श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ हरवलेला महिना आणि सापडलेलं संतुलन.. – लेखिका : तृष्णा (रानू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

एकदा काय झालं…

आकाशात सूर्य आणि चंद्र यांच्यात एक शांत पण महत्वाची स्पर्धा चालू होती.

दोघेही आपापल्या मार्गाने जग चालवत होते…

सूर्य म्हणाला,

“मी ऋतू ठरवतो… उन्हाळा, पावसाळा, हिवाळा… माझ्यामुळेच पृथ्वीवर जीवनाचं चक्र चालतं. ”

चंद्र हसून म्हणाला,

“आणि मी वेळ मोजतो… अमावस्या, पौर्णिमा, सण, व्रत… लोकांच्या भावना माझ्याशी जोडलेल्या आहेत. ”

– – दोघंही बरोबर होते… पण एक समस्या हळूहळू वाढत होती.

गोंधळाची सुरुवात…

चंद्राच्या वर्षात 354 दिवस होते,

आणि सूर्याच्या वर्षात 365 दिवस.

– – दरवर्षी 11 दिवसांचा फरक वाढत गेला…

सुरुवातीला कोणी लक्ष दिलं नाही,

पण काही वर्षांनी लोकांना जाणवायला लागलं—

– – दिवाळी कधी उन्हाळ्यात येऊ लागली

– – होळीचा ऋतू बदलायला लागला

– – सण आणि ऋतू यांचा ताळमेळ बिघडायला लागला

– – – जगात एक अदृश्य गोंधळ निर्माण झाला…

एक नकोसा महिना– 

या गोंधळातून एक अतिरिक्त महिना निर्माण झाला…

पण त्याला कोणी स्वीकारायला तयार नव्हतं.

लोक म्हणाले—

“तू कोण? तुला नाव नाही… स्थान नाही… तुझ्यात कोणताही सण नाही…”

तो महिना एकटा पडला…

त्याला “मलमास” म्हणत दुर्लक्षित केलं जाऊ लागलं.

तो दु:खी झाला… आणि थेट देवांकडे गेला.

देवाची करुणा

– – तो महिना देवाकडे गेला आणि म्हणाला—

“माझं अस्तित्व का आहे… जर कोणी मला मानतच नाही?”

देव हसले… आणि म्हणाले—

“तू विशेष आहेस… कारण तू संतुलन आणतोस.

तुझ्यामुळेच वेळ पुन्हा योग्य मार्गावर येते. ”

आणि त्यांनी त्या महिन्याला आपलं नाव दिलं—

पुरुषोत्तम मास

त्या दिवसापासून…

जो महिना एकेकाळी नाकारला गेला होता,

तोच सर्वात पवित्र मानला जाऊ लागला.

विज्ञानाची गोष्ट

ही कथा आपल्याला भावना शिकवते…

पण त्यामागे एक अचूक विज्ञान आहे.

पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात फिरते

चंद्र पृथ्वीभोवती 354 दिवसात त्याचे 12 महिने पूर्ण करतो

– – दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो.. हा फरक साचत जातो…

.. आणि साधारण 2. 5 ते 3 वर्षांत तो एक पूर्ण महिना होतो

म्हणून—

– – हा “अधिक मास” calendar मध्ये जोडला जातो

.. आणि सण व ऋतू पुन्हा संतुलित होतात

धार्मिक महत्त्व

अधिक मास आपल्याला एक वेगळी शिकवण देतो—

– – जीवनात जे “extra” वाटतं… तेच कधी कधी सर्वात महत्त्वाचं असतं

– – हा महिना फक्त वेळेचा भाग नाही… तर *आत्मशुद्धीचा काळ* आहे

या काळात माणूस जाणीवपूर्वक थांबतो…

बाहेरच्या गडबडीपासून दूर जाऊन… स्वतःकडे वळतो…

– – जप आणि नामस्मरण केलं जातं —

भगवंताचं नाव घेताना मन हळूहळू स्थिर होतं

– – व्रत आणि उपवास पाळले जातात —

शरीरावर नियंत्रण ठेवताना मनही शिस्तीत येतं

– – दान आणि सेवा केली जाते —

कारण या काळात दिलेलं दान केवळ इतरांसाठी नसतं…

तर आपल्या मनालाही हलकं करतं

– – धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं —

जेणेकरून विचार अधिक स्वच्छ आणि सकारात्मक होतील

आणि म्हणूनच—

लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, मोठे शुभ समारंभ टाळले जातात

हा काळ “नवं काही सुरू करण्याचा” नसून…

आधी स्वतःला समजून घेण्याचा आणि घडवण्याचा असतो

कारण…

आयुष्याच्या या सतत चालणाऱ्या प्रवासात,

“अधिक मास” म्हणजे एक छोटासा विसावा असतो…

— — असा एक थांबा…

जिथे आपण धावणं थोडं थांबवतो,

पण थांबतो ते हरण्यासाठी नाही…

— — तर स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी…

नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी…

— — जेणेकरून पुढचा प्रवास

अधिक स्पष्ट… अधिक मजबूत… आणि अधिक सुंदर होईल…

एक वेगळी जाणीव…

कदाचित… आपल्या आयुष्यातला “अधिक मास” म्हणजेच तो काळ…

ज्याला आपण टाळतो…पण जो आपली स्वतःशी भेट घडवतो…

कधी कधी आयुष्यातही असा “अधिक मास” येतो…

सगळं थांबल्यासारखं वाटतं…

पण खरं तर… तोच काळ आपल्याला आतून घडवत असतो…

कुणीतरी खूप सुंदर म्हटलंय—

“Sometimes stopping is better to bounce back hard…”

आणि खरंच…

— — “कधी कधी थांबणं म्हणजे मागे पडणं नसतं…

थांबण्यातही एक वेगळी ताकद असते…

— — आणि ही थांबलेली पावलं हरवत नाहीत…

ती फक्त उंच भरारीसाठी तयारी करत असतात…”

शेवटची जाणीव

अधिक मास आपल्याला सांगतो—

— — — “जी गोष्ट सुरुवातीला नकोशी वाटते…

.. तीच कधी कधी जीवनात संतुलन आणणारी ठरते…”

लेखिका : तृष्णा (रानू)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted