सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “लाॅकडाऊन” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

पुस्तकाचे नाव – ‘लाॅकडाऊन’

लेखिका – संध्या साठे-जोशी

बी-१०९, तुलसी सोसायटी, मार्कंडी, या. चिपळूण, जि.रत्नागिरी

पुस्तकाचा प्रकार – कथासंग्रह

दिलिप राज प्रकाशन प्रा.लि.

प्रथमावृत्ती १५ आॅक्टोबर २०२१

लेखिकेने या पुस्तकात लाॅकडाऊन आणि कोरोना काळाशी संबंधित अशा अनेक कथा लिहिल्या आहेत.साधारणपणे २०२० च्या मार्चमध्ये कोरोना भारतात आला. जास्तकरून पुणे, मुंबई या भागात.. परदेशात आपल्या नातेवाईकांकडे गेलेल्या आई-वडील, किंवा जवळचे नातेवाईक यांना या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले.त्या गोष्टी चा अनुभव आम्हाला ही घ्यावा लागला, कारण आम्ही दोघे तेव्हा दुबई हून आलो होतो.त्यामुळे कथेतील काही अनुभव आम्ही घेतले होते.

कोकणातील मालघर सारख्या लहान खेड्यात राहून लेखिका तेथील रसरशीत आयुष्य अनुभवते आहे.तेथील अनुभव कथेच्या रुपात वाचायला खूपच आवडले.

२३ कथांचा हा संग्रह आहे.त्यांत कोकणातील चालीरीती,उत्सव, जीवनशैली या सर्व गोष्टी दिसून येतात.’स्पर्शतृष्णा’, मातृत्व’ती आई होती म्हणुनी’यासारख्या कथा मनाला स्पर्शून जातात.’कोरोनाची गोष्ट’ वाचताना दोन वर्षांपूर्वी आपण जे पाहिले,अनुभवले ते अगदी डोळ्यासमोर उभे राहते.

आत्ता च्या काळाशी सुसंगत आणि ओघवत्या भाषेत लिहिलेल्या कथा वाचायला खूप छान वाटले..

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments