? वाचताना वेचलेले ?

☆ बावन पत्ते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

५२ पत्ते … या बद्दल आजवर वाईट किंवा फार तर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल. पत्त्यांचा खेळ म्हटला, की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही… म्हणजे यापलीकडे आपण विचारही करत नाही. पण त्यापलीकडे पत्त्यांविषयी खूप काहीही जाणून घेण्यासारखे आहे………

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लॅस्टिकचे बनविलेले असतात.

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो. पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात. तर…….

1) हे 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे.

2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतू….. प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.

3) या सर्व पत्त्याची बेरीज 364

4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.

5) 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.

6) 52 पत्यातील 12 चित्र पत्ते. म्हणजे 12 महिने

7) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश.

2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश

3) चौकी म्हणजे चार वेद  (अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद)

4) पंजी म्हणजे पंच प्राण  (प्राण, अपान, व्यान, उदान, समान)

5) छक्की म्हणजे षड रिपू  (काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ)

6) सत्ती- सात सागर

7) अटठी- आठ सिद्धी

8) नववी- नऊ ग्रह

9) दसशी- दहा इंद्रिये

10) गुलाम- मनातील वासना.

11) राणी- माया.

12) राजा-सर्वांचा शासक.

13) एक्का- मनुष्याचा विवेक.

14) समोरचा भिडू – प्रारब्ध.

 मित्रांनो, लहानपणा पासून पत्ते बघितले असतील. काहींनी खेळले असतील; परंतु त्या पत्त्यांच्या संचाबद्दल माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!

नवरा बायको — पहिली पिढी

2) मुलं (सख्खी भावण्डं) — दुसरी पिढी —आई वडलांकडून 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसूत्रे share करतात.

3) तिसरी पिढी — नातवंडे — पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसूत्रे share करतात.

4) चौथी पिढी — पहिल्या पिढीचे 12. 5% गुणसूत्रे share करतात.

5) पाचवी पिढी — पहिल्या पिढीचे 6. 25% गुणसूत्रे share करतात.

6) सहावी पिढी — पहिल्या पिढीचे 3. 12 % गुणसूत्रे share करतात.

7) सातवी पिढी — पहिल्या पिढीचे 1. 56% chromosome share करतात.

8) आठवी पिढी —पहिल्या पिढीचे < 1% share गुणसूत्रे करतात.

म्हणून मूळ पुरुष, जोडप्यापासून सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्यजात गुणसूत्रीय आजारांची शक्यता असते. अनेक समाजात मामाच्या मुलीशी विवाह करतात. पण धार्मिक/ वैज्ञानिक दृष्टीने निषिद्ध आहे.

आठव्या पिढीपासून नातं, भाऊबंदकी मानत नाहीत.

म्हणून पती-पत्नी चं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.

तीन पिढ्या सपिंड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.

आणि सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात. !!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments