सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कन्येला वडिलांचे गोत्र का मिळत नाही?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

 – – – एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण…

आपल्याला माहीत आहे की स्त्रियांमध्ये XX गुणसूत्रं आणि पुरुषांमध्ये XY गुणसूत्रं असतात.

जेव्हा संतती होते….

जर पुत्र झाला तर त्याचे गुणसूत्र XY असतात. यातलं Y गुणसूत्र केवळ वडिलांकडूनच येते, कारण आईकडे Y गुणसूत्र नसते.

जर कन्या झाली तर तिचं गुणसूत्र XX असतं.

एक X वडिलांकडून आणि दुसरं X आईकडून येतं.

०१ XX गुणसूत्र (कन्या)

कन्येमध्ये असलेले दोन X गुणसूत्र आई-वडिलांकडून मिळतात. हे दोन्ही गुणसूत्र “cross over” नावाची एक प्रक्रिया करतात, ज्यात दोन्ही गुणसूत्रांची अदलाबदल होते. त्यामुळे एकमेकात मिश्रण होते.

०२ XY गुणसूत्र (पुत्र)

पुत्रामध्ये Y गुणसूत्र वडिलांकडूनच येते. XY मध्ये असमानता असल्यामुळे फक्त 5% cross over होतो आणि Y गुणसूत्र जवळपास 95% जसंच्या तसं (intact) राहते त्यामुळे हे गुणसूत्र वडिलांकडून तंतोतंत आलेलं असतं.

गोत्र प्रणाली आणि Y गुणसूत्र 

गोत्र ही वैदिक प्रणाली Y गुणसूत्र वर आधारित आहे. म्हणजेच, जेव्हा एखाद्याचं गोत्र कश्यप असतं, तेव्हा त्याचं Y गुणसूत्र “कश्यप ऋषी” पर्यंत मागे जातं.

कारण स्त्रियांमध्ये Y गुणसूत्र नसते, म्हणूनच विवाहानंतर तिला नवऱ्याच्या गोत्रात समाविष्ट केलं जातं.

सगोत्र विवाह वर्ज्य का?

जर दोघांचं गोत्र एकच असेल, तर त्यांच्या पूर्वजांमध्ये एकच ऋषी असतो म्हणजेच ते एकाच कुटुंबातून आलेले असतात त्यामुळे त्यांना बंधुभगिनी मानलं जातं.

आजच्या जनुकशास्त्र (Genetics) नुसार सुद्धा, एकसारखी जनुके असलेल्या व्यक्तींमध्ये विवाह झाल्यास, त्यांच्या संततीमध्ये मानसिक/शारीरिक अपंगत्व, गंभीर आजार यांसारख्या अनुवांशिक दोषांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे सगोत्र विवाह वर्ज्य केला आहे.

मुलगा व मुलगी DNA चे प्रमाण

पुत्रामध्ये वडिलांकडून 95% आणि आईकडून 5% DNA येतो.

कन्येमध्ये आई-वडिलांकडून 50-50% DNA येतो.

जर कन्येलाही कन्या झाली, आणि पुन्हा तिलाही मुलगी झाली, तर सातव्या पिढीपर्यंत वडिलांचा डीएनए केवळ 1% राहतो. म्हणजेच, वडिलांचा Y गुणसूत्र वारसा फक्त पुत्रा मार्फत टिकतो.

सात जन्मांचा संबंध :

वडिलांचं Y गुणसूत्र सतत पुत्रापासून पुढे जात राहतं. त्यामुळे DNA वारसा अमर राहतो आणि हेच सात जन्मांचं नातं दर्शवतं. म्हणूनच पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात कारण आपण त्यांच्या गुणसूत्रांचे वाहक असतो.

कन्यादानाचा अर्थ :

कन्यादान म्हणजे कन्येला वस्तू मानणं नाही, तर हे एक वैज्ञानिक संस्कार आहे. विवाहासाठी कन्या गोत्रमुक्त केली जाते म्हणजे ती वडिलांच्या गोत्रातून बाहेर पडते आणि नवऱ्याच्या गोत्रात समाविष्ट होते.

विवाहित स्त्री नवऱ्याच्या वंशाला रजदान (Monthly Menstrual Cycle द्वारे) करते म्हणजे ती त्या वंशाच्या संततीची माता होते. त्यामुळे माता म्हणून तिचा सन्मान केला जातो.

निष्कर्ष :

हिंदू गोत्र परंपरा ही विज्ञानाशी सुसंगत आहे. गोत्र ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून, त्यामागे दीर्घकालीन अनुवांशिक शुद्धता राखण्याचं अत्यंत परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे ज्याचं ज्ञान आपल्या ऋषींनी विज्ञानाच्या आधुनिकतेपूर्वीच दिलं होतं.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted