बिल्वा शुभम् अकोलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जिलेबीवाला… माहिती संकलक : डॉ. डी. डी. देशमुख कामठेकर ☆ प्रस्तुती – बिल्वा शुभम् अकोलकर 

उज्जैनच्या महाकाल मंदिरामागे एक छोटीशी गल्ली होती…

त्या गल्लीत घीसू नावाचा एक हलवाई राहत होता.

तो रोज पहाटे चार वाजता जीलेबी बनवायचा… पण विकण्यासाठी नाही — महाकालांना अर्पण करण्यासाठी.

 

घीसूच्या वडिलांनी 1952 मध्ये दुकान सुरू केलं होतं.

दुकानाचं नाव होतं — “महाकाल जिलेबी”.

दुकान लहान होतं, पण गर्दी प्रचंड असायची.

कारण घीसूची जिलेबीं कुरकुरीत, रसाळ आणि स्वस्त होती.

पण घीसूचा एक नियम होता —

पहिली कढई महाकालांसाठी.

तो रोज पहाटे उठायचा… पीठ मळायचा, पाक तयार करायचा…

आणि पहिली गरमागरम जीलेबी थाळीत सजवून मंदिराच्या मागच्या दरवाजातून पुजाऱ्यांकडे द्यायचा.

भोग लागल्याशिवाय दुकान उघडायचं नाही.

लोक विचारायचे,

“घीसू, धंदा कधी करणार?” 

तो हसून म्हणायचा,

“धंदा तर महाकाल करतात… मी तर फक्त प्रसाद वाटतो. ” 

 

2020 मध्ये लॉकडाऊन लागलं…

मंदिर बंद झालं… गर्दी गायब झाली…

घीसूचं दुकानही बंद पडलं.

कर्ज वाढत गेलं.

मुलगा म्हणाला,

“बाबा, पहिली कढई बंद करा… आधी ग्राहकाला विकूया. ”

पण घीसूने नकार दिला.

तो रोज पहाटे उठून दहा जलेबी बनवायचा…

आणि मंदिराच्या बंद दरवाज्यापाशी ठेवून यायचा.

पुजारी नव्हता… मंदिर बंद होतं…

तरीही तो ठेवायचा.

बायको रागाने म्हणाली,

“घरात पीठ नाही… आणि तुम्ही बंद मंदिरात देवाला जीलेबी चढवताय?” 

घीसू शांतपणे म्हणाला —

“देव बंद नाही… फक्त दरवाजा बंद आहे. ” 

 

कर्जदारांनी धमक्या दिल्या…

घीसूने मोठी कढई विकली.

आता तो तव्यावर हाताने जीलेबी बनवू लागला.

एक दिवस मुलगा म्हणाला,

“मी पुण्याला नोकरीसाठी जातोय. ” 

घीसूने आशीर्वाद देत फक्त एवढंच सांगितलं —

“पहिल्या पगारातून महाकालांना जीलेबी चढव. ” 

 

2021 मध्ये मंदिर पुन्हा उघडलं.

लोकांची गर्दी परत आली.

पण घीसूकडे कढई नव्हती…

तो तव्यावरच जीलेबी बनवत होता.

लोक हसायचे —

“घीसू म्हातारा झाला. ” 

एका सकाळी एक वृद्ध साधू आला…

मळके कपडे, मोठ्या जटा… 

तो म्हणाला,

“जीलेबी खायची आहे. ”

घीसूने गरम जीलेबी दिली.

साधूने डोळे मिटून खाल्ली… आणि हळूच म्हणाला —

“तोच स्वाद…” 

घीसू चकित झाला.

“तुम्ही आधी खाल्ली आहे?”

साधू हसला —

“1978 मध्ये… तुझ्या वडिलांच्या हातची.

मी रोज पहिली कढई खायचो… जेव्हा मंदिर बंद असायचं. ” 

घीसूच्या डोळ्यांत पाणी आलं… 

साधूने झोळीतून एक छोटी पितळी कढई काढली.

“ही ठेव… आता ती तुझी. ” 

घीसूने नकार दिला.

साधू म्हणाला,

“मला आता जीलेबी नाही… मुक्ती हवी आहे. ” तो निघून गेला…

घीसूने कढईत पाहिलं…

आत एक चिठ्ठी होती —

“कर्ज माफ. ” 

त्याच दिवशी कर्जदार आला आणि म्हणाला —

“कोणीतरी तुझं पूर्ण कर्ज फेडलं. ”

घीसूने पुन्हा पहिली कढई सुरू केली.

लोक म्हणू लागले —

“घीसूच्या जलेबीत आता अमृत आहे. ” 

 

एक दिवस तोच साधू महाकालांच्या शाही मिरवणुकीत दिसला…

घीसू धावत गेला… पण तो गर्दीत नाहीसा झाला.

नंतर पुजारी म्हणाले —

“ते साधू नव्हते… महाकालांचे नागा संत होते.

ते फक्त त्या प्रसादाला स्वीकारतात जो कोणत्याही स्वार्थाशिवाय अर्पण केला जातो. ” 

तेव्हा घीसूला समजलं…

त्या दोन वर्षांत बंद दरवाज्यासमोर ठेवलेली जलेबी कुत्रे खात नव्हते… 

 

आज घीसू 68 वर्षांचा आहे.

दुकान मुलगा चालवतो.

पण पहिली कढई अजूनही घीसूच बनवतो… रोज पहाटे चार वाजता.

तो आजही थाळी घेऊन मागच्या दरवाज्यापाशी जातो…

कधी थाळी रिकामी परत येते… कधी भरलेली…

पण घीसू कधी प्रश्न विचारत नाही.

 

लोक विचारतात,

“बाबा, तुमच्या यशाचं रहस्य काय?” 

घीसू हसून म्हणतो —

“जीलेबी गोल असते… तिला ना सुरुवात असते ना शेवट.

धंदाही तसाच असतो…

तुम्ही ग्राहकापासून सुरुवात करता…

मी देवापासून करतो. ” आणि आजही उज्जैनमध्ये पहाटे पाच वाजता महाकालांच्या नैवेद्यात घीसूची जीलेबी चढते… 

पुजारी म्हणतात —

“नैवेद्यात गोडवा नाही चढत…भरोसा चढतो. ” 

 

कारण घीसूने शिकवलं —

“जेव्हा दरवाजे बंद असतात… तेव्हाही अर्पण करणं थांबवू नका…

कारण घेणारा कधीच दरवाज्यातून येत नाही…

“देवावरचा विश्वास खरा असेल… तर बंद दरवाज्यांमागेही तो तुमचं ऐकतो, असं तुम्हाला वाटतं का?

संकलन :- डॉ. डी. डी. देशमुख कामठेकर

पुणे.

प्रस्तुती :  बिल्वा शुभम् अकोलकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted