावली. म्हणाली, ‘तुला माहीत आहे नं, त्याला जास्त तिखट चालत नाही. इतक्या दुरून तो येतो, ते तुम्हा लोकांना भेटण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही योग्य असं जेवणही बनवू शकत नाही. ’ असे अनेक क्षण. मोठ्यासाठी ते सगळे सन्मानाचे क्षण असायचे. परंतु तिघे भाऊ आणिक त्यांच्या बायका मात्र कुढत राह्यच्या.
मोठा नावालाच आहे. याने खरं तर सांभाळायला हवं आईला, पण सांभाळतोय आम्ही. धाकटे असून आमचं कर्तव्य पार पडतोय. ‘
‘मोठ्याबद्दल प्रेमाचे उमाळे खूप येताहेत. करून घे माया. आज आहे, उद्या निघून जाईल. ’
अशी अनेक कडवट बोलणी माझ्या मनात गुंजात रहातात. आज प्रत्येकाला एक तृतीयांश वाटणीत सगळा वाटा घेतलाय भावांनी. तो चौथा, जो आईसाठी पाहिला होता, तो कुठेच उरला नाही आता.
आईचा चेहरा डोळ्यापुढे येतोय. ती असताना, तिच्यासमोर कुणी माझा हिस्सा घेतला असता, तर त्याची काय परिस्थिती झाली असती. जेव्हा ती दूध आटवून मावा मिठाई बनवायची, तेव्हा माझ्या वाटणीची कुलपात ठेवली जायची कारण मी अभ्यासात गुंतलेलो असायचो.
गाता काळाच्या आठवणी येता येता अनेकदा हात फोनपाशी गेला. वाटलं, तिघा भावांना विचारावं, या वटणीत मी कुठे आहे?’ पण धीर झाला नाही. वर असलेला आईचा फोटो दिसतो. टी म्हणत असते, ‘ मी तुला खूप दिलाय बेटा. पहिला मायेचा वर्षाव तुझ्यावर केलाय. तूच तर मला मातृत्वाच्या सुखाची जाणीव करून दिलीस. मी तर आहे ना तुझ्याबरोबर!’
‘त्यांना पैशाची गरज आहे. ते फार शिकलेले नाहीत. ’
‘ते शहाणे नाहीत. समजदार नाहीत. तू तुझ्या हुशारीने पैसे कमावशील. ’
‘ते तुझे धाकटे भाऊ आहेत. त्यावेळी वाटणी रोज होत होती. त्यावेळी तुला जास्त प्रेम, माया मिळत होती. त्यावेळी त्यांनीही प्रश्न विचारले होते. त्यांनाही उत्तर देऊ शकले आणि आता तुलाही… एक रत्तीभर, टोला, मासा, काही तरी तुझ्यासाठी जास्तीचं होतंच ना!’
आईचा तो हात, जो मोठ्याच्या डोक्यावर आधी ठेवला जायचा, तोच हात विदेश गमनांनंतर हजारो मैलांवरून आशीर्वाद देत असायचा. तिचा तो हात आजदेखील माझ्या डोक्यावर आहे. त्या हाताचा स्पर्श माझ्या केसविरहित, टक्कल पडलेल्या डोक्यावर जाणवतो. मोठ्या मुलाच्या नुसतं नाव घेण्यानेही तिच्या चेहरा दुप्पट प्रकाशमान व्हायचा. ‘आज सगळे भाऊ समान खूश आहेत. तर तू तीनच्या खुशीत साथ दे. आज सगळ्यांना आपला योगी हक्क मिळाला आहे.
वाटणी तर पैशांची झाली होती. माझ्यापाशी गेल्या अनेक वर्षांपासून जे होतं, ते आजही सुरक्षित आहे. माझा हिस्सा पूर्ण. एकास एक. त्यात वाटणी नाहीच. मी वर बघितलं. आईचा चेहरा जरा जास्तच हसरा दिसत होता.
भावांना मी फोन लावलाच.. पण हे सांगण्यासाठी की तुमच्या निर्णयाने मी खूप खूश आहे.
– समाप्त –
मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
दूरभाष – 001 + 647 213 1817 ईमेल – hansadeep8@gmail.com
मराठी भावानुवाद : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






