सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्री…  ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

ठाम रहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही,

स्वतःवर विश्वास असला की,

जीवनाची सुरूवात कुठूनही करता येते.

 

कोणतेही नाते निभावताना,

समोरच्याच्या मनातील,

आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते.

विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतो.

नाही तर आपण नाते फुलवत राहतो,

आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो.

 

दरवळ महत्त्वाची…

कारण दरवळ अविस्मरणीय असते,

मग ती फुलांची असो,

वा माणसांची…

 

हसतच कुणीतरी भेटत असतं,

नकळत आपल्यापेक्षाही आपलंसं वाटत असतं,

केव्हा कोण जाणे,

मनात घर करुन राहत असतं.

 

ते जोपर्यंत जवळ आहे.

त्याला फुलासारखं जपायचं

असतं,

दूर गेल्यावरही आठवण

म्हणून,

मनात साठवायचं असतं,

याचंच तर नांव,

“मैत्री”असं असतं..!!

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments