सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…” –  माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ सुश्री प्रभा हर्षे

भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…

हे आहे भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन, येथून उतरून पायी चालत गेल्यास प्रवासी तीन मोठ्या तीन देशात पोहोचतात !

तुम्हाला माहीत आहे का, भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक कोणते आहे? हे स्थानक एकाच वेळी तीन देशांना जोडते, आणि या स्टेशनवर उतरून जर तुम्ही पायी चालत गेलात, तर थेट परदेशात पोहोचाल ! चला, जाणून घेऊया हे अनोखे रेल्वे स्थानक कोणते आहे.

ते आहे, भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक – सिंहाबाद स्टेशन

भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक पश्चिम बंगालमधील सिंहाबाद रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक बांगलादेशच्या सीमेलगत स्थित आहे. जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले, तेव्हा हे स्थानक जसे होते, तसेच आजही आहे.

पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक सुरू होती, परंतु सध्या प्रवासी गाड्यांसाठी हे स्थानक बंद आहे. येथे केवळ मालगाड्यांची वाहतूक केली जाते आणि काही गाड्या थेट बांगलादेशपर्यंत जातात. हे स्थानक पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर परिसरात स्थित आहे.

ब्रिटिशकालीन वारसा :

सिंहाबाद रेल्वे स्थानक ब्रिटिश काळात बांधण्यात आले होते. आजही येथे कार्डबोर्ड तिकिटे पाहायला मिळतात, जी आता इतर कोणत्याही रेल्वे स्थानकावर वापरली जात नाहीत. येथे अजूनही हाताने नियंत्रित सिग्नल गिअर्स, ब्रिटिश काळातील टेलिफोन आणि उपकरणे वापरली जातात.

या रेल्वे स्थानकावर एक छोटे कार्यालय, दोन रेल्वे क्वार्टर आणि कर्मचारी कार्यालय आहे. विशेष म्हणजे, येथे “भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक” असा एक फलक लावण्यात आला आहे,

तीन देशांना जोडणारे अनोखे स्थानक:

सिंहाबाद रेल्वे स्थानकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथे उतरून जर तुम्ही पायी चालत गेलात, तर तुम्ही थेट तीन देशांत प्रवेश करू शकता.

ते देश म्हणजे – – 

  1. बांगलादेश
  2. नेपाळ
  3. पाकिस्तान

ही भारतातील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक रेल्वे लिंक असून, आजही ती भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालवाहतुकीसाठी वापरली जाते.

उर्वरित भारताशी संपर्क कमी:

पूर्वी कोलकाता-ढाका रेल्वे मार्गाचा एक भाग म्हणून सिंहाबाद स्टेशनला महत्त्व होते. मात्र, सध्या येथून कोणतीही प्रवासी रेल्वे धावत नाही. त्यामुळे हे स्थानक निर्जन आणि शांत बनले आहे.

हे स्थानक ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, या स्थानकाने अजूनही ब्रिटिशकालीन आठवणी जपून ठेवल्या आहेत.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted