मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेरणा… लेखक : शरद कुलकर्णी ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

??

☆ प्रेरणा… लेखक : शरद कुलकर्णी ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

आम्ही छान मराठीत गप्पा मारत चाललो होतो. निनादने याआधी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक केला होता. त्यामुळे त्यालाही हा रस्ता माहितीचा होता. आम्ही गप्पा मारत चालत असतानाच पुढे उजव्या बाजूला एक भारतीय ट्रेकर हळूहळू चालताना दिसला. साधारण पंचावन्न वयाचा, काहीसा स्थूल, पाठीवर छोटी सॅक, कमरेला एक पाऊच, बरोबर एक पोर्टर. त्याच्या खांद्यावर स्वतःच्या बॅगेसहित या माणसाची मोठी डफलबॅग. तो त्या माणसाच्याच चालीने हळू हळू चालत होता.

आमच्या मराठीतील चाललेल्या गप्पा ऐकून तो माणूस थोडा थबकला आणि वळून म्हणाला.

“ पुण्याचे का? ” 

मी म्हणालो “नाही”.

मी ठाण्याचा आणि हा निनाद नाशिकचा.

महाराष्ट्रीयन आहोत. हे ऐकून त्याला खूप आनंद झाला.

बाहेरच्या कोणत्याही अनोख्या देशात किंवा अनोळखी ठिकाणी मराठी बोलणारा ट्रॅकर असला की तो पुण्याचाच असतो असा समज बऱ्यापैकी आहे. आणि तो काही अंशी खराही आहे.

“मी पण महाराष्ट्रीयन… इंदोरला असतो. “

मी म्हटलं “अरे वा”… एवरेस्ट बेस कॅम्प का?

“नाही” मी “थ्री पासचा” ट्रेक करायला चाललोय. “

त्याचे एकंदर वय आणि त्याचं शरीराचं आकारमान पाहून मला त्याचं कौतुक वाटलं. त्याच्या एकूण शरीरयष्टीकडे पाहून मला वाटत होतं की, याला हे जमेल की नाही. पण त्याचा आत्मविश्वास दांडगा होता. फक्त एक पोर्टर गाईड घेऊन तो सोलो “थ्री पास” करायला निघाला होता.

“थ्री पास” हा ट्रेक एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षाही अवघड आहे. मला अजूनही शंका होती.

मी तरीही त्याचं कौतुक केलं.

“अरे वा तुम्ही या वयात पण “थ्री पास” करत आहात आणि तेही सोलो.. ?

नाही म्हटलं तरी हा वीस-बावीस दिवसाचा ट्रेक होता.

“25 दिवस लागले तरीही चालेल. मी हा ट्रेक पूर्ण करण्याच्या उद्देशानेच पूर्ण महिन्याची सुट्टी घेऊन आलोय. ” 

मला त्याचं अजून कौतुक वाटलं. मी त्याचं नाव विचारलं.

“मी पिंगळे”

मी थोडं थांबून विचारलं 

“तुम्ही काय करता”

“मी आयआयटीमध्ये प्रोफेसर आहे इंदोरला” आणि माझे आयआयटीचे क्लासेस पण आहेत. और मेरा लडका इंजिनियर है. बेंगलोरमे सर्व्हिस करता है.. ”

अर्ध मराठी आणि हिंदी बोलण्यावरून तो पक्का इंदोरचा महाराष्ट्रीयन वाटतं होता.

चालत असताना त्याला बोलायला जड जात होतं. थोडी धाप ही लागत होती. त्या अरुंद वाटेवरून खेचर आणि इतर पोर्टर, गिर्यारोहक ये जा करीत होते..

मी आणि निनादने त्यांना थोडं बाजूला थांबवलं. आता माझी उत्सुकता वाढत होती.

निनाद बाजूला शांतपणे उभा राहून आमच्यातील संवाद लक्षपूर्वक ऐकत होता.

आता एका जागी थांबल्यामुळं त्याला बोलायलाही सोपं वाटू लागलं. एकीकडे त्याच्याबद्दल कौतुक पण वाटत होतं आणि काळजीही वाटत होती.

शेवटी मी विचारलंच…

“एवढा अवघड ट्रेक का निवडला. त्याऐवजी नुसता EBC करायचा ”

त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला..

“ EBC तो सब करते है. मुझे कुछ चॅलेंजिंग करना था.. ”

और इसके साथमे मेरा EBC भी हो जायेगा..

परत तो एक क्षण थांबला आणि म्हणाला.

“ये मेरा बकेट लीस्टका ट्रेक था. ”

मी म्हटलं “अरे व्वा.. येतो बहोत अच्छा है. दुनियाके हर ट्रेकरके बकेट लिस्टमे ये EBC ट्रेक होताही है. ”

एक दीर्घ उसासा घेऊन लगेच म्हणाला…

“वो क्या है, मेरी वाईफ को कॅन्सर है. सेकंड स्टेज…”

मी एकदम स्तब्ध झालो. माझ्या मनात प्रश्न पडला. यांची पत्नी कॅन्सरने आजारी असूनही हा गृहस्थ एव्हढा अवघड ट्रेक का करतोय.. ?

माझ्या तोंडून निघालं. “ओह.. सॉरी…”

“कोई बात नही. मेरे वाईफ के लियेही मैं ये ट्रेक कर रहा हूँ…”

उसनेही मुझे जबरदस्ती ये ट्रेक पर भेजा. बोली तुम्हारा बकेट लीस्टका ट्रेक है, सपना है… वो पुरा करके आओ. तुम वापीस आने तक मुझे कुछ नही होगा”

धन्य आहे त्या महिलेची. एव्हढा जीवघेणा आजार असूनही नवऱ्याच्या स्वप्नाची काळजी ती करतेय. एव्हढ बळ येतं कुठून…? मी मनातच विचार करीत होतो.

आजूबाजूनी येणारे जाणारे ट्रेकर्स आम्हाला पाहून शुभेच्छा देत होते. आम्हीही ट्रेक पूर्ण करून येणाऱ्यांचे अभिनंदन करीत होतो. ट्रेक रूटवर असा संवाद नेहमीच एकमेकांना बळ देत असतो. थकून येणाऱ्यांना परत उभारी मिळत जाते.

आम्हालाही आता उशीर होत होता. जमेल तर जास्त अंतर आज कापायचं होतं. निनादची पण चुळबुळ चालू होती. आम्ही परत गप्पा मारत हळू हळू चालायला सुरवात केली. त्याने पण आमच्या बरोबर चालायला सुरुवात केली.

त्याला खूप बोलायचं होतं. चालतंच त्याने बोलायला सुरुवात केली…

“मेरी पत्नीको मेरा ट्रेकिंगका पॅशन मालूम है. कुछदिन पहले उन्होने मेरे हातमे एक बुक थमाई… बोली पढो इसे.. मैने दो बार पढी है. “और उनकी डॉक्युमेण्ट्रीभी देखी है …”

माझं कुतूहल हळूहळू वाढतंच होतं. मी माझी चाल हळू केली. त्याच्या बरोबरीने चालू लागलो.

“मैने वो बुक दो दो बार पढी… और डॉक्युमेंटरीभी चार चार बार देखी. और उससे प्रेरणा लेके मैं ट्रेक पे चला हूँ. ”

माझ्या बरोबरचा निनादने शेवटी त्याला विचारलं.

“कोनसा बुक है वो…”

“वो कोई महाराष्ट्रके मुंबईसे कुलकर्णी करके है ”

मी न राहवून म्हटलं “कहीं शरद कुलकर्णी तो नही.. ”

तो लगेच उत्तरला “हाँ वही… जिनकी पत्नीका देहांत एवरेस्टपर हुआ था. ” 

मी आणि निनाद दोघेही स्तब्ध झालो.

पिंगळे पुढे बोलतच होता..

“मैं ये ट्रेक पुरा करुंगा और मेरे वाईफ को समर्पित करुंगा…

उसे बहुत ख़ुशी होगी. ”

आम्ही दोघंही चालता चालता थांबलो.

पिंगळेही थांबले. त्यांचा पोर्टरही पुढे जाऊन आमची वाट पहात थांबला.

निनादला आता राहवलं नाही.

तो हातातला ट्रेकिंग पोल माझ्या दिशेने करीत पिंगळेना म्हणाला.

“तुम्हाला माहीत आहेत का हे कोण आहेत. ? ”

माझ्याकडे शोधक नजरेने न्याहाळत पिंगळे उत्तरले.

“ नाही…याद नही येत. पण कोठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ”

“ हे शरद कुलकर्णी आहेत ”

आश्चर्याने माझ्याकडे पहात पिंगळे उदगारले.

“ये शरद कुलकर्णी”.. ??

अंजली मॅडमके पती.. ??

जिन्होने वो बुक लिखा है वो.. ?

शेवटी माझ्याच्याने राहवले नाही. त्यांच्याकडे वळत मी सांगितलं.

“हो, मीच तो शरद कुलकर्णी. ”

पिंगळेचा विश्वास बसत नव्हता. परत परत ते विचारत होते. “वो आपही है…? “

… बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो माझ्या पायावर पडायच्या आत मी त्याला सावरले आणि माझ्या गळ्याशी धरले. सारखे त्याच्या तोंडातून तेच शब्द बाहेर पडत होते.

“यहाँ आनेसे पहले.. मैने मॅडमकी फिल्म… चार- चार बार देखी…बार – बार बुक पढी. और निकल पढा.. ”

मैं बहुत भाग्यशाली हूँ…आज मेरी लिये बहुत बढा दिन है.. जिससे प्रेरणा लेके चला हूँ, वह खुद मेरे सामने यहाँ खडा है.. वह भी परदेशमे… मैं मेरे पत्नी को लेके आपसे मिलने जरूर आऊंगा…”

… त्याला झालेल्या अत्यानंदामुळे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.

मी त्यांना म्हटलं “अहो तुमच्यासारखे लोक एका चांगल्या उद्देशाने, अशा बिकट परिस्थितीत, तेही या उतार वयात ट्रेक करीत आहात. हे आमच्यासाठीपण खूप प्रेरणादायी आहे. ”

मी त्याला आपल्या बाहुपशात घेऊन थोडं शांत केलं. त्यांना पुढील ट्रेक साठी काही उपयुक्त सूचना दिल्या. शुभेच्छा दिल्या. आणि दोघां उभयंतांना मुंबई भेटीचं आमंत्रण दिलं. आणि पुढील मुक्कामासाठी निघालो.

वाटेतील रोडोडेंड्रॉन गुलाबी फुले आता आणखीन गडद दिसू लागली. त्याचा हलकासा दरवळणारा सुगंध हळुवारपणे मन प्रफुल्लित करित होता. माझं मलाच छान वाटू लागलं.

… तसा मी काही मुळात लेखक नाही. पण आज पहिल्यांदाच माझ्या हातून एक चांगलं पुस्तक लिहून झाल्याचं समाधान वाटलं… अतिशय आनंदायी आणि आत्मसमाधान देणारा अनुभव होता तो…

खरं तर हे पुस्तक लिहायचा मी खूप कंटाळा केला होता.

… पण आता वाटतंय या पुस्तकाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काही लोकांच्या जीवनात खरीच प्रेरणा मिळतेय… आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आता घेतोय.

लेखक : शरद कुलकर्णी

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मनावर कोरलेला शिलालेख…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मनावर कोरलेला शिलालेख…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आदरणीय डॉ. A. P. J. अब्दुल कलाम सर, माझे रोल मॉडेल, आदर्श व्यक्तिमत्व, माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, सच्च्या दिलाचे माणूस…!

त्यांच्यावर प्रेम करत नाही, असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही…!

त्यांना एकदा तरी भेटून त्यांच्या पायावर नतमस्तक व्हावे…

आयुष्यातल्या काही इच्छांपैकी ही एक इच्छा…!

… पण आभाळाएवढा माणूस, त्यांच्या पायापर्यंत सुद्धा पोहोचण्यासाठी माझे हात तोकडे पडले.

आदरणीय रतनजी टाटा सर यांच्याबाबतीतही असेच घडले. त्यांच्या नावे पुरस्कार मिळाला, परंतु त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही.

आयुष्यातल्या या काही जखमा.. कधीही भरून न येणाऱ्या…!

यांची वैयक्तिक भेट आता आयुष्यात कधीही शक्य नाही, परंतु त्यांचे विचार आणि पुस्तकं यांनाच गुरु मानून मी तिथे नतमस्तक होतो 

… पण अशी माणसं कुठेही जात नाहीत, शतकांनुशतके ती अमर असतात…!!!

असो…

“लेवा भ्रातृ मंडळ, पुणे” या संस्थेकडून एके दिवशी मला फोन आला, ‘मी पुरुषोत्तम पिंपळे बोलतो, आमच्याकडे एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपले बुके आम्ही विकत घेऊ इच्छितो. ‘ 

भीक मागणाऱ्या लोकांनी भीक मागणे सोडून काम करावे, सन्मानाने जगावे, यासाठी आम्ही एक रोजगार केंद्र सुरू केले आहे. तिथे आम्ही विविध वस्तू बनवतो आणि त्याच्या विक्रीतून तेथील सर्व खर्च भागवतो. मोत्यांचे बुके हे त्यातलेच एक प्रॉडक्ट…

आनंदाने मी बुके पाठवून दिले.

पुन्हा एके दिवशी त्यांचा फोन आला, ‘ पिंपळे सर म्हणाले, ‘आमच्या कार्यक्रमात आम्ही तुमचा विशेष सन्मान करू इच्छितो, अमुक दिवशी अमुक वेळेला यावे. ‘ 

त्यांनी बोलावलेल्या दिवशी न टाळता येण्यासारखी बरीच कामं होती, मी त्यांना नम्रपणे माझी अडचण सांगितली, आणि पुढील वेळेला बघूया कधीतरी, पुढील वेळी नक्की येतो असं म्हणालो.

यावर ते म्हणाले, ‘ अहो डॉक्टर, कार्यक्रमाला डॉ. A. P. J. M. J. सलीम शेख सर येत आहेत, त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार देत आहोत. ‘

दोन सेकंदासाठी मनातल्या मनात प्रचंड लाटा उसळल्या.

डॉ. सलीम शेख सर म्हणजे आदरणीय कलाम सरांचे नातू (भावाच्या मुलाचे चिरंजीव), Dr. APJ Abdul Kalam International Foundation चे संस्थापक, रामेश्वरम येथील Dr. A. P. J. Abdul Kalam Mission of Life Gallery चे डायरेक्टर… आणखीही बरंच काही…!

… *आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय कलाम सरांच्या पवित्र, निर्मळ आणि शुद्ध सहवासाने पुनित झालेलं एक व्यक्तिमत्व…!!! *

.. अत्तराच्या दुकानात बसलेला माणूसही सुगंधी होऊन जातो…!

डॉ सलीम शेख सर यांना भेटून, आयुष्यात हरवलेला आदरणीय कलाम सरांचा सुवास आणि सहवास अशा रूपाने का होईना, पण मिळेल… सरांची भेट, मनाच्या गाभाऱ्यात झालेल्या जखमेवर हळुवार फुंकर तरी मारून जाईल…

या विचाराने सर्वच्या सर्व कामं बाजूला ठेवून गेलो.

मुख्य कार्यक्रमाआधी डॉ. सलीम सरांशी भेट झाली, काम समजल्यानंतर ते सद्गदित झाले, दूर उभ्या असलेल्या मला त्यांनी जवळ बोलावलं, छातीशी लावलं, पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली, खांद्यावर हात ठेवून तुझ्यासोबत आहे म्हणाले…!

हेच ते हात असतील ना? जे कधीतरी इवले होते, आणि या हातांना आदरणीय कलाम सरांचा सुद्धा स्पर्श झाला असेल…?

.. या विचाराने मी रोमांचित झालो, मला काय वाटलं असेल, हे मी शब्दात सांगूच शकत नाही…

भेटीचा हा सुगंध मी श्वासात भरून घेतला, डोळ्यात साठवून घेतला…

मुख्य कार्यक्रम सुरू झाला, सरांच्या हस्ते माझा विशेष सन्मान झाला. सरांचे स्वागत करताना आयोजकांनी आमचा बुके सरांना भेट म्हणून दिला.

डॉ. A. P. J. M. J. सलीम शेख सर यांच्या हाती तो बुके पाहून मी पुन्हा रोमांचित झालो, हृदयातली धडधड वाढली…

आमच्या थरथरत्या वृद्ध अपंग हातांनी हे बुके बनवले होते, तेच बुके आज सरांच्या हाती होते, याच हातांना आदरणीय कलाम सरांचा स्पर्श झाला होता… आता श्वासाचा वेग वाढला…

भर सभेत, व्यासपीठावर, मी पुढे होऊन हा क्षण सरांच्या जवळ जाऊन कॅमेऱ्यात टिपला…

– – खरंतर मी प्रोटोकॉल मोडला होता, पण हे समजायला मी भानावर होतोच कुठं…???

डॉ सलीम सर गालातल्या गालात मंद हसले…

त्यांना माहीत होतं, निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्ताच्या हातून अनावधानाने काही चूक घडली तर ती चूक नसते…!

आदरणीय कलाम सरांचा मी भक्त होतो हे त्यांना माहीत होते.

शक्यतो मोठी माणसं कार्यक्रमात मिळालेले बुके, शाल किंवा नारळ अशा गोष्टी घेऊन जात नाहीत, असा अनुभव आहे.

.. कार्यक्रम संपल्यानंतर मी सरांना हात जोडून म्हणालो, सर प्लीज हा बुके आपण घेऊन गेलात, तर आम्ही सर्वजण आपल्या ऋणात राहू…

मंद हसत ते म्हणाले, ‘ Offcourse, इतका सुंदर बुके मी इथे कसा ठेवेन? मी माझ्या ड्रायव्हर कडे आधीच तो दिला आहे, आणि त्यांनी तो व्यवस्थित गाडीत ठेवला आहे. मी तो घरी घेऊन जाणार आहे आणि चांगल्या ठिकाणी, इतरांना दिसेल अशा जागी ठेवणार आहे. ‘ ते सहज बोलून गेले.

… पण माझ्या डोळ्यात पाणी आलं…

माजी राष्ट्रपती, माझे दैवत, आदरणीय कलाम सर, यांच्या मूळ गावी, मूळ घरात, ज्या घराला आदरणीय कलाम सरांचा सहवास लाभला आहे, घर नव्हे जे एक मंदिर आहे, तिथे हा बुके सन्मानाने जाईल…

मी शहारलो…

भीक मागणे सोडून काम करू लागलेल्या आमच्या लोकांचा हा खऱ्या अर्थाने झालेला सन्मान होता…!

सर पुढील कार्यक्रमासाठी निघाले, भरलेल्या डोळ्यांनी सरांना निरोप दिला.

मला डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नव्हतं… वाटलं, ज्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलं, त्या डोळ्यातल्या आठवणी हे अश्रू पुसून टाकतील…

पण नाही… दगडात कोरलेले शिलालेख सहजासहजी पुसले जात नाहीत.

सरांची भेट आणि अप्रत्यक्षरीत्या झालेला आदरणीय कलाम सरांचा स्पर्श आणि सहवास हा मनावर कोरलेला एक शिलालेख आहे, तो कधीही पुसला जाणार नाही.

… हा शिलालेख मी आयुष्यभर मिरवत राहीन…!!!

श्री पुरुषोत्तम पिंपळे सर आणि समस्त लेवा भ्रातृ मंडळ यांचा मी मनापासून ऋणी आहे…!!!

अभिजीत 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”एक स्वस्त छंद..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “एक स्वस्त छंद.. ☆ संध्या बेडेकर ☆

एक स्वस्त छंद – – – 

 – – – ALL INDIA RADIO / BBC…

प्रत्येक परिवारात/ मोहल्ल्यात एक BBC /AIR news reader व्यक्ती असतेच. परिवारातील/ मोहल्ल्यातील सर्वांची सर्व माहिती घेणे. मग ती सर्वांना सांगणे.

एखादी बातमी चांगली / वाईट कोणाच्या कानावर पडली तर लगेचच…

त्यांना विचारूया.. म्हणजे BBC ला 

खर काय ते कळेल… अस सहज लोकांच्या तोंडून निघत.

ALL INDIA RADIO वर बातम्या ऐकल्या की देश- विदेश खेलकूद, क्राइम, सोने-चांदीचे भाव, भाजी भावातील चढ-उतार सर्व कळत. BREAKING NEWS च्या नावाखाली अनेक बातम्या कानावर पडतात. कोण कोणाबरोबर पळून गेली, बाॅलीवूड, टाॅलीवूड च्या सर्व बातम्या किती खर्या किती खोट्या हे ऐकणार्याला आपल्या बुद्धीचा वापर करून ठरवायच असत. त्याकडे दुर्लक्ष करायच की लक्षात ठेवायच. हे ही ठरवायच असत.

जर चार बहीण भावांचा एक परिवार असेल तर त्यांच्या घरच्या, याच्या माहेरच्या, तिच्या सासरच्या, त्यांच्या मुलांच्या, जावयांच्या, चूलत, मावस भावडांचे परिवारही असतातच की. इकडच्या तिकडच्या अनेक बातम्या असतातच की.

मग ही BBC news reader आपल्या स्वभावानुसार, आपल्या आवडत्या नावडत्या लोकांना त्या बातम्या आधी एकत्र करणार, मग सांगणार. आवडत्या आणि नावडत्या लोकांना बातम्या सांगायची पद्धत, बातम्यांचा क्रम ब्रेकिंग न्युज वेगवेगळी असते. कोणाला काय सांगायच? काय नाही? याचा विचार करण्या एवढे हे हुशार असतात. कोणाचे कान भरायचे. याचा अभ्यास छान केलेला असतो. कोण कच्च्या कानाचे आहेत? हे सर्व लक्षात ठेवाव लागत.

मला असं कळलं… खर की खोट माहित नाही… अस म्हणून एखादी फुलझडी सोडण सहज जमत त्याना.

मी फक्त तुम्हाला सांगतेय हं! कोणाला सांगू नका. हे वाक्य तर हमखास सर्वांनाच कधी न कधी म्हंटलेलच असत.

अशा लोकांचा मुख्य टाईम पास हाच असतो. आता फोन असल्यामुळे हे काम सोप्प झालय. आणि वेळ छान जातो.. इकडची बातमी तिकडे, तिकडची इकडे. यासाठी खूप मोठी डिग्री, ज्ञान लागत नाही. फक्त वेळ द्यावा लागतो.

एखाद्या/ एखादीला फोन करायच्या आधी त्यांच होमवर्क झालेले असत. कारण सांगितलेल्या गोष्टीचा प्रभाव पडायला पाहिजे ना. तरच तर उद्देश्य सफल होतो. त्या बातमीत किती मसाला टाकायचा, त्याला किती चरफरीत करायचे की गोड पदार्थ करायच हे फोन रिसीव करणार्या व्यक्ती बरोबर त्यांचे संबंध कसे आहेत? यावर अवलंबून असत.

कोणाच लग्न मोडल. कोणाच सूनेबरोबर पटत नाही, कोणाला दारूच व्यसन आहे.

आता व्यसनची डिग्री कमी जास्त करणे हे त्यांच्या सांगण्यावर, आवाजावर अवलंबून असत. Voice modulation जमते त्यांना. कधी कधी एखादी बातमी सांगताना असूरी आनंद ही त्यांच्या आवाजात जाणवतो. म्हणजे तसे ते हुशार असतात.

ही एक कला आहे सर्वांना जमतच अस नाही. त्यासाठी तो Interest, practice, रोज चार तास फोन करायची हौस असावी लागते. ऐर्यागैर्याचे काम नाही ते.

आपल्या घरापेक्षा दुसर्यांच्या घरात जास्त interest असावा लागतो.

मधून मधून स्वतः ची श्रीमंती, स्वतः ची हुशारी बोलायला विसरत नाहीत.. खूप बोलताना आपल्या घरच्या काही गोष्टी पण सांगून टाकतात. आणि स्वःतच मनोरंजनाचे पात्र बनतात.

काय आहे… रोज डेटा फ्री मिळतोच. मग स्वस्तातला हा छंद छान आहे.

उरलेला वेळ You tube च्या बातम्या, whats app वर आलेले मेसेजेस असतातच, ते forward करायचे. हा पण एक added छंद असतो.

हुशार माणसाला अशा लोकांशी सावधान रहाव लागत.

मला कधी कधी अशा लोकांच खूप कौतुक वाटत. किती वेळ, किती energy, खर्च करतात. त्यांचा फोन आला की लगेच लक्षात येत आज काही तरी विशेष ऐकायला मिळणार. त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो. आपल्याकडे किती वेळ आहे हे बघून फोन घ्यायचा की नाही हे ठरवायच असत.

AIR / BBC च्या बातम्या ऐकून आपण नेहमी बोअरच होतो अस नाही, कधी कभी मजाही येते नाही का?

खरतर ही अशी माणस आपल्या आयुष्यात रंग भरतात.. म्हणजे प्रयत्न करतात. मनोरंजन करतात.

शोधून बघा तुमच्या परिवारात / मोहल्ल्यातही अशी एखादी व्यक्ती आहे का?? …

थोडा डेटा… खूप मजा… छंद किती स्वस्त आहे. कष्ट नको… ज्ञान नको… पलंगावर पडल्या पडल्या वेळ कसा मस्त जातो…

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆

(तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं, “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना? एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द! _

इथून पुढे  

त्यानंतर मी विचार केला की, झोपेत असताना उशी तोंडावर दाबून गुदमरवून मारावं. यात रक्ताचा थेंबही सांडणार नाही आणि काही वायाही जाणार नाही. मी लिहिलं, “तो सावलीसारखा बेडजवळ गेला आणि त्याने सुती उशी त्या पात्राच्या तोंडावर जोरात दाबली… ” पण लगेच माझ्या मनात विचार आला, “अरेरे! ती उशी आणि त्याचं कव्हर तर अगदी नवीन आहे. माणूस वाचण्यासाठी हातपाय मारेल, तडफडेल, त्याने ते कव्हर फाटून जाईल किंवा खराब होईल. नको नको, उशी नको. ” उशीचा प्लॅनही फ्लॉप झाला. शेवटी मी ठरवलं की आपण स्वतः काही करायला नको, निसर्गावर किंवा नशिबावर सोडून देऊ. ‘अपघात’ दाखवू या. मी लिहिलं, “खुन्याने रात्रीच्या अंधारात त्याच्या कारचे ब्रेक निकामी केले. दुसऱ्या दिवशी तो कार घेऊन घाटातून जात असताना… ” पण लगेच माझ्या मनात पाझर फुटला, “अरे, पण घाटात गाडी चालवताना कारमध्ये त्याच्यासोबत त्याची बायको लहान मुलं किंवा एखादा निरपराध मित्र असेल तर? एकाच्या पापात बाकीच्या निष्पाप जीवांचा बळी का? कार दरीत कोसळली तर संपूर्ण कुटुंब संपून जाईल. ” माझ्या संवेदनशील मनाने कारचे ब्रेक पुन्हा जागेवर दुरुस्त केले. कथा पुन्हा शून्यावर आली!

दोन दिवस झाले होते. माझ्या वहीत खाडाखोड करून फक्त चार ओळ्या उरल्या होत्या, पण माझ्या डोक्यात मात्र चाळीस जिवंत माणसं इकडून तिकडे फिरत होती. मला रात्री झोपेतही तेच विचार यायचे. दोन दिवस सतत विचार करून माझं डोकं जाम झालं होतं. शेवटी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला, जी साहित्याची जाणकार होती. मी तिला माझी अडचण सांगितली, “अगं, तूच सांग, तुझ्या कथेत मर्डर कसा करतात ग लोक? मला जमतच नाहीये. ” ती फोनवर शांतपणे म्हणाली, “वेडी आहेस का तू? अगं, तो खून खराखुरा नसतो. ती फक्त एक काल्पनिक कथा असते. पात्रं काल्पनिक असतात. ” मी हताश होऊन म्हणाले, “मला माहिती आहे गं ते काल्पनिक असतं. पण जेव्हा मी लिहायला घेते, तेव्हा माझं मन त्या पात्रांना जिवंत समजतं. मला वाटतं मी खरोखरच कोणाचा तरी जीव घेतेय. ” माझं हे भाबडेपण ऐकून ती फोनवर पोट धरून हसायला लागली.

त्या रात्री मन हलकं करण्यासाठी मी टीव्ही चालू केला. एका वाहिनीवर गुन्हेगारीवर आधारित मालिका सुरू होती. त्यात एका माणसाने क्षणात खिशातून बंदूक काढली आणि समोरच्यावर गोळी झाडली. समोरचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला. मी दचकून रिमोटने टीव्ही लगेच बंद केला. मनात एकच प्रश्न आला, “हे पडद्यावर किंवा पुस्तकात इतकं सहज कसं दाखवतात? माणसाचा जीव घेणं इतकं सोपं असतं का? ” दुसऱ्या दिवशी सकाळी मी वर्तमानपत्र उघडलं. पहिल्याच पानावर मोठी बातमी होती, “जमिनीच्या किरकोळ वादातून सख्या भावाने केला भावाचा खून. ” पान उलटलं, तर दुसऱ्या पानावर बातमी होती, “मोबाईल गेमवरून झालेल्या भांडणातून मित्राने मित्राचा जीव घेतला. ” मी काही क्षण स्तब्ध झाले. वर्तमानपत्र हातातून गळून पडलं. कालपर्यंत ज्या विषयावर मी घरात विनोद करत होते, पती आणि मुलासोबत हसत होते, ते वास्तव किती भयानक, क्रूर आणि वेदनादायी आहे याची मला जाणीव झाली. समाजात माणसाच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे? किती सहजतेने हत्या आणि मर्डर होते.. मी तर माझ्या पायाखाली मुंगी पण मारू शकणार नाही.

आणि धडा धड दररोज मर्डर होतात आहे.

मी पुन्हा माझ्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि वही उघडली. या क्षणी माझ्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. मी ठरवलं, मी मर्डर मिस्ट्री लिहिणारच नाही. माझ्याकडून कोणाचा खून होणार नाही— अगदी कागदावरसुद्धा नाही! त्याऐवजी, मी पेन उचललं आणि एका वेगळ्याच कथेला सुरुवात केली. मी एका अशा लेखिकेची कथा लिहायला घेतली, जिला स्पर्धेसाठी मर्डर मिस्ट्री लिहायची असते, पण अत्यंत संवेदनशील मनामुळे हजार प्रयत्न करूनही तिच्याकडून कथेत कोणाचा खून होत नाही. ती कशी पात्रांना वाचवत राहते, याची ती एक हलकीफुलकी पण अंतर्मुख करणारी कथा होती.

स्पर्धेचा दिवस आला, मी माझी ती ‘वेगळी’ कथा पाठवून दिली. काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे माझ्या कथेला पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळाला नाही. कारण कथेच्या मुख्य अटीनुसार त्यात ‘मर्डर’ किंवा ‘रहस्य’ नव्हतंच. पण निकालपत्राच्या शेवटी परीक्षकांनी माझ्या कथेबद्दल विशेष नोंद म्हणून एक ओळ लिहिली होती. ती ओळ वाचून माझे डोळे भरून आले. तिथे लिहिलं होतं, “ही कथा कोणत्याही गुन्ह्याची किंवा रक्ताची नाही; तर ही एका अत्यंत संवेदनशील आणि जिवंत मनाची कथा आहे. लेखिकेचे विचार कौतुकास्पद आहेत. ” तो कागद हातात धरून मी बराच वेळ शांत बसून राहिले. तो पुरस्कारापेक्षाही मोठा सन्मान होता.

संध्याकाळी चहा पिताना नवरा हसत हसत म्हणाला, “चल काही हरकत नाही. यंदा नंबर नाही आला तर काय झालं? पुढच्या वर्षी नक्कीच प्रेमकथेची किंवा कौटुंबिक विषयावरची स्पर्धा असेल. तेव्हा बघू. ” मी चहाचा घोट घेतला आणि हसून म्हणाले, “हो… ते माझ्याकडून नक्कीच होईल. त्यात मी अव्वल येईन. ” त्याने डोळे मिचकावत पुन्हा विचारलं, “आणि मर्डर मिस्ट्री? ” मीही तितक्याच आत्मविश्वासाने आणि हसून उत्तर दिलं, “माझ्याकडून कागदावरसुद्धा मर्डर होत नाही आणि प्रत्यक्ष आयुष्यात तर प्रश्नच उद्भवत नाही! “

त्या दिवशी मला जगण्याचं आणि लेखनाचं एक खूप मोठं सत्य कळलं होतं. लेखक तो मोठा नाही, जो आपल्या लेखणीच्या बळावर सहज एखादं पात्र मारून टाकतो आणि क्रूरता निर्माण करतो. खरा लेखक तर तो असतो, ज्याच्या मनात आणि लेखणीत पात्रांना जिवंत ठेवण्याची ताकद असते, जे पात्र वाचकांच्या मनात घर करून राहतं. काही लोकांच्या हातात शस्त्र असतं, तर काही लोकांच्या हातात पेन असतं. शस्त्र माणसाचा जीव घेऊ शकतं, समाजात भीती पसरवू शकतं. पण एक पेन… ते माणसाची मेलेली मनं आणि संवेदना जिवंत ठेवू शकतं. आणि कदाचित म्हणूनच, मला सार्थ अभिमान आहे की आजपर्यंत माझ्याकडून कागदावर का होईना, पण एकही “मर्डर” झाला नाही आणि माझी लेखणी नेहमीच माणुसकी जपणारी राहिली!

धन्यवाद 

– समाप्त – 

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ऋतू बरवा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ऋतू हिरवा… ऋतू बरवा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

जीवघेण्या ग्रीष्म वृत्तीची काहिली पृथ्वीचे अंग प्रत्यंग जाळतेय. जागोजागी भेगा पडून विच्छिन्न झालेली ही वसुंधरा जणू भग्न मूर्तीसारखी भकास बघतेय एकटक आसमंताकडे! या कोमलांगी प्रेयसीला समीराचे उष्ण श्वास अंतर्बाह्य पोळत आहेत, त्यावर ‘चंदनाची चोळी’ देखील शीतलता प्रदान करायला असमर्थ आहे! नजरेत प्राण एकवटून तिच्या अंतरीची आस वाट बघतेय, कुठं दिसतोय का ‘शामलवर्णीय मेघदूत’ अन त्याची चंचल खट्याळ सखी विद्युल्लता! कारण या दूताने ग्वाही दिल्याशिवाय तिचा प्रियतम अवतरतच नाही. अन एक दिवस या जीवघेण्या प्रतीक्षेचा अंत होतो. श्यामवर्णी मेघांच्या सेनेची अति जलद गरुडभरारी आसमंतात दृष्टिपथास येते! एका बाजूने आक्रमण करीत करीत संपूर्ण नीलाकाशाला व्यापून टाकीत युद्ध जिंकल्याच्या आनंदात त्यांचे गडगडाटी हास्य पृथ्वीला तिच्या प्रियकराची चाहूलच वाटते. मेघाच्या संगती त्याची प्रेयसी विद्युलता आपले चपलांगी हास्य करीत मेघांना रुपेरी रंगाने सजवते. हा जामानिमा तयार झाला की येतो पाऊस. आपल्या प्रेयसी वसुंधरेला कोवळ्या नाजूक सरींच्या स्पर्शाने हलकेच गोंजारून मग मात्र आवेगाने तिचे अंग अंग आपल्या सहस्रबाहू जलधारांनी कवेत घेत बरसतो! या प्रणयाचे साक्षीदार असतात वृक्षलता, आनंदाने आपला पिसारा फुलवून नर्तन करणारे मयूर आणि पावसाच्या एका थेंबानेच तृप्त होणारा चातक!

मंडळी, पाऊस म्हटला की सामान्यजनांना सय येते ती वाफाळलेल्या अदरक घातलेल्या कडक मीठी चाय अथवा जायफळ घातलेल्या धुंद वाफेने गंधाळलेल्या कॉफीची, सोबतीला गरमागरम कांद्याची किंवा तत्सम भजी असली तर ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा आमची! पण या ‘कवी’ नामक फुलपाखरी गिरकी घेत पावसाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींची जातकुळीच वेगळी हो! आपण त्यांच्या शब्दभ्रमाच्या भुलभुलैयात मस्तपैकी जाणून बुजून बंदिस्त होऊन मज्जा मज्जा करीत ‘अंगे भिजली जलधारांनी’ असा अनुभव घ्यायचा!

या मनोहर हिरवाईने लगडलेल्या, रंगीबेरंगी सुमनांच्या ताटव्याने बहरलेल्या वर्षाऋतूचा देखणा नायक असतो ‘पाऊस’! मराठी माणसाच्या मनांमनांत रुजलेले हिरवेजर्द काव्य म्हणजे बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांचे ‘बालभारती’ त प्रस्थापित…

‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । 

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।’ 

… ही आद्य पाऊस कविता! कितीही वेळा वाचा, हिची सर्वकालीन हिरवीकंच हिरवाई कधीच कोमेजत नाही.

या बहुप्रसवी भूमीचे सृजन याच पावसाने फुलते. उन्हाने त्रासलेल्या मानवाला तर हा पाऊस म्हणजे आनंदच नव्हे तर नवसंजीवनी देणारा ठरतो. म्हणून तर पावसाळा हा ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ (कवयित्री-शांताबाई शेळके) आहे.

‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा,

पाचूचा वनी रुजवा

युगविरही हृदयावर,

सरसरतो मधूशिरवा’

लहान मुलांची (त्यांच्या लहानपणापासूनच) अन पावसाची गट्टी अश्शी घनदाट असते, की…

‘ये रे ये रे पावसा रुसलास का 

माझ्याशी गट्टीफू केलीस का’ 

(कवयित्री – वंदना विटणकर) 

.. असे ती त्यालाच विचारतात. उत्तर मिळाले नाही तर मग ही मुले पाऊसदादाला सरळ एका ढब्बू पैशाचे आमिष द्यायलाही कमी करत नाहीत. म्हणून तर अखिल बालक मंडळी पहिल्या पावसाची एंट्री व्हावी म्हणून ‘ये रे येरे पावसा तुला देतो पैसा’, असे घोकत असतात. गोड छकुल्याने असा पैसा दिला की, गहिवरलेला आज्ञाधारक पाऊस लगेच हजर झालाच म्हणून समजा!

आता बाळ थोडं मोठं झालं की त्याला अवचितच शाळा नामक खलनायिका भेटते. मग काय आता कवितेचा रागरंगच बदलतो.

 ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? ‘ 

(कवी-मंगेश पाडगावकर) 

… असे म्हणत शाळेला वैतागलेली पोरं मग डायरेक्टली भोळ्या शंकरालाच साकडे घालतात.

बघा कशी गंमत आहे, धो धो पाऊस अंगणात अन रानावनात कोसळतोय बघा पोरगं पावसाच्या सरी झेलायला, अन गम्माडी गंमत करायला, दोस्तांबरोबर फेर धरत गाणी हवीच- 

‘पिरपिर पिरपिर पावसाची,

त्रेधा तिरपिट सगळ्यांची’ 

(परत वंदनाताईच हो) 

… किंवा झालंच तर ‘अग्गोबाई अन ही आई नावाची बाई मुलाला घरात कोंडून ठेवतेय! किती हा हिचा जाच! मग तिची विनवणी अन लांगूल चालन करावे लागणारच ना.

‘ए आई मला पावसात जाऊ दे,

एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे’

(आमच्या अति लाडक्या कवयित्री-वंदना विटणकर) 

.. अन एकदाचं बाहेर पडलं की धुमशान पळतंय कसं 

अग्गो बाई, ढग्गोबाई, लागली कळ । 

ढगाला उन्हाची केवढी झळ । 

थोडी न् थोडकी लागली फार । 

डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।’ 

(कवी- संदीप खरे)

मैत्रांनो, आता जाऊ या तिथं, जिथं राधा अधीर होऊन म्हणतेय 

‘रिमझिम पाऊस पडे सारखा,

यमुनेलाही पूर चढे,

पाणिच पाणी चहूकडे 

ग बाई गेला मोहन कुणीकडे? ‘ 

(जनकवी पी. सावळाराम) 

निसर्ग कवी बा. भ. बोरकरांची ‘सरींवर सरी आल्या ग’ ही सदा प्रफुल्लित कविता आठवते कां? गोकुळात बरसणारा पाऊस, हिरवेगार कदंब वृक्ष, यौवनाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या वेली, मेघांची गर्जना, विजेची पैंजणे आणि कृष्णधुन आळवणारी त्याची वेणू, यांच्या तालासोबत मनमोहक रंगांनी सजलेले आपले पिसारे फुलवीत मिरवणारे मयूर! त्यांच्यासोबत दुग्धधारांसारख्या भासणाऱ्या धवल जलधारांत सचैल न्हालेल्या गोपींचे कृष्णाशी एकरूप होण्याचे वर्णन बोरकरांनीच करावे!

(ही समग्र कविता ऐकावी यू ट्यूब वर पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडेंच्या स्वरात! )

सरींवर सरी: सरीवर सरी…

*

सरींवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग

गोपी झाल्या भिजून-चिंब, थरथर कापती निंब-कदंब

घनांमनांतुन टाळ-मृदंग, तनूंत वाजवी चाळ अनंग

पाने पिटिती टाळ्या ग, सरिंवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधून

वनांत गेला मोर भिजून, गोपी खिळल्या पदी थिजून

घुमतो पावा सांग कुठून? कृष्ण कसा न उमटे अजून?

वेली ऋतुमति झाल्या ग, सरिंवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग

दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून

मी-तू-पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून

सरींवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनि धाल्या ग

सरींवर सरी: सरीवर सरी…

कवी ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो’ ही कविता मेघांनी आच्छादलेल्या आकाशासारखी गूढरम्य आहे. जणू विरहाचे दुःख डोळ्यांच्या पापण्यांतच थिजल्यासारखे वाटते!

‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने’

मंडळी या निसर्गराजाच्या वर्षाऋतूत भावानुरागी कवीचे मन बरसणाऱ्या जललहरीं सोबत थुई थुई नाचत असते. या पावसाचे नखरेल रुप विविधरंगी आणि बहुढंगी! कधी कोमल हलकेच थेंबाथेंबाने अंगण भिजवणारा रोमांचकारक शिडकावा जणू स्मितहास्याची हळुवार लकेर, वा मंद शीतल समीरची झुळुकच, अथवा रसरंगात दंग असलेल्या मैत्रिणींच्या अंगांवर शिंपडलेले तजेलदार गुलाबपाणी समजा! या पावसाचा मूड पण वेगवेगळा असतो बरं कां! एखाद्या मैफिलीत जाणत्या शास्त्रीय गायकासारखा इंद्रधनुष्याच्या किनारीने नटलेली निलाकाशी शाल पांघरून कधी द्रुत तर कधी विलंबित तालात तो गायनी कला दर्शवतो तर कधी हाच पाऊस नद्या, नाले, तडाग इत्यादींची तृष्णा एकाच वेळी भागवण्याकरता रसरसून अतिवेगाने अविरत बरसत असतो.

ग्रीष्म ऋतूच्या गर्मीत तिष्ठत असलेल्या विराणी धरेला पहिल्याच भेटीत हळुवारपणे कवेत घेत तिच्यावर मृदगंधाची पखरण करणारा हा पहिला पाऊस तर कवीला अतिप्रिय, त्याच्या प्रणयिनीची आठवण करून देणारा! मंगेश पाडगावकर यांच्या प्रणयधुंद कवितेतील या ओळी पहिल्या ओलेत्या भेटीचे अत्तर शिंपीत येतात.

‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।

धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।

ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।’

मैत्रांनो, या रमणीय वर्षा ऋतूचा अनुभव घेतल्यानंतर आता लेखाच्या अंती याच पावसाचे रौद्ररूप देखील स्मरण्याची वेळ आलीय! आकाश भयावह काळ्याकभिन्न राक्षससदृश मेघांनी संपूर्णपणे आच्छादलेले, त्यातच मध्ये मध्ये आपली समग्र शक्ती एकवटत सुरु असलेले विजेचे भीषण तांडव, नदी नाल्यांचा जीवानिशी मांडलेला आकांत ऐकणारे कुणीच नाही.

‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ 

(कवी- ग. दि. माडगूळकर) 

… असा प्रलयंकारी घनघोर पाऊस वेड्यासारखा मुसळधार कोसळतोय. इतके दिवस पेरणी करून आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थिजले. अन आता त्याच पिकाची नासाडी करीत त्याच्या कमकुवत खोपट्याकडे तुच्छ नजरेने पाहणाऱ्या मस्तवाल पावसाला शेतकऱ्याची कारभारीण शिवी घालतेय,

‘आरं गाभ्रीच्या पावसा! ’ (कवी – स्वप्निल प्रीत)

‘आरं गाभ्रीच्या पावसा! आता कशी दया आली

कवतिक नाही तुजं, जवा तहान आटली ।।धृ।।

ओली ठिगळाची चोळी, वर छप्पर गळते

कागदाच्या होडीवानी माजं खोपटं बुडते ।।१।।

आला पडशाचा ताप, कशी जाऊ मी कामाले

तुझा नाचणारा मोर, घास देतो का पोटाले ।।२।।

रित्या पोटी बाप ग्येला, डोळं होतं आभायाला

फक्त आईच्या डोयांत, तवा पाऊस पाह्यला ।।३।।

त्याच दुष्काळात माझं, सारं सपान सुकलं

आता नको तुझी माया, मन तुले उबगलं ।।४।।

प्रिय वाचकांनो, या बहुतेक कविता गेय आहेत. तुम्हाला भावणारी पावसाची नटरंगी रूपे एन्जॉय करतांना वाफाळत्या ‘चाय गरम’ बरोबर यू ट्यूबवर या कवितांचा आशयघन आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका बरं कां!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थ्रिलर… भाग – १ ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ थ्रिलर… भाग – १ ☆ तृप्ती देव ☆

“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाईलच्या स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित संदेश वाचून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

… चहाचा गरम कप तसाच हातात धरून मी तो संदेश एकामागून एक दोन-तीनदा वाचला. चेहऱ्यावरचं हसू ओसंडून वाहत होतं आणि कित्येक दिवसांची माझी कठोर मेहनत आज फळाला आली असं मला वाटत होतं. मी मनातून खूप सुखावले,  पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही,  कारण पुढच्याच मिनिटाला कमिटीकडून दुसरा एक सविस्तर मेसेज आला. त्या नव्या संदेशात पुढची अट आणि नियम लिहिले होते. त्यात लिहिलं होतं,  “यंदाच्या अंतिम फेरीचा मुख्य विषय – मर्डर मिस्ट्री म्हणजेच क्राइम थ्रिलर. कथेमध्ये खून,  संशय,  गुंतागुंतीचा तपास,  रहस्य,  थरार आणि एक अनपेक्षित शेवट असणे अनिवार्य आहे.”

तो मेसेज वाचून मी जागच्या जागी अक्षरशः थिजून गेले. हातातील चहाचा कप थरथरला आणि टेबलवर वाजत स्थिरावला. अंगावर एक सरसरून काटा आला आणि कपाळावर आठ्या पडल्या. “काय झालं गं?  एवढी का गोठली आहेस सकाळी सकाळी? “

स्वयंपाकघरातून पोहे बनवत असलेल्या नवऱ्याने माझा पडलेला आणि गंभीर चेहरा पाहून विचारलं. मी काही न बोलता फक्त मोबाईल त्याच्या हातात दिला. त्याने तो मेसेज शांतपणे वाचला आणि तो घरात घुमणारा मोठा हसू हसला. “अरे वा! बस,  आता तुझं काम झालं तर! तू तर रोज नवनवीन विषयांवर सुंदर कथा लिहीत असतेस. हा विषय तर खूपच मस्त आणि थ्रिलिंग आहे. लिही की एखादी कडक थ्रिलर,  तुला नक्की जमेल! ” तो म्हणाला.

मी त्याच्याकडे अत्यंत रागाने आणि असहाय्यतेने पाहिलं. “अरे,  तुला थट्टा वाटतेय का?  माझ्या आजवरच्या कथा आठव जरा. माझ्या कथेत दोन पात्रांमध्ये साधं कडाक्याचं भांडण झालं,  तरी शेवटी मी दोघांची मनं वळवून त्यांची प्रेमाने समेट घडवून आणते. इथे सरळ जिवंत माणूस मारायचा आहे! रक्त,  चाकू,  खून… हे सगळं माझ्या संवेदनशील मनाला कसं पटणार आणि माझ्याकडून कसं होणार? ” माझं हे बोलणं ऐकून तो अजूनच जोरात हसायला लागला. तितक्यात आमचा कॉलेजला जाणारा मुलगा बेडरूममधून बाहेर आला आणि हसत म्हणाला,  “बाबा,  बरोबर आहे तिचं. आईच्या कथेतला खुनी आधी पीडित माणसाला प्रेमाने चहा पाजेल,  मग त्याची मनधरणी करेल,  ‘मला माफ कर’ म्हणून डोळ्यात पाणी आणेल आणि शेवटी दोघे गळ्यात गळे घालून पक्के मित्र होतील! ” सगळं घर माझ्यावर हसत होतं. त्या हसण्याने घरातलं वातावरण हलकं झालं असलं,  तरी माझी मात्र धाकधूक वाढली होती. मी अत्यंत गंभीर झाले होते,  कारण प्रश्न माझ्या लेखणीच्या प्रतिष्ठेचा होता.

दुपारी घरची सगळी कामं आटोपली. घरात शांतता पसरली होती. मी अभ्यासाच्या टेबलावर माझी आवडती वही आणि पेन घेऊन बसले. वहीच्या कोऱ्या पानाच्या अगदी मध्यभागी मी मोठ्या आणि ठळक अक्षरात शीर्षक लिहिलं,  “मर्डर मिस्ट्री.” थोडं थांबून,  खूप विचार करून मी कथेचं पहिलं वाक्य लिहिलं,  “मध्यरात्रीचे बारा वाजले होते. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि भयानक शांतता पसरली होती. काळ्या कपड्यांमधील एक संशयास्पद माणूस हातात धारदार चाकू घेऊन बंगल्याच्या मागच्या दरवाजाने आत शिरला…” मी ते वाक्य लिहिलं आणि स्वतःच दोनदा वाचलं. ते वाचताच माझ्या आतल्या संवेदनशील मनाने लगेच मान डोलवली आणि आतून आवाज आला,  “धारदार चाकू?  अगं,  एवढा धारदार कशाला?  चुकून जास्त लागलं तर?  चाकू थोडा बोथट ठेव.” मी कपाळावर हात मारला,  पण मनाचं ऐकून मी ‘धारदार’ हा शब्द खोडला आणि तिथे ‘बोथट’ असं लिहिलं.

मी पुढे लिहायला सुरुवात केली,  “त्याने खोलीत झोपलेल्या माणसावर बोथट चाकूने जोरात वार केला…” पुन्हा माझं मन मध्येच ओरडलं,  “जोरात नको गं बाई! खूप रक्त येईल आणि त्याला खूप वेदना होतील. त्यापेक्षा हलकासा वार कर.” मी ‘जोरात’ पुसलं आणि ‘हलकासा’ केलं. आता वाक्य झालं,  “त्याने हलकासा वार केला.” पण क्षणभर विचार केल्यावर मलाच हसू आलं. हलकासा वार करून काय उपयोग?  त्याने माणूस कसा मरेल?  त्याला तर फक्त किरकोळ खरचटलं असेल. मग मर्डर कसा होणार?  मी चिडून ते पूर्ण वाक्यच पुसून टाकलं. यावेळी मी चाकूच बाजूला ठेवला. मनात विचार केला की मारामारी दाखवू. मी लिहिलं,  “त्याने मागून येऊन त्या माणसाला जोरात ढकललं…” लगेच मनातून दुसरी शंका उपस्थित झाली,  “अरे,  पण तो खाली पडल्यावर तिथे फरशी असेल आणि डोक्याला लागलं तर?  खाली एखादी मऊ गादी किंवा सोफा असेल तर किती छान होईल! ” मी कथेतील त्या पडणाऱ्या पात्राच्या खाली सुरक्षित गादी ठेवली. पुन्हा सगळं पुसलं. असा करत करत अर्धा तास उलटून गेला होता. कागदावर शब्दांची खाडाखोड झाली होती,  पण माझ्या कथेतला तो बिचारा माणूस अजून जिवंतच होता आणि खुनीसुद्धा दारात उभा राहून थकला होता.

इतक्यात नवरा खोलीत डोकावला आणि खोचकपणे म्हणाला,  “काय लेखिकाबाई,  झाला का मर्डर?  की पोलीस तपास सुरू झाला? ” मी वैतागून पेन खाली ठेवलं आणि म्हणाले,  “नाही रे… अजून खुनी दारातच उभा आहे. आत यायला तयार नाही.” तो हसत म्हणाला,  “अशी दारात उभी ठेवून त्याची काय खातीरदारी करतेस?  आत पाठव त्याला लवकर आणि उरकून टाक.” मी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिलं,  “अरे,  तो आत गेला तर घरातले लोक त्याला चहा-पाणी विचारतील. मग चहा द्यावा लागेल. चहा दिला की मर्डर कॅन्सल होईल आणि दोघे गप्पा मारत बसतील! ” तो डोक्याला हात लावून हसत हसत निघून गेला. मी हार मानणार नव्हते. यावेळी मी हिंसेचा मार्ग सोडायचा ठरवला. रक्तपात नको,  म्हणून मी ‘विषाचा’ पर्याय निवडला. मी नवीन पानावर लिहायला घेतलं,  “खुन्याने स्वयंपाकघरात जाऊन दुधाच्या कपात अत्यंत जहाल विष मिसळलं…” तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं,  “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना?  एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द!

– क्रमशः भाग पहिला 

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुलाबभाई… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

अल्प परिचय

‘मन अंकुरे अंकुरे’ या नावाचा ललित लेख संग्रह ज्ञानपथ पब्लिकेशन्स अमरावती द्वारा प्रकाशित.

साहित्य संमेलनांमधून कथाकथन, कविता वाचन केलेले आहे.

वृत्तपत्रामधून सातत्याने विविध विषयांवर लिखाण.

? मनमंजुषेतून ?

☆ गुलाबभाई… ☆ डॉ. नेहा भटकर

त्याच ‍झालं असं,  की परवा स्वयंपाकघरातील काळी नॉनस्टीक भांडी आरोग्यास किती व कशी बाधक आहेत वा नाहीत याबद्दलच लेखन वाचनात आलं. तसंही अलीकडे सर्वत्र केवळ स्टीलची भांडी अन्न शिजवण्यासाठी वापरावीत असा प्रचार होतोयं पण गैरसोय अशी होते की,  स्टील उष्णतेचा चांगला वाहक नसल्याने,  भांड्याला सर्वत्र सारखा जाळ लागत नाही त्यामुळे पदार्थ लगेच करपतो. हे सगळं मनाशी घोळत असतानांच मला दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडी गुलाबभाई घरी येऊन सर्व स्वयंपाकघरातील शिजवण्याची,  खाण्याची वा अन्न काढून ठेवण्याची सगळी पितळी भांडी; उष्णतेची उत्तम वाहक असलेली,  कल्हई करून अगदी चांदीसारखी चकचकीत करून द्यायचे,  जेणेकरून कुठलाही पदार्थ कळकून त्याची बाधा होऊ नये आणि आम्ही कसे निर्धास्त व्हायचो हे आठवलं

कंदील भडकतोयं, गुलाबभाई. पावसाळ्याच्या तोंडी भाड्यांना कल्हई करायचीयं, गुलाबभाई. तेल संपलेल्या डब्यांची झाकणं कापून घ्यायचीयं व त्यापासून वापरायला सोयीचे डबे बनवायचेतं तर गुलाबभाई. बादलीला वाळा बसवायचायं,  कुठल्या गळक्या जुनाट गुंड वा कळशीला डाग द्यायचायं,  गुलाबभाई. धान्याचा हंगाम जवळ आलायं धान्य साठवायच्या कणग्या ठिकठाक करून घ्यायच्यायं तर गुलाबभाई. उन्हाळ्यात गावच्या कुंभारवाड्यातून नुकत्याच आणलेल्या नव्या कोऱ्या मातीच्या माठासाठी अडणी करायची तरी गुलाबभाई. तर एकंदरीत कुठलंही तांबा पितळ, लोखंडी वा टपरी पत्र्यांचं आणि कल्हई वगैरे कामं करायचं तर अशा कित्येक कामांसाठी आमची भिस्त केवळ गुलाबभाईवरच. अशा प्रकारची कामे करणारा आसपासच्या खेड्यांसकट एकमेव माणूस गुलाबभाई. आज ही असली कामे कुणी करवून घेत नाहीत. त्याची गरजही नाही किंवा ती कालबाह्य झालेली आहेत. आजच्या वापरा आणि फेका वा युज अँड थ्रो जमान्यात,  वर्षानुवर्षे एकच,  वारंवार भडकणारा कंदील पुन्हा पुन्हा दुरुस्त करून वापरणाऱ्या लोकांचं जग कालौघात केव्हाच मागे पडलेलं. कंदीलाच्या धुरकट काचेतून पडणाऱ्या अंधुक उजेडासारखं हळूहळू धुसर होऊन पडद्याआड दिसेनासं झालयं व आज बहुतेकांसाठी तितकंच ते अनोळखीचही आहे. आजची पन्नाशीच्या पलीकडची,  खेडेगावांशी बऱ्यापैकी परिचीत असलेली पिढी, कोणे एकेकाळी त्या जगाचा भाग होती. जसजसा काळ सरकत गेला तसतशा लहानपणीच्या दुनियेतील अगदी रोज भेटणाऱ्या खुणा एक एक करून दिसेनाशा होताहेत. तो निसर्गाचा नियमच आहे; त्याचे काय विशेष. कालपरत्वे स्थित्यंतरे ही घडणारच. गतकाळात भेटलेली कितीतरी माणसे,  घडलेल्या घटना,  विस्मृतीत गडप होतात. पण कधी कधी,  कुणास ठाऊक कशी,  अत्यंत साधी वाटणारी माणसं किंवा तेव्हा तितक्याशा महत्वाच्या नसणाऱ्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना,  कुठेतरी मनाच्या पार आतल्या कप्प्यात जपलेल्या असतात,  इतक्या की त्यांना पाठीशी घालत आपण कितीतरी काळ पुढे चालत आलेलो आहोत याचाही विसर पडतो, इतक्या त्या ताज्या असतात.अगदी कसं सगळं परवाच भेटल्या वा घडल्या सारखं लख्ख. त्यापैकीच एक भांड्यांना कल्हई करुन चकचकीत करणारे गुलाबभाई. 

सहा फुटाच्या जवळपास उंची आणि सडपातळ शरीरयष्टी,  कुठलेही भाव नसलेला उभट चेहरा, कुणी काय सांगतोय हे त्यांचे डोळेच ऐकायचे किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. पांढरा ढगळ पायजमा शर्ट व डोईवर कायम काळी साधी टोपी. टोपी न घातलेले गुलाबभाई मी बघितले नाहीत. भ्रमण वा स्थिर यापैकी कुठलीही दूरध्वनी सुविधा हाताशी नव्हती व तसल्या सोयीची पुसटशीही कल्पना त्याकाळी गावामध्ये कोणाच्याही मनीमानसी असण्याचे काही कारणही नव्हते. गावात कोणालाही काही सांगायचे झाल्यास प्रत्यक्ष भेटणे हीच पद्धत. यामुळे घरात गुलाबभाईसाठी कुठलेही काम निघाले असेल तर गुलाबभाईंच्या थेट घरीच थडकावे लागे आणि हमखास ती कामगिरी घरात लहान असल्याने माझ्याकडेच यायची. हो घरीच,  त्याकाळी घर आणि व्यवसाय हे दोन्ही बहुतेक एकाच ठिकाणी असायचे किंवा कारागीर,  ज्यांचे कोणाचे काम असेल त्यांच्या,  घरी जाऊन ते काम करून द्यायचे. आजच्यासारखे वेगळे वर्कशॉप किंवा वेगळे दुकान अशी पद्धत नव्हतीच. गुलाबभाईंचे स्वतःचे घर नव्हते. ते राहायचे गावाला अगदी लागून असलेल्या शेतामधील डॉ. अशोक यांच्या वाड्याच्या परिसरात, दर्शनी भागातील डाव्या कोपऱ्यातील ओसरीत. अर्थातच तोच त्यांचा निवारा आणि वर्कशॉपही. त्यांचे छोटेसे कुटुंब मीयॉं,  बिबी आणि दोन मुली अत्यंत उद्यमशील असा हम दो और हमारे दो असा चौकोनी संसार. वाड्याच्या समोरच्या भागात गुलाबभाई तर मागच्या बाजूला आणखी एक का दोन कुटुंब राहायला असल्याचे आठवतं. पण एकुणच सर्व गावाचा संबंध यायचा तो गुलाबभाईंशी आणि आजारी पडल्यास डॉक्टरांशी.

डॉक्टरांच्या शेतामध्ये अगदी कुंपणाला लागून,  गुलाबभाईंच्या ओसरीच्या जरा डाव्या बाजूला मोठाल्या चिंचेच्या झाडांची रांग होती. वाऱ्याच्या झुळुकेसरशी डुलणारे चिंचांचे झुपके मनाला नेहमी खुणावत असत. शेताच्या कुंपणापलीकडील एका कार्यालयामध्ये शिपाई असणाऱ्या सदाभाऊंचा मात्र आमच्या चिंचा गोळा करण्याला कडाडून विरोध असे. अर्थात त्याला कारणही तसंच असायचं म्हणा. आम्हा शाळकऱ्यांचा घोळका चिंचेखाली एकदाचा जमला की इतका गोंधळ नि गोगांट करायचा की बाजूच्या कार्यालयीन कामात अडथळा यायचा पण आम्ही आपले सदाभाऊंच्या नावाने सदा बोटं मोडायचो. अशावेळी आम्ही गुलाबभाईच्या मुलींना हाक मारायचो आणि त्या आम्हाला चिंचेखालची चार-दोन बोटूकं अगदी सहज द्यायच्या आणि आमची बोळवण करायच्या. चिंचेच्या झाडांची रांग जेव्हा माकडांनी गजबजायची तेव्हा झाडावरची माकडं आणि आम्ही खालची माकडं यांच्यात करार होऊन गुलाबभाई आणि सदाभाऊ यांची चांगलीच कोंडी करत असू. माकडांच्या गोंधळात आमचाही गोंधळ मिसळून जायचा. तेव्हा माकडं गावात बाराही महिने मुक्कामाला नसायची. काही दिवसांची ही पाहुणी माकडं आमची फार आवडती होती.

वाड्यात शिरण्यासाठी,  पहिले तर वाड्याच्या भल्या मोठ्या लोखंडी पत्र्याच्या फाटकाशी झुंजाव लागायचं. फाटक ढकलून आत मध्ये पाऊल पडल्याशिवाय वाड्याचा आतला परिसर काही दृष्टीपथात यायचा नाही कारण फाटक एकसंघ पत्र्याचं. त्याला मध्ये कुठलीही खिडकी वा फट नसल्याने फाटकाशी उभे राहून आत मधील कोणाला बाहेरून आवाज देणे अशक्यच म्हणून लहान मुलांसाठी ती झुंजच,  पण अनिवार्य. त्यातल्या त्यात सोयीचा भाग म्हणजे फाटकाला वर किंवा खाली कडीकोंडा लागलेला नसायचा फक्त ते ढकलायचे अन् त्याचा कर्र… असा होणारा आवाज कानात घेऊन आतील ऐसपैस पटांगणात शिरायचे. फाटकाचं कर्र…एकदाच बंद झाल्यावरही जर का करकर,  खडखड, ठकठक असे आवाज जर आपल्या डावीककडून येत असतील तर गुलाबभाई घरीच आहेत अन्यथा ते कुठे गावामध्ये कोणाकडे काहीशा असल्याच कामासाठी गेलेले असावेत हा अंदाज फाटकातच यायचा. गुलाबभाईंशी संवाद साधने म्हणजे अत्यंत जिकिरीचं काम. त्यांची कामानिमीत्त चाललेली ठोकपिट आणि भरीत भर गुलाबभाई दोन्ही कानाने ठार बहिरे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी गत व्हायची. मी फक्त त्यांना एवढं सांगून घराकडे येत असे,  ते म्हणजे तुम्हाला काही कामासाठी आईने बोलावले आहे आणि बहुतेक हा संवाद हातवारे जास्त आणि शब्द कमी असाच व्हायचा. यावर गुलाबभाई फक्त मानेने होकार द्यायचे.

गुलाबभाईंचे कामातील कसब व सफाईदारपणा आणि माझ्या आईच्या संसारोपयोगी नवनवीन कल्पनांच्या समन्वयाची परिणीती व्हायची ती नाविन्यपूर्ण घरगुती वापरातील सुलभ उपकरणांच्या निर्मितीमध्ये. चिळ्या कंदीलांमध्ये रॉकेल भरायच्या डब्याला तोटी लावून घेऊन काम अधिक सोपे करणे तर कधी दिवालगिरीच्या वातीच्या पुंगळी भवती खबरदारी म्हणून आधीच आणखी एक जास्तीची पुंगळी बसवून घेऊन तिच्या कधी काळी भडकाण्यावर उपाय करावा. कित्येकदा बनवलेले झाकण बाहेरून नीट बसत नाही तर अशावेळी ते आत मधून बसवावे म्हणजे अधिक नीट बसेल का, असले प्रयोग करायला कधी गुलाबभाई थकत नसतं. घरोघरी दिवाळीच्या आधी होणाऱ्या वार्षिक साफसफाईच्या वेळी तर कित्येक अडगळीतल्या सामानांची दुरुस्ती करावी आणि त्यांना उपयोगात आणावे अशा विचाराने आणि इतर अनेक नियमित वापरातल्या सामानाच्या दुरुस्तीचा चेव बऱ्याच जणांना यायचा.त्यामुळे या सुमारास गुलाबभाईंच्या घराबाहेर बराच मोठा वैविध्यपूर्ण मोडक्या वा नादुरुस्त वस्तूंचे ढीग,  किंवा ढीगभर काम त्यांना पडायचे. अशावेळी ते सारखे लगबगीत, प्रत्येकाची डेडलाईन सांभाळायचे. “हा हा दिवाली के पहेलेही बना दूंगा” असं पुटपुटल्यागत बोलायचे पण त्यांचा कामाचा झपाटा आणि ठोकपिटीचा आवाज त्या काळात फार वाढायचा.

कुणाच्याही कधी अध्यात मध्यात नसणारे, आपलं काम भलं आणि आपण भले या नियमाने चालणारे. सदैव कामाचीच भाषा बोलणारे व आवाजाचा एकच पोत ठाऊक असलेले. भोवतालच्या जगाला त्यांच्या व्यक्त्तीमत्वाचा केवळ गुलाबभाई डागवाला वा कल्हईवाला एवढा एकच पदर ठाऊक असलेले,  कामात अत्यंत प्रामाणिक आणि तितकेच हरहुन्नरी. कधीही कुठली तक्रार नसणारे, माणुसकीचा वसा घेतलेले. कधीही कामा पलीकडे न बोलणारे, आजूबाजूच्याच काय तर कधी स्वत:बाबतही व्यक्त न होणारे गुलाबभाई; आज मात्र मला फार गूढ वाटतात.

┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भारत माझा देश आहे 🇮🇳… एक चिंतन ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ भारत माझा देश आहे… एक चिंतन ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

भारत माझा देश आहे! 

पण प्रश्न हा आहे की कोणता भारत माझा देश आहे?

रामायणातल्या उच्च आदर्शांचा लवलेशही नसलेला भारत?

की महाभारतातील कौरवांची परंपरा जतन करणारा भारत?

सिंहासन सोडून पादुकांची पूजा करणाऱ्या भरताचा भारत?

की सर्वस्वाचेही दान करणाऱ्या व्यवहार शून्य

कर्णाचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

अतिथी देवो भव म्हणत शत्रूलाही थारा देणारा भारत? की खलांची व्यंकटी सांडो अशी आर्त विनवणी करणारा भारत?

 मर्यादांचा पडदा न ओलांडणाऱ्या महाराणी पद्मिनीचा भारत?

 की वास्तवतेच्या नावाखाली प्रदर्शनाला सोकावलेल्या अभिनेत्रींचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

पंचतारांकित पक्वानांच्या जेवणावेळी झोडणारा भारत?

की धारावीच्या उकिरड्यात पत्रावळीतून डोकावणारा भारत?

एक तीळ सात जणात वाटून खाणाऱ्या पांडवांचा भारत?

की चारा असो, कोळसा असो, खात सुटणाऱ्या नेत्यांचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

 तलवारीच्या पात्यावर शत्रूला नाचवणाऱ्या बाजीरावाचा भारत?

की बाजीरावालाच नाचणाऱ्या आधुनिक इतिहासकारांचा भारत?

भवितव्याशी करार करणाऱ्या देशभक्तांचा भारत?

की लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या नतद्रष्टांचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीवर कुटुंबाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा भारत?

की कुटुंबाच्याच चिंतेत रमणाऱ्या सत्तापिपिसूंचा भारत?

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् म्हणणाऱ्या भूमिपुत्रांचा भारत?

की त्याच मातेच्या पोटी जन्मलेल्या धर्मांधांचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

न्यायदेवतेचे डोळे उघडणाऱ्या रामशास्त्रांचा भारत?

की काय द्यायचं बोला म्हणत डोळ्यावर पट्टी बांधणा-यांचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

प्रश्न माझे खरे आहेत .

पण खरे उत्तर सोपे नसते .

कारण केव्हाच गुंडाळले आहे आम्ही 

सत्यमेव जयते‘ 

तरीसुद्धा, तरीसुद्धा… भारत माझा देश आहे .

भारत माझा देश आहे .

कारण तो फक्त देश नाही.

ती एक माता आहे .

ती भारत माता आहे.

भारत माझा देश आहे!

┉❀꧁꧂❀┉

©  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची प्रतिज्ञा :: भारत माझा देश आहे! 🇮🇳 ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ आमची प्रतिज्ञा :: भारत माझा देश आहे! ☆ शीला पतकी 

सातवीचे पुस्तक नवीन आहे म्हणून मी ते चाळायला घेतलं. पहिल्या पानावर नेहमीप्रमाणे प्रतिज्ञा …

आणि मला त्या पुस्तकातून प्रतिज्ञा बाहेर जाताना दिसायला लागली प्रतिज्ञेतल्या पानावरचा एकेक शब्द नाहीसा व्हायला लागला… सगळे अक्षर पुसट झाली…मी विचारले अग चाललीस कुठे? माझया प्रश्नावर प्रतिज्ञा म्हणाली नुसतं कागदावर राहण्याचा कंटाळा आला ग मला… उगाच ते तोंड हलवून म्हणणं … तो विचार ना मनात माझ्या डोक्यात… मग उपयोग काय माझा…? मी म्हणाले, ” असं का म्हणतेस आम्ही फार निष्ठापूर्वक म्हणून घेतले मुलांकडून” “हो पण मुलांनी कुठे म्हटलं …त्याने ते फक्त पाठ केलं रोज म्हणून अगदी मारुती स्तोत्र रामरक्षा सारखं …अर्थ काहीच ठाऊक नाही पण पाठ मात्र चोख!”

मी म्हणाले, ” असं काय म्हणतेस ग? त्यावर ती म्हणाली, ” बैस येथे मी तुला समजून सांगते हे पहा पहिली ओळ आहे ..भारत माझा देश आहे… ही जाणीव किती जणांना असते? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी तुम्हाला वाटतं आपण भारत देशाचे आहोत त्याच्या अलीकडे एक आठवडाभर ही सुरुवात असते. मेरे देश की धरती वगैरे सारखी गाणी लागतात. शहीद, भगतसिंग, देशभक्त, क्रांती, बॉर्डर असले सिनेमे टीव्ही वरती चालू राहतात …आठवडाभरानंतर सगळं संपत…

सारे भारतीय माझे बांधव आहेत अग घरातले भाऊ-बहीण घरातली सदस्य एका चौकोनी खोकड्यात बघत असतात. पलीकडच्या घरात कोण राहतो याची माहिती तुम्हाला नाही .त्याच्या सुखदुःखाशी तुमचं देणंघेणं नाही तुमच्या उंबर्या पलीकडचं जग तुम्हाला माहित नाही… त्यांच्याशी संवाद नाही. पलीकडे उत्तर हिंदुस्तानी आला तर तुम्ही म्हणता तो आपला नाही …सारे भारतीय बांधव कुठले तुमचे…? प्रांतरचनेवर तुमचे भांडण… बर आता ही ओळ बघ… माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे! यातल अर्ध वाक्य बरोबर आहे परंपरा समृद्ध आहेतच पण त्या अधिक समृद्ध करण्याचं काम तुम्ही केलेलं नाही. काही परंपरा तर ओंगळवाण्या केल्यात त्या परंपरांचे आधुनिकीकरण करताना त्याचे इव्हेंट केलेत. ओवाळून करायचे वाढदिवस मेणबत्ती विझवून आणि केक कापून करताय तुम्ही …हे म्हणजे आधुनिकीकरण नाही …गणपती उत्सवात मिरवणुकीत हिडीस प्रकाराने नाचता नृत्य करता… परंपरावादी माणूस तुम्हाला आऊटडेटेड वाटतो… आणि मुख्य म्हणजे परंपरा पाळा ना. आपल्या देवळात जाण्यासाठी काही नियम असतील तर ते पाळले पाहिजेत तिथे एखाद्या बाईने तोकडी पॅन्ट आणि वर एखादा तोकडा शर्ट घालून जाणे योग्य नाही त्याच्यावर तुम्ही आंदोलन करता बायकांनी तर पुरुषी होण्याची स्पर्धाच चालवली आहे बायकांनी पुढे जरूर यावं …सगळं शिकावं… सगळ्या गोष्टीआत्मसात कराव्यात, प्राविण्य मिळवावं पण बाईपण सोडू नये… परमेश्वराने दिलेली देणगी आहे ती!…ममता सामंजस्य ऋजूता वात्सल्य आणि अफाट सहनशक्ती कारण ती सृजनाची शक्ती आहे पण तुम्हाला तसं वाटत नाही पुरुषांशी बरोबरी करण्यात आणि त्यांच्यापुढे जाण्यात धन्यता… त्यामुळे खरंच कोणी सुखी नाही…ना पुरुष ना स्त्री ना कुटुंब आणि खरं सांगू का कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे तो तोच संकुचित होत चालला गाव गाड्या पासून वाड्या आल्या.. वाड्यापासून वस्त्या झाल्या ..गल्ली बोळ …छोट घर मोठ कुटुंब… मोठ्या कुटुंबाचे रूपांतर विभक्त कुटुंबात झाले आणि आता बहुतेक एकल कुटुंब होतील…!

” त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन “असं म्हणणारे तुम्ही त्या परंपरा मोडीत तरी काढताय किंवा त्याच आधुनिकीकरण करण्याच्या नादात विद्रुप पद्धतीने त्या बदलत आहात या परंपरांचे पाईक होण्यासाठी तुम्हाला पाईक या शब्दाचा अर्थ शोधावा लागतो. निष्ठेने एखादी गोष्ट पुढे नेणारा त्यावर श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट चालू ठेवणारा वारकरी सांप्रदायातली वारी परंपरा,

ती प्रथा पुढे नेत आहेत 700 वर्षाहून अधिक काळ झाला पण त्यात सुद्धा इव्हेंट आलाच. वारी कव्हर करणारे चॅनल, वारीच्या रस्त्यावर जाहिरातीचे बोर्ड लावणारे जाहिरात दार आले वारीत हौसे नवशे गवशे सगळे आले पण मूळ गरीब बिचार्या वारकऱ्यांनी आपली परंपरा सोडली नाही .

आता पुढची ओळ बघ “मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन” जरा पोरं मोठी झाली की पालकांचा चुका करण्यात सॉरी चुका दाखवण्यात ते पटाईत झालेत तुम्हाला हे जमत नाही तुम्हाला हे येतच नाही ते तुमच्या वेळेच आता जुना झालं वगैरे वगैरे… आई वडिलांना वाकून नमस्कार करणारी पिढी संपली, आता गुडघ्याला नमस्कार करतात. गुरुजनांचा तर विचारच नको त्यांना थोबाडीत मारेपर्यंत मजल गेली आहे मुलांची आणि ही दृश्य तुमच्या चित्रपटातही दाखवले जातात मुलांना बळ मिळतं त्यांना वाटतं आपणही असं करावं कारण त्याला कोणती शिक्षा होताना दाखवत नाहीत त्याचा बाप आमदार असतो खासदार असतो पैसा फेकला की पेपर मिळतो ऍडमिशन मिळते डिग्री मिळते त्याला ठाऊक झाले कारण हे असले महापाप करणारे प्रजाजन आपल्या देशात आहेत आणि तरुण मुलांची डोके भडकवणारे परदेशात बसलेत. देशाचा सर्वोच्च मानबिंदू आपले पंतप्रधान त्यांना सुद्धा जगातल्या वाईटात वाईट असलेल्या शब्दाने शिव्या देण्याचे काम करणारी पिढी… त्यांना ही प्रतिज्ञा शाळेत शिकवली नसेल का? ते कोणत सौजन्य दाखवत होते? ते कोणाच्या वयाचा मान नाही कोणाच्या पदाच मान नाही नाही… जेंडर डिफरन्स तर तुम्हाला मान्य नाही ठीक आहे पण तो तुम्ही अमान्य करून उपयोग नाहीये निसर्गाने तो फरक बनवलेला आहे पोर शेवटी बाईलाच होणार आहे आणि आई पण तुमच्याकडेच येणार आहे…! सौजन्याने वागणे यात पहिल्यांदा सौजन्य म्हणजे काय शिकवावे लागेल अशी अवस्था आली आहे. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे कोणती निष्ठा कोणावर दाखवत आहे या देशात राहून दुसऱ्या देशावर निष्ठा आहे तुमची प्रतिज्ञा.. या देशांमध्ये खूप आराजक आहे ..राजकारण फार आहे …पैसे फार मिळत नाहीत… जगण्यासाठी संघर्ष आहे… हे लक्षात घेऊन आपल्या ज्ञानाचा विकास करायचा या उदात्त हेतूने अन्य राष्ट्रात पलायन करणारी पिढी या राष्ट्राच्या मातीला विसरत चाललीये आई बापाला विसरलेली आहे ते दुःखी जीव पैशाचा समृद्ध लाटेवर अगतिकतेने जगताना पाहिल की वाईट वाटतं. बासरी वाजून उंदीर पळून लावणाऱ्या जादूगारासारखी आपली पोर इतर देशात पळवून नेलीत आणि त्यांचे आईबाप त्यांच्या प्रेमाला पारखे झाले… माता पिता गुरुजन वडीलधारी मंडळी हे सर्व शब्द आता डिक्शनरीत राहतील. 

माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे हे प्रतिज्ञाचे शेवटचे वाक्य बघ …!देशभक्त हे शब्द हद्दपार झाले पूर्वी पत्रं यायची लोकांना तर मागे दे.भ. असे ती सर्वात मोठी डिग्री होती दे. भ. म्हणजे देशभक्त अमुक तमुक आता अशी डिग्री माग असणारा कोणी दिसतो का तुला? …डिगऱ्या सगळ्या पुढे आणि माणसं राहिली माग ..!आतंकवादी, चुकीचे काम करणाऱ्या असंख्य लोकांना आपल्या घरात असरा देणारी माणसं, चुकीच्या मार्गाने पैसे कमावणारी माणसं, देशाचा कर बुडवणारी माणसं, फुकट्या सवलती उपटणारी माणसं,

कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारे राजकारणी, लोकांची जीवाची पर्वा न करता बिल्डिंग बांधणारे कंत्राटदार, निसर्गाचा ऱ्हास करून बांधकाम उभे करणारे ठेकेदार, नद्याचा नाला करून नद्याच गायब करणारे जादूगार यांनी ही प्रतिज्ञा म्हणली नसेल का ग? हे सगळं विसरायला लावणारे वरवरचे शिक्षण काय उपयोगाचं..? शिक्षण आणि शिस्त रक्तात भिनली पाहिजे… असेल खूप काही चांगले घडत असेल मी नाही म्हणत नाही …पण अलीकडे देशात घडणारे अनेक प्रसंग पाहून उद्विग्नता आली आहे हे मात्र खरे…!

.. प्रतिज्ञे झालं तुझं सांगून… प्रतिज्ञा आता माझं ऐक .. एवढी निराश होऊ नकोस. देशासाठी गोल्ड मेडल मिळाल्यानंतर डोळ्यात घळाघळा पाणी आणणाऱ्या भारतीय महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जिंकण्याचा जल्लोष मातीवर डोकं टेकवून रडण्यात करणारी हीच मुलं आहेत. नवनवीन शोध लावणारी काळ्या आईत राबवून क***** बे भरवशाची शेती करणारी तरुण पोरं आहेतच की …रस्त्यावर चहाची गाडी लावून चहा विकून आपला उदरनिर्वाह करणारी …अशी स्वतःच्या उद्योगाची निर्मिती करणारी तरुण पोरं आहेतच ना …अनाथ आश्रम स्वतःहून चालवणारे समाजसेवक आहेत …वृद्धाश्रम श्रद्धेने चालवणारे समाजसेवक आहेत… गरिबांच्या पोरांना शिक्षणाबरोबर संस्कार मिळावा म्हणून मोफत शिकवणी घेणारे मास्तर अजून आहेत …अन्नदान करणारे आहेत, देहदान करणारे आहेत, रक्तदानकरणारेआहेत, …दुर्जनांच्या रांगेत जसे आहेत तसेच सज्जनांच्या रांगेतही खूप जण उभे आहेत रस्त्यावरच्या लेकराला उचलून आणून आपलं लेकरू म्हणून सांभाळणारी पाळणाघर आहेत ती चालवणार्या आया आहेत…! काळ्या, शेंबड्या पोराचा मुका घेणारी आई जोपर्यंत या देशात आहे ना तोपर्यंत इथली कुटुंब संपणार नाहीत… माया संपणार नाही …आणि संस्कार ही संपणार नाहीत..! क्लास वाले कितीही उदंड होत देत ज्ञानदान करणाऱ्या आणि संस्कार देणाऱ्या मातृभाषेतल्या शाळा टिकणार आहेत …तर तू अशी तुझं पान सोडून जाऊ नकोस शपथ आहे तुला… तीही एका शिक्षकाची…! तू सोडून गेलीस ना तर ही पिढी घडवणाऱ्या आम्हा सगळ्यांचा विश्वास संपेल!…जा परत जा पुस्तकाच्या पहिल्या पानावर विराजमान हो..तू ही रक्तात भिनशील … लक्षात ठेव… 

मी डोळे पुसले आणि प्रतिज्ञा पुन्हा पानावर होती मी तिचे मोठ्यांदा वाचन करू लागले .. .. .. 

‘भारत माझा देश आहे…!’🇮🇳

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“माऊलींची माया हाये ओ आमच्यावर. ती तुमास्नी नाय कळायची. ” असं तो म्हणाला अन् डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रूंचे दोन चार थेंब ओघळले. समोर माऊलींच्या तळावर तंबूचे कळस दिसत होते अन् त्या कळसांकडे पाहून हात जोडून तो आनंदानं रडत होता. नेमकं काय घडलं होतं, ते त्याला अन् माऊलींनाच ठाऊक. त्यांचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाशी त्यांचं काही ना काहीतरी नातं असतंच.

“त्यांच्यामुळं तरलो बगा यंदा. ” असं म्हणत त्यानं हात जोडले. माझ्याकडं लक्षच नव्हतं. त्याचं आपलं स्वतःशीच बोलणं सुरु होतं. तो इतका भावूक झाला होता की, कुणी नुसता स्पर्श जरी केला असता तरीही त्याच्या भावनांचा बांध फुटला असता.

माऊलींशी आणि तुकोबारायांशी असा भावनिक संवाद साधणारे कितीतरी वारकरी आपल्याला दिसतील. इतक्या सहजतेनं ते माऊलींशी मनातलं सगळं सगळं बोलतात, सुख-दुःखाच्या गूजगोष्टी करतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांचा सल्ला घेतात, कधी कधी त्यांच्यावर रागावतात सुद्धा. पण हेही तितकंच खरं आहे की, त्यांना त्या संवादातून मार्ग सापडतात, प्रश्नांची उत्तरं मिळतात, रस्ते दिसतात, आपल्या हातून जाणते- अजाणतेपणी घडलेल्या चुकांची जाणीव होते. अशावेळी, पटकन क्षमा मागून मोकळेही होतात.

वारी हा स्वतःला अधिकाधिक निर्मळ, अधिकाधिक सात्विक करण्याचा एक प्रवास आहे. शुद्ध सकारात्मक वातावरणात महिनाभर राहण्याचा अनुभव मोठा विलक्षण असतो. अत्यंत साध्या जीवनशैलीत राहायचं, पहाटेपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जगण्याचं शहाणपण शिकवणाऱ्या संतांच्या अभंग रचना गात गात चालायचं, निश्चित वेळी मोजकं आवश्यक तितकंच खायचं, आवश्यक तेवढंच पाणी घ्यायचं, संपूर्ण स्वावलंबी आयुष्य जगायचं, आपल्यापासून कुणाला उपद्रव त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घ्यायची, तोंडून चुकून सुद्धा एकही अपशब्द येऊ द्यायचा नाही, ऊन- वारा- पाऊस- थंडी जे जे अनुभवाला येईल ते गोड मानून घ्यायचं, कुठल्याही अपेक्षांमध्ये अडकून पडायचं नाही, असं जगणं आपल्या जगण्याचा पाया दिवसेंदिवस भक्कम करत जातं.

रोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी थांबलं की, पालखी तळावर कीर्तन असतं. आपण एकटेच असतो. दिवसभर चालून पाय थकलेले असतात. पण मन मात्र थकलेलं नसतं. अशावेळी साध्या पण अत्यंत मार्मिक संतवचनांमधून जगण्याचं प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांच्या प्रासादिक वाणीचा प्रभाव पडतोच. संतांची चरित्रं उलगडली जातात. पुस्तकी साक्षरता आणि प्रत्यक्ष जगण्यासाठी लागणारी मूल्यं यांच्यात किती फरक असतो, याची जेवढी अनुभूती कीर्तनातून होते, तेवढी अन्य कोणत्याही माध्यमातून होणं कठीण. आपण माणूस म्हणून स्वतःमध्ये आणखी किती सुधारणा करायला हवी, याची फार रोखठोक जाणीव कीर्तनकार करुन देतात. कीर्तनानंतर हरिपाठ झाला की, धरणीवर अंग टाकून द्यायचं. एका क्षणात आपण निद्रादेवीच्या अधीन होतो. वारीच्या वीस दिवसांत जशी गाढ झोप लागते, तशी पुन्हा वर्षभर लागत नाही, असा अनुभव तुम्हाला कित्येकजण सांगतील. म्हणूनच, आपली विस्कटलेली आयुष्यं अन् चुकलेली जीवनशैली ताळ्यावर आणण्यासाठी वारी केली पाहिजे.

“काय झालं माऊली? ” मी अगदी शांतपणे विचारलं.

“काय नाय ओ. माऊलींनी माजं भिजत पडलेलं घोंगडं निस्तारलं बगा. ” तो रडत म्हणाला.

“कसलं घोंगडं? ” मी विचारलं. वारीत मुक्कामाच्या जागी असा संवाद होतोच. पण, एक फार मोलाची आणि आपण शिकण्यासारखी गोष्ट माझ्या लक्षात आली की, खरा वारकरी कधीही रडगाणं गात नाही. तोही माणूस आहे, त्यालाही भावना आहेत. पण समस्या, अडचणी यांना आहे तसं स्वीकारुन पुढं पाऊल टाकण्याची एक विलक्षण क्षमता त्यांच्याकडं आहे.

“अवो, पोरगा गेली तीन वर्षं ऐकतच नव्हता. यंदा तयार झाला. ” असं तो म्हणाला, पण मला काहीच उलगडा झाला नाही.

“जरा विस्कटून सांगा की. ” 

“काय नाय. बारावीला दोनदा नापास झाला. मी त्याला सांगत हुतो, आपल्याला जे जमंल ते करावं. उगं दुसऱ्यानं अमकं केलं म्हंजे आपनही त्येच करायला जाऊ नये. पन ऐकायला तयारच नई. “

“मग? “

“मी लई गोष्टी सांगून बघितल्या. इलेक्ट्रिक काम शिक, मोटार मेकॅनिकी शिक, टेलरिंग शिक. पन ते काय त्येला समजत नव्हतं. त्येच्या डोक्यात एकच खूळ – फॉरेनला जायचं अन् भरपूर पैसा मिळवायचा. ” 

“पण हे फॉरेनचं अचानक कुठून आलं डोक्यात? ” 

“अवो, मोबाईलवर काय ते बघायचं अन् तेच धरुन बसायचं. फॉरेनला जाऊन मोठ्या हॉटेलात काम करतो असं म्हनायचा. आता माजी धा एकर शेती, वीस पंचवीस जनावरं हयेत. एक पिठाची चक्की हाये. एक दुकान गाळा भाड्यानं दिलाय. उन्हाळ्यात ऊसाचं गुऱ्हाळ असतंय. डेअरीला दूध घालतो. थोडीफार तरकारी केली तर ती विकतो. आजून काय पायजेल सांगा. “

एक मिनिटभर मला काही कळलंच नाही. माझ्या शेजारी साध्या प्लॅस्टिकच्या कागदावर बसलेला तो माणूस. पायात साधी चप्पल, शेजारी एक कपड्याची पिशवी. दोन जोड कपडे, एक पंचा, एक पांघरुणाची गुलाबी शाल, एक टाळ एवढ्यावर पंचवीस दिवस पायी प्रवास करणारा एकदम कॉमन मॅन. त्याचं वार्षिक उत्पन्न बारा-चौदा लाख रुपये असेल असं मलाच काय, पण कुणालाच खरं वाटलं नसतं.

“पण मग हा तिढा सुटला कसा? “

“असल्या गोष्टीत घाई करुन उपयोग नसतोय, हे मी आमच्या मंडळीला अगोदरच सांगितलं होतं. त्यामुळं, घरी आमी त्याला काय टोचत बिचत नव्हतो. एक दिवस मी आमच्या चक्कीवर बसलो होतो. मनात विचार आला, हा गुंता माऊलींना सांगाया पायजे. घरी बोललो. दुसऱ्या दिवशीची एसटी धरली अन् पोराला घेऊन आळंदीला गेलो.” 

“मग? “

“देवापाशी डोकं टेकीवलं अन् अजानबागेपाशी सावली धरुन बसलो. मी पोराला म्हनलं, ‘हे काय खरं नाय गड्या. दोन वर्षं झाली, आपन अडकलोय. काई तरी तोड काडली पायजेल. मला काय वाटतं तुला सांगू का? ‘” 

“मग पोरगा काय म्हणाला? ” 

“पोरगा म्हनला ‘सांगा.’

“मी म्हनलं, भायेर जाऊन नोकरी करायची, यापतुर आपलंच कायतरी सुरु करु. हा अभ्यास काय तुला झेपत नई. मग कशाला वेळ काढायचा? मी म्हनलं, ते पोराला पटलं. इचार करु म्हनला. ” 

“मग जमलं का? “

“जमलं तर. दुसऱ्या दिवशी गडी एकटाच कॉलेजात गेला. बारावीला बाहेरुन बसायचा फॉर्म भरला. विषय बदलले. त्येचं तेनीच केलं. कॉलेजातले सर म्हनले, कुठं काय अडलं तर मी सांगतो. कामच झालं. रोज संध्याकाळी मी डेअरीला दूध घालून येईस्तोवर चक्कीवर बसायचा. दुपारी अभ्यास करायचा. “

“व्वा. चांगलं झालं की माऊली. तुमचं टेन्शनच गेलं. ” मी म्हटलं.

“तर ओ. फेब्रुवारीत परीक्षा पार पडली. दुसऱ्या दिवसापासून आमच्या एका मित्राच्या हॉटेलात त्येच्या हाताखाली कामाला जायला लागला. वडे, भजी, पुऱ्या तळायला शिकला. दीड दोन महिन्यात चांगला तयार झाला. लग्नसराई जोरदार सुरु होती. मसालेभात, रस्सा करायला शिकला. चांगला खुश असायचा. रात्री दमून भागून येऊन गाढ झोपायचा. त्येच आमचं सुख. ” 

मी एकदम गहिवरुन गेलो. कुणालाही न लुटता, न लुबाडता, खोटारडेपणा फसवाफसवी न करता, इमाने इतबारे कष्ट करुन, आपलं पोरगं दमून गाढ झोपलंय, यातच सुख मानणारा बाप मी बऱ्याच वर्षांत पहिल्यांदाच बघत होतो. सरळमार्गानं जग अन् हवा तेवढा मोठा हो, एवढीच अपेक्षा होती त्याची. “जिथे राबती हात तेथे हरी” इतकाच त्या वडिलांचा साधा सिद्धांत..!

बऱ्याचदा मुलांच्या त्यांच्या आयुष्याविषयीच्या अवास्तव अपेक्षा तयार होतात, त्याला कारणीभूत असतात पालकच..! पण इथं प्रकरण उलटं होतं.

“बारावी सुटला की नाही? ” माझी उत्सुकता तिथंच घुटमळत होती.

“सुटला? चांगल्या मार्कानी सुटला. साठ टक्के पडले. स्वतःच्या हातानं शिरा केला, सगळ्याना खाऊ घातला. आता दिवसभर हॉटेलात काम करुन नाईट कॉलेजात शिकायचं म्हनतोय. तर आपन कशाला अडवा? चांगलंच ठरवलंय त्यानं. “

“हे सगळ्यात बेस्ट. काम करत करत शिकलेलं चांगलं. त्याचं त्याला जाणवलं, हेच सगळ्यात महत्त्वाचं. पण मग आता डोळ्यात पाणी कशाला आणताय? ” 

“मी तुमाला काय म्हनलं, माऊलींची माया हाये आमच्यावर. इतरांना ती कळायची न्हाई. यंदा वारीला निघालो. आठ तारखेला प्रस्थान. मी तीन दिवस आधीच जात असतो, पन यावर्षी पाऊस जोरदार झाला. आळंदीला कुठनं जानार? पुन्यातच थांबायचं ठरत होतं. तर आमचा लेक आला पुढं अन् म्हनला, मी येतो दिंडीत. आचाऱ्याच्या हाताखाली काम करीन. मी कशाला नाई म्हनतोय? म्हनलं चला. पोरगं मार्गी लागतंय. आज रात्रीचा दीडशे मानसांचा पिठलं भाताचा सैपाक त्येनं एकट्यानं केलाय. सगळी दिंडी जेवून झोपली. नंतरच दोन घास खाऊन झोपलाय बगा तिथं. आता पहाटं तीनाला उठून चहा करंल. ” 

मी मागं वळून बघितलं. सामानाच्या ट्रकबाहेर एक विशितला पोरगा बसल्याजागी गाढ झोपून गेला होता..

“आपन एकदा त्यांना मनातलं सांगितलं की, मार्ग काढायची जबाबदारी त्यांची. ते बरोब्बर वाट दावत्यात. बसल्याजागी काय सुदा मिळत नाई ओ. आता पोरगं फॉरेनला जाईल नायतर नाई जाईल, पन आज घाम गाळाया शिकलं ना.. हुईल की तयार हळूहळू. बाकी काय का असंना, आज मोबाईल मधून भायेर आला, काम कराया लागला. परीक्षा पास झाला. आपनहून वारीला आला. आता देवानं अजून काय द्यावं म्हनता? सांगा.. “

विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । 

रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ 

*

उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । 

रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ 

*

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । 

तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ 

*

ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । 

नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

 हा माऊलींचा शब्द त्यांनीच सकळ सिद्ध करुन दाखवला. गुरु आपल्याला आपला हात धरुन योग्य वेळी योग्य मार्गे नेतातच, याची खात्री पटण्यासाठी आणखी दुसरा कुठला दृष्टांत हवा?

“चित्ती असो द्यावे समाधान” चा खरा अर्थ मला माऊलींच्याच तळावर माऊलींच्याच समोर साक्षात अनुभवायला मिळाला होता. शिबी आणि मिडास दोघेही राजेच होते. पण शिबी राजाला त्याचं कर्तव्य पूर्ण समजलं होतं अन् मिडास राजा मात्र सोन्याच्या मोहातून बाहेरच येऊ शकला नाही. जितक्या कमी अपेक्षा, जितक्या कमी महत्त्वाकांक्षा, तितकं समाधान जास्त.. दोघांपैकी कुणाची निवड करायची, याचा निर्णय आपणच घ्यायचा. मी शिबी राजाची निवड केली. माऊलींच्या सहवासात, त्यांच्या प्रकाशात…

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares