सुश्री संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “विचारांचे विश्लेषण.. का गरजेचे??…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

*मी जे कष्ट केले ते माझ्या मुलांना करायला लागू नये. * – – हा विचार बरोबर आहे का??

अजय, ताई भाऊजींचा एकुलता एक मुलगा. ताईचा परिवार मध्यम परिस्थितीचा. भाऊजी स्वभावाने खूप चांगले, सांपत्तिक स्थिती मात्र बेताचीच. पण ताई अजयला काही कमी पडू नये, याची भाऊजी नेहमी काळजी घ्यायचे. सगळी बचत स्वतः वरच करायचे. एकंदरीत मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. अजयच्या शिक्षणासाठी नेहमी लक्ष दयायचे. तो म्हणेल तशी मदत करायचे.

अजयने पण कधी हट्ट केला नाही. छान अभ्यास केला. इंजिनीअर झाला. आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी करतोय. •••

ताई शांत स्वभावाची होती. कधी तक्रार केली नाही. पण अनेक लहान सहान इच्छा तिच्या राहूनच गेल्या. •••

अजयने घरात नेहमी पैशाची चणचण बघीतली म्हणून त्याची एक वेगळयाच प्रकारची मानसिकता तयार होत गेली. •••

“मी खूप पैसे कमवेन. माझ्या परिवाराला खूप आनंदात ठेवेन‌. माझ्या मुलाला काही कमी पडू देणार नाही. एवढा पैसा एकत्र करेन की माझ्या सारखे कष्ट करायची गरज त्याला पडणार नाही. वगैरे वगैरे तो नेहमी म्हणत असे. “

भाऊजी यावर काहीच बोलत नसत. त्यांचा conscious clear होता. त्यांचे जेमतेम शिक्षण, त्यानुसार नोकरी आणि त्याच प्रमाणात त्यांनी प्रामाणिक कमाई आयुष्यभर केली. कष्ट केले. काटकसर केली. त्यांना माहीत होते, ••• अजयचा प्रगतीचा मार्ग म्हणजे त्याच शिक्षणच आहे. त्याकडे त्यांनी लक्ष दिल. तेथे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष केले नाही. ••• 

आपली बौद्धिक, सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण हे एक अचूक आणि प्रभावशाली शस्त्र आहे. हे भाऊजी समजून ह़ोते. अजयने पण मेहनत केली. आणि आज त्याचे परिणामही दिसतायेत. •••

बरोबर आहे 

Patience and hard work is a key that connects efforts to success.

मग अजयचे हे विचार, •••

“मी जे कष्ट केले ते माझ्या मुलाला करावे लागू नये ” •••

ते बरोबर आहेत का??

आज त्याच्या मेहनतीनेच तो या स्टेजवर पोहचला आहे. •••

कष्ट करून मिळालेल्या पैशाचे महत्व आणि किंमत तो ओळखून आहे. •••

आणि असा किती पैसा जमवून ठेवणार आहे अजय? म्हणजे आयुष्यभर मुलाच्या हातात त्याला जे लागेल, तो जे मागेल ते देणार का?

पैसा वापरायची आणि सांभाळायची अक्कलही असावी लागते. •••

मुलांना खर्च करायची सवय लागेल, पण पैसा कमवायची आणि पैसा कुठे आणि कसा वाचवायचा?? हे शिकणे राहून जाईल. •••

अजयच्या तुलनेत त्यांच्या मुलाची परिस्थिती चांगलीच राहणार आहे. •••

जेंव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून आपण जातो तेव्हा आपली मानसिकता तयार होत असते. ‍•••

म्हणतात ना, ••••

“Reactions r based on one’s past memories, but conclusion and Response is a conscious process in present moments. “

आज ताई म्हणाली, •••

अरे अजय!! तुझे असे विचार मला पटत नाहीत. आपण कोणत्या आई वडीलांच्या पोटी, कोणत्या देशात, कोणत्या सामाजिक परिस्थितीत जन्म घ्यावा?? हे आपल्या हातात नसतच. •••

आपल्या घरात खूप आधुनिक सुखसोयी नव्हत्या. म्हणजे अगदी तुला अभ्यासासाठी वेगळी खोली वगैरे नव्हती. तुला तबला शिकायचा होता पण तो खर्च आपण करू शकत नव्हत़ो. हे मान्य आहे. परंतु तुझ्या मेहनतीने तू चागला शिकला. आज आपली परिस्थिती चांगली आहे. कष्ट केल्याशिवाय हे सर्व घडल का? •••

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कस वागाव? , कस जगाव? याचे प्रशिक्षण / धडे आपल्याला कष्ट केल्यावर, चालताना पडल्यावर, आयुष्यात नकार ऐकल्यावर, अपयशाचा सामना झाल्यावर होणाऱ्या दुःखामुळेच शिकायला मिळतात. •••

तुम्ही मानसिक दृष्ट्या मजबूत होता.

मानसिक सामर्थ्य हा एक महत्वाचा गुण आहे. आयुष्यात येणारे अडथळे, संकट अपयश यांना सामोरे जाण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता असलीच पाहिजे. आपले भावनिक व्यवस्थापन करता आले पाहिजे. शाळा कॉलेजचा अभ्यास, डिग्री नोकरीसाठी आवश्यक आहे. परंतु अनुभवांची ठोकर लागल्याशिवाय आयुष्याचं गणित सोडविता येत नाहीत. •••

Psychology of adjustments should be taught in every branch of learning from childhood. •••

आज तुझी प्रगती बघून आम्हाला आनंद आहे. आपली मुल आपल्या पेक्षा दोन पावलं पूढे गेली ही आई वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट असते.

तू खूप पैसे कमव. परंतु आपल्या मुलांना कष्ट करायची सवय असलीच पाहिजे. तुझ्या पेक्षा दोन पावलं पुढे जायला त्याला तू आधार नक्की दे. त्यांना नाही ऐकायची सवय असलीच पाहिजे. •••

खरतर तूझे स्वकर्तुत्वाने मिळालेले यश हीच गोष्ट तुझ्या मुलांसाठी प्रेरणा असेल. •••

किती तरी मोठे बिझनेस मॅन, खेळाडूंनी शुन्यातून स्वतः चे जग तयार केले आज त्यांच्या यशोगाथांची उदाहरण देतात. हे सर्व मेहनतीशिवाय झाले का?? •••

आयुष्यातील लहान संकटे, पूढे येणाऱ्या मोठया संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळण्यासाठीच निर्मित झालेली असतात. ••

वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो. त्या काळात एवढे शिकायला मिळते की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. •••

मुलांना आधार द्यावा, जमेल तेवढ्या सुखसोई द्यावा. परंतु पैशाची किंमत आणि कष्टाची सवय त्यांना असलीच पाहिजे. •••

तेंव्हा तुझे विचारांचे विश्लेषण कर. विचार कर.

बघ पटतंय का?

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted