श्री सुहास रघुनाथ पंडित

? २० फेब्रुवारी – संपादकीय  ?

श्रीकांत ग. माजगावकर :

श्री.ग.माजगावकर, शिरूभाऊ, माणूसकार

श्रीगमा अशा विविध नावांनी परिचित असलेले माजगावकर हे सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,अशा सर्व प्रकारचे लेखन करणारे समर्थ लेखक होते.स्वतःच्या लेखनाबरोबरच लेखक घडवण्याचे व त्यांना प्रकाशात आणण्याचे कामही त्यांनी केले.राजहंस ही प्रसिद्ध प्रकाशन संस्था त्यांचीच.माणूस हे मासिककाही त्यांनी 01/06/1961 ला सुरू केले. हे मासिक वाचण्याची लोकांना इतकी ओढ होती की मासिकाचे रूपांतर साप्ताहिकात करावे लागले.’माणूस’ चे वैशिष्ट्य असे यात  की सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना मते  मांडण्याची मुभा होती.ध्यास असलेले लेखक तयार करण्याचे व्यासपीठ असेच त्याचे वर्णन करावे लागेल.

आणीबाणीच्या काळात याच साप्ताहिकातून जनतेचा आवाज उठवला गेला होता.हे साप्ताहिक नंतर 1986 मध्ये बंद करण्यात आले.

श्री.ग.माजगावकर यांनी निर्माणपर्व , बलसागर आणि श्रीग्रामायन या तीन पुस्तकांचे लेखन केले आहे.याशिवाय वृत्तपत्रीय लेखन, संपादन, नवोदित लेखक, वार्ताहर यांना मार्गदर्शन करून लेखकांची नवी पिढी घडवण्याचे महत्वाचे काम केले आहे.    

त्यांना ॲग्रोफाॅरेस्ट्री व उत्कृष्ट संपादक हे पुरस्कार बहाल करण्यात आले.तसेच त्यांच्या नावे श्रीगमा पुरस्कार 2019 मध्ये सुरू करण्यात आला असून तो त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापर्यंत म्हणजे  2029 पर्यंत देण्यात येणार आहे.

लेखन आणि संपादन समर्थपणे पेलणा-या श्री.ग. यांचे वयाच्य  68 व्या वर्षी 1997 मध्ये निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया, दै.प्रभात.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments