सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ आज यमद्वितीया…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

यमही आपल्या बहिणीकडे जातो आणि यमीकडून औक्षण करतो. बदल्यामधे आजच्या दिवशी कुणा भावाला मरण नाहीच पण भावासाठी दीर्घायूचे वरदान. ही धारणा.

पण आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे समजून सगळ्यांसाठीच चांगले वरदान मागता येईल ना? हेच ज्ञानेश्वरांसारखे पसायदान होऊ शकेल ना?

मग ज्यांना भाऊ नाही त्यांनीच फक्त चंद्राला ओवाळायचे या पेक्षा सगळ्या बांधवांपर्यंत जाता येत नाही म्हणून या एका वैश्विक बंधूला औक्षण केले तर सगळ्या बांधवांपर्यंत हे औक्षण जाईल ना? अगदी मनापासून केलेली प्रार्थना सगळ्यांपर्यंत पोहोचेल ना?

मनापासूनची केलेली प्रार्थना सकल बांधवांपर्यंत पोहोचल्यावर त्यांचेही बंधुत्व जागृत होईल ना? मग स्त्री दाक्षिण्य, नारी आदर हे आपोआपच आल्यावर आपली संस्कृती जी महानच आहे ती अढळपदावरच धृवतार्‍याप्रमाणे राहील ना?. . . . . दिवाळीचा शेवटचा दिवस गोड होईल ना? आपले सर्व बांधव, जे सीमेवर असतात, जे पोलीस रुपात वावरत असतात जे दुसर्‍यांचा रोग बरा करणंयासाठी रात्रंदिवस झटत असतात आणि जे कोणत्याही पेशात असून कायम आपल्यासाठी समाजासाठी जागृत असतात अशा सगळ्या भावांसाठी माझे आजचे औक्षण आहे. सगळ्याचे केलेले हे स्मरण आहे.

चला नवा जमान्यात नवा विचार करू आणि आजचा भाऊबिजेचा दिवस परिवारापुरता मर्यादित न ठेवता वैश्विक रूप देऊ. … आपल्या महान भारताला समृद्ध आणि प्रेमाच्या ताकदीने सशक्त करू.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted